Tuesday, August 4, 2015

बाल विकास व शिक्षण केंद्राचे व्यवस्थापन प्रमाणपत्र अभ्याससक्रमाचा शुभारंभ


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत असलेल्‍या गृहविज्ञान महाविद्यालयाच्‍या मानव विकास व कौटुंबिक अभ्‍यास विभागातर्फे दि ३ ऑगस्‍ट ते ३ नोव्‍हेंबर या तीन महिने कालावधीत बाल विकास व शिक्षण केंद्राचे व्‍यवस्‍थापन या प्रमाणपत्र अभ्‍यासक्रमाचे आयोजन करण्‍यात आले असुन अभ्‍यासक्रमाचे उद्घाटन दि ३ ऑगस्‍ट रोजी कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. याप्रसंगी प्राचार्य प्रा विशाला पटणम, डॉ रम्‍मना देसेट्टी, डॉ जया बंगाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

   उद्घाटनपर भाषणात कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु म्‍हणाले की, आजचे बालक हे उद्याचे नागरिक असुन त्‍यांच्‍या विकासात पालक व‍ बालशिक्षकाची भुमिका महत्‍वाची आहे. शास्‍त्रोकरीत्‍या बालसंगोपनाचे महत्‍त्‍व लक्षात घेऊन समाजाच्‍या गरजेनुसार या अभ्‍यासक्रमाची आखणी करण्‍यात आली असुन राष्‍ट्रीय पातळीवर नावलौकीक प्राप्‍त झालेल्‍या विभागामार्फत राबविल्‍या जात, याचा प्रशिक्षणर्थ्‍यांना निश्चितच लाभ होणार असे सांगुन प्रमुख समन्‍वयीका प्राचार्या प्रा विशाला पटणम यांच्‍या नेतृत्‍वाखाली तयार करण्‍यात आलेल्‍या अभ्‍यासक्रमाबाबत त्‍यांनी प्रशंसा केली.

   या तीन दिन महिन्‍याच्‍या अभ्‍यासक्रमाचा उद्देश्‍य उत्‍कृष्‍ट पालक व बालशिक्षक निर्माण करणे हा असुन या अभ्‍यासक्रमाव्‍दारे प्रशिक्षणार्थींना दर्जेदार बाल विकास व शिक्षण केंद्र जसे की, पाळणाघर, प्‍ले स्‍कुल, नर्सरी स्‍कुल, किन्‍डर गार्डन, बाल विकास केंद्र, पुर्व प्राथमिक शाळा, बाल छंद वर्ग आदी सुरू करण्‍यासाठी किंवा अश्‍या केंद्रात संगोपक शिक्षकांची नौकरी करून अर्थार्जन करण्‍यासाठी सक्षम केले जाणार आहे. यावेळी प्राचार्या प्रा विशाला पटणम लिखित प्रायोगिक पुर्व प्राथमिक शाळेच्‍या दर्जेदार माहितीघडीपत्रिकेचे विमोचन कुलगुरूंच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. सदरिल कार्यक्रमात प्राचार्य प्रा विशाला पटणम यांनी बाल विकास व शिक्षणाचा दर्जा उंचावण्‍याची गरज यावर मार्गदर्शन केले. डॉ रम्‍मना देसेट्टी यांनी उत्‍तेजनात्‍मक वातावरणातुन बालविकास कसा घडवावा याविषयी तर डॉ जया बंगाळे यांनी बालकांच्‍या विकासात्‍मक गरजा व‍ त्‍यांची पुर्तता या विषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास विभागाच्‍या प्राध्‍यापीका, प्रशिक्षणार्थी व विद्यार्थी मोठया संख्‍येने उ‍पस्थित होते.

