Wednesday, October 30, 2013

कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता व प्राचार्य डॉ एन डी पवार यांना विस्‍तार शिक्षण विभागाच्‍या वतीने निरोप

कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता व प्राचार्य डॉ एन डी पवार यांना विस्‍तार शिक्षण विभागाच्‍या वतीने निरोप समारंभात सत्कार करतांना विद्यापीठाचे कुलसचिव श्री का वि पागिरे व विस्‍तार शिक्षण विभागाचे विभाग प्रमुख डॉ बी एम ठोंबरे


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत असलेल्‍या कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता व प्राचार्य डॉ एन डी पवार दि 31 ऑकटोबर 2013 रोजी सेवानिवृत्त झाले. त्‍यानिमित्‍त विस्‍तार शिक्षण विभागाच्‍या वतीने त्‍यांना निरोप देण्‍यात आला. कार्यक्रमास विद्यापीठाचे कुलसचिव श्री का वि पागिरे, विभाग प्रमुख डॉ बी एम ठोंबरे, कृषि अर्थशास्‍त्र विभागाचे प्रमुख डॉ बी आर पवार, डॉ जे व्‍ही एकाळे, डॉ पी आर देशमुख, डॉ आर पी कदम, डॉ प्रविण कापसे, प्रा शुभांगी देशमुख, डॉ कांबळे, श्री सी एस नखाते आदी उपस्थित होते. याप्रसंगी डॉ एन डी पवार यांचा शाल व श्रीफळ देउन विभाग प्रमुख डॉ बी एम ठोंबरे यांनी सत्‍कार केला. या‍वेळी डॉ पवार यांनी मनोगतात म्‍हणाले कि, सर्वाच्‍या सहकार्याने विद्यापीठातील सेवेचा कार्यकाल यशस्‍वीपणे पुर्ण करू शकलो, विशेषता त्‍यांच्‍या कार्यकाळात निम्‍नस्‍तर शिक्षणाचे सहयोगी संचालक पदावर कार्यकाळात कृषि पद‍वीका सर्व शाळेच्‍या प्रवेश प्रक्रिया ऑन लाईन करण्‍यात आली, ही विद्यापीठाच्‍या दृष्टिने महत्‍वाचा निर्णय अमलात आणु शकलो, यामुळे विद्यार्थींना प्रवेश प्रक्रियेतील अडचणी कमी झाल्‍या. त्‍यांच्‍या कार्यकाळात सर्व विभागाचे बळकटीकरण व आंतरराष्ट्रिय वसतीगृह व सर्व विद्यार्थ्‍याचे वसतीगृ‍हाचे नुतनीकरण व अद्यावतीकरण करण्‍यात आले. काही काळ त्‍यांनी विस्‍तार शिक्षण संचालक म्‍हणुनही कार्य केले. विभाग प्रमुख डॉ बी एम ठोंबरे यांनी कार्यक्रमाच्या शेवटी आभार मानले.  

Monday, October 28, 2013

ग्रामीण गृहविज्ञान कार्यानुभव कार्यानुभव यशस्‍वी सांगता





      वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या गृहविज्ञान महाविद्यालयातील अंतिम वर्षातील सातव्‍या सत्राचे विद्यार्थी ग्रामीण जीवनशैली अभ्‍यासण्‍यासाठी तसेच गृहविज्ञान या विषयाचे आत्‍मसात केलेले ज्ञान व तंत्रज्ञानाचा प्रसार करण्‍यासाठी ग्रामीण गृहविज्ञान कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत 21 ऑगष्‍ट 2013 पासून पोखर्णी नृसिंह येथे कार्यरत होते. या ठिकाणी प्रत्‍येक विद्यार्थ्‍यांनी पाच कुटूंब दत्‍तक येऊन त्‍यांचे सर्वेक्षण करुन त्‍यांच्‍या गृहविज्ञानाशी निगडीत गरजांवर आधारीत कार्यक्रमाची आखणी केली. प्रारंभी पोखर्णी येथील नृसिंह विद्यालयाच्‍या विद्यार्थ्‍यांचा सहभाग घेऊन गावफेरी काढण्‍यात आली. या विद्यालयाच्‍या विद्यार्थ्‍यांसाठी संभाषण कौशल्‍य व व्‍यक्‍तीमत्‍व विकास, महिलांसाठी गरोदर मातांची व बालकांच्‍या काळजी कशी घ्‍यावी आणि सर्वांगीण विकास याबाबत महाविद्यालयाच्‍या प्राचार्या प्रा. विशाला पटनम यांनी कार्यशाळेद्वारे मार्गदर्शन केले. तसेच गृहविज्ञान तंत्रज्ञानाबाबतचे प्रदर्शन नृसिंह मंदीर सभागृहामध्‍ये आयोजीत केले होते. प्रदर्शनाचे उद्घघाटन सरपंच श्री मदनराव वाघ यांचे हस्‍ते करण्‍यात आले होते. प्रदर्शनास पोखर्णी येथील बहूसंख्‍य महिला व पुरूषांनी भेट दिली. गृहविज्ञान तंत्रज्ञान जास्‍तीत जास्‍त ग्रामीण महिलांपर्यंत पोहचविण्‍यासाठी प्रयत्‍न व्‍हावेत असे मनोगत सरपंच मदनराव वाघ यांनी याप्रसंगी व्‍यक्‍त केली. रावेच्‍या विद्यार्थ्‍यांनी ग्राम स्‍वच्‍छता अभियान राबवुन ग्रामपंचायत कार्यालय, गावातील मंदीरे व त्‍यांचा परिसर स्‍वच्‍छ केला. नाविन्‍यपूर्ण गृहविज्ञान तंत्रज्ञानाचा अवलंबन करुन पोखर्णी येथील महिलांनी विविध खाद्यपदार्थ, बांधणी काम, शोभीवंत तयार केलेल्‍या वस्‍तूंच्‍या प्रदर्शन मांडण्‍यात आले. या प्रदर्शनाचे उद्घघाटन डॉ. हेमांगीनी सरंबेकर यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले व त्‍यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या दोन महिन्‍याच्‍या कालावधीत महाविद्यालयाच्‍या अन्‍न व पोषण विभागाच्‍या प्रमुख डॉ. विजया नलवडे, विस्‍तार विभाग प्रमुख डॉ. प्रभा अंतवाल व डॉ. फारुखी फरजाना यांनी महिलांनी विविध तंत्रज्ञानावर मार्गदर्शन केले. समारोपाच्‍या कार्यक्रमाप्रसंगी महिलांनी प्रतिक्रिया देताना विद्यार्थींनीकडून विविध पाककृती, मानव विकास, वस्‍त्र अभिकल्‍पना, कौटूंबिक व्‍यवस्‍थापन, निरोगी रहाण्‍यासाठी तसेच विविध आजारामध्‍ये आहाराचे नियोजन इ. बद्दल सखोल माहिती मिळाली व त्‍यांच्‍या ज्ञानात भर पडली असे गृहविज्ञान महाविद्यालय व विद्यापीठाबाबत गौरवास्‍पद उद्गगार काढले. संपूर्ण कार्यक्रमांचे नियोजन प्राचार्या प्रा. विशाला पटनम यांच्‍या मार्गदर्शनानुसार समन्‍वयक डॉ. शंकर पूरी व विद्यार्थ्‍यांनी रेश्‍मा मल्‍लशे, वेदांती मुळे, अनुराधा डोके, शमशाद शेख, संध्‍या देशमुख, गिता सामला, स्‍नेहल कारले आणि मिनाक्षी मगर यांनी केले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी सरपंच मदनराव वाघ, उपसरपंच शेषेराव वाघ, नृसिंह मंदीर व्‍यवस्‍थापन समिती, मुख्‍याध्‍यापक सय्यद सर, अंगणवाडी पर्यवेक्षीका यादव मॅडम व त्‍यांच्‍या सर्व सहकारी आणि समस्‍त गांवक-यांचे सहकार्य लाभले. 

