कोरडवाहू शेतीसाठी नैसर्गिक शेती व कृषि संलग्न उपक्रमांचा समन्वय गरजेचा.... माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि
वसंतराव नाईक
मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत अखिल भारतीय
समन्वयित कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्पाच्या वतीने “मराठवाडा विभागातील कोरडवाहू
शेतीत खरीप हंगामाचा आढावा व रब्बी पीक व्यवस्थापन नियोजन” या विषयावर एकदिवसीय
ऑनलाइन कार्यशाळेचे आयोजन दिनांक १९ डिसेंबर २०२५ रोजी करण्यात आले.
या
कार्यशाळेचे अध्यक्षस्थान माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी भूषविले.
उद्घाटनपर मार्गदर्शनात त्यांनी कोरडवाहू शेतीचे व्यवस्थापन करताना जमिनीचे जैविक
घटक व आरोग्य जपणे अत्यंत महत्त्वाचे असून,
यासाठी सेंद्रिय व नैसर्गिक शेतीचे अनन्यसाधारण महत्त्व असल्याचे
त्यांनी स्पष्ट केले. तसेच महाराष्ट्र राज्य नैसर्गिक शेतीसाठी कटिबद्ध असून
त्यासाठी प्रोत्साहन देत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
कोरडवाहू शेती
ही केवळ पिकांचे उत्पादन वाढविण्यापुरती मर्यादित नसून, त्यामध्ये फलोत्पादन, पशुधन
विकास, मत्स्यपालन, कुक्कुटपालन,
रेशीम शेती आदी कृषि संलग्न घटकांचाही समावेश असून, या सर्व बाबी एका छत्राखाली राबवण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी
सांगितले. या सर्व उपक्रमांचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांचे कल्याण, त्यांचे उत्पन्न व आनंद वाढवणे हा असला पाहिजे. यासाठी कोरडवाहू शेतीत
पाणी बचत करणारे तंत्रज्ञान, जमिनीचे आरोग्य सुधारण्याच्या
पद्धती, सेंद्रिय घटकांची निर्मिती तसेच प्रभावी लागवड
तंत्रांचा अवलंब करणे आवश्यक आहे. मात्र, या शिफारशी देताना
शेतकऱ्यांच्या अवलंबनामध्ये गोंधळ निर्माण होऊ नये, यासाठी
सर्व शास्त्रज्ञांनी समन्वयाने चर्चा करून शेतकरी-उपयुक्त व सहज अवलंबण्याजोग्या
शिफारशी द्याव्यात. तसेच मराठवाड्यातील कोरडवाहू शेतीसाठी संशोधन, विस्तार व कृषि विभाग यांचा समन्वय अत्यंत महत्त्वाचा असल्याचे त्यांनी
नमूद केले.
कार्यक्रमात
आयसीएआर-क्रिडा, हैदराबाद येथील
प्रकल्प समन्वयक डॉ. जे. व्ही. एन. एस. प्रसाद, संशोधन संचालक
डॉ. खिजर बेग व विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांनीही मार्गदर्शन केले.
कार्यशाळेत
खरीप हंगामाचा आढावा व रब्बी पीक व्यवस्थापनावर सादरीकरण सहसंचालक कृषि श्री.
सुनील वानखेडे (छत्रपती संभाजीनगर विभाग) तसेच श्री. महेश तिर्थकर (लातूर विभाग)
यांनी केले. सध्याच्या व आगामी हवामान अंदाजाबाबत माहिती डॉ. के. के. डाखोरे, मुख्य शास्त्रज्ञ (कृषि हवामानशास्त्र) यांनी
दिली. प्रास्ताविक प्रभारी अधिकारी डॉ आनंद गोरे यांनी केले.
लातूर, अंबाजोगाई, परभणी,
नांदेड व छत्रपती संभाजीनगर येथील विस्तार कृषि विद्यावेत्ता यांच्या
अनुभवांवर आधारित विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात रब्बी
हंगामातील पीक व्यवस्थापनाबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
रब्बी पीक
व्यवस्थापनावर सादरीकरण करताना कृषिशास्त्रज्ञ डॉ. आनंद गोरे (कृषिविद्याशास्त्र), डॉ. मदन पेंडके (कृषि अभियांत्रिकी), विभाग प्रमुख डॉ. प्रफुल घंटे (वनस्पती रोगशास्त्र), डॉ. गजेंद्र लोंढे (पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र), डॉ.
विश्वनाथ खंदारे (फलोत्पादन), सहयोगी संशोधन संचालक डॉ. सुर्यकांत पवार, प्रभारी अधिकारी
डॉ. शिवाजी शिंदे (केळी संशोधन केंद्र), डॉ. संजय पाटील (फळ संशोधन केंद्र), डॉ.
किरण जाधव (एकात्मिक शेती पद्धती योजना)आणि शास्त्रज्ञ डॉ. वसंत सुर्यवंशी, (कृषिविद्याशास्त्र),
डॉ. गणेश गायकवाड (मृदा शास्त्र), डॉ.अनंत लाड (कीटकशास्त्र), डॉ. राजेश भालेराव यांनी पीक, पालोत्पादन, पशुधन उत्पादन वाढ, कीड-रोग व्यवस्थापन, मृदा आरोग्य व यांत्रिकीकरण
याबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ,
परभणी अंतर्गत कार्यरत सर्व जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी (DSAO),
तालुका कृषि अधिकारी (TAO), मंडळ कृषि अधिकारी
(CAO), कृषि विज्ञान केंद्रे (KVK) तसेच
विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी सहभाग घेतला. संवाद सत्रात क्षेत्रीय समस्यांवर
चर्चा करत शाश्वत व शेतकरी-केंद्रित उपाययोजनांवर भर देण्यात आला.
शेवटी या कार्यशाळेतून मिळालेल्या शिफारशी शेतकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्याचे आयोजकांनी आवाहन केले. या कार्यक्रमामुळे शेतकऱ्यांपर्यंत अद्ययावत तंत्रज्ञान प्रभावीपणे पोहोचविण्यास मदत होणार असून रब्बी हंगामातील उत्पादनक्षमतेत वाढ होण्यास हातभार लागेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला. सूत्रसंचालन डॉ. गणेश गायकवाड व पपिता गौरखेडे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. मदन पेंडके यांनी केले.







.jpeg)
.jpeg)
.jpeg)

.jpeg)
.jpeg)


.jpeg)




.jpeg)
.jpeg)





.jpeg)


.jpeg)


.jpeg)



.jpeg)
.jpeg)

.jpeg)
.jpeg)
.jpeg)



.jpeg)


.jpeg)


.jpeg)

.jpeg)


.jpeg)

