Monday, February 9, 2026

अहंकार त्याग, ‘डिसएंगेज’ची कला आणि वर्तमानात जगण्याचा मंत्रच यशाचा मार्ग – माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात “हॅपिनेस को कहो हाय… टेन्शन को कहो बाय” प्रेरणादायी व्याख्यान

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि 
मोटिवेशनल स्पीकर डॉ. बी. के. शक्तिराज भाई 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे शिक्षण संचालनालय व ब्रह्मकुमारी, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्यांसाठी दिनांक ०९ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रेरणादायी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम विद्यापीठातील सिम्पोसियम सभागृह (हॉल क्र. १५), प्रशासकीय भवन येथे संपन्न झाले.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी भूषविले. आंतरराष्ट्रीय प्रेरक वक्ते, लाईफ कोच व मोटिवेशनल स्पीकर डॉ. बी. के. शक्तिराज भाई यांनी व्याख्यान दिले. यावेळी शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य, डॉ. राजेश क्षीरसागर, अर्चना बहेनजी यांची प्रमुख उपस्थिती होती.

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, जर सर्वांनी अहंकार सोडला तर निश्चितच यशस्वी होता येईल. विनाकारण तणाव घेऊन त्याचे ओझे वाहू नये, यासाठी सोडून देण्याची  (‘डिसएंगेज’ करण्याची) कला आत्मसात करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. कृतीगीत व प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून देण्यात आलेल्या मार्गदर्शनाचे त्यांनी कौतुक केले. लहान मुलांसारखी निरागस वृत्ती ठेवून साधे व आनंदी जीवन जगण्याची कला शिकावी, असे सांगताना त्यांनी स्पष्ट केले की घर, कार्यालय किंवा इतर ठिकाणी शारीरिकदृष्ट्या उपस्थित नसतानाही त्या ठिकाणचे विचार मनात असतील, तर मनाची द्विधा अवस्था निर्माण होते आणि कार्यक्षमतेवर परिणाम होतो. त्यामुळे समोर असलेली व्यक्ती, वेळ आणि कार्य यांवर लक्ष केंद्रित करावे, असा सल्ला त्यांनी दिला. भविष्याची चिंता करत वर्तमान खराब करू नये, तर वर्तमानात जगण्याची कला आत्मसात करावी, यासाठी चांगल्या आठवणींचे स्मरण करावे, असे त्यांनी सांगितले.

आपल्या हातात नसलेल्या गोष्टींबाबत अधिक विचार करू नये, तर नियंत्रणाऐवजी योग्य व्यवस्थापनावर भर द्यावा, असे सांगताना त्यांनी म्हटले की डोक्यावरचे ओझे माणसाला थकवत नाही, तर डोक्यातील ओझे माणसाला थकवते. आपण इतरांसाठी चांगले केल्यावर त्यांच्याकडून तशीच अपेक्षा ठेवू नये, दुर्लक्ष करण्याची क्षमता वाढवावी, आनंदाचे क्षण जपावेत आणि सामर्थ्यवान व्यक्तीनेही क्षमा करण्याची कला आत्मसात करावी, असे आवाहन त्यांनी केले.

डॉ. बी. के. शक्तिराज भाई यांनी हॅपिनेस को कहो हाय… टेन्शन को कहो बाय” या प्रभावी विषयावर मार्गदर्शन केले. सकारात्मक विचारसरणी, आनंदी जीवनशैली, तणावमुक्त जीवन जगण्याचे महत्त्व तसेच आत्मविकासासाठी मानसिक सशक्ततेची आवश्यकता यावर त्यांनी सखोल मार्गदर्शन केले. त्यांच्या ओघवत्या व प्रभावी शैलीतील भाषणाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

डॉ. शक्तिराज भाई यांनी सांगितले की प्रत्येकाने आपल्या बुद्धीला चार्ज करणे आवश्यक आहे. मानवी जीवनात केवळ बुद्ध्यांक (IQ) नव्हे, तर भावनिक क्षमता निर्देशांक (Emotional Quotient – EQ) अधिक महत्त्वाचा असून, वर्तमान परिस्थितीत येणाऱ्या प्रसंगांना सामोरे जाण्यासाठी भावनिक संतुलन आवश्यक असते. सैन्यदल, क्रीडा, कार्यालयीन जीवन अशा सर्व क्षेत्रांत यशस्वी संतुलनासाठी भावनिक समतोल राखणे गरजेचे आहे. मानसिक तणाव कमी करण्यासाठी दैनंदिन ध्यान (मेडिटेशन) हा एक प्रभावी पर्याय असल्याचे त्यांनी नमूद केले.