Friday, October 25, 2013

प्राचार्या प्रा विशाला पटनम ह्या डॉ. राधाकृष्‍णन सुवर्ण पदक व भारत सेवा रतन सुवर्ण पदकांनी सन्‍मानीत


डॉ. सर्वपल्‍ली राधाकृष्‍णन यांच्‍या 125 व्‍या जयंती निमित्‍त चेन्‍नई येथील ग्‍लोबल इकॉनॉमीक प्रोग्रेस एन्ड रिसर्च असोशियशन या संस्‍थेतर्फे गृहविज्ञान महाविद्यालयाच्‍या सहयोगी अधिष्‍ठाता तथा प्राचार्या प्रा. विशाला पटनम यांना शिक्षण व संशोधन क्षेत्रामध्‍ये केलेल्‍या उत्‍कृष्‍ट कार्याबद्दल डॉ. राधाकृष्‍णन सुवर्ण पदकांनी तर वैयक्‍तीक मिळविलेल्‍या नावलौकीकाबद्दल भारत सेवा रतन सुवर्ण पदकांनी सन्‍मानीत करण्‍यात आले. या पुरस्‍कारांचे वितरण चेन्‍नई येथे दिनांक 19 ऑक्‍टोंबर 2013 रोजी माजी कायदा व न्‍याय मंत्री के. वेंकटपथी आणि मद्रास उच्‍च न्यायालयाचे न्‍यायाधीश एस जगदिसन यांच्‍या हस्‍ते कॉन्‍ट्रीब्‍युशन टु इज्‍युकेशन अन्‍ड नॅशनल डेव्‍हलपमेंट याविषयावर आयोजीत 14 व्‍या राष्‍ट्रीय परिसंवादाच्‍या कार्यक्रमामध्‍ये करण्‍यात आले. यानिमित्य गृहविज्ञान महाविद्यालयाच्‍या सर्व शिक्षक, शिक्षकेत्‍तर कर्मचारी व विद्यार्थी यांनी त्‍यांचे सत्‍कार करून अभिनंदन केले.

Thursday, October 24, 2013

‘गहु पिकांत एकात्मिक अन्‍नद्रव्‍य व्‍यवस्‍थापन’ याविषयावर मार्गदर्शन

दि 25 ऑक्‍टोबर 2013 शुक्रवार रोजी सायंकाळी 7.30 वाजता आकाशवाणी परभणी केंद्राच्‍या आमचं घर, आमचं शिवार या कार्यक्रमात गहु पिकांत एकात्मिक अन्‍नद्रव्‍य व्‍यवस्‍थापन याविषयावर वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत असलेल्‍या दिर्द्यकालीन खत प्रयोग योजनेचे सहायक प्राध्‍यापक डॉ सुदाम शिराळे मार्गदर्शन करणार आहेत.

Wednesday, October 23, 2013

गृहविज्ञान तंत्रज्ञानाचे प्रदर्शन


महिलांना मार्गदर्शन करतांना गृहविज्ञान महाविद्यालयाच्‍या प्रभारी प्राचार्या डॉ. हेमांगिनी सरंबेकर व्यासपीठावर डॉ. विजया नलवडे, डॉ. प्रभा अंतवाल व समन्‍वयक डॉ. शंकर पुरी 

गृहविज्ञान तंत्रज्ञानाचे प्रदर्शनाची पाहणी करतांना गृहविज्ञान महाविद्यालयाच्‍या प्रभारी प्राचार्या डॉ. हेमांगिनी सरंबेकर व्यासपीठावर डॉ. विजया नलवडे, डॉ. प्रभा अंतवाल