Saturday, August 1, 2015

कृषि विद्यापीठ व कृषि विभागांनी आपत्का‍लीन पिक व्यवस्थापन शिफारशींचा प्रसार करावा..... कुलगुरू मा डॉ बी व्यंकटेश्वरलु

क्रॉपसॅप प्रकल्‍पाची एक दिवसीय विभागीय कार्यशाळा संपन्‍न 
कार्यशाळेत मार्गदर्शन करतांना कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु, व्‍यासपीठावर संशोधन संचालक डॉ डि पी वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, लातुर विभागाचे विभागीय कृषि सहसंचालक श्री एस आर सरदार, विभाग प्रमुख डॉ पी आर झंवर आदी
कार्यशाळेत मार्गदर्शन करतांना लातुर विभागाचे विभागीय कृषि सहसंचालक श्री एस आर सरदार, व्‍यासपीठावर कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु, संशोधन संचालक डॉ डि पी वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, , विभाग प्रमुख डॉ पी आर झंवर आदी
 *****************
मराठवाडा विभागात यावर्षी आजपर्यंत पाऊसाचे प्रमाण अत्‍यल्‍प झाले असुन देशाचा विचार करता सर्वात बिकट अवस्‍था मराठवाडयात पाहावयास मिळत आहे. काही भागात पेरणीच झाली नाही तर काही भागात पेरणी झाली परंतु पिके जगण्‍याची शाश्‍वतता नाही. अशा परिस्थितीत पुढील काही दिवसात पाऊस पडला तर कोणती पिके लागवडीसाठी योग्‍य असतील याबाबत विचारमंथन करून कृषि विद्यापीठ व कृषि विभाग यांनी आपत्‍कालीन पिक व्‍यवस्‍थापनाच्‍या शिफारशींचा प्रसार करावा, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांनी केले. महाराष्‍ट्र शासनाचा कृषि विभाग व वसंतराव नाईक मराठवाडा कृ‍षी विद्यापीठाचा कीटकशास्‍त्र विभाग यांचया संयुक्‍त विद्यमाने सोयाबीन, कापुस, तूर व हरभरा पिकावरील कीड-रोग सर्वेक्षण व सल्‍ला (क्रॉपसॅप) प्रकल्‍पांतर्गत दि १ ऑगस्ट रोजी कृषि विभागातील अधिका-यांसाठी विभागीय कार्यशाळेचे आयोजन करण्‍यात आले होते, या कार्यशाळेच्‍या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. या प्रसंगी व्‍यासपीठावर संशोधन संचालक डॉ डी पी वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, विभागीय कृषि सहसंचालक श्री एस आर सरदार, कुलसचिव डॉ डि एल जाधव, विभाग प्रमुख डॉ पी आर झंवर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु पुढे म्‍हणाले की, बियाण्‍याची उपलब्‍धता, बाजारपेठेतील मागणी, आर्थिक लाभ आदीं बाबींचा विचार करूनच कृषि विद्यापीठ व कृषी विभाग यांनी पुढील काळासाठी शेतक-यांना योग्‍य पिक लागवडीबाबत शिफारस करावी, असा सल्‍ला त्‍यांनी दिला.
विभागीय कृषि सहसंचालक श्री एस आर सरदार मार्गदर्शन आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, मराठवाडातील काही भागात पाऊसाचा ४० दिवसांपेक्षाही जास्‍त खंड पडला असुन पिके होरपळत आहेत. हलक्‍या जमिनीवरील पिके जवळपास सुकली असुन मध्‍यम ते भारी जमिनीवरील पिके काहीअंशी तग धरून आहेत. पिकांना सरंक्षित पाणी देण्‍यासाठीही पाण्‍याची  उपलब्‍धता नसुन कृषि विद्यापीठ शास्‍त्रज्ञ व कृषि विभागातील क्षेत्रीय अधिकारी यांनी एकत्रितपणे शेतक-यांना या परिस्थितीतही तंत्रज्ञानाचे बळ देण्‍याची गरज असल्‍याचे मत त्‍यांनी व्‍यक्‍त केले.
मराठवाडातील भुजल पातळी अधिकाधिक घटत असुन पाण्‍याचे दुर्भक्ष निर्माण होत असल्‍याचे संशोधन संचालक डॉ डि पी वासकर आपल्‍या भाषणात म्‍हणाले तर विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले म्‍हणाले की, मराठवाडातील काही जिल्‍हयात हुमणी किडीचा प्रादुर्भाव आढळुण येत असुन विद्यापीठ याबाबत शेतक-यांना मार्गदर्शन करीत आहे, हुमणी किडीच्‍या नियंत्रणासाठी कृषि विद्यापीठ कृषि विभागाच्‍या सहकार्यातुन लवकरच प्रकल्‍प हाती घेणार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.
कार्यशाळेत विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले यांनी सद्यस्थितीत मराठवाडयातील बहुभक्षी किडींचा प्रादुर्भाव यावर मार्गदर्शन केले तर आपत्‍कालीन पीक नियोजनावर डॉ यु एन आळसे, मराठवाडयातील किडींची अति प्रादुर्भावग्रस्‍त ठिकाणे यावर डॉ पी आर झंवर यांनी मार्गदर्शन केले. वातावरण बदलाचा किडींवरील परिणाम यावर प्रा बी व्‍ही भेदे यांनी तर खरिप पिकातील आपत्‍कालीन रोग व्‍यवस्‍‍थापन यावर प्रा पी एच घंटे व सर्वेक्षण प्रपत्र नोंदी व सर्वेक्षणाच्‍या पध्‍दती यावर डॉ ए जी बडगुजर यांनी मार्गदर्शन केले तसेच विविध जिल्‍हयातील सद्य पिक परिस्थितीबाबत कृषि विभागातील अधिका-यांनी सादरीकरण केले.  