प्रत्येकाने स्वतःमधील शक्ती ओळखून आपल्या भावनिक क्षमतांचा विकास करावा, असे सांगत त्यांनी विविध प्रात्यक्षिकांद्वारे अहंकार व गर्व दूर करण्याचे महत्त्व स्पष्ट केले. हसू, राग आणि तणाव यामुळे शरीरात होणारे शारीरिक बदल व त्यातून निर्माण होणाऱ्या हार्मोन्सचे परिणाम त्यांनी शास्त्रीय दृष्टिकोनातून विशद केले. आनंदी जीवनासाठी कोणताही औषधी खुराक नसून, आनंद ही एक जीवनशैली आहे, असे त्यांनी सांगितले. आज आपण आनंदी असू, तर भविष्यातही आनंदी राहण्याची शक्यता अधिक असते, त्यामुळे वर्तमान क्षणाचे महत्त्व ओळखावे, असे त्यांनी आवाहन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार शिक्षण प्रभारी डॉ. रणजीत चव्हाण यांनी मानले. या कार्यक्रमास विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली.










भारत@१०० साठी शाश्वत कृषि व आरोग्य विकासात कृत्रिम बुद्धिमत्तेची निर्णायक भूमिका : माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

मुंबई येथे माहिती तंत्रज्ञान आणि व्यवस्थापनातील प्रगती विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषद २०२६; कृषि व आरोग्य क्षेत्रातील शाश्वततेसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता व माहिती तंत्रज्ञानावर भर


अचूक शेती (Precision Agriculture), स्मार्ट कृषि व्यवस्थापन, तंत्रज्ञानाधारित निर्णयप्रक्रिया तसेच हवामान-अनुकूल परिस्थितीत उत्पादनवाढ, खर्चकपात आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी केले. ते माहिती तंत्रज्ञान व व्यवस्थापन क्षेत्रातील नव्या घडामोडींवर चर्चा करण्यासाठी आयोजित आंतरराष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान आणि व्यवस्थापनातील प्रगती विषयावरील परिषद २०२६ (The International Conference on Advances in Information Technology and Management – ICAIM 2026) मध्ये मुख्य अतिथी म्हणून बोलत होते.

या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन मुंबई येथील ठाकूर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, करिअर डेव्हलपमेंट अँड रिसर्च (TIMSCDR) यांच्या वतीने करण्यात आले होते. “कृषि व आरोग्य क्षेत्रातील शाश्वततेसाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर – भारत@१०० साठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI)” या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित ही परिषद दिनांक ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मुंबईतील ठाकूर एज्युकेशनल कॅम्पस, कांदिवली (पूर्व) येथे यशस्वीरीत्या संपन्न झाली.

यावेळी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी “ड्रोन तंत्रज्ञान, डिजिटल साधने आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून नवोन्मेषाधारित शाश्वत कृषि विकास” या अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावर सखोल मार्गदर्शन केले. हवामान बदल, संसाधनांची टंचाई आणि वाढत्या अन्नसुरक्षेची आव्हाने यांना सामोरे जाताना कृषि क्षेत्रासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित डिजिटल उपाययोजना अत्यंत महत्त्वाच्या ठरत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. त्यांचे अभ्यासपूर्ण व प्रेरणादायी व्याख्यान संशोधक, विद्यार्थी, शेतकरी तसेच धोरणकर्त्यांसाठी दिशादर्शक ठरले.

या कार्यक्रमास भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्था (CIRCOT), मुंबई येथील शास्त्रज्ञ डॉ. सुजीत कुमार शुक्ला हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते. परिषदेत AI-Assisted Digital Solutions for Agricultural Resilience या विषयावर अमेरिकेतील कॅन्सस स्टेट युनिव्हर्सिटी येथील डिजिटल अ‍ॅग्रोनॉमी रिसर्च टीम (DART) चे संचालक डॉ. गौरव झा यांनी मार्गदर्शन केले. तसेच AI for Smart Agronomy and Sustainable Agriculture  या विषयावर पालघर येथील कृषि संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी व कृषि तज्ज्ञ डॉ. अमोल व्ही. दहिफळे यांनी शाश्वत शेतीसाठी AI आधारित प्रणालींचे महत्त्व विशद केले. AI Enabled Digital Ecosystem for Climate Resilient Agriculture या विषयावर महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागातील कृषि व मृदाशास्त्र तज्ज्ञ श्री. विजय कोळेकर यांनी हवामान-सहनशील शेतीसाठी डिजिटल परिसंस्थेची गरज अधोरेखित केली.

कार्यक्रमाच्या शेवटी “AI for Bharat@100: भारतीय कृषितील प्रश्न व आव्हाने” या विषयावर तज्ज्ञांची सखोल पॅनल चर्चा आयोजित करण्यात आली. या चर्चेमध्ये AI तंत्रज्ञानाच्या अंमलबजावणीतील संधी, अडचणी तसेच भविष्यातील दिशा यावर सखोल विचारमंथन करण्यात आले.