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या गृहविज्ञान महाविद्यालयाच्‍या ग्रामीण गृहविज्ञान कार्यानुभव कार्यक्रम नृसिंह पोखर्णी येथे दोन महिन्‍यापासून राबविण्‍यात येत असुन या कार्यक्रमामध्‍ये येथील महिलांना महाविद्यालयाच्‍या विद्यार्थीनींनी अन्‍न व पोषण, कौटुंबिक साधनसंपत्‍ती व्‍यवस्‍थापन, मानव विकास व कौटुंबिक अभ्‍यास, वस्‍त्र व परिधान अभिकल्‍पना तसेच संदेशवहन याबाबतीत नाविन्‍यपुर्ण गृहविज्ञान तंत्रज्ञानाची माहिती दिली. या माहितीची महिलांनी भरपूर लाभ झाला तसेच महिलांनी आत्‍मसात केलेल्‍या तंत्रज्ञानाचा वापर करुन त्‍यांनी विविध खाद्य पदार्थ, बांधणी काम, शोभिवंत वस्‍तू तयार केल्‍या आणि याचे प्रदर्शन पोखर्णी येथील नृसिंह मंदिर संस्‍थान सभागृहात आयोजित करण्‍यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घघाटन महाविद्यालयाच्‍या प्रभारी प्राचार्या डॉ. हेमांगिनी सरंबेकर यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. या प्रसंगी त्‍यांनी उपस्थित महिलांना विविध गृहविज्ञान तंत्रज्ञानावर मार्गदर्शन केले. तसेच महा‍विद्यालयातील अन्‍न व पोषण विभागाच्‍या प्रमुख डॉ. विजया नलवडे यांनी जागतिक अन्‍न दिनानिमित्‍त अन्‍न व पोषण आहार यावर तर डॉ. प्रभा अंतवाल यांनी विद्यापीठाच्‍या विविध कार्याविषयी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केल्रे. या प्रसंगी उपस्थित महिलांनी मनोगतात सांगितले कि महाविद्यालयाच्‍या विद्यार्थींनी कडून विविध पाककृती, मानव विकास, वस्‍त्र अभिकल्‍पना, कौटूंबिक व्‍यवस्‍थापन, निरोगी रहाण्‍यासाठी तसेच विविध आजारामध्‍य आहाराचे नियोजन इ. बद्दल सखोल माहिती मिळाली व त्‍यांच्‍या ज्ञानात भर पडली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन रेश्‍मा मल्‍लेशा यांनी केले तर आभार वेदांती मुळे यांनी मानले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी कार्यानुभव कार्यक्रमाचे समन्‍वयक डॉ. शंकर पुरी यांच्‍या मार्गदर्शनाखाली अनुराधा डोके, शमशाद शेख, संध्‍या देशमुख, गीता सामला, स्‍नेहल कारले आणि मिनाक्षी मगर यांनी परिश्रम घेतले. तसेच कार्यक्रमासाठी नृसिंह मंदिर समितीचे विशेष सहकार्य मिळाले. कार्यक्रमात महिलांनी मोठ्या प्रमाणात उत्‍स्‍फुर्तपणे सहभाग नोंदवला.

Tuesday, October 22, 2013

मराठवाडयाकरिता कृषि हवामान सल्ला

भारतीय हवामान विभागमुबई यांचेकडून प्राप्‍त झालेल्‍या हवामान अंदाजानुसार, मराठवाडा विभागामध्‍ये पुढील आठवडयात आकाश अंशतः ढगाळ राहील. औरंगाबाद व उस्‍मानाबाद जिल्‍हयात तुरळक ठिकाणी हलक्‍या स्‍वरूपाचा पाउस पडण्‍याची शक्‍यता आहे. कमाल तापमान २७.० ते ३४.० अंश सेल्‍सीअस राहील तर किमान तापमान १७.० ते २२.० अंश सेल्‍सीअस राहील. वारा ताशी ६.० ते १२.० कि.मी. प्रति तास वेगाने वाहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ५८.० ते ९९.० टक्‍के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ३३.० ते ७९.० टक्‍के राहील.

विशेष सुचना या आठवडयात  आकाश अंशतः ढगाळ राहील.

शेतकरी बांधवाना कृषि सल्‍ला

कापूस

तुडतुडे, पांढरी माशी, दहिया, लाल्‍या  
कापूस पिकात तुडतुडे, पांढरी माशी, दहिया व लाल्‍या रोगाचा प्रादुर्भाव दिसुन येत आहे. तुडतुड्यांचे निरूंत्रणासाठी असिटामेप्रीड २० टक्‍के २ ग्रॅम किंवा मिथिलडिमेटॉन २५ टक्‍के ८ मिली, पांढरी माशीचे नियंत्रणासाठी ट्रायझोफॉस ४० टक्‍के २० मिली किंवा असिफेट ७५ टक्‍के २० ग्रॅम प्रती १० लिटर पाण्‍यात मिसळून फवारणी करावी दहीया रोगाच्‍या नियंत्रणासाठी पाण्‍यात विरघळणारा गंधक २५ ग्रॅम तर लाल्‍या रोगाच्‍या नियंत्रणासाठी मॅग्‍नेशियम सल्‍फेट अधिक पोटॅशियम नायट्रेट प्रत्‍येकी ४० ग्रॅम प्रत्‍येकी प्रती दहा लिटर पाण्‍यात मिसळून फवारणी करावी.  
तुर

तुरीचे पिक गाठी धरण्‍याच्‍या अवस्‍थेत आहे. शेंगा पोखरणारी अळी पिसारी पतंग व शेंगमाशी यांचा प्रतिबंधात्‍मक उपाय म्‍हणून फुलकळीच्‍या अवस्‍थेत ५ टक्‍के निंबोळी अर्क अधिक १ टक्‍का साबनेचा चुरा अधिक क्विनॉलफॉस २५ टक्‍के १६ मिली प्रती १० लिटर पाण्‍यात मिसळून फवारणी करावी.
उस

