Pages

Thursday, May 15, 2025

मराठवाड्यातील शेतीच्या समस्या आणि शेतीचा शाश्वत विकास यावर चर्चा

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापिठातील कृषि अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविदयालयात मराठवाड्यातील शेतीच्या समस्या आणि शेतीचा शाश्वत विकास या विषयावर दिनांक १५ मे रोजी चर्चा अयोजित करण्यात आली. नवी दिल्लीचा भारत ग्रामीण जीवनोन्नती फाउंडेशनचे कार्यकरी सदस्य आणि आंतरराष्ट्रीय विकास सल्लागार श्री. रवि प्रताप सिंग, सहयोगी अधिष्ठाता डॉ. राहुल रामटेके, सरस्वती सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष श्री. प्रल्हाद कुटे, सचिव श्री. रमेश कुटे, संशोधन अभियंता डॉ.स्मिता सोळंकी आदींची उपस्थीती होती.

सुरुवातीस डॉ. राहुल रामटेके यानी कृषि अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयाने महाविदयालयाने केलेल्या संशोधनाचा आणि विकासित केलेल्या तंत्रज्ञाचा आढावा घेतला.

चर्चेत सहभागी होताना विभाग प्रमुख डॉ. मदन पेंडके, डॉ. हरीश आवारी, डॉ. सुभाष विखे, डॉ.स्मिता सोळंकी डॉ. गोपाळ शिंदे, डॉ. प्रमोदिनी मोरे, प्रा. लक्ष्मीकांत राऊतमारे यांनी अनुक्रमे मृद जल संधारण तंत्रज्ञान, सिंचन व्यवस्थापन, सुधारित शेती औजारे, ड्रोनचा वापर, हरित गृह तंत्रज्ञान, कृषि प्रक्रीया तंत्रज्ञान, शेतीचे  विविध प्रश्न याविषयी  महिती दिली.

श्री. रवि प्रताप सिंग म्हणाले की, राठवाड्यामध्ये शेती संबंधित अनेक समस्या आहेत यात सिंचनाची कमतरता, कमी होणारे मनुष्यबळ, आणि नैसर्गिक आपत्तींचा समावेश आहेअनियमित पाऊस आणि दुष्काळ यांसारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे शेतीला मोठा फटका बसतो सिंचनाचे साधन कमी असल्याने, शेती मुख्यत्वे पावसावर अवलंबून असतेशेतीमध्ये काम करणारे मनुष्यबळ कमी होत चालले आहे, ज्यामुळे शेतीमध्ये यांत्रिकीकरण आवश्यक होत आहे

कार्यक्रमाला विभाग प्रमुख प्रा. विवेकानंद भोसले, तसेच डॉ.सुमंत जाधव, डॉ.रवींद्र शिंदे, डॉ.संदीपान पायाळ, डॉ.विशाल इंगळे, प्रा. दत्तात्रय पाटील, डॉ.गजानन वासू, डॉ.ओंकार गुप्ता, डॉ.शैलजा देशवेंना, डॉ. अश्विनी गावंडे, डॉ.अनिकेत वाईकर  आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन डॉ.मधुकर मोरे यांनी केले तर रमेश कुटे यांनी उपस्थितांचे आभार मानले.