भारताच्या स्वातंत्र्याच्या शताब्दीकडे वाटचाल करत असताना कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा अ‍ॅनालिटिक्स, इंटरनेट ऑफ थिंग्स (IoT), स्वयंचलन (Automation) आणि डिजिटल परिसंस्था यांचा कृषि व आरोग्य क्षेत्रातील शाश्वत विकासासाठी कसा प्रभावी वापर करता येईल, यावर परिषदेत सखोल चर्चा करण्यात आली. उत्पादनक्षमता वाढ, संसाधनांचे योग्य व्यवस्थापन, सेवा सुलभता, ताणतणावांना सामोरे जाण्याची क्षमता (Resilience) आणि दीर्घकालीन शाश्वतता या महत्त्वाच्या मुद्द्यांवर विशेष भर देण्यात आला.

कृषि व आरोग्य क्षेत्रातील शाश्वत विकासासाठी जबाबदार आणि विस्तारयोग्य (Scalable) AI उपाययोजनांना चालना देण्याच्या उद्देशाने ही परिषद आयोजित करण्यात आली होती. शैक्षणिक संस्था, उद्योग, शासन आणि संशोधन क्षेत्रातील सहकार्य वाढवून भारत@१०० साठी तंत्रज्ञानाधारित, सक्षम आणि शाश्वत भवितव्य घडविण्यात ICAIM 2026 महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.





 

The Decisive Role of Artificial Intelligence in Sustainable Agricultural and Healthcare Development for India@100: Hon’ble Vice-Chancellor Prof. (Dr.) Indra Mani

 

International Conference on Advances in Information Technology and Management 2026 held in Mumbai; emphasis on Artificial Intelligence and Information Technology for sustainability in the agriculture and healthcare sectors.

 

Hon’ble Vice-Chancellor Prof. (Dr.) Indra Mani emphasized that modern technology plays a crucial role in promoting Precision Agriculture, smart agricultural management, and technology-driven decision-making, as well as in increasing productivity, reducing costs, and enhancing farmers’ income under climate-resilient conditions. He was speaking as the Chief Guest at the International Conference on Advances in Information Technology and Management (ICAIM 2026), organized to discuss recent developments in the fields of information technology and management.

The international conference was organized by Thakur Institute of Management Studies, Career Development and Research (TIMSCDR), Mumbai. The conference, based on the central theme “Leveraging Information Technology for Sustainability in Agriculture and Healthcare – Artificial Intelligence (AI) for Bharat@100,” was successfully held on 7 February 2026 at the Thakur Educational Campus, Kandivali (East), Mumbai.

On this occasion, Hon’ble Vice Chancellor Prof. (Dr.) Indra Mani delivered in-depth guidance on the highly significant topic “Innovation-driven Sustainable Agricultural Development through Drone Technology, Digital Tools, and Artificial Intelligence.” He emphasized that AI-based digital solutions are becoming extremely important for the agricultural sector in addressing challenges such as climate change, resource scarcity, and growing food security concerns. His scholarly and inspiring lecture proved to be a guiding force for researchers, students, farmers, and policymakers alike.

The programme was graced by the presence of Dr. Sujit Kumar Shukla, Scientist at the Central Institute for Research on Cotton Technology (CIRCOT), Mumbai, under the Indian Council of Agricultural Research (ICAR), as the Guest of Honour.

During the conference, Dr. Gaurav Jha, Director of the Digital Agronomy Research Team (DART) at Kansas State University, USA, delivered an expert lecture on the theme “AI-Assisted Digital Solutions for Agricultural Resilience.”

Dr. Amol V. Dahiphale, Officer-in-Charge and Agricultural Expert at the Agricultural Research Centre, Palghar, elaborated on the importance of AI-based systems for sustainable agriculture while speaking on “AI for Smart Agronomy and Sustainable Agriculture.”

On the theme “AI-Enabled Digital Ecosystem for Climate-Resilient Agriculture,” Mr. Vijay Kolekar, Agriculture and Soil Science Expert from the Department of Agriculture, Government of Maharashtra, emphasized the need for a robust digital ecosystem to support climate-resilient farming practices.

At the conclusion of the programme, an in-depth expert panel discussion was organized on the topic “AI for Bharat@100: Issues and Challenges in Indian Agriculture.” The discussion focused on the opportunities, challenges, and future directions related to the implementation of AI technologies in the agricultural sector.

As India moves towards the centenary of its independence, the conference witnessed comprehensive deliberations on the effective use of Artificial Intelligence, Data Analytics, Internet of Things (IoT), Automation, and digital ecosystems for sustainable development in the agriculture and healthcare sectors. Special emphasis was laid on increasing productivity, efficient resource management, ease of service delivery, resilience to stresses, and long-term sustainability.