पूर्व हंगामी ऊसाची लागवड १५ नोव्‍हेंबर पर्यंत पुर्ण करावी. लागवडीसाठी को-८६०३२ (निरा), को-९४०१२, को.सी.६७१, को-८०१४, को.९९००४, या वाणांचा वापर करावा. ऊसाचे बेणे जाड रसरशीत, डोळे जोमदार व फुगीर असावेत, बेण्‍याचे वय ०९ ते ११ महिन्‍याचेअसावे. किड व रोगमुक्‍त बेण्‍याचा वापर करावा. लागवडी पूर्वी बेणे मॅलॅथिऑन ३०० मिली व बाविस्‍टीन (१०० ग्रॅम) १०० लिटर पाण्‍याच्‍या द्रावणात १० ते १५ मिनीटे बुडवून घ्‍यावे.
आंबा

आंब्‍यावर तुडतुडे आढळल्‍यस सांयपरमेथ्रीन २५ ईसी ३ मिली किंवा फेनवलरेट २० ईसी ५ मीली १० लिटर पाण्‍यात मिसळुन फवारावे.तसेच भुरी रोग आढळल्‍यास कार्बेंडायझीम १० ग्रॅम १० लिटर पाण्‍यात मिसळुन फवारणी करावी. बागेमध्‍ये तुट आढळुन आल्‍यास दुसरे रोप लावुन तुट भरून काढावी. सिंचन सुविधा उपलब्‍ध असल्‍यस रब्‍बीची अंतरपीके घ्‍यावीत. झाडास आळे करून घ्‍यावीत. 
संत्रा मोसंबी
बुरशीजन्‍य रोग
संत्रा/मोसंबीचे बागेत बुरशीजन्‍य रोगांचा प्रादूर्भाव दिसून येत आहे. त्‍याचे नियंत्रणसाठी १ टक्‍के बोर्डोमिश्रणाची फवारणी करावी.
पेरू

पेरूच्‍ बागेत फळमाशीच्‍या नियंत्रणसाठी मीथीलयुजेनॉलयुक्‍त सापळे हेक्‍टरी ५ या प्रमाणात लावावेत.
अंजीर
तांबेरा
बागेत पावसाचे पाणी साचणार नाही याची काळजी घ्‍यावी. तसेच शेंडेमर आढळल्‍यसा रोगग्रस्‍त फाद्या काढून त्‍या ठिकाणी बोर्डेपेस्‍ट लावावे.
सिताफळ
काढणी अवस्‍था
पक्‍व फळांची काढणी करावी. प्रतवारी करून बाजारपेठेत विक्रीसाठी पाठवावे.
कागदीलिंबु
देवीरोग
पाने खाणारी अळीचा प्रादूर्भाव बागेत आढळल्‍यास क्विनॉलफॉस २० मिली १० लिटर पाण्‍यात मिसळुन फवारावे. 
फुलशेती

गुलाबावर भुरी रोग आढळलयास डायफॅन्‍कॅनाझोल ०.०५ टक्‍के या बुरशीनाशकाची दर आठ दिवसाच्‍या अंतराने फवारणी करावी. निशिगंधाच्‍या पानावर ठिपके व करपा रोग आढळल्‍यास झायरम ०.३ टक्‍के किंवा डायथेन एम-४५ -०.२५ टक्‍के या बुरशीनाशकाची फवारणी करावी.
पशुधन व्‍यवस्‍थापन  : जनावरांना खुरकुत रोगाची लस टोचुन घ्‍यावी.


सौजन्य 
केंद्र प्रमुख
एकात्मिक कृषि हवामान सल्‍ला सेवा योजना


हवामानशास्‍त्र विभाग, वनामकृवि, परभणी
पञक क्रमांकः ५४
दिनांकः २२.१०.२०१३

Tuesday, October 15, 2013

मराठवाडयाकरिता कृषि हवामान सल्ला

भारतीय हवामान विभाग, मुबई यांचेकडून प्राप्‍त झालेल्‍या हवामान अंदाजानुसार, मराठवाडा विभागामध्‍ये पुढील आठवडयात आकाश अंशतः ढगाळ राहील. उस्‍मानाबाद, व लातुर जिल्‍हयात तुरळक ठिकाणी हलक्‍या स्‍वरूपाचा पाउस पडण्‍याची शक्‍यता आहे. कमाल तापमान ३१.० ते ३३.० अंश सेल्‍सीअस राहील तर किमान तापमान १९.० ते २२.० अंश सेल्‍सीअस राहील. वारा ताशी २.० ते ९.० कि.मी. प्रति तास वेगाने वाहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ६२.० ते ८९.० टक्‍के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ३६.० ते ५८.० टक्‍के राहील.
विशेष सुचना : या आठवडयात  आकाश अंशतः ढगाळ राहील.

शेतकरी बांधवांसाठी कृषि सल्‍ला

कापूस

फुलकिडे, तुडतुडे, पांढरी माशी
कापूस पिकात रस शोषण करणा-या किडींच्‍या प्रादूर्भावामुळे व जमीनीतील सतत ओलाव्‍यामुळे कापसाची पाने लाल पडत  आहे. रस शोषण करणा-या किडींचे नियंत्रणासाठी असिफेट ७५ टक्‍के २० ग्रॅम अधिक थायामिथॉक्‍झाम २५ टक्‍के; २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्‍यातून मिसळुन फवारणी करावी. पानावरील लालसरपना कमी करण्‍यासाठी सोबत २ टक्‍के डीएपी किंवा युरीयाचा वापर करावा.      
तुर
पाने गुंडाळणारी अळी
तुरीचे पिकात पाने गुंडाळणा-या अळीचा प्रादूर्भाव दिसुन येत असल्‍यास त्‍याचे नियंत्रणसाठी डायमिथोएट १० मिली किंवा मोनोक्रोटोफॉस १५ मिली अधिक १० मिली स्‍टीकर प्रति १० लिटर पाण्‍यात मिसळुन फवारणी करवी. 
उस

