Sunday, March 3, 2019

सेंद्रीय बिजोत्पादनातुन शेतक-यांना आर्थिक पाठबळ मिळु शकते......जेष्ठ पिक पैदासकार डॉ एस पी मेहत्रे

वनामकृवित औरंगाबाद आणि जालना जिल्हयातील शेतक-यांसाठी आयोजित दोन दिवसीय सेंद्रीय शेती प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राच्‍या वतीने मराठवाडयातील विविध जिल्‍हयातील शेतक­यांसाठी दोन दिवसीय सेंद्रीय शेती प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत असुन औरंगाबाद आणि जालना जिल्हयातील शेतक-यांसाठी आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन दिनांक 1 मार्च रोजी संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ पिक पैदासकार डॉ. एस. पी. मेहत्रे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन आंतरराष्ट्रीय अेडीएम कंपणीचे शेतकरी संपर्क प्रमुख श्री प्रका शेनॉय, कृषि अभियंता डॉ. स्मिता सोलंकी, कृषिविद्यावेत्ता डॉ. आनंद गोरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

अध्यक्षीय भाषणात मार्गदर्शन करतांना जेष्ठ पिक पैदासकार डॉ. एस. पी. मेहत्रे म्‍हणाले की, आज हवामान बदल, शेतीतील वाढत असलेला उत्‍पादन खर्च, जमिनीचे खालावलेले आरोग्य आदीं पार्श्‍वमुमीवर सेंद्रीय शेतीकडे शेतकरी आशेने बघत आहेत. सेंद्रीय शेती करतांना शेतक-यांनी मुलभुततत्वांचे पालन करावे तसेच सेंद्रीय पिकांमध्ये सरळ व सुधारीत वाणाचा वापर करावा. आज सेंद्रीय बियाण्यास मागणी वाढत असुन सेंद्रीय बिजोत्पादनातुन शेतकरी आर्थिक पाठबळ मिळु शकते. गटशेतीच्या माध्यमातुन सेंद्रीय बिजोत्पादन राबविल्यास खर्चास बचत होऊन गुणवत्तापुर्ण बियाणे उपलब्ध होण्यास मदत होईल, यासाठी तांत्रिक पाठबळ देण्यास विद्यापीठ सदैव तयार आहे. 
अेडीमचे शेतकरी संपर्क प्रमुख श्री. प्रका शेनॉय आपल्‍या भाषणात सांगीतले की, शेतक­यांचे सेंद्रीय उत्पादन खरेदी अेडीएम पुढाकार घेईल सेंद्रीय प्रमाणीकरणाचा खर्च कंपनीतर्फे करण्यात येईल. शेतक­यांना सेंद्रीय माल उत्पादन प्रक्रीयेसाठी प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्नशील राहुन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठच्या सहकार्याने भविष्यात विविध उपक्रम शेतक­यांसाठी राबविण्यात येतील असे त्‍यांनी सांगीतले. कृषि अभियंता डॉ. स्मिता सोळंकी म्‍हणाले की, सेंद्रीय शेती वापरण्यात येणा­या विविध निविष्ठांसाठी कमी खर्चाची व उपयोगी अवजारांचा वापर केल्यास शेतक­यांना लाभ होईल. योग्य अवजारांचा वापर केल्यास खर्चाची व वेळेची बचत करता येईल. प्रास्ताविकात डॉ. आनंद गोरे यांनी सेंद्रीय शेती पीक उत्पादन सेंद्रीय प्रमाणीकरण या दोन्ही बाबींवर लक्ष देणे आवश्‍यक असुन याबाबत योग्य प्रशिक्षण घेतले तर अपेक्षित लाभ घेता येईल, असे सांगितले.

तांत्रिक सत्रा डॉ एस कारले यांनी सेंद्रीय पीक लागवड तंत्रज्ञान, हार्षल जैन यांनी सेंद्रीय प्रमाणीकरण, डॉ एस जावळे यांनी अन्नद्रव्य व्यवस्थापन, डॉ के गोरे यांनी सेंद्रीय पीक व्यवस्थापन, कृषि अभियंता डॉ. सौ. स्मिता सोलंकी यांनी पशुक्तीचा सेंद्रीय शेती कार्यक्षम वापर याविषयावर मार्गदर्शन केले. सदरिल प्रशिक्षण कार्यक्रम कुलगुरु मा. डॉ. अशोक ढवण आणि संचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकर यांचे संकल्‍पनेतुन व मार्गदर्शनाखाली घेण्‍यात येत आहेत. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सतिकटारे यांनी केले तर आभार अभिजीत कदम यांनी मानले. प्रल्हाद गायकवाड, बालु दारभळे, डॉ. सुनिल जावळे, सचिन रनेर,  नागरेसावंत, दिपक शिंदे आदींनी परिश्रम घेतले. प्रशिक्षणास औरंगाबाद व जालना जिल्हयातील शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.