Wednesday, September 13, 2017

वनामकृविच्या. विदयापीठ आपल्या दारी : तंत्रज्ञान शेतावरी कार्यक्रमास मोठा प्रतिसाद

पंधरवाडयात परभणी व हिंगोली जिल्‍हयातील 52 गावांत विद्यापीठ शास्‍त्रज्ञाचे मार्गदर्शन व प्रक्षेत्र भेटी


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विदयापीठाच्‍या कृषि तंत्रज्ञान माहीती केंद्राच्‍या वतीने राष्‍ट्रीय कृषि विकास योजने अंतर्गत परभणी आणि हिंगोली जिल्‍हयातील विविध गांवामध्‍ये खरिप पिक संरक्षण आणि रब्‍बी पिक नियोजनासाठी विदयापीठ आपल्‍या दारी : तंत्रज्ञान शेतावरी हा विशेष विस्‍तार कार्यक्रम कुलगुरु मा. डॉ. बी. व्‍यकटेश्‍वरलू यांच्‍या निर्देशानुसार आणि संचालक विस्‍तार शिक्षण डॉ. पी. जी. इंगोले यांच्‍या मार्गदर्शनाखाली दिनांक २३ ऑगस्‍ट ते ०७ सप्‍टेंबर दरम्‍यान राबविण्‍यात आला, यास शेतक-यांनी मोठा प्रतिसाद दिला. या विस्‍तार कार्यक्रमासाठी विदयापीठातील विविध विषयाच्‍या शास्‍त्रज्ञांचे चार चमू करण्‍यात आले होते, प्रत्‍येक चमू मध्‍ये विविध विषयातील पाच ते सहा विद्यापीठ शास्‍त्रज्ञ सहभागी झाले होते. शास्‍त्रज्ञांच्‍या चमुने दोन्‍ही जिल्‍हयातील एकूण ५२ गावांना भेटी दिल्‍या, या भेटीमध्‍ये शेतक-यांनी विचारलेल्‍या विविध प्रश्‍नांची आणि अडचणीची सोडवणूक चर्चासत्राद्वारे व छोटया मेळाव्‍याद्वारे केली तसेच काही गावांमध्‍ये प्रत्‍येक्ष शेतक-यांच्‍या शेतावर जाऊन पाहणी केली. पाहणी दरम्‍यान शेतक-यांच्‍या शेतावर कापुस या पिकांवर फुलकिडे, लाल्‍या, पांढरीमाशी तर सोयाबीन या पिकावर शेंग करपा, पाने खाणारी अळी, उंदीर, खोडमाशी व चक्रीभुंगा तसेच पाणथळ जमिनीत सोयाबीन मर याच बरोबर तुर या पिकामध्‍ये मर, पाने गुंडाळणारी अळी, हळदीवर कंदमाशी, कंदसड, पानावरील करपा आदीं प्रमुख समस्‍या आढळून आल्‍या, या समस्‍यांचे विदयापीठातील शास्‍त्रज्ञाच्‍या चमूने शेतक-यांचे समाधानकारक निरसण केले, त्‍याचबरोबर रब्‍बी हंगामाच्‍या नियोजनाबद्दल मार्गदर्शन केले. 
कार्यक्रमाचे नियोजन विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. पी. जी. इंगोले यांच्‍या मार्गदर्शनाखाली विस्‍तार कृषि विदयावेत्‍ता डॉ. यु. एन. आळसे, किटकशास्‍त्रज्ञ प्रा. डि. डी. पटाईत, डॉ. एस.जी. पुरी, श्री. के. डी. कौसडीकर यांनी केले. शास्‍त्रज्ञांच्‍या चमूमध्‍ये विदयापीठ शास्‍त्रज्ञ, डॉ. यु. एन. आळसे, डॉ. सि. बी. लटपटे, प्रा. अे. टी. दौंडे, प्रा. डि. डी. पटाईत, डॉ. एस. जी. पुरी, डॉ. सी. व्‍ही. अंबाडकर, डॉ. व्हि. एम. घोळवे, डॉ. एस. पी. चव्‍हाण, प्रा. बी. एस. कलालबंडी, प्रा. पी. के. वाघमारे, प्रा. बि. व्‍ही. भेदे, डॉ. ए. जी. बडगुजर, प्रा. एन. इ. जायेवार, डॉ. जी. पी. जगताप, प्रा. जी. डी. गडदे, डॉ. डी. जी. मोरे आदींनी सहभाग नोंदवून शेतक-यांना मार्गदर्शन केले तसेच शेतक-यांच्‍या समस्‍या सोडविल्‍या. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी कृषि  विभागातील अधिकारी-कर्मचारी व संबधीत गावातील शेतक-यांनी विशेष सहकार्य केले. सदरिल कार्यक्रमाचा शेतक-यांना फायदा होत असल्‍याचे मत प्रत्‍येक गावातील शेतकरी व्‍यक्‍त करीत होते.