जमीनीत वापसा येताच पुर्वमशागतीचे कामे पुर्ण करून पुर्व हंगामी उसाचे लागवडीसाठी हलक्‍या जमीनीत ९० सेंमी; मध्‍यम जमीनीत १२० सेंमी तर भारी जमीनीत १५० सेंमी अंतरावर स-या पाडाव्‍यात व १५ नोव्‍हेंबर पर्यंत लागवड करावी. लागवडी पुर्वी बेणे मॅलॅथिऑन ३०० मिली अधिक बाविस्‍टीन १०० ग्रॅम १०० लिटर पाण्‍यात मिसळुन या द्रावणात१५ मिली बेणे बुडवुन लागवड करावी.
आंबा

आंब्‍यावर तुडतुडे आढळल्‍यस सांयपरमेथ्रीन २५ ईसी ३ मिली किंवा फेनवलरेट २० ईसी ५ मीली १० लिटर पाण्‍यात मिसळुन फवारावे.तसेच भुरी रोग आढळल्‍यास कार्बेंडायझीम १० ग्रॅम १० लिटर पाण्‍यात मिसळुन फवारणी करावी. बागेमध्‍ये तुट आढळुन आल्‍यास दुसरे रोप लावुन तुट भरून काढावी. सिंचन सुविधा उपलब्‍ध असल्‍यस रब्‍बीची अंतरपीके घ्‍यावीत. झाडास आळे करून घ्‍यावीत. 
संत्रा मोसंबी
बुरशीजन्‍य रोग
संत्रा/मोसंबीचे बागेत बुरशीजन्‍य रोगांचा प्रादूर्भाव दिसून येत आहे.त्‍याचे नियंत्रणसाठी १ टक्‍के बोर्डोमिश्रणाची फवारणी करावी.
पेरू

पेरूच्‍या बागेत फळमाशीच्‍या नियंत्रणसाठी मीथीलयुजेनॉलयुक्‍त सापळे हेक्‍टरी ५ या प्रमाणात लावावेत.
अंजीर
तांबेरा
बागेत पावसाचे पाणी साचणार नाही याची काळजी घ्‍यावी. तसेच शेंडेमर आढळल्‍यसा रोगग्रस्‍त फाद्या काढून त्‍या ठिकाणी बोर्डेपेस्‍ट लावावे.
सिताफळ
काढणी अवस्‍था
पक्‍व फळांची काढणी करावी. प्रतवारी करून बाजारपेठेत विक्रीसाठी पाठवावे.
कागदीलिंबु
देवीरोग
पाने खाणारी अळीचा प्रादूर्भाव बागेत आढळल्‍यास क्विनॉलफॉस २० मिली १० लिटर पाण्‍यात मिसळुन फवारावे. 
फुलशेती

गुलाबावर भुरी रोग आढळलयास डायफॅन्‍कॅनाझोल ०.०५ टक्‍के या बुरशीनाशकाची दर आठ दिवसाच्‍या अंतराने फवारणी करावी. निशिगंधाच्‍या पानावर ठिपके व करपा रोग आढळल्‍यास झायरम ०.३ टक्‍के किंवा डायथेन एम-४५ -०.२५ टक्‍के या बुरशीनाशकाची फवारणी करावी.
पशुधन व्‍यवस्‍थापन  : जनावरांना खुरकुत रोगाची लस टोचुन घ्‍यावी.

सौजन्‍य
केंद्र प्रमुख
एकात्मिक कृषि हवामान सल्‍ला सेवा योजना
पञक क्रमांकः ५२                                              
दिनांकः १५.१०.२०१३


Tuesday, October 8, 2013

जलालपुर येथील शेतकरी मेळाव्‍यास प्रतिसाद


      वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या कृषि महाविद्यालय, परभणी येथील ज्‍वार संशोधन केंद्रांच्‍या ग्रामीण कृषि कार्यानुभवांतर्गत दिनांक 07.10.2013 रोजी मौजे जलालपुर ता.जि. परभणी येथे शेतकरी मेळावा घेण्‍यात आला. मेळाव्‍यास प्रमुख पाहुणे म्‍हणून कृषि तंत्रज्ञान आणि माहिती केंद्राचे व्‍यवस्‍थापक डॉ. आनंद गोरे तर प्रतिष्‍ठीत नागरीक डॉ. बाळासाहेब जटाळ अध्‍यक्षस्‍थानी होते.
      डॉ. आनंद गोरे यांनी रब्‍बी लागवड तंत्रज्ञान यावर तर पशुधन विकास अधिकारी डॉ. पि. डी. सावणे यांनी जनाव-यांचे आजार व प्रतिबंधत्‍मक उपाय याविषयी मार्गदर्शन केले. तसेच कीड व्‍यवस्‍थापनावर डॉ. डी डी पटाईत यांनी तर कार्यक्रम अधिकारी प्रा. खोब्रागडे यांनी ज्‍वार लागवडीवर शेतक-यांनी मार्गदर्शन केले.
     कार्यक्रम घेण्‍यासाठी सहयोगी अधिष्‍ठाता व प्राचार्य मा. डॉ. एन. डी. पवार, ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमाचे सहसमन्‍वयक तथा विभाग प्रमुख मा. डॉ. बी. एम. ठोंबरे, ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमाचे प्रभारी डॉ. आर. पी. कदम अधिकारी ह्यांचे मार्गदर्शन लाभले. मेळावास शेतकरी मोठया संख्‍येने उपस्थित होते. मेळावा यशस्‍वीतेसाठी कृषिदुतांनी परिश्रम घेतले.