The conference was organized with the objective of promoting responsible and scalable AI solutions for sustainable development in agriculture and healthcare. The organizers expressed confidence that ICAIM 2026 will play a significant role in shaping a technology-driven, empowered, and sustainable future for Bharat@100 by strengthening collaboration among academic institutions, industry, government, and the research community.




Saturday, February 7, 2026

नेपाळ येथे आंतरराष्ट्रीय परिषदेत माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचे प्रमुख व्याख्यान

हवामान-अनुकूल संवेदनशील शेतीत आंतरराष्ट्रीय सहकार्याची गरज अधोरेखित

परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी काठमांडू (नेपाळ) येथे दिनांक ५ व ६ फेब्रुवारी २०२६ रोजी “कृषि अभियांत्रिकी आणि हवामान-अनुकूल शेती (Agricultural Engineering and Climate-Smart Agriculture)” या विषयावर आयोजित आंतरराष्ट्रीय परिषद–२०२६ मध्ये प्रमुख व्याख्यान दिले.

ही आंतरराष्ट्रीय परिषद नेपाळी सोसायटी ऑफ अ‍ॅग्रिकल्चरल इंजिनिअर्स (NSAE), नेपाळ यांच्या वतीने iDE (International Development Enterprises) यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आली होती. परिषदेत आशियाई देशांतील नामवंत शास्त्रज्ञ, अभ्यासक, संशोधक, शिक्षणतज्ज्ञ तसेच उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी शाश्वत अन्नसुरक्षेसाठी हवामान-अनुकूल शेती (Climate-Resilient Agriculture for Food Security)” या विषयावर मार्गदर्शन करताना हवामान बदलामुळे निर्माण होणाऱ्या आव्हानांवर मात करण्यासाठी हवामान-अनुकूल तंत्रज्ञान, कृषि यांत्रिकीकरण तसेच धोरणाधिष्ठित नवकल्पनांची भूमिका अधोरेखित केली. मराठवाड्यासारख्या कोरडवाहू व अर्धकोरडवाहू प्रदेशासाठी उपयुक्त ठरणाऱ्या हवामान-अनुकूल पीक वाणांचा विकास, कृषि यंत्रसामग्री तसेच शाश्वत शेती पद्धती विकसित करण्यात वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे मोलाचे योगदान असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी त्यांनी आंतरराष्ट्रीय सहकार्य, तंत्रज्ञान हस्तांतरण तसेच क्षमता वृद्धी (Capacity Building) यांचे महत्त्व विशद करत हवामान-स्मार्ट शेतीला चालना देण्यासाठी संयुक्त प्रयत्नांची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन केले. हे सर्व उपक्रम राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) २०२० च्या उद्दिष्टांशी सुसंगत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या प्रभावी प्रमुख व्याख्यानास आंतरराष्ट्रीय स्तरावरील मान्यवरांकडून मोठा प्रतिसाद मिळाला.  या परिषदेत आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त दहा तज्ज्ञ सहभागी झाले होते. यामध्ये वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि, आफ्रो-एशियन असोसिएशन ऑफ अ‍ॅग्रिकल्चरल इंजिनिअर्स (AAAE) चे महासचिव डॉ. सय्यद इस्माईल, नेपाळ येथील iDE चे संचालक डॉ. मेनिला खरल तसेच नेपाळच्या राष्ट्रीय नियोजन आयोगाचे माजी सदस्य डॉ. लक्ष्मी प्रसाद देवकोटा यांचा समावेश होता.

व्याख्यात्यांनी कृषी अभियांत्रिकीतील नवकल्पना हवामान बदलाशी सुसंगत करण्याची, धोरणात्मक पाठबळ मजबूत करण्याची तसेच शेतकरी-केंद्रित दृष्टिकोन स्वीकारण्याची तातडीची गरज अधोरेखित केली. परिषदेत हवामान-स्मार्ट शेती व पशुपालन, कृषी यांत्रिकीकरण व स्वयंचलन, काढणीपश्चात तंत्रज्ञान व अन्न अभियांत्रिकी, जलसंधारण व मृदा अभियांत्रिकी, ग्रामीण व नवीकरणीय ऊर्जा, डिजिटल सल्ला सेवा (DAS), आधुनिक तंत्रज्ञान तसेच स्मार्ट ग्रामीण पायाभूत सुविधा या महत्त्वपूर्ण विषयांवर तांत्रिक सत्रांचे आयोजन करण्यात आले होते.

हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शाश्वत शेती विकासासाठी कृषि अभियांत्रिकीचे योगदान अधोरेखित करणे, संशोधन व नवतंत्रज्ञानाचा प्रसार करणे तसेच आंतरराष्ट्रीय सहकार्य वृद्धिंगत करणे हा या परिषदेचा मुख्य उद्देश होता. या सहभागामुळे भारत–नेपाळ दरम्यान कृषि अभियांत्रिकी व हवामान-संवेदनशील शेती क्षेत्रातील शैक्षणिक व संशोधन सहकार्य अधिक दृढ होण्यास मदत होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.



Hon’ble Vice-Chancellor Prof. (Dr.) Indra Mani delivers keynote address at an International Conference in Nepal

 

Highlights the need for international cooperation in climate-resilient and climate-sensitive agriculture

 

Hon’ble Vice-Chancellor of Vasantrao Naik Marathwada Agricultural University, Parbhani, Prof. (Dr.) Indra Mani, delivered a keynote address at the International Conference 2026 on the theme ‘Agricultural Engineering and Climate-Smart Agriculture,’ held in Kathmandu (Nepal) on 5th and 6th February 2026.

This international conference was organized by the Nepalese Society of Agricultural Engineers (NSAE), Nepal, in collaboration with iDE (International Development Enterprises). Renowned scientists, academicians, researchers, education experts, as well as representatives from the industry sector from various Asian countries participated in the conference in large numbers.

Hon’ble Vice-Chancellor Prof. (Dr.) Indra Mani, while guiding on the topic “Climate-Resilient Agriculture for Food Security,” highlighted the role of climate-resilient technologies, agricultural mechanization, and policy-driven innovations in addressing the challenges arising from climate change. He stated that Vasantrao Naik Marathwada Agricultural University has made significant contributions to the development of climate-resilient crop varieties, agricultural machinery, and sustainable farming practices, which are especially beneficial for dryland and semi-arid regions like Marathwada.

On this occasion, he elaborated on the importance of international collaboration, technology transfer, and capacity building, and emphasized the need for collective efforts to promote climate-smart agriculture. He also clarified that all these initiatives are in alignment with the objectives of the National Education Policy (NEP) 2020.

The effective keynote address delivered by Hon’ble Vice-Chancellor Prof. (Dr.) Indra Mani received an overwhelming response from eminent dignitaries at the international level. The event featured ten internationally recognized experts, including Prof. Dr. Indra Mani, Vice Chancellor of VNMKV, Dr. Syed Ismall, General Secretary of the Afro-Asian Association of Agricultural Engineers (AAAE); Dr. Menila Kharal, Nepal Country Director of iDE; and Dr. Laxmi Prasad Devkota, former member of Nepal’s National Planning Commission. Speakers emphasized the urgency of aligning engineering innovation with climate adaptation, policy support, and farmer-centric approaches.

The conference featured technical sessions on several important themes, including climate-smart agriculture and livestock management, agricultural mechanization and automation, post-harvest technology and food engineering, water conservation and soil engineering, rural and renewable energy, digital advisory services (DAS) and modern technologies, as well as smart rural infrastructure.

The main objective of the conference was to highlight the contribution of agricultural engineering toward sustainable agricultural development in the context of climate change, promote research and innovative technologies, and strengthen international collaboration. It was expressed that this participation would help further reinforce academic and research cooperation between India and Nepal in the fields of agricultural engineering and climate-resilient agriculture.

Thursday, February 5, 2026

वनामकृविच्या ज्वार संशोधन केंद्रास पंचवार्षिक आढावा समितीचा उत्कृष्ट अभिप्राय

यशामागे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचे दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व, सातत्यपूर्ण मार्गदर्शन व भक्कम पाठबळ

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत कार्यरत ज्वार संशोधन केंद्रास मागील पाच वर्षांच्या कालावधीसाठी झालेल्या पंचवार्षिक आढावा समिती (Quinquennial Review Team – QRT) च्या पाहणीदरम्यान उत्कृष्ट, समाधानकारक व प्रशंसनीय असा अभिप्राय प्राप्त झाला आहे. या गौरवास्पद मान्यतेमुळे केंद्राच्या गेल्या पाच वर्षांतील दर्जेदार संशोधन कार्य, नाविन्यपूर्ण उपक्रम तसेच शेतकरीहितासाठी केलेल्या उल्लेखनीय योगदानाची अधिकृत दखल घेण्यात आली आहे.

या यशामागे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचे दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व, सातत्यपूर्ण मार्गदर्शन, प्रेरणादायी धोरणे व भक्कम पाठबळ अत्यंत मोलाचे ठरले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली विद्यापीठातील संशोधन कार्य अधिक शिस्तबद्ध, उद्दिष्टाभिमुख व राष्ट्रीय पातळीवर स्पर्धात्मक बनले असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. संशोधन व शेतकरी यांच्यातील दुवा अधिक बळकट करण्यावर त्यांनी दिलेला भर या यशात निर्णायक ठरला आहे.

