Thursday, December 26, 2013

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ स्‍पर्धामंचाच्‍या संकल्‍प व्‍याख्‍यानमालेचे शेवटचे पुष्‍प


कार्यक्रमाचे उदघाटन करतांना गोळेगांव कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता डॉ विलास पाटील, कृषि उपसंचालक श्रीमती रक्‍क्षा शिंदे, उपजिल्‍हाधिकारी श्री जनार्धन विधाते, कॅप्‍टन बालाजी सुर्यवंशी, डॉ अभय पडिले, डॉ एच व्‍ही काळपांडे, श्री अमोल राठोड, शिवाजी येवतीकर आदी
मार्गदर्शन करतांना गोळेगांव कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता डॉ विलास पाटील
कृषि उपसंचालक श्रीमती रक्‍क्षा शिंदे
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ स्‍पर्धामंचाच्‍या 2013 यावर्षातील संकल्‍प व्‍याख्‍यानमालेचे शेवटच्‍या पुष्‍पात  दि 25 डिसेंबर 2013 रोजी कृषि उपसंचालक श्रीमती रक्‍क्षा शिंदे, उपजिल्‍हाधिकारी श्री जनार्धन विधाते, भारतीय सेनेतील कॅप्‍टन बालाजी सुर्यवंशी, तालुका कृषि अधिकारी डॉ अभय पडिले यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्‍य अध्‍यक्षस्‍थानी गोळेगांव कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता डॉ विलास पाटील होते तर व्‍यासपीठावर ज्‍वार संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ एच व्‍ही काळपांडे, मंचाचे अध्‍यक्ष अमोल राठोड, उपाध्‍यक्ष शिवाजी येवतीकर, विद्यार्थीनी अध्‍यक्ष कु स्‍वाती कदम, उपाध्‍यक्ष कु प्रियांका शिंदे उपस्थित होते. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ  स्‍पर्धामंच विद्यापीठातील विद्यार्थी व विद्यार्थीनी मार्फत स्‍पर्धापरीक्षेच्‍या तयारीसाठी मार्गदर्शन वर्ग, वाचनालय, ग्रंथालय, चाचणी परिक्षा असे विविध उपक्रम राबविले जातात त्‍या अंतर्गत या व्‍याख्‍यानमालेचे आयोजन कृषि महाविद्यालयाच्‍या सभागृहात करण्‍यात आले होते.
कृषि उपसंचालक श्रीमती रक्‍क्षा शिंदे मार्गदर्शन करतांना म्‍हणाल्‍या कि, स्‍पर्धा परीक्षात यशासाठी तसेच नौकरी करीयर मध्‍ये चांगले काम करण्‍यासाठी मुलींनी निर्णय क्षमता विकसित करणे आवश्‍यक आहे. कष्‍ट, जिकाटी व वेळेचे नियोजन हेच यशाचे गमक आहे. इंग्‍लीश व मराठी वृत्‍तपत्राचे नियमीत वाचन करण्‍याचा सल्‍लाही त्‍यांनी दिला. श्री जनार्धन विधाते यांची यावर्षी उपजिल्‍हाधिकारी यापदावर नियूक्‍ती झाली असून सध्‍या ते मंडल कृषि अधिकारी यापदावर कार्यरत आहेत. ते आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, मी सर्वसामान्‍य कुटुंबातुन दहावी व बारावीत जेमतेम मार्क घेउन ऊर्त्‍तीण झालो तरी आत्‍मविश्‍वास व सकारात्‍मक दृष्टिकोनाच्‍या आधारे उपजिल्‍हाधिकारी होऊ शकलो. विद्यापीठातील चार वर्षीचा शैक्षणिक काळ तुम्‍हाच्‍या आयुष्‍याची दिशा ठरविणार असुन या काळात तुम्‍ही वाईट गोष्‍टीपासुन दुर रहावे. भारतीय सेनेतील कॅप्‍टन बालाजी सुर्यवंशी आपल्‍या मार्गदर्शनात म्‍हणाले की, माझी भारतीय सेनेत निवड झाली यांचे श्रेय मी कृषि महाविद्यालयाला देतो. कृषि पदवीधरांनी राज्‍याच्‍या व देशाच्‍या कृषि क्षेत्रात योगदान देण्‍याची गरज आहे. जीवनात यशस्‍वी होण्‍यासाठी नियमित वाचन महत्‍वाचे आहे. वाचन करून विचार मंथन केल्‍यास विविध विषयावर स्‍वत:च्‍या व्‍यापक दृष्टिकोन विकसित होतो. अध्‍यक्षीय भाषणात सहयोगी अधिष्‍ठाता डॉ विलास पाटील म्‍हणाले की, विद्यार्थ्‍याचा स्‍पर्धामंचाचे विविध उपक्रम हे अत्‍यंत चांगले असुन यामुळे अनेक विद्यार्थ्‍या घडत आहेत. विद्यार्थ्‍याची जिद्द व शंभर टक्के प्रयत्‍न हेच परिक्षात यश मिळवुन देतात. या प्रसंगी डॉ अभय पडिले व डॉ एच व्‍ही काळपांडे यांनीही मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे  प्रास्‍ताविक नितिन लिंगायत यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री सुनिल भालेकर यांनी तर आभार प्रदर्शन देवानंद शेटे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुजित सानप, संदिप पवार, सतीश काकडे, गोपाल गजानन, अरूण सिरसाट, स्‍वाती खाडे, पल्‍लवी पवार व मंचाच्‍या सदस्‍यांनी परीश्रम घेतले. कार्यक्रमास विद्यार्थी व विद्यार्थीनी मोठया संख्‍येने उपस्थित होते तसेच मान्‍यवरांनी विद्यार्थीशी थेट संवाद साधुन स्‍पर्ध परिक्षेबाबत शंकाचे समाधान केले.
उपजिल्‍हाधिकारी श्री जनार्धन विधाते

कॅप्‍टन बालाजी सुर्यवंशी
डॉ एच व्‍ही काळपांडे
डॉ अभय पडिले