Thursday, October 3, 2013

महात्‍मा गांधी व लाल बहादुर शास्‍त्री यांच्‍या जयंतीप्रित्‍यर्थ विद्यापीठात स्‍पर्धा परिक्षा मार्गदर्शन


     वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात महात्‍मा गांधी व लाल बहादुर शास्‍त्री यांची जयंती उत्‍साहात साजरी करण्‍यात आली. त्‍यानिमित्‍त कृषि महाविद्यालय व कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाच्‍या वतीने विद्यार्थ्‍यांसाठी स्‍पर्धा परिक्षेबाबत अतिरिक्‍त पोलीस अधिक्षक श्री प्रणय अशोक मार्गदर्शनाचे आयोजन करण्‍यात आले होते. कार्यक्रमास प्राचार्य डॉ.डि बी देवसरकर, प्राचार्य डॉ. उदय खोडके, विद्यार्थी कल्‍याण अधिकारी प्रा. महेश देशमुख, विभाग प्रमुख डॉ बी एम ठोंबरे, श्री दिवाकर काकडे, डॉ धीरज कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.
      श्री प्रणय अशोक आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, स्‍पर्धा परिक्षात यश संपादन करण्‍यासाठी कठीण परिश्रम करण्‍याची तयारी पाहिजे. ध्‍येय निश्चित करून वेळेचे नियोजन करावे, मुलभुत ज्ञान प्राप्‍त करणे आवश्‍यक आहे. अभ्‍यासात सातत्‍य पाहिजे तसेच मुलाखतीत आपला समाजाप्रती असलेला दृष्टिकोन महत्‍वाचा ठरतो. विद्यार्थ्‍यांनी गांधीजी व शास्‍त्रीजी यांच्‍या वैचारीक प्रेरणा घेउन आचरण करावे. कठीण परिस्थितीत संयमाने वागुन विजय मिळवित आला पाहिजे असे सल्‍लाही त्‍यांनी सांगितले.
      या कार्यक्रमात कार्यक्रमाधिकारी प्रा. रविंद्र शिंदे यांनी स्‍वयंसेवकांना अहिंसा, सत्‍य व शांततेविषयीची शपथ दिली. कार्यक्रमाधिकारी प्रा. विजय जाधव यांनी विद्यार्थ्‍यांना शास्‍त्रीजींच्‍या जीवनशैलीची माहिती दिली. तसेच विदयार्थ्‍यानी महात्‍मा गांधी व लाल बहादुर शास्‍त्री यांच्‍या बाबत आपले विचार व्‍यक्‍त केले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक प्रा. अनिल कांबळे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. महेश देशमुख यांनी केले.
      कार्यक्रमाच्‍या यशस्वितेकरीता राष्ट्रिय सेवा योजनेच्‍या स्‍वयंसेवक व स्‍वयंसेविका परीश्रम घेतले. कार्यक्रमास 500;600 विद्यार्थ्‍यी उपस्थित होते.


Wednesday, October 2, 2013

राष्ट्रिय सेवा योजनाच्‍या वतीने शांतता रॅलीचे आयोजन

शांतता रॅलीत सहभागी स्‍वयंसेवक व स्‍वयंसेविका



वृक्षारोपण करतांना कुलगुरू मा डॉ किशनरावजी गोरे व जिल्‍हाधिकारी मा श्री सचिंन्‍द्र प्रताप सिंह, शिक्षण संचालक तथा अधिष्‍ठाता डॉ विश्‍वास शिंदे, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, प्राचार्य डॉ उदय खोडके, डॉ डि बी देवसरकर, विद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख, कार्यक्रम अधिकारी प्रा अनिस कांबळे, प्रा रविंद्र शिंदे, प्रा विजय जाधव आदी 
राष्‍ट्रपिता महात्‍मा गांधी व दिवंगत पंतप्रधान लालबहादुर शास्‍त्री यांच्‍या जयंती दिनानिमित्‍य वसंतराव नार्इक कृषि विद्यापीठातील कृषि महाविद्यालय व कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाच्‍या राष्ट्रिय सेवा योजनाच्‍या वतीने शांतता रॅलीचे आयोजन करण्‍यात आले होते. या शांतता रॅलीस कुलगुरू मा डॉ किशनरावजी गोरे व जिल्‍हाधिकारी मा श्री सचिंन्‍द्र प्रताप सिंह यांच्‍या हस्‍ते हिरवा झेंडा दाखवुन सुरवात करण्‍यात आली. या प्रसंगी शिक्षण संचालक तथा अधिष्‍ठाता डॉ विश्‍वास शिंदे, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, प्राचार्य डॉ उदय खोडके, डॉ डि बी देवसरकर, विद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख उपस्थित होते. रॅलीला संबोधीत करतांना जिल्‍हाधिकारी मा श्री सचिंन्‍द्र प्रताप सिंह म्‍हणाले की, महात्‍मा गांधी व लाल बहाद्दुर शास्‍त्री यांच्‍या जंयत्‍या नुसत्‍या साज-या करू नयेत तर त्‍यांचे विचार आचरणात आणा, कारण गांधीजीनी अहिंसा व सत्‍य ही तत्‍वे स्‍वत: आचरणात आणल्‍याने ते महान होते. सर्व विद्यार्थ्‍यानी त्‍यांचे विचार आचरणात आणावेत. लाल बहादुर शास्‍त्री व गांधीजी हे त्‍यांच्‍या साधेपणामुळे ही परीचित होते. जय जवान जय किसान नारा हा शास्‍त्रीजीनी दिला. कारण त्‍यांना शेतकरी बाधवांचे देशाच्‍या विकासासाठीचे महत्‍व माहीत होते. या प्रसंगी कुलगुरू मा डॉ किशनरावजी गोरे म्‍हणाले की, गांधीजीनी खेडया कडे चला हा नारा दिला, कारण खेडे स्‍वंयपुर्ण झाले तर देश स्‍वयंपुर्ण होईल याची जाणीव त्‍यांना होती.
याप्रसंगी मान्‍यवरांच्‍या हस्‍ते विद्यापीठ परीसरात वृक्षारोपण करण्‍यात आले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी रासेयोचे कार्यक्रम अधिकारी प्रा अनिस कांबळे, प्रा रविंद्र शिंदे, प्रा विजय जाधव यांच्‍या मार्गदर्शनाखाली रासेयोचे स्‍वयंसेवक व स्‍वयंसेविका यांनी परीश्रम घेतले.