संशोधन संचालक डॉ. खिजर बेग यांनी निश्चित करून दिलेल्या संशोधनाच्या स्पष्ट दिशानिर्देशांनुसार ज्वार संशोधन केंद्राने सुधारित वाण विकास, उत्पादनवाढ, तंत्रज्ञान हस्तांतरण, शेतकरी प्रशिक्षण व विस्तार उपक्रम प्रभावीपणे राबविले.

पंचवार्षिक आढावा समितीने ज्वारीच्या सुधारित वाणांच्या विकासासाठी करण्यात आलेले संशोधन, उत्पादन व उत्पादकता वाढीसाठीचे प्रयत्न, शेतकरीाभिमुख तंत्रज्ञान प्रसार, तसेच राष्ट्रीय व आंतरसंस्थात्मक संशोधन सहकार्याबाबत समाधान व्यक्त केले. केंद्राच्या कार्यामुळे कोरडवाहू शेतीत ज्वारी पिकाची उपयुक्तता, आर्थिक स्थैर्य व अन्नसुरक्षेतील भूमिका अधिक बळकट झाल्याचेही समितीने स्पष्टपणे नमूद केले.

या उल्लेखनीय यशाबद्दल ज्वार संशोधन केंद्राचे विद्यमान प्रमुख डॉ. अंबिका मोरे, माजी प्रमुख डॉ. लक्ष्मण जावळे, डॉ. के. आर. कांबळे, डॉ. जे. इ. जहागीरदार तसेच संपूर्ण ज्वार संशोधन चमूचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे. या मान्यतेमुळे भविष्यात ज्वारी संशोधन अधिक व्यापक व प्रभावी होऊन शेतकऱ्यांच्या उत्पादनात, उत्पन्नात व जीवनमानात निश्चितच सकारात्मक बदल घडेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.





Wednesday, February 4, 2026

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठास २०२५ चा ऊर्जा संवर्धन पुरस्कार

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या नेतृत्वात सौर ऊर्जेच्या प्रभावी वापरातून ऊर्जा संवर्धनात विद्यापीठाची भरीव कामगिरी

परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने ऊर्जा संवर्धनाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत महाराष्ट्र ऊर्जा संवर्धन पुरस्कार २०२५” (Energy Conservation Award 2025) अंतर्गत विद्यापीठ गटात (University Category) द्वितीय पुरस्कार पटकावला आहे. हे पुरस्कार महाराष्ट्र ऊर्जा विकास संस्था (MEDA) यांच्या वतीने आयोजित करण्यात येतात. या पुरस्कारांच्या माध्यमातून उद्योग, संस्था, विद्यापीठे, स्वयंसेवी संस्था (NGOs) तसेच इमारती यांच्याकडून राबविण्यात आलेल्या उल्लेखनीय ऊर्जा कार्यक्षमता व ऊर्जा संवर्धनाच्या उपक्रमांना गौरविण्यात येते. या पुरस्कारांचा उद्देश राज्यभर ऊर्जा कार्यक्षमतेचा प्रसार करणे तसेच शाश्वत व पर्यावरणपूरक पद्धतींचा अवलंब करण्यास प्रोत्साहन देणे हा आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या परिसरात छतावरील सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पाची उभारणी रीन्युएबल एनर्जी सर्व्हिस कंपनी मोड (RESCO Mode) अंतर्गत स्थापन करण्यात आली आहे. या प्रकल्पांतर्गत विद्यापीठाची प्रशासकीय इमारत तसेच मुख्यालयातील विविध महाविद्यालयांच्या इमारतींच्या छतांवर ५०० किलोवॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात आले आहेत. या प्रकल्पाचे उद्घाटन माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या हस्ते दिनांक २५ फेब्रुवारी २०२५ रोजी करण्यात आले होते. उद्घाटनप्रसंगी माननीय कुलगुरू म्हणाले होते की, हा प्रकल्प विद्यापीठासाठी पथदर्शी ठरणार असून सौर ऊर्जेचे महत्त्व अधोरेखित करेल. भारतात मुबलक प्रमाणात सूर्यप्रकाश उपलब्ध असल्याने सौर ऊर्जा निर्मितीस मोठा वाव असून अक्षय ऊर्जेच्या क्षेत्रात अधिक व्यापक कार्य करण्याची गरज आहे. या प्रकल्पामुळे विद्यापीठाच्या वीज खर्चात ५० ते ६० टक्के बचत होणार असून त्यामुळे लक्षणीय आर्थिक लाभ होईल. परभणी येथील मुख्यालय तसेच बाहेरील कार्यालयांचा विद्युत बिलाचा खर्च शून्यावर आणण्याच्या दृष्टीने सर्व ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्प पूर्ण क्षमतेने उभारण्यात येणार आहेत. तसेचविजेची बचत म्हणजेच वीज निर्मिती” या संकल्पनेवर भर देत, सर्वांनी आवश्यकतेनुसारच विजेचा वापर करावा, असे आवाहन माननीय कुलगुरूंनी त्यावेळी केले होते.

