विद्यापीठाच्या मानांकनामागे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचे दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी तसेच अंतर्गत येणाऱ्या विविध महाविद्यालयांना भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या (आयसीएआर) राष्ट्रीय कृषि शिक्षण अधिस्वीकृती समितीद्वारा प्रतिष्ठेचे ‘ए ग्रेड’ मानांकन प्राप्त झाले. भारतीय कृषि अनुसंधान परिषदेने दिनांक १६ मे २०२५ रोजी झालेल्या ४०व्या बैठकीत विद्यापीठास १ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२८ या कालावधीसाठी अधिस्वीकृती प्रदान करण्यात आली असून, या मूल्यांकनात विद्यापीठास उच्चांकी ‘३.२१’ गुण प्राप्त झाले आहेत.
ही अधिस्वीकृती
विद्यापीठाच्या शैक्षणिक गुणवत्ता, संशोधनातील सातत्य व विस्तार
सेवांतील कार्यक्षमतेची अधिकृत पावती आहे. अधिस्वीकृती समितीने २५ ते २९ नोव्हेंबर
२०२४ दरम्यान परभणी मुख्यालयासह लातूर, बदनापूर, अंबाजोगाई, धाराशिव, गोळेगाव
(जि. हिंगोली), व चाकूर (जि. लातूर) येथील महाविद्यालयांना
भेटी देत सखोल मूल्यांकन केले.
यावेळी विद्यापीठाचे माननीय
कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या नेतृत्वाखाली सर्व महविद्यालयांचे
अधिष्ठाता, सहयोगी अधिष्ठाता, सर्व विभागाच्या प्रमुखांनी, प्राध्यापकांनी आपले
कार्य सादर केले. या कामगिरीचा सखोल आढावा त्यावेळी समितीने घेतला होता. त्यावेळी विद्यापीठात
शैक्षणिक, संशोधन व विस्तार कार्यात सातत्यपूर्ण प्रगती,
शेतकरी हिताच्या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग, तसेच
भौतिक सुविधांचा प्रभावी वापर आदी बाबींचे समितीने विशेष कौतुक केले होते.
विद्यापीठाचे माननीय
कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व व प्रभावी
मार्गदर्शनामुळे हे मानांकन प्राप्त होऊ शकले. यानिमित्ताने कुलगुरू प्रा. (डॉ.)
इन्द्र मणि यांनी सांगितले की, हे यश संपूर्ण विद्यापीठ समुदायाच्या एकत्रित
प्रयत्नांचे फलित आहे. राष्ट्रीय पातळीवर कृषी शिक्षण, संशोधन
आणि विस्तार क्षेत्रात विद्यापीठाचा प्रभाव अधिकाधिक वाढेल. या मानांकनामुळे
विद्यापीठ विद्यार्थी केंद्रित शिक्षण, नाविन्यपूर्ण संशोधन,
शेतकरी केंद्रित विस्तारकार्य आणि कर्मचारी केंद्रित प्रशासन
राबविण्यास अधिक कटिबद्ध राहील.
या अधिस्वीकृतीमुळे विद्यापीठाची शैक्षणिक आणि संशोधन क्षेत्रातील प्रतिष्ठा अधिक उंचावली असून, मराठवाड्यातील कृषी शिक्षणाला नवसंजीवनी लाभली आहे. या यशाबद्दल महाराष्ट्र राज्याचे माननीय राज्यपाल तथा विद्यापीठाचे माननीय कुलपती श्री सी. पी. राधाकृष्णनजी, महाराष्ट्र शासनाचे, कृषि मंत्री तथा विद्यापीठाचे प्रतिकुलपती मा. ना. अॅड. माणिकरावजी कोकाटे, कृषि राज्यमंत्री मा.ना. अॅड. आशिष जयस्वाल, कृषि परीषदेचे उपाध्यक्ष मा. ना. मा. श्री तुषार पवार, विधान परिषद सदस्य व कार्यकारी परिषद सदस्य मा. आ. श्री. सतीश चव्हाण, विधानसभा सदस्य व कार्यकारी परिषद सदस्य मा. आ. डॉ. राहुल पाटील, विधानसभा सदस्य व कार्यकारी परिषद सदस्य मा. आ. श्री. रमेशराव कराड, विधानसभा सदस्य व कार्यकारी परिषद सदस्य मा. आ. श्री. अभिमन्यू पवार आणि विद्यापीठ कार्यकारी परिषद सन्मानीय सदस्य मा. श्री विठ्ठल सकपाळ, मा. श्री. सुरज जगताप, मा. श्री. प्रविण देशमुख, मा. श्री. दिलीप देशमुख, मा.डॉ. आदिती सारडा, मा. श्री. भागवत देवसरकर, मा. डॉ. कौशिक बॅनर्जी, मा. डॉ. व्ही. एम. मायंदे, कृषि परिषदेचे सदस्य मा. श्री विवेक दामले, मा. श्री विनायक काशीद, मा. श्री जनार्दन कातकडे, महाराष्ट्र राज्याचे प्रधान सचिव (कृषि) मा. श्री. विकासचंद्र रस्तोगी (भाप्रसे), पुणे येथील कृषि परिषदेचे महासंचालक मा. श्री. रावसाहेब भागडे (भाप्रसे), कृषि आयुक्त मा. श्री. सुरज मांढरे (भाप्रसे), कृषि परिषदेचे सर्व संचालक आणि विद्यापीठाच्या विद्वत परिषदेचे सर्व सन्माननीय सदस्य, यांनी दिलेल्या अनमोल सहकार्याबद्दल माननीय कुलगुरूंनी आभार मानले.
