Wednesday, July 22, 2015

भारतीय कृषि संशोधन परिषदेच्‍या वतीने कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांची राष्‍ट्रीय पुरस्‍कारासाठी निवड

नवी दिल्‍ली येथील भारतीय कृषि संशोधन परिषदेच्‍या वतीने देण्‍यात येणा-या हरिओम आश्रम ट्रस्‍ट पुरस्‍कार २०१४ करिता वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांची निवड झाली असुन परिषदेच्‍या ८७ व्‍या वर्धापन दिनी पटना (बिहार) येथे दि २५ जुलै रोजी पुरस्‍कार प्रदान करण्‍यात येणार आहे. हवामान बदलाचा मातीच्‍या आरोग्‍यावरील परिणाम यावरील केलेल्‍या संशोधन योगदानबाबत कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांची या पुरस्‍कारासाठी निवड करण्‍यात आली आहे.