Friday, March 16, 2018

मौजे खटिंग सायाळा येथे वनामकृवि अंतर्गत असलेल्‍या महाविद्यालयाच्‍या रासेयो स्‍वयंसेवकांनी राबविले विविध सामाजिक उपक्रम

स्‍वयंसेवकांनी बांधला गेबीयन बंधारा व 70 स्‍वयंसेवकांनी केले रक्‍तदान 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या कृषि महाविद्यालय, कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय तसेच उद्यानविद्या महाविद्यालय यांच्‍या संयुक्त विद्यमाने राष्‍ट्रीय सेवा योजनाचे विशेष शिबीराचे आयोजन मौजे खटिंग सायाळा येथे करण्‍यात आले होते. सदरिल शिबीरात स्‍वयंसेवकांनी विविध सामाजिक उपक्रम राबविले. श्रमदानाच्‍या माध्‍यमातुन गेबीयन बंधारा बाधला तसेच ग्रामस्‍वच्‍छता, व्‍यक्‍तीमत्‍व विकास, उमेद कार्यक्रम, कृषि तंत्रज्ञान प्रसार मोहिम, स्‍वच्‍छता फेरी, शेतकरी चर्चासत्र, अंधश्रध्‍दा निर्मुलन, योग प्रशिक्षण, एडस जनजागरण, आरोग्‍य तपासणी आदी सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्‍यात आले होते. वाचवा पाणी, वाचवा शेतकरी याविषयावर कृषि महाविद्यालयातील स्‍वयंसेव‍क लक्ष्‍मण कदम, उन्‍नती निकम, विद्या ढेपे, कृष्‍णा हरकळ, गोपाल जंगले, शामबाला माने आदीनी पथनाटय सादर केले. डॉ कनकदंडे यांनी रक्‍तदानाचे महत्‍व विशद करून रक्‍तदान शि‍बीराची सुरूवात केली. रक्‍तदान शिबीरात 70 स्‍वयंसेवक व स्‍वयंसेविकांनी रक्‍तदान केले. दिनांक 14 मार्च रोजी विस्‍तार शिक्षण संचालक डॉ प्रदिप इंगोले यांनी स्‍वयंसेवकांना शेतक-यांसाठी कार्य करण्‍याचा सल्‍ला दिला. सदरिल शिबीराचा समारोप दिनांक 15 मार्च रोजी झाला. यावेळी व्‍यासपीठावर प्रसिध्‍द कवी प्रा अरूण पवार, प्रा. राजेंद्र गहाळ, डॉ. कनकदंडे, डॉ शिरूरे, सरपंचा वच्‍छलाबाई काळे, उपसरपंच लक्ष्‍मणराव खटिंग, प्रा. आर व्‍ही चव्‍हाण आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रसिध्‍द कवी प्रा अरूण पवार यांनी अफु नावाची कविता सादर करून शेतक-यांच्‍या समस्‍या मांडल्‍या तसेच स्‍त्रीवरील अत्‍याचाराचे चित्र आपल्‍या कवितेच्‍या माध्‍यमातुन सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्‍ध केले.
अध्‍यक्षीय समारोप प्रा. आर व्‍ही चव्‍हाण यांनी केला तर प्रास्‍ताविक डॉ जयकुमार देशमुख यांनी केले. सुत्रसंचालन विनोद ओसावार यांनी केले तर आभार रंगोली पडघण हिने केले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी रासेयो कार्यक्रमाधिकारी प्रा. विजयकुमार जाधव, डॉ जयकुमार देशमुख, प्रा. एस पी सोळंके, डॉ पपिता गोरखेडे, डॉ संजय पवार आदींसह रासेयोचे स्‍वयंसेवक स्‍नेहल इंगले, स्‍वप्‍ना शिंदे, सुमीत माने, तेजस्विनी भदरे, रोहणी पालेकर, प्रतिक्षा गुंडरे, कृष्‍णा, उफाड व गावकरी यांनी परिश्रम घेतले.