कार्यक्रमाचे प्रास्‍ताविकात क्रॉपसॅप प्रकल्‍पाची माहिती दिली तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ दयानंद मोरे यांनी केले. कार्यक्रमात कीटकशास्‍त्र विभागाच्‍या वतीने तयार करण्‍यात आलेल्‍या प्रमुख पिकावरील एकात्मिक कीड व्‍यवस्‍थापनयावर चलचित्राच्‍या सीडीचे विमोचन मान्‍यवरांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. कार्यक्रमास लातुर विभागातील कृषि विभागातील अधिकारी, विद्यापीठ शास्‍त्रज्ञ, अधिकारी व कर्मचारी मोठया संख्‍येने उपस्थित होते. 
कार्यक्रमात कीटकशास्‍त्र विभागाच्‍या वतीने तयार करण्‍यात आलेल्‍या प्रमुख पिकावरील एकात्मिक कीड व्‍यवस्‍थापन’ यावर चलचित्राच्‍या सीडीचे विमोचन मान्‍यवरांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले त्‍याप्रसंगी. 

अवर्षण प्रवण परिस्थितीत ट्रॅक्‍टर चलीत रुंद वरंबा सरी पध्‍दतीचे दृष्‍य परिणाम

सेलु तालुक्‍यातील ढेंगळी पिंपळगांव येथील शेतकरी श्री गोविंदभाऊ जोशी यांच्‍या रूंद वरंबा व सरी पध्‍दतीने पेरणी केलेल्‍या मुगाच्‍या शेतीस वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे शास्‍त्रज्ञ विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, डॉ यु एन आळसे, प्रा पी एस चव्‍हाण, प्रा टेकाळे आदी.
****************************
मराठवाडयात साधारणत: 135.2 मिमी. पाऊस झाला असुन हंगामातील सरासरी पावसापेक्षा 48 % कमी पाउस पडला तर परभणी व हिंगोली जिल्‍हयात सर्वात कमी पाऊस (33%) पडला, या पावसाचे वितरणही पीकांच्‍या दृष्‍टीने समाधानकारक नाही. कधी रिमझिम पाऊस पडत असुन कशीबशी पीके तग धरुन आहेत. साधारणपणे चार ते पाच आठवडयाचा खंड पडला आहे. त्‍याच बरोबर 32 ते 380 सें. तापमान व वा­याचा वेग यामुळे जमिनीतील पाण्‍याचे बाष्‍पीभवन जलद गतीने होत आहे. अशा परिस्थितीत मराठवाडयात पीकांची पाहणी केली असता रुंद वरंबा व सरी (बीबीएफ) वर पेरणी केलेली सोयबीन व मुग ही पीके तग धरुन आहेत. ढेंगळी पींपळगाव (ता. सेलू) येथील शेतकरी श्री. गाेविंदभाऊ जोशी यांचे शेतात रुंद वरंबा व सरी पध्‍दतीने पेरलेल्‍या मुग पीकाला शेंगा लागत आहेत तरी श्री उध्‍दवराव सोळंके यांचे शेतात मुग मोडुन टाकण्‍याची अवस्‍था झाल्‍याचे त्‍यांनी सांगितले. सदरील शेतक-यांच्‍या शेतीस नुकतेच वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे विस्‍तार शिक्षण संचालक डॅा.