तसेच त्यांनी विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, माजी
शिक्षण संचालक डॉ. उदय खोडके, विस्तार शिक्षण संचालक डॉ.
राकेश आहिरे, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, कुलसचिव श्री. संतोष वेणीकर, नियंत्रक श्री. प्रवीण
निर्मळ, विद्यापीठ अभियंता श्री. दीपक कशाळकर तसेच सर्व
अधिष्ठाता, सहयोगी अधिष्ठाता, विभाग
प्रमुख, सर्व शिक्षक, शास्त्रज्ञ,
प्रशासकीय आणि आर्थिक अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी
यांचेसह प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभागी यांनी दिलेल्या महत्त्वाचे योगदानाचे कौतुक करून
सर्वांचे अभिनंदन केले असून ही अधिस्वीकृती विद्यापीठाच्या गुणवत्तापूर्ण शैक्षणिक,
संशोधन व विस्तार कार्याची पावती असल्याचे ते म्हणाले.
या मानंकानामुळे राष्ट्रीय
स्तरावरील निकषांवर विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या कृषी, कृषी
अभियांत्रिकी, अन्नतंत्रज्ञान, उद्यानविद्या,
जैवतंत्रज्ञान आणि कृषी व्यवसाय व्यवस्थापन इत्यादी शाखांतील पदवी,
पदव्युत्तर व आचार्य अभ्यासक्रमांनी उत्कृष्ट गुणवत्ता सिद्ध केली
आहे.
विद्यापीठात या गौरवामुळे
आनंदाचे व उत्साहाचे वातावरण असून, माननीय कुलगुरूंच्या
नेतृत्वाबद्दल सर्वांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. ही अधिस्वीकृती विद्यापीठाच्या
राष्ट्रीय स्तरावरील शैक्षणिक विश्वासार्हतेला बळकटी देणारी असून, विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तापूर्ण कृषि शिक्षणाच्या नव्या संधी खुल्या करणारी
ठरणार आहे.
विद्यापीठाच्या मानांकन उंचाविण्यास प्रभावी ठरलेल्या विशेष बाबी
मागील दोन वर्षांमध्ये माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या प्रभावी मार्गदर्शनाखाली शिक्षण, संशोधन व विस्तार कार्यात राबविण्यात आलेले विशेष उपक्रम विद्यापीठाच्या मानांकन उंचाविण्यास निर्णायक ठरले आहेत. विद्यार्थ्यांकरिता सुविधा निर्मिती व वसतिगृहांची दुरुस्ती, विद्यापीठ परिसरातील रस्त्यांचे नूतनीकरण, तसेच सीएसआर निधीच्या माध्यमातून ‘महाराष्ट्र यांत्रिकीकरण केंद्र’, कौशल्य विकास उपक्रम, कॉमन इन्क्युबेशन सेंटर (सामायिक उद्योजकता संवर्धन केंद्र) ची स्थापना या गोष्टींचा समावेश आहे. तसेच गेल्या दोन वर्षात २५०० एकर पडीत जमिन विकसित करून मोठया प्रमाणात दर्जेदार पैैैैैैैदासकर बीजोत्पादन करण्यात आले.
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०, सहाव्या अधिष्ठाता समितीचा पदवी अभ्यासक्रम तसेच पदव्युत्तर स्तरावरील बीएसएमए अभ्यासक्रम यांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली आहे. यासोबतच बाह्यस्त्रोत निधीच्या साहाय्याने सुरू करण्यात आलेले संशोधन प्रकल्प, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबर करण्यात आलेले सामंजस्य करार, 'शेतकरी देवो भव:' या भावनेतून शेतकरी बांधवांसाठी राबविण्यात येणारा ‘माझा एक दिवस माझ्या बळिराजासोबत’ उपक्रम, नियमितपणे राबविण्यात येणारा ऑनलाईन शेतकरी-शास्त्रज्ञ संवाद कार्यक्रम, संशोधनाद्वारे विकसित करण्यात आलेले विविध नवीन वाण, अवजारे व तंत्रज्ञान आणि यांचे प्रभावी विस्तार कार्य - या सर्व बाबी विद्यापीठाच्या शैक्षणिक, संशोधन व विस्तार कामगिरीला गती देणाऱ्या ठरल्या असून, मानांकन उंचाविण्यास कारणीभूत ठरल्या आहेत.