Sunday, October 21, 2018

मौजे इटलापूर (ता. जि. परभणी) येथे दिवसीय शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम संपन्‍न


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे संशोधन संचालनालयांतर्गत कृषि व शेतकरी कल्याण मंत्रालय (भारत सरकार) अंगीकृत राष्ट्रीय वनस्पती स्वास्थ प्रबंधक संस्थान, हैद्राबाद यांच्या माध्‍यमातुन राबविण्‍यात येत असलेल्‍या राष्ट्रीय पातळीवरील असंतुलीत व अनियंत्रीत रासायनिक खत व किटकनाकाचा पिकांवर होणारा प्रभावया संशोधन प्रकल्पाच्‍या वतीने दि. २० ऑक्टोबर रोजी मौजे इटलापूर ता. जि. परभणी येथे रासायनिक खते व किटकनाशाकांच्या असंतुलीत व जास्त वापरामुळे पीक व जमिनीच्या आरोग्यावर होणारे दुष्परीणाम याविषयावर एक दिवसीय शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन करण्‍यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्‍हणुन मृदाशास्त्रज्ञ डॉ. सय्यद इस्माईल, व किटकशास्त्रज्ञ डॉ. बी. व्ही. भेदे हे उपस्थित होते.
अध्‍यक्षीय भाषणात संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर यांनी प्रकल्पाची उद्दिष्टे, कोरडवाहू शेती पद्धती, सेंद्रीय पदार्थाचा योग्य वापर, अपांरपारीक पिके लागवड, यात निसर्गाला हानी न पोहोचवता जमिनीचे आरोग्य कसे राखावे याबद्दल मार्गदर्शन करून विद्यापीठ विकसित ज्वारीचे नवीन वाण परभणी क्ती वाणाद्वारे मानवी आहारातील अन्नद्रव्यांची कमतरता पुर्ण केल जाऊ कते असे सांगितले.
डॉ. सय्यद इस्माईल यांनी सद्यस्थितीतील अन्नद्रव्यांचा वापर, अन्नद्रव्यांची कमतरता, मानवाच्या आहारातील व रीरातील अन्नद्रव्यांचे बदलणारे प्रमाण उदभवणारे रोग व समस्या यावर मार्गदर्शन केले. तसेच डॉ. बी. व्ही. भेदे यांनी पिके व त्यांवरील विविध किडी, खत व किटकनाकांच्या वापरानुसार किटकांमध्ये होणारे बदल, प्रतिकारक्षमता व यांचे नियंत्रण यावर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास पंचायत समिती सदस्य श्री. सुतारे,  उपसरपंच श्री. नांगरे, प्रगतशीशेतकरी श्री. पाटील व समस्त गावकरी मंडळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. गणेगायकवाड यांनी तर आभार गोविंद देमुख यांनी मानले. देशात केवळ सात विद्यापीठाची या संशोधन प्रकल्‍पाकरीता निवड करण्यात आलेली अुसन  राज्‍यात केवळ वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतच हा प्रकल्‍प आहे. यात सोयाबीन व वांगी या पिकामध्ये संशोधन करण्यात येत आहे.