Monday, October 24, 2016

मुरूंबा येथे रबी शेतकरी मेळावा संपन्‍न

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील अखिल भारतीय एकात्मिक शेती पध्‍दती योजना व कापुस संशोधन योजना येथे कार्यरत असलेल्‍या कृषी महाविद्यालयाच्‍या कृषिदुतांनी ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमातंर्गत दिनांक 19 ऑक्‍टोबर रोजी मौजे मुरूंबा येथे रब्बी पीक शेतकरी मेळाव्‍याचे आयोजन करण्‍यात आले होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी प्राचार्य डॉ धर्मराज गोखले हे होते तर संरपंचा श्रीमती लताबाई झाडे, डॉ. बी एम ठोंबरे, डॉ आर डी आहिरे, डॉ डब्‍ल्‍यु एन नारखेडे, डॉ ए एस जाधव, डॉ. डि आर कदम, डॉ पी बी केदार, डॉ पी के वाघमारे, डॉ पपिता गौरखेडे आदींची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी प्राचार्य डॉ धर्मराज गोखले यांनी रबी हंगाम नियोजनावर मार्गदर्शन करतांना म्‍हणाले की, शेतक-यांनी विद्यापीठाने शिफारस केलेल्‍या तंत्रज्ञानाचा वापर करावा. रबी पीकांतील विविध सुधारीत वाणाचे स्‍वत: बीजोत्‍पादन करून वापर करावा. मेळाव्‍यात रबी पीकांचे नियोजन, करडई पीक लागवड, रबी पीकांवरील कीड व रोग व्‍यवस्‍थापन आदी विषयावर तज्ञांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक विभाग प्रमुख डॉ आर डी आहिरे यांनी केले. सुत्रसंचालन अक्षय सुरवसे, पल्‍लवी मस्‍के यांनी केले तर आभार अनुराधा शिंदे हिने मानले. मेळावा यशस्‍वीतेसाठी कृषिदुत व कृषिकन्‍यानी परिश्रम घेतले. मेळाव्‍यास शेतकरी बांधव मोठया संख्‍येने उपस्थित होते