Friday, November 2, 2018

मौजे असोला येथे कृषि संवाद कार्यक्रम संपन्‍न

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील परभणी कृषि महाविद्यालय व अखिल भारतीय समन्‍वयीत सोयाबीन संशोधन केंद्र याच्‍या सयुक्‍त विद्यमाने ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत मौजे असोला येथे दुष्‍काळी परिस्थितीत चा-याचे व पाण्‍याचे व्‍यवस्‍थापन यावर दिनांक 31 ऑक्‍टोबर रोजी कृषि संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले होते. कार्यक्रमास प्रगतशील शेतकरी दत्‍ताराव जावळे, कृषि विभागाचे माजी संचालक अनंतराव जावळे, विभाग प्रमुख डॉ आर डी आहिरे, डॉ बी एम ठोंबरे, डॉ यु एम खोडके, डॉ एस पी म्‍हेत्रे, डॉ ए जी बडगुजर, डॉ ए टी शिंदे, लक्ष्‍मणराव जावळे, व्‍यंकटी जावळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी डॉ बी एम ठोंबरे यांनी दुष्‍काळ परिस्थितीत पशुसंवर्धन व पशुखाद्य व्‍यवस्‍थापन यावर मार्गदर्शन केले. तसेच डॉ आर डी आहिरे यांनी शेतीपुरक जोड व्‍यवसयावर तर उपलब्‍ध पाण्‍याचे कार्यक्षम व्‍यवस्‍थापन यावर डॉ यु एम खोडके, किड व्‍यवस्‍थापनावर डॉ ए जी बडगुजर यांनी तर रबी पिक व्‍यवस्‍थापनावर डॉ एस पी म्‍हेत्रे यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक डॉ ए टी शिंदे यांनी केले. सुत्रसंचालन पल्‍लवी कांबळे व मोहिनी तिथे हिने केले तर आभार पुजा काळबांडे हिने मानले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी कृषीकन्‍या व गांवक-यांनी परिश्रम घेतले.