– संरक्षण भिंत, औषधी बाग, ऍग्रो टुरिझम प्रकल्प, संग्रहालय यासाठी मार्गदर्शन
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी कृषि विज्ञान केंद्र, तुळजापूरला दिनांक ७ एप्रिल रोजी दिलेल्या भेटीदरम्यान केंद्राच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस उपाययोजना राबविण्याचे निर्देश दिले. विविध विभाग व स्थानिक यंत्रणांच्या सहकार्याने हे केंद्र भविष्यात उत्कृष्ट विकास साधेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी सर्वप्रथम केंद्राच्या संरक्षण भिंतीची पाहणी करून तिच्या सध्याच्या
स्थितीचा आढावा घेतला. पश्चिमेकडून शहरातील येणाऱ्या पाण्याच्या समस्येवर तोडगा
काढण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी समन्वय करून समांतर
चर खोदण्याचे निर्देश दिले. याच दरम्यान विद्यापीठ अभियंता श्री. दीपक काशाळकर
यांच्याशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधून संरक्षण भिंतीसह भव्य प्रवेशद्वाराचे काम
लवकरात लवकर सुरू करण्याच्या सूचना केल्या.
प्रक्षेत्रातील गोडाऊन व शेतकरी
निवासाच्या अर्धवट कामांचे पूर्णत्व आठ ते दहा दिवसांत सुनिश्चित करण्यास
सांगितले. तसेच,
न वापरात असलेल्या भंगार वस्तूंचा लिलाव करून केंद्राचा
परिसर स्वच्छ ठेवण्यावरही भर दिला. झाडांच्या तोडपरवान्यांसाठी तुळजापूर
नगरपंचायतचे मुख्याधिकारी श्री. अजिंक्य रणदिवे यांच्याशी संपर्क साधून आवश्यक
सहकार्य मिळवण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान कार्यालयात झालेल्या बैठकीत माननीय कुलगुरूंनी कृषि विज्ञान केंद्राचा परिसर ऍग्रो टुरिझम हब म्हणून विकसित करून लवकरात लवकर त्याची
नोंदणी करण्यात यावी, परिसराचे सौंदर्यीकरण करणे अत्यावश्यक असून जिल्हाधिकारी व जिल्हा
नियोजन समितीच्या सहकार्याने निधीची मागणी करावी, परिसरात औषधी
वनस्पतींची बाग
(Medicinal Garden) उभारण्याचे नियोजन करावे, तेलबिया
पिकांचे संग्रहालय
स्थापन करून शेतकरी व पर्यटकांना आकर्षित करावे, आणि कृषि
विज्ञान केंद्रासाठी २०२५-२६ या वर्षात विद्यापीठ महसूलातून
निधी उपलब्ध
करून देण्यासाठी नियंत्रक कार्यालयाशी संपर्क साधावा, या महत्त्वाच्या
बाबी सुचवून त्यावर मार्गदर्शन केले.
या भेटीदरम्यान केंद्राचे कार्यक्रम
समन्वयक डॉ. सचिन सूर्यवंशी, शास्त्रज्ञ श्रीमती वर्षा
मरवाळीकर,
डॉ. विजयकुमार जाधव, श्रीमती
अपेक्षा कसबे तसेच डॉ. श्रीकृष्ण झगडे आदी मान्यवर उपस्थित होते.
या यशस्वी भेटीसाठी कृषि
विज्ञान केंद्राचे कर्मचारी श्री. सखाराम मस्के, जगदेव हिवराळे, बालाजी कदम, शिवराज रुपनर, शब्बीर शेख आदींनी विशेष
मेहनत घेतली. कार्यक्रमाचा समारोप शास्त्रज्ञ डॉ. विजयकुमार जाधव यांनी सर्व
मान्यवरांचे आभार मानून केला.