वसंतराव नाईक कृषि विद्यापीठास अखंडीत वीज पुरवठयासाठी द्रुतगती वाहीनी कार्यान्‍वीत



वसंतराव नार्इक कृषि विद्यापीठ कृषि शिक्षण, संशोधन व विस्‍ताराचे कार्य केल्‍या जाते. मराठवाडा विभागासाठी स्‍थापन झालेल्‍या या कृषि विद्यापीठास विद्युत विषयक अनेक समस्‍यामुळे शैक्षणिक व संशोधन कार्यात सतत अडचणी निर्माण होत. विद्यापीठ हे दरमहा मोठी विद्युत देयके भरणारा विद्युत ग्राहक आहे. विद्यापीठ परिसरात विविध महाविद्यालये, प्रयोगशाळा, संशोधन योजना, बीजोत्‍पादन प्रक्षेत्र, कृषि प्रात्‍यक्षिक प्रक्षेत्र, उती संवर्धन केंद्र आदी महत्‍वाच्‍या आस्‍थापना व संशोध्‍न केंद्रे असुन या विविध शैक्षणिक व संशोधनात्‍मक कार्यासाठी अखंडीत वीज पुरवठयाची गरज असते. परंतु अलिकडे विद्युत वितरण कंपनीव्‍दारे भार नियमनात वाढ केल्‍याने या कार्यात व्‍यत्‍यत येत असे. विशेषता बीजोत्‍पादनात अडचणी येतात, पर्यायाने शेतक-यांना चांगले वाणाचे बियाणे पुरेशा प्रमाणात उपलब्‍ध करणे विद्यापीठास शक्‍य होत नसे तसेच शिक्षण व संशोधनाच्‍या कार्यात अडचणी निर्माण होत होत्‍या. विद्यापीठास अखंडीत व योग्‍य दाबाने विद्युत पुरवठा करण्‍यासाठी द्रुतगती विद्युत वाहीनी (एक्‍सप्रेस फीडर) मिळण्‍यासाठी महावितरण कंपनीस विद्यापीठाने विनंती केली. तसेच महाराष्‍ट्र राज्‍य कृषि शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्‍यक्ष मा ना श्री विजयरावजी कोलते यांनी महाराष्‍ट्र राज्‍याचे उप मुख्‍यमंत्री व वित्‍त व नियोजन मंत्री मा ना श्री अजितदादा पवार यांना विनंती केली होती.
महावितरण कंपनीने त्‍यांच्‍या अभियंत्‍या मार्फत सर्वेक्षण करून अंदाजपत्रक तयार केले व‍ त्‍याच्‍या दरपत्रकाचा भरणा विद्यापीठामार्फत विद्युत कंपनीस करण्‍यात आला. त्‍यानंतर विद्युत कंपनीने हे काम हाती घेवुन पुर्ण केलेले आहे. आज राष्‍ट्रपिता महात्‍मा गांधी व दिवंगत पंतप्रधान लालबहादुर शास्‍त्री यांच्‍या जयंती दिनाचे औचित्‍य साधुन विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ किशनरावजी गोरे व जिल्‍हाधिकारी मा श्री सचिन्‍द्र प्रताप सिंह यांच्‍या हस्‍ते द्रुतगती वाहीनीची कळ दाबुन कार्यान्‍वीत करण्‍यात आली. याप्रसंगी महावितरण कंपनीचे अधिक्षक अभियंता श्री सुरेश गणेशकर, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, कुलसचिव श्री का वि पागिरे, विद्यापीठ अभियांता श्री अब्‍दुल रहीम, उपाभियंता श्री उल्‍हास खंबायतकर, महावितरण कंपनीचे उपाभियंता श्री पैठणकर, कनिष्‍ठ अभियंता श्री महेश जोशी, अधिकारी व कर्मचारी मोठया संख्‍येने उपस्थित होते. याप्रसंगी अधिक्षक अभियंता श्री सुरेश गणेशकर यांना या कामाबाबतचा रूपये सात लाखाचा धनादेश मा जिल्‍हाधिकारी मा श्री सचिन्‍द्र प्रताप सिंह यांच्‍या हस्‍ते देणात आला.
या वाहीनीमुळे पहिल्‍या टप्‍प्‍यात विद्यापीठाच्‍या परिसर क्रमांक तीन मधील कृषि प्रात्‍यक्षिक प्रक्षेत्र, कृषि तंत्रज्ञान माहीती केंद्र, विद्यार्थी वसतीगृहे, प्रशासकीय इमारत, पाणी पुरवठा, पथदिवे इत्‍यादींना अखंडीत विद्युत पुरवडा मिळणार आहे. तसेच दुस-या टप्‍प्‍यात विद्यापीठ परीसर क्रमांक एक व दोन करीताही द्रुतगती वाहिनीची आवश्‍यता असुन त्‍यासाठी विद्यापीठ प्रयत्‍नशील आहे.  


राष्‍ट्रपिता महात्मा गांधी व दिवंगत पंतप्रधान लालबहादुर शास्त्री यांची जयंती साजरी

राष्‍ट्रपिता महात्‍मा गांधी व दिवंगत पंतप्रधान लालबहादुर शास्‍त्री यांची जयंती वसंतराव नार्इक कृषि विद्यापीठात साजरी करण्‍यात आली. या निमित्‍त विद्यापीठाचे कुलगूरू मा डॉ किशनरावजी गोरे यांच्‍या हस्‍ते महात्‍मा गांधी व लालबहादुर शास्‍त्री यांच्‍या प्रतिमेचे पुजन करण्‍यात आले. याप्रसंगी संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, कुलसचिव श्री का वि पागिरे, विद्यापीठ अभियंता श्री अब्‍दुल रहीम, उपकुलसचिव श्री जुक्‍टे, श्री गोरे यासह विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी मोठया संख्‍येने उपस्थित होते. यावेळी कुलगूरू मा डॉ किशनरावजी गोरे यांनी मार्गदर्शन करतांना म्‍हणाले कि, विद्यापीठातील कर्मचा-यांनी व अधिका-यांनी महात्‍मा गांधीच्‍या विचाराचे आचरण करावे, साधी राहाणी व उच्‍च विचार या युक्‍ती प्रमाण राहावे. आपले कार्य प्रामाणिकपणाने पार पाडुण विद्यापीठाच्‍या विकासात हातभार दयावा. 

