Tuesday, August 1, 2017

सामाजिक विज्ञान महाविद्यालयात सत्यमेव जयते या विषयावर कार्यशाळेचे आयोजन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सामाजिक विज्ञान महाविद्यालयातर्फे पदवी, पदव्‍युत्तर विद्यार्थीं शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचा-यासाठी आदरनीय पं. महिंद्रपालजी आर्य यांचे सत्यमेव जयते या विषयावर कार्यशाळेचे आयोजन केले गेले. कार्यक्रमात महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. विशाला पटनम यांनी मानव विकासात  नितीमत्तेच्या शास्त्रेात्र पैलूंच्या आवश्‍यकतेवर भर दिला. पं. महिंद्रपालजी यांनी नैतीक मुल्यांच्या विविध पैलूंचे महत्व सत्यमेव जयते या शाश्‍वत मुल्याचे संभाषणतून प्रस्तुतीकरण केले. कार्यक्रमांचे आयोजन महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. विशाला पटनम उपाध्यक्षा जीमखाना डॉ. सुनीता काळे यांनी केले.