त्यानुसार विद्यापीठात ऊर्जा कार्यक्षमता वाढविणे, वीज बचत, नवीकरणीय ऊर्जेचा प्रभावी वापर तसेच ऊर्जा व्यवस्थापनासंदर्भात राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांमुळे विद्यापीठास हा मानाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. विद्यापीठ प्रशासनाने ऊर्जा संवर्धनाबाबत अवलंबिलेल्या सातत्यपूर्ण धोरणे व प्रभावी अंमलबजावणीची दखल या पुरस्काराच्या माध्यमातून घेण्यात आली आहे.

या उल्लेखनीय यशाबद्दल माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी सर्व अधिकारी, शास्त्रज्ञ, कर्मचारी व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून भविष्यातही ऊर्जा संवर्धन व शाश्वत विकासासाठी विद्यापीठ कटिबद्ध राहील, असे त्यांनी नमूद केले.

या सर्व प्रकल्पांसाठी अपारंपारिक ऊर्जा विभाग प्रमुख तथा कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. राहुल रामटेके यांनी विशेष परिश्रम घेऊन प्रभावी देखरेख केली. त्यांनी पुणे येथे विद्यापीठाने अवलंबलेले तंत्रज्ञान आणि उपाय यांचे सादरीकरण नुकतेच केले होते. त्यांचे मुल्यांकन करून हा पुरस्कार देण्यात आला असे डॉ. रामटेके यांनी सांगितले. या पुरस्कारामुळे वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाची शैक्षणिक व सामाजिक जबाबदारीची प्रतिमा अधिक उजळली असून, इतर शैक्षणिक संस्थांसाठीही हे एक प्रेरणादायी उदाहरण ठरणार आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या परिसरात छतावरील सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प




Tuesday, February 3, 2026

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या शुभहस्ते डॉ. मदन पेंडके यांचा यथोचित सत्कार

 ३३ वर्षांच्या विद्यापीठ सेवेनंतर डॉ. मदन पेंडके यांची नियत वयोमानानुसार सेवानिवृत्ती


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयातील मृदा व जलसंधारण अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख डॉ. मदन पेंडके हे दिनांक ३१ जानेवारी २०२६ रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. यानिमित्त त्यांच्या सेवाकार्यपूर्ती व गुणगौरव सोहळ्याचे आयोजन कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि होते. यावेळी शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, सहयोगी अधिष्ठाता डॉ. राहुल रामटेके, डॉ. प्रविण  वैद्य, डॉ. शिवाजीराव शिंदे, डॉ. विश्वनाथ खंदारे, मृदा व रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. हरीहर कौसडीकर, उपसंचालक संशोधन डॉ. गजेंद्र जगताप, तसेच डॉ. मदन पेंडके कुटुंबीय श्रीमती मंजिरी पेंडके व कु. ईशा पेंडके उपस्थित होते.

यावेळी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या शुभहस्ते डॉ. मदन पेंडके यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. आपल्या अध्यक्षीय भाषणात माननीय कुलगुरूंनी डॉ. पेंडके यांच्या प्रदीर्घ सेवाकाळातील जिद्द, चिकाटी, प्रामाणिक परिश्रमशीलता व सदैव सकारात्मक दृष्टिकोनाचे विशेष कौतुक केले. त्यांच्या कार्यशैलीमुळे विद्यापीठाच्या शैक्षणिक, प्रशासकीय व सामाजिक प्रतिमेला भरीव योगदान लाभले असून विद्यापीठाची ओळख अधिक उजळण्यास मोलाची मदत झाली असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच डॉ. पेंडके यांनी आपल्या कर्तृत्वातून सहकाऱ्यांसह तरुण पिढीसाठी आदर्श निर्माण केला असून त्यांचा अनुभव व मार्गदर्शन भविष्यातही समाजोपयोगी ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. अखेरीस, त्यांच्या सेवानिवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी उत्तम आरोग्य, समाधान व यशस्वी वाटचालीसाठी माननीय कुलगुरूंनी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी डॉ. पेंडके यांनी कोरडवाहू शेती संशोधन क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याचा आढावा घेतला. शेततळ्यांचे आकारमान निश्चिती, मुळस्थानी जलसंधारण पद्धती, हवामान बदलास अनुकूल शेतीपद्धती तसेच विहीर व कुपनलिका पुनर्भरण तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी डॉ. प्रविण वैद्य, डॉ. विश्वनाथ खंदारे, डॉ. दयानंद टेकाळे, डॉ. मेघा जगताप, डॉ. गोपाळ शिंदे, प्रा. विवेकानंद भोसले, डॉ. प्रमोदिनी मोरे, प्रा. दत्तात्रय पाटील व डॉ. अनिकेत वाईकर यांनीही आपल्या भाषणांतून डॉ. पेंडके यांच्या कार्याचे विविध पैलू उलगडले.