बी.बी. भोसले, कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राचे व्‍यवस्‍थापक डॉ. यू. एन. आळसे, विस्‍तार शिक्षण अधिकारी प्रा.पी.एस. चव्‍हाण यांनी भेट देऊन पाहणी केली. शेतक­यांचे मत असे आहे की, रुंद वरंबा व सरी पध्‍दतीने पेरलेले सोयबीन व मुग अजून आठ ते दहा दिवस तग धरु शकतात, परंतू पारंपारिक पध्‍दतीने पेरलेली पीके मोडावीच लागतात.
      यावर्षी ब­याच शेतक­यांनी ट्रॅक्‍टरचलित बीबीएफ यंत्र घेतले पण काही तांत्रिक अडचणीमुळे पेरणी करता आली नाही. शेतकरी बंधुनी बीबीएफ पेरणी यंत्राची जोडणी करत असतांना ट्रॅक्‍टरची अश्‍वशक्‍ती व सरीच्‍या अंतर पीकाचे शिफारशीनुसार दोन ओळीतील अंतर, हेक्‍टरी झाडांची संख्‍या याचा विचार केला पाहिजे. ट्रॅक्‍टरच्‍या चाकाच्‍या मागे सरी पडली पाहिजे जेणे करुन पीकांची टायरच्‍या बाजुच्‍या ओळीची उगवण होण्‍यास अडचण येणार नाही. ट्रॅक्‍टरचे पुढील व मागील चाक एकाच चाकोरतुन गेले पाहिजे. ट्रॅक्‍टरच्‍या मोठया टायरच्‍या पाठीमागे फण येत असेल तर ट्रॅक्‍टरचे सर्व टायर पल्‍टी करुन बसवावेत. दोन सरीतील अंतर मोजून पीकाच्‍या शिफारशीनुसार 150 सेमी. अंतराच्‍या बेडवर सोयबीनच्‍या तीन ओळी घ्‍यावयात व दोन ओळीतील अंतर 45 सें.मी ठेवावे. 30 सें.मी अंतर ठेवले तर चार ओळी येतील एखादे वेळेस ट्रॅक्‍टरच्‍या तडजोडीनुसार दोन ओळीतील अंतर कमी अधिक करावे लागेल.

      सन 2014-­15 साली बनसारोळा (जि.बीड) व सारोळा (जि. उस्‍मानाबाद) येथे गटाच्‍या माध्‍यमातुन मोठया प्रमाणावर शेतक­यांनी बीबीएफ वर पेरणी केली असता त्‍यांना पारंपारिक पेरणीच्‍या तुलनेत 15 ते 20 % अधिक उत्‍पन्‍न  मिळुन प्राप्‍त झाले. यावर्षीपण या शेतक­यांनी संपूर्ण यांत्रिकीकरण करुन खर्चात बचत करुन अधिक उत्‍पन्‍न वाढीचे उदि्दष्‍ट ठेवले आहे. तरी शेतकरी बंधूनी जमिन, पीक, पाऊस या सर्व बाबींचा अभ्‍यास करुन रूंद वरंबा व सरी पध्‍दतीचा अवलंब करण्‍याचे आवाहन विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. बी.बी. भोसले यांनी केले आहे.

Friday, July 31, 2015

आदर्श गुरू हेच राष्‍ट्राचे निर्माते असतात....... प्रा नयन कुमार आचार्य

भारतीय मृदविज्ञान संस्‍थेच्‍या परभणी शाखेच्‍या वतीने गुरूपोर्णिमा साजरी
दिपप्रज्‍वलन करतांना
मार्गदर्शन करतांना कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु
मार्गदर्शन करतांना प्रा नयन कुमार आचार्य

सौजन्‍य
अध्‍यक्ष, भारतीय मृद विज्ञान संस्‍था शाखा परभणी 
तथा विभाग प्रमुख, मृद विज्ञान विभाग, वनामकृवि, परभणी 

Friday, July 24, 2015

कला व क्रीडा क्षेत्रात वनामकृविच्या विद्यार्थ्यांची दर्जात्मक वाढ होत आहे.......कुलगूरू मा. डॉ. बी. व्यंकटेश्वरलु

वनामकृवित विद्यार्थ्‍यांचा गुणगौरव सोहळा संपन्‍न
गुणगौरव सोहळयात मार्गदर्शन करतांना कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु, व्‍यासपीठावर शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, कुलसचिव डॉ दिनकर जाधव, विद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख, क्रीडाधिकारी प्रा जी ए गुळभिले आदी
गुणगौरव सोहळयात कोलाज या कला प्रकार सुवर्ण पदक प्राप्‍त केल्‍याबद्दल शिवशक्‍ती गोडसलवार हिचा सत्‍कार करतांना कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु, सोबत शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, कुलसचिव डॉ दिनकर जाधव, विद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख, क्रीडाधिकारी प्रा जी ए गुळभिले आदी
*****************
गतवर्षी कर्नल व अमरावती येथे पार पडलेल्‍या युवक महोत्‍सवात विद्यापीठाच्‍या संघानी विविध कला प्रकारात चार सुवर्ण व तीन कास्‍य पदके प्राप्‍त करून विद्यार्थ्‍यांनी राज्‍य व देश पातळी चांगले यश मिळवीले, यावरून विद्यापीठाच्‍या विद्यार्थ्‍यांची कला व क्रीडा क्षेत्रातील दर्जात्‍मक वाढ होत असल्‍याचे सिध्‍द होते, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगूरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या विद्यार्थी कल्‍याण अधिकारी कार्यालयाच्‍या वतीने आयोजित विद्यापीठ खेळाडु, अधिकारी व कर्मचारी यांचा गुणगौरव सोहळा दि २३ जुलै रोजी संपन्‍न झाला, या सोहळयाच्‍या अध्‍यक्षस्‍थानावरून ते बोलत होते. याप्रसंगी व्‍यासपीठावर शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, कुलसचिव डॉ दिनकर जाधव, विद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख, क्रीडाधिकारी प्रा जी ए गुळभिले आदींची प्रमुख उपस्थिती होती.
     कुलगूरू मा. डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु पुढे म्‍हणाले की, स्‍पर्धेा व खेळ हा विद्यार्थी जीवनातील  अविभाज्‍य घटक झाला पाहिजे, विद्यार्थ्‍यी जीवन हे उत्‍पादक जीवन असुन त्‍यांना प्रोत्‍साहन देणे गरजे आहे. विद्यार्थ्‍यांच्‍या विकासासाठी विद्यापीठातंर्गत असलेल्‍या महाविद्यालयांनी कला व क्रीडा क्षेत्रात अद्यावत दर्जाच्‍या सुविधा पुरविल्‍या पाहिजे जेणे करून त्‍यांच्‍यातील कौशल्‍यांना वाव मिळेल. या सुविधांमुळे मराठवाड्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थी ही या क्षेत्रात चांगली का‍मगिरी करून शकतील, असे मत त्‍यांनी व्‍यक्‍त केले.   
     शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण आपल्‍या मनोगतात म्‍हणाले की, विद्यापीठाच्‍या विजयी संघात विविध राज्‍यातील, भागातील तसेच विविध संस्‍कृती व पार्श्‍वभुमी लाभलेले विद्यार्थी प्रतिनिधीत्‍व करीत असुन त्‍यांना अधिकाधिक सुविधा पुरविण्‍यास सर्व महाविद्यालयांने प्रयत्‍न करावेत. कार्यक्रमात प्राचार्य डॉ विलास पाटील, डॉ विजया नलावडे, प्रा सुनील तुरकमाने व विद्यार्थ्‍यांनी अथीरा रवींद्रन यांनी मनोगत व्‍यक्‍त केले.  
    गुणगौरव सोहळयात सन २०१४-१५ मध्‍ये विविध क्रीडा व सांस्‍कृतिक स्‍पर्धेत प्राविण्‍य मिळविलेल्‍या विद्यार्थी व विद्यार्थीनीं तसेच विविध क्रीडा प्रकारातील संघ व्‍यवस्‍थापक, प्रशिक्षक व परिक्षक यांचा मान्‍यवरांच्‍या हस्‍ते सत्‍कार करून प्रशस्‍तीपत्र देण्‍यात आले. कार्यक्रमाच्‍या प्रास्‍ताविकात विद्यार्थ्‍यी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख यांनी सन २०१६ मध्‍ये अश्‍वमेध क्रीडा स्‍पर्धा व २०१७ मधील इंद्रधनुष्‍य क्रीडा स्‍पर्धेचे आयोजन विद्यापीठात होणार असल्‍याची माहिती दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ आशाताई देशमुख यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. शाहू चौहान यांनी केले. कार्यक्रमास विद्यापीठांतर्गत असलेल्‍या मराठवाडा विभागातील संलग्‍न व घटक महाविद्यालयाचे प्राचार्य, विभाग प्रमुख, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थ्‍यी-विद्यार्थ्‍यीनी व पालक मोठया संख्‍येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी प्रा. डी एफ राठोड, रामा खोबे, किशोर शिंदे, श्री जगताप, श्री सुर्यवंशी, अन्‍वरमिया आदींनी परिश्रम घेतले.
गुणगौरव सोहळयात सत्‍कार झालेले विद्यापीठ खेळाडू
     अमरावती येथील संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात पार पडलेल्‍या इंद्रधनुष्‍य या बारावी महा‍राष्‍ट्र राज्‍य आंतर विद्यापीठ युवक महोत्‍सवात कोलाज या कला प्रकारात शिवशक्‍ती गोडसलवार हिने सुवर्ण पदक तर विद्यापीठाच्‍या संघास लोकनृत्‍यात सुवर्ण पदक प्राप्‍त केले, या संघात प्रविण मांजरे, अथीरा रवींद्रन, ऐश्‍वर्या ढालकरी, मृनाली बिंद, पुनम क्षीरसागर, मयुर देशमुख, चंद्रकांत मुदिराज, संकेत शिंदे, रेणुका पवार, प्रविण जाधव, शुभम सुर्यवंशी या विद्यार्थ्‍यांचा समावेश होता. कर्नल येथील राष्‍ट्रीय दुग्‍ध संस्‍था येथे पार पडलेलया अखिल भारतीय आंतर कृषि विद्यापीठ युवक स्‍पर्धेत विद्यापीठाच्‍या संघास लोकनृत्‍यात सुवर्ण पदक, भारतीय समुह गीतात सुवर्ण पदक, देश भक्‍तीपर गीत प्रकारात कास्‍य पदक तर कला प्रकार कास्‍यपदक प्राप्‍त केले. लोकनृत्‍य संघात सहभागी विद्यार्थ्‍यीनी मृनाली बिंद, अथीरा रवींद्रन, बी पी कुरवाळे, एस यु अंबोरे, पी जी शिरसे, सावळे पी व्‍ही, पुनम क्षीरसागर, अंजली वाघमारे, के एम केळकर, पी एस सरदार यांचा तसेच भारतीय समुह गीत स्‍पर्धेत सुवर्ण पदक प्राप्‍त केले, या संघात एस यु अंबोरे, एस एस सेलुकर, एस बी कसबे, एस एस संत, एस पी पुंगळे, एस एस कादरी यांचा मान्‍यवरांच्‍या हस्‍ते सत्‍कार करण्‍यात आला. देश भक्‍तीपर गीत संघात एस यु अंबोरे, एस एस सेलुकर, एस बी कसबे, एस एस संत, एस पी पुंगळे, एस एस कादरी यांचा समावेश होता तर कोलाज या कलाप्रकारात शिवशक्‍ती गोडसलवार हिने व स्‍पॉट पेंटिग मध्‍ये जे एम गरूड हिने कास्‍यपदक प्राप्‍त केले. यासर्व विद्यार्थ्‍यांचा मान्‍यवरांच्‍या हस्‍ते सत्‍कार करण्‍यात आला­. 
     राष्‍ट्रीय सेवा योजनेतील उत्‍कृष्‍ठ स्‍वयंसेवक म्‍हणुन निवड झालेल्‍या कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचा विद्यार्थी रमाकांत कारेगांवकर, रासेयोचे उत्‍कृष्‍ठ कार्यक्रमाधिकारी प्रा रविंद्र शिंदे तसेच उत्‍कृष्‍ठ महाविद्यालय म्‍हणुन कृषि अभियांत्रिक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ उदय खोडके यांचा सत्‍कार करण्‍यात आला. आंतरराष्‍ट्रीय योग दिनानिमित्‍त घेण्‍यात आलेल्‍या निबंध स्‍पर्धेत प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांक प्राप्‍त केल्‍याबाबत रूचिता भालेराव, श्री सम्‍मेटा व रमाकांत कारेगांवकर यांचाही सत्‍कार करण्‍यात आला.
    कार्यक्रमात विद्यापीठातील कला व क्रीडा क्षेत्राच्‍या विकासात योगदान दिल्‍याबद्दल प्राचार्य डॉ विलास पाटील, प्राचार्य डॉ उद्य खोडके, डॉ विजया नलावडे, प्रा विशाल अवसरमल, विजय सावंत, डॉ प्रशांत करंदिकर, श्रीमती भार्गव, प्रा नागभिडे, दत्‍ता चव्‍हाण, पंकज खेडकर, मिलिंद बामणीकर, सुनिल तुरूकमाने, औंढेकर सर, प्रा खंदारे आदींचाही सत्‍कार करण्‍यात आला. 

कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांचा कास्‍ट्राईब कर्मचारी महासंघातर्फे सत्‍कार

वसंतराव नाईक कृषि पुरस्‍कार व भारतीय कृषि अनुसंधान परीषदेचा हरी ओम आश्रम ट्रस्‍ट पुरस्‍कार प्राप्‍त केल्‍याबददल वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांचा दिनांक २२ जुलै रोजी कास्‍ट्राईब कर्मचारी महासंघातर्फे सत्‍कार करण्‍यात आला. या प्रसंगी कुलसचिव डॉ. दिनकर जाधव, विद्यापीठ अभियंता इंजी. पी. डी. जवरे आणि कास्‍ट्राईब कर्मचारी महासंघाचे सर्व पदाधिकारी व सदस्‍य उपस्थित होते. 

Wednesday, July 22, 2015

भारतीय कृषि संशोधन परिषदेच्‍या वतीने कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांची राष्‍ट्रीय पुरस्‍कारासाठी निवड

नवी दिल्‍ली येथील भारतीय कृषि संशोधन परिषदेच्‍या वतीने देण्‍यात येणा-या हरिओम आश्रम ट्रस्‍ट पुरस्‍कार २०१४ करिता वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांची निवड झाली असुन परिषदेच्‍या ८७ व्‍या वर्धापन दिनी पटना (बिहार) येथे दि २५ जुलै रोजी पुरस्‍कार प्रदान करण्‍यात येणार आहे. हवामान बदलाचा मातीच्‍या आरोग्‍यावरील परिणाम यावरील केलेल्‍या संशोधन योगदानबाबत कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांची या पुरस्‍कारासाठी निवड करण्‍यात आली आहे.