Monday, July 29, 2013

वृक्षारोपन व संवर्धन काळाची गरज : डॉ. जे. व्‍ही. एकाळे

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ येथील कापूस संशोधन योजना आणि पिक पध्‍दतीच्‍या कृषिकन्‍यांनी परभणी जिल्‍ह्यातील मुरुंबा येथे वृक्षारोपनाचा कार्यक्रम आयोजीत करण्‍यात आला होता.  
कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी सरपंच श्री गोपीनाथराव झाडे, विशेष अतिथी म्‍हणुन शाळेच्‍या मुख्‍याध्‍यापिका श्रीमती कोयाळकर, कृषि सहाय्यक श्री दिपक नगोरे, ग्रामसेवक श्रीमती होनमाने, कृषितज्ञ कुलकर्णीसर, प्रमुख पाहुणे डॉ. प्रा. जे. व्‍ही. एकाळे, डॉ. शेखनुर, समर्थ कारेगांवकर, श्री स्‍वामी, शाळेतील शिक्षकवृंद व समस्‍थ ग्रामस्‍थ मंडळी उपस्थित होते.
    ग्रामीण कृषि कार्यानुभवाचे अंतर्गत वृक्षारोपनाचा कार्यक्रम सहयोगी अधिष्‍ठाता व प्राचार्य डॉ. एन. डी. पवार यांच्‍या सूचनेनुसार आणि विस्‍तार शिक्षण विभागाचे विभाग प्रमुख तथा समन्‍वयक डॉ. बि. एम. ठोंबरे व ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रम प्रभारी  डॉ. राजेश कदम यांच्‍या मार्गदर्शनाने घेण्‍यात आला.
यावेळी डॉ. एकाळे यांनी वृक्षारोपनाचे महत्‍व विषद केले तसेच ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमाच्‍या कृषिकन्‍यांनी ग्रामीण लोकजीवन व समाज‍जीवनाचा अभ्‍यास करावा, विद्यापीठातील तंत्रज्ञानाचे शेतकरी व ग्रामीण महीलापर्यंत नेण्‍याच्‍या प्रयत्‍न करावा तसेच गावक-यांनीही विद्यापीठाची ज्ञानाची गंगा दारात आली आहे, तरी याचा पुरेपुर फायदा करुन घ्‍यावा असा सल्‍ला त्‍यांनी दिला. वृक्षारोपन व संवंर्धन हि काळाची गरज आहे व त्‍या दृष्‍टीकोनातुन विचार करणे गरजेचे आहे, असे आवाहन त्‍यांनी  केले.
जिल्‍हा परिषद शाळेतील शिक्षक श्री स्‍वामी ह्यांनी शिक्षणाचे तसेच पर्यावरणासोबतच वृक्षरोपणाचे महत्‍व विषद केले. कृषि तज्ञ श्री कुलकर्णी यांनी  एक मुल एक झाड असे झाले तरच उद्याचा भारत उज्‍वल होईल आणि संपन्‍न, सुजलाम सुफलाम होईल, असे नमूद केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. अश्विनी पंचांगे यांनी केले.  कोमल शिंदे, संगीता थिटे, पल्‍लवी पाटील, सविता झाटे, शितल उफाडे, प्रियांका खटींग, शितल लोनसणे, शुभांगी यादव, कांचन क्षिरसागर, अपर्णा काळदाते, निशा खंदारे, आमरीन कादरी, भाग्यश्री फड यांनी वृक्षारोपन कार्यक्रम घेण्‍यासाठी परिश्रम घेतले. डॉ. कारले, डॉ. नारखेडे व डॉ. मंत्री यांच्‍या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्‍वीरित्‍या पार पाडण्‍यात आला.