कृषि विद्यापीठातील ३३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवाकाळात त्यांनी सहाय्यक प्राध्यापक (कृषि अभियांत्रिकी), वरिष्ठ शास्त्रज्ञ (मृदा व जलसंधारण), उपसंचालक (संशोधन), संशोधन संपादक तसेच कापूस संशोधन योजनेचे प्रभारी अधिकारी म्हणून प्रभावी कार्य केले.

सत्काराला उत्तर देताना डॉ. मदन पेंडके यांनी विद्यापीठातील ३३ वर्षांच्या सेवेत शिक्षण, संशोधन व विस्तार शिक्षण क्षेत्रात काम करण्याची संधी दिल्याबद्दल विद्यापीठ प्रशासनाचे आभार मानले. विभागप्रमुख म्हणून सेवानिवृत्त होत असल्याने वडिलांची इच्छा पूर्ण झाल्याचे त्यांनी भावनिक शब्दांत सांगितले.

या कार्यक्रमास कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयातील विभागप्रमुख, प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. मधुकर मोरे यांनी केले.



वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचा अकोला येथील राज्यस्तरीय मृदविज्ञान परिसंवादात उज्ज्वल ठसा

 माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या प्रेरणेने उत्कृष्ट संशोधनास तीन राज्यस्तरीय पारितोषिके


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील मृदविज्ञान विभागाने अकोला येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय मृदविज्ञान परिसंवादात उल्लेखनीय कामगिरी करत विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या प्रेरणेने मृदविज्ञान विभागातील ७ शास्त्रज्ञ व १५ पदव्युत्तर विद्यार्थ्यांनी या परिसंवादात सक्रिय सहभाग नोंदविला. या परिसंवादात विद्यापीठातील मृदविज्ञान विभागाच्या आचार्य (पीएच.डी.) पदवीच्या विद्यार्थिनी व विद्यार्थ्यांपैकी निकिता परदेशी, प्रियांका नखाते व ओमकार भोसले यांना त्यांच्या उत्कृष्ट संशोधन सादरीकरणासाठी राज्यस्तरीय पारितोषिके प्रदान करण्यात आली.

कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य हे ओमकार भोसले यांचे मार्गदर्शक असून, डॉ. सुरेश वाईकर यांनी प्रियांका नखाते यांना तसेच डॉ. रामप्रसाद खंदारे यांनी निकिता परदेशी यांना संशोधनासाठी मार्गदर्शन केले. तसेच पदव्युत्तर पदवीदरम्यान संशोधनात सहभागी असलेल्या इतर मार्गदर्शक शास्त्रज्ञांचेही विद्यार्थ्यांना मोलाचे सहकार्य लाभले.

या यशामध्ये डॉ. प्रविण वैद्य यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन, परिसंवादात प्रत्यक्ष उपस्थित राहून दिलेले प्रोत्साहन तसेच मृदविज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. हरिहर कौसडीकर यांचा सततचा पाठपुरावा यांचा विशेष वाटा आहे. याशिवाय दीर्घकालीन खत प्रयोग योजनेचे प्रमुख डॉ. रामप्रसाद खंदारे यांनी सादरीकरणाबाबत दिलेल्या मार्गदर्शक सूचनांमुळे विद्यार्थ्यांना उत्कृष्ट सादरीकरण करणे शक्य झाले.

या राज्यस्तरीय परिसंवादात राज्यातील चारही कृषि विद्यापीठांमधील मृदविज्ञान विषयाचे आचार्य व पदव्युत्तर स्तरावरील सुमारे १२० विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यामधून वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील तीन विद्यार्थ्यांची उत्कृष्ट संशोधन सादरीकरणासाठी निवड होणे ही विद्यापीठासाठी अभिमानाची बाब ठरली आहे.

या उल्लेखनीय यशाबद्दल राज्यातील मृदविज्ञान परिवारातर्फे, तसेच कृषि विद्यापीठाच्या विविध स्तरांतून, परभणी चॅप्टर ऑफ इंडियन सोसायटी ऑफ सॉइल सायन्सच्या सदस्य व पदाधिकाऱ्यांकडून या विद्यार्थ्यांचे, त्यांच्या मार्गदर्शकांचे व मृदविज्ञान विभागाचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे.