Saturday, July 27, 2013

मराठवाडयाकरिता कृषि हवामान सल्ला पञिका

भारतीय हवामान विभाग, मुबई यांचेकडून प्राप्‍त झालेल्‍या हवामान अंदाजानुसार, मराठवाडा विभागामध्‍ये आकाश ढगाळ राहून तुरळक ठिकाणी हलका पाउस पडण्‍याची शक्‍यता आहे. कमाल तापमान २६.० ते ३१.० अंश सेल्‍सीअस राहील तर किमान तापमान २१.० ते २३.० अंश सेल्‍सीअस राहील. वारे ताशी १२.० ते २२.० कि.मी. प्रति तास वेगाने नैऋत्‍य-पश्चिम दिशेने वाहतील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८३.० ते ९६.० टक्‍के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ५५.० ते ७९.० टक्‍के राहील.

विशेष सुचना : या आठवडयात  आकाश ढगाळ राहून तुरळक ठिकाणी हलका पाउस पडण्‍याची शक्‍यता आहे.


कृषि सल्‍ला 
  • सोयाबीन - वापसा येताच कोळपणी करून तण नियंत्रण करावे. पानेखाणा-या आळयांचा प्रादूर्भाव दिसून येत असल्‍यास क्विनॉलफॉस २५ टक्‍के २० मिली किंवा क्‍लोरोपायरीफॉस २० टक्‍के २० मिली किंवा इमामेक्टिन बेन्‍झोएट ५ एस.जी.३.५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्‍यातून फवारणी करावी. चक्री भुंग्‍याचा प्रादूर्भाव दिसून येत असल्‍यास डायमेथेएट ३० टक्‍के १० मिली किंवा ट्रायझोफॉस ४० ई.सी १६ मिली किंवा प्रोफेनोफॉस ५० टक्‍के प्रवाही २५ मिली प्रति १० लिटर पाण्‍यातुन फवारणी करावी.  
  • कापूस - वापसा येताच कोळपणी करावी व कोळपणी सोबत नत्राची दुसरी मात्रा हलक्‍या जमीनी २० किलो तर भारी जमीनी ३० किलो प्रति हेक्‍टर द्यावी.
  • केळीचे बागेत पाणी साचुन रहाणार नाही यांची काळजी घ्‍यावी. जुनमध्‍ये लागवड केलेल्‍या केळीचे पिकास ५०० ग्रॅम युरीया प्रति झाड दिला नसल्‍यास देण्‍यात यावा .बागेतील पावसाचे पाणी साचुन राहणार नाही याची काळजी घ्‍यावी. वापसा येताच खुरपणी करून तण नियंत्रण करावे. 
  • डाळींबाचे रोपे तयार करावयाची असल्‍यास झाडावर गुटी कलम करावी. बागेत पावसाचे पाणी साचुन रहाणार नाही याची काळजी घ्‍यावी. नविन लागवड केलेल्‍या कलमांचे खुंटावरील फुट काढून टाकावी. कलमांना काठीचा आधार द्यावा.
  • नविन लागवड केलेल्‍या आंब्‍यामध्‍ये जागेवर मृदुकाष्‍ट कलम करावी. कलमीकरणासाठी परभणी हापूस, केशर, सिंध्‍दू या वाणांची कलम कांडयाचा वापर करावा.  
  • मिरची, वांगे, व टोमॅटो ची पुनर लागवड सरी वरंब्‍यावर करावी. लागवडी पुर्वी रोप बॅविस्‍टीनच्‍या १ टक्‍के द्रावणात बुडवुन घ्‍यावीत. भेंडी, गवार व चवळी या भाजीपाला पिकांची लागवड करावी.
  • पावसाचे अतिरीक्‍त पाणी वाहून नेण्‍यासाठी शेताच्‍या बाजुला गवताचे चर असतात. गवताच्‍या चरांची त्‍वरित दुरूस्‍ती करून द्यावी. चर फुटला असेल तर त्‍याची डागडूगी करून घ्‍यावी. जास्‍त गवत वाढले असेल तर ते कमी करून घ्‍यावे. गवताचा चरातून पुर्णपणे गवत काढून घेउ नये. अन्‍यथा गवताच्‍या चराचीच धूप होउन जाईल. पावसाचे अतिरिक्‍त पाणी गवताच्‍या चरातून सहजपणे वाहून गेल्‍यामुळे शेतातील मातीची धूप आपण रोखू शकतो.
केंद्र प्रमुख
एकात्मिक कृषिहवामान सल्‍ला सेवा योजना
पञक क्रमांकः ३०                                       
दिनांकः २६/०७/२०१३