Monday, March 26, 2018

वनामकृवि अंतर्गत असलेल्‍या औरंगाबाद येथील बाजरी संशोधन प्रकल्‍प सर्वोकृष्‍ट संशोधन केंद्र

अखिल भारतीय समन्‍वयीत बाजरी संशोधन प्रकल्‍पाच्‍या 53 व्‍या वार्षिक गट बैठकीचे जोधपुर (राजस्‍थान) येथील कृषि विद्यापीठात दिनांक 22 ते 24 मार्च दरम्‍यान आयोजन करण्‍यात आले होते. सदरिल बैठकीत वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या औरंगाबाद येथील राष्‍ट्रीय कृषि संशोधन प्रकल्‍पाच्‍या अखिल भारतीय सन्‍मवयीत बाजरी संशोधन प्रकल्‍पास सन 2017-18 साठी उल्‍लेखनीय संशोधन कार्यासाठी सर्वोकृष्‍ट संशोधन केंद्र म्‍हणुन सन्‍मानित करण्‍यात आले. जोधपुर कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ बलराज सिंग हस्‍ते प्रमाणपत्र व मानचिन्‍ह विद्यापीठ शास्‍त्रज्ञांना प्रदान करण्‍यात आले. यावेळी आयसीएआरचे सहाय्यक महासंचालक डॉ आय एस सोलंकी, प्रकल्‍प सन्‍मवयक डॉ सी तारा सत्‍यवती आदींची प्रमुख उपस्थिती होती.
वनामकृविच्‍या औरंगाबाद येथील बाजरी संशोधन प्रकल्‍प केंद्रानी लोहयुक्‍त एएचबी-1200 व एएचबी-1269 ही दोन वाण विकसित केलेली असुन या वाणांची राष्‍ट्रीय पातळीवर लागवडीसाठी शिफारस करण्‍यात आलेली आहे तसेच हैद्राबाद येथील आंतरराष्‍ट्रीय संस्‍था इक्रीसॅट सोबतच्‍या उत्‍कृष्‍ट सन्‍मवयीत संशोधन कार्य, कृषिविद्या व पिक विकृतीशास्‍त्रातील शिफारसी आदी संशोधन कार्याच्‍या योगदानामुळे केंद्रास सन्‍माननित करण्‍यात आले आहे. कुलगुरू मा. डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु व संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर यांच्‍या मार्गदर्शनाखाली सदरिल बाजरी संशोधन केंद्रातील कार्यरत शास्‍त्रज्ञ सहयोगी संशोधन संचालक डॉ एस बी पवार, वरिष्‍ठ पैदासकार डॉ एन वाय सातपुते, डॉ जी पी जगताप, डॉ डि एम लोमटे, डॉ आर सी सावंत, डॉ एस एस घुगे, प्रा. एस बी कदम, डॉ एस आर जक्‍कावाड, डॉ एन आर पतंगे, एस एल माने, बी एन लघाने आदीचे संशोधनात मोलाचे योगदान आहे.