Wednesday, March 18, 2015

कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्‍या विद्यार्थ्यांची पाणलोटक्षेत्रास भेट


कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयातील पदवीपुर्व अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहलीचे दिनांक १२ मार्च रोजी जिंतूर तालुक्यातील रायखेडा व जालना जिल्ह्यातील कडवंची पाणलोट क्षेत्र येथे आयोजीत करण्‍यात आली होती. याप्रसंगी विद्यार्थ्‍यांनी पाणलोटाची पाहणी करून तेथील मृद व जलसंधारण कामांची माहिती कृषी अभियंता पंडित वासरे व पाणलोट विकास समितीचे सचिव चंद्रकांत क्षीरसागर यांनी दिली. जालना कृषी विज्ञान केंद्राने माननीय विजयआण्णा बोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली इन्डो-जर्मन पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत १९९४ मध्ये कडवंची गावात काम सुरू केले. मृदसंधारण व पाण्याचे योग्य नियोजनामुळे यावर्षी सरासरीच्या कमी पाऊस होऊनही कडवंची गावचा शिवार मार्चमध्येही हिरवागार असुन असून द्राक्ष, डाळिंब ही बागायती पिके येथील शेतकरी घेत आहेत. शैक्षणिक सहलीचे आयोजन शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण व सहयोगी अधिष्ठाता डॉ. उदय खोडके यांच्‍या मार्गदर्शनानुसार करण्‍यात आले होते. सहल यशस्वीतेसाठी प्रा भास्करराव भुईभार, प्रा. मधुकर मोरे, प्रा. संदीप पायाळ, प्रा दयानंद टेकाळे, नागनाथ गोरे आणि मारोतराव कटारे यांनी परिश्रम घेतले.