Tuesday, April 3, 2018

परभणी जिल्हयात बालकातील कुपोषण व वाढांक मुल्यमापनावर नऊ शास्त्रोक्त कार्यशाळा संपन्न

 परभणी जिल्‍हा मानव विकास समिती व वनामकृविच्‍या मानव विकास व अभ्‍यास विभागाचा संयुक्‍त उपक्रम

बालकातील कुपोण व संबंधी विकासात्मक दोषांच्या निर्मुलनासाठी परभणी जिल्हा मानव विकास समिती, महिला व बालविकास विभाग, परभणी जिल्हा परिद आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सामाजिक विज्ञान महाविद्यालयाच्‍या मानव विकास व अभ्यास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने एकात्मिक बालविकास सेवा योजनाचे कर्मचारी व जिल्‍हा परिषद शाळेचे शिक्षकांसाठी बालकांमधील कुपोषणाचे प्रमाण कमी करण्‍यासाठी वाढांक मुल्‍यमापनावर शास्त्रोक्त कार्यशाा मार्च महिण्‍यात जिल्‍हयात विविध ठिकाणी घेण्‍यात आल्‍या. परभणी, पुर्णा, पालम, सोनपेठ, गंगाखेड, मानवत, जिंतूर, पाथरी व सेलू या नऊ तालुक्यांच्या ठिकाणी कार्यशाळा घेण्‍यात आल्‍या. यात परभणी जिल्हयातील एकात्मिक बालविकास सेवा योजनाचे 1260 कर्मचारी, जि.प. शाळा शिक्षक कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील 235 विद्यार्थीनींनी सहभाग नोंदविला.
मानव विकास विभागाने विकसित केलेल्या तंत्रज्ञानाचा गावागावात मोठया प्रमाणात प्रसार व्हावा, या उद्देशाने सदरिल कार्यशाळा आयोजनाची संकल्पना परभणी जिल्हाधिकारी मा. शिवाशंकरवनामकृविचे कुलगुरु मा. डॉ. बी. व्यंकटेश्‍वरलु मानव विकास शास्‍त्रज्ञा व विभाग प्रमुख प्रा. विशाला पटनम पुढाकारांनी आखण्‍यात येऊन कार्यशाळांसाठी महाराष्‍ट्र शासनाद्वारे उपलब्ध निधीतुन परभणी जिल्हा मानव विकास समितीच्या वतीने सदरिल कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले. कार्यशाळांच्या यस्वीततेसाठी परभणी जिल्हा परिचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. पृथ्वीराज बी. पी., उपमूख्य कार्यकारी अधिकारी (बा.क) श्री एस. ई. देसाई 9 तालुक्याचे सीडीपीओ यांनी विशेष प्रयत्न केले. बालकांच्‍या चांगल्‍या भविष्‍यासाठी या सारख्‍या नावीन्यपूर्ण कार्यशाळांच्‍या नियमित आयोजनाची गरजेचे असल्याचे मनोगत प्रशिक्षणार्थीनी व्यक्त केले.

कार्यशाळेत मार्गदर्शनात मानव विकास शास्‍त्रज्ञा प्रा. विशाला पटणम यांनी पुढील बाबीवर भर दिला
सदरिल प्रशिक्षणात विद्यापीठातील मानव विकास शास्त्रज्ञ व विभाग प्रमुख प्रा. विशाला पटनम यांनी प्रामुख्‍यांने नावीन्यपूर्ण पद्धतींचा अवलंब करुन प्रशिक्षण दिले. शास्त्रोक्त कार्यशाळेसाठी वातावरण निर्मिती करुन प्रशिक्षणार्थीनींना स्‍वत:ची कर्तव्‍य व कार्यावियी संवेदनशील करण्यात येऊन त्यांच्या बालकांच्‍या वाढांक मूल्यमापनाच्या तंत्रज्ञानाची माहिती देण्‍यात आली. वाढांक मूल्यमापनावर प्रात्याक्षिक, पॉवर पईंट सादरीकरण, संबंधीत अभ्‍यास संदर्भ, मनोरंजक गोष्‍टी, उदाहरणे आदींचा अवलंब करण्यात आला तसेच संबंधीत विषयाच्‍या घडीपुस्तिका इतर साहित्याचे वाटपही करण्‍यात आले.
न स्वस्थ तर मन स्वस्थ या उक्तीनुसार मानवाच्या सर्वांगीण विकासासाठी शारीरिक स्‍वस्‍थाचे महत्व पटवून देण्यात आले.
गर्भवती मातां स्वतःच्या आहार, आरोग्य, लसीकरण, मानसिक स्वास्थ्य, व्यायाम, प्रसुती दरम्यान योग्य काळजी घेतल्यास सुदृढ नवजात अर्भक जन्मास येऊ शकते. प्रौढपणी त्यांचे अपेक्षीत असलेली त्यांचे वजन (6%), उंची (30%), व डोक्याचा घेर (60%) याप्रमाणे विकसित होतो. नवजात अर्भकाचे वजन योग्‍य असेल तर जन्मानंतर सुरुवातीच्या काळात त्यांची विशेष काळजी घ्यावी लागते यावियी कुटुंबानी जागरुक असावे, असे त्यांनी स्पष्‍ट केल.
वयाच्या 4 वर्षापर्यंत बालकाचा आहार, आरोग्य, लसीकरण आदीबाबत काळजी घेतल्यास त्यांच्या डोक्याचा घेर हा प्रौढ व्यक्तीच्या असावयाच्या डोक्याचा घेराच्या 90 टक्के होऊन पुढे 8 वर्षांपर्यंत त्यांच्या वयोपरत्वे अशीच काळजी घेतल्यास तो 98 टक्के इतका वाढतो व 8 ते 18र्ष वयापर्यंत त्याची उपरोक्त प्रमाणे काळजी घेतली गेल्यास त्यात केवळ 2 टक्के वाढ होते. यावरुन असे स्पष्‍ट होते की, गर्भावस्थेपासूनच बालकांची सर्वतोपरी काळजी घेतल्यास बालकातील कुपोण तथा त्यासंबंधीच्या विकासात्मक दोषांचे निराकरण होऊन त्यांचा उच्चतम सर्वागींण विकास घडल्यामुळे भविष्‍यात अशी बालके यस्वी व आनंदीपणे आपले जीवन व्यतीत करण्यासाठी सक्षम होतात,शी ग्वाही प्रा. विशाला पटनम यांनी दिली. बालसंगोपनाबाबत पालकांना जर स्मार्ट व्हावयाचे असेल तर उपरोक्त बाबतीत अधिक जागरुक असणे नितांत गरजेचे असल्याचे मत त्यांनी या कार्यशाळां व्यक्त केले.