Tuesday, October 1, 2013

मराठवाडयाकरिता कृषि हवामान सल्ला पञिका

भारतीय हवामान विभाग, मुबई यांचेकडून प्राप्‍त झालेल्‍या हवामान अंदाजानुसार, मराठवाडा विभागामध्‍ये पुढील आठवडयात आकाश ढगाळ राहून तुरळक हलका ते मध्‍यम स्‍वरूपाचा पाउस पडण्‍याची शक्‍यता आहे. कमाल तापमान २६.० ते ३३.० अंश सेल्‍सीअस राहील तर किमान तापमान २०.० ते २३.० अंश सेल्‍सीअस राहील. वारा ताशी ९.० ते १९.० कि.मी. प्रति तास वेगाने वाहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९०.० ते ९६.० टक्‍के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ५८.० ते ८५.० टक्‍के राहील.

विशेष सुचना या आठवडयात  आकाश ढगाळ राहुन तुरळक ठिकाणी हलका ते मध्‍यम स्‍वरूपाचा पाउस पडण्‍याची शक्‍यता आहे.

शेतकरी बांधवाना कृषि सल्‍ला

कापूस

कापूस पिकावर फुलकिडे, तुडतुडे, पांढरी माशी व लाल कोळी या रस शोषण करणा-या किडींचा प्रादूर्भाव दिसून येत आहे. त्‍यांच्‍या नियंत्रणासाठी फेनप्रोपथ्रिन १० ई.सी. १० मिली किंवा बुप्रोफेझीन २५ टक्‍के १० मिली प्रति १० लिटर पाण्‍यात मिसळुन पाण्‍यात मिसळुन फवारणी करावी. मागील आठवडयातील काळात झालेल्‍या पावसामुळे सखल भागातील जमिनीत कापसाची झाडे उमळत आहेत. अशा झाडांना कॉपरऑक्‍सीक्‍लोराईड २५ ग्रॅम किंवा कार्बेन्‍डाझीम १० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्‍यात मिसळुन २५० ते ३०० मिली द्रावणाची चिबंवणी प्रति झाड केल्‍यास उमळण्‍याचे प्रमाण कमी होईल.        
तुर
तुरीचे पीक सखल भागातील जमिनीत उमळत आहेत. अशा जमिनीत वापसा येताच कोळपणी करावी. म्‍हणजे उमळण्‍याचे प्रमाण कमी होईल.
खरीप ज्‍वारी
खरीप ज्‍वारीचे पीक दाणे  भरण्‍याच्‍या अवस्‍थेत आहे. पिकाचे पक्षापासुन संरक्षणासाठी पिकात बेगडी पटया बांधाव्‍यात.
उस
पुर्व हंगामी उसाचे लागवडीसाठी जमिनीची निवड करून मशागतीची कामे पुर्ण करून जमिन तयार करावी. पुर्व हंगामी उसाची लागवड १५ ऑक्‍टोंबर ते १५ नोव्‍हेंबर या काळात करावी.
आंबा
बागेत पाने खाणा-या अळीचा प्रादूर्भाव दिसून आल्‍यास क्विनॉलफॉस २५ टक्‍के २० मिली प्रति १० लिटर पाण्‍यात मिसळुन फवारणी करावी.
संत्रा मोसंबी
बागेत तुट आढळुण आल्‍यास तुट भरून काढावी. सिंचन सुविधा असल्‍यास बागेमध्‍ये रब्‍बीची आंतरपिके घेवु शकता बाग तणविरहीत ठेवावी.
अंजीर
३-४ खोडे ठेवून १५ ऑक्‍टोबर पर्यंत छाटणी केल्‍यास फायदेशीर आहे. अंजीरावर तांबेरा रोगाच्‍या नियंत्रणासाठी क्‍युलोरोथॅलोनील २० ग्रॅम २ ग्रॅम अधिक कार्बेन्‍डाझीम ७ ग्रॅम प्रति लिटर पाण्‍यात मिसळुन फवारणी करावी.
सिताफळ
पिठया ढेकणाचा (मिलीबग) चा प्रादूर्भाव आढळल्‍यास त्‍याच्‍या नियंत्रणासाठी मॅलेथीऑन ५० टक्‍के प्रवाही १० मिली किंवा फॉस्‍पोमीडॉन ३ मिली प्रति १० लिटर पाण्‍यात मिसळुन फवारणी करावी. पक्‍व फळांची काढणी करावी.
कागदीलिंबु
पाने खाणारी अळीचा प्रादूर्भाव दिसल्‍यास क्विनॉलफॉस २० मिली किंवा डायमिथोएट २० मिली प्रति १० लिटर पाण्‍यात मिसळुन फवारणी करावी. तसेच शेंडामर दिसून आल्‍यास रोगग्रस्‍त फांदया काढून त्‍यावर बोर्डोपेस्‍ट लावावे.
फुलशेती
झेंडुवर रसशोषण करणा-या किडीचा प्रादूर्भाव आढळुण अल्‍यास डायमेथोएट १० मिली प्रति १० लिटर पाण्‍यात मिसळुन फवारणी करावी. जिलारडीया, गुलाब इत्‍यादी फुलपिकांची लागवड करावी. 


  
सौजन्य 
केंद्र प्रमुख
एकात्मिक कृषि हवामान सल्‍ला सेवा योजना
हवामानशास्‍त्र विभाग, वनामकृवि, परभणी
पञक क्रमांकः ४८                                              
दिनांकः ०१.१०.२०१३

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाबाबतचा सकाळ अॅग्रोवन मध्ये दि 28 सप्टेंबर 2013 रोजी प्रसिध्द झालेला संपादकीय लेख