सामंजस्य करारातून आधुनिक तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांना लाभ ....... माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि
मराठवाड्यातील शेती अधिक शाश्वत व हवामान बदलास सक्षम करण्याच्या दृष्टीने वसंतराव
नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी आणि नानाजी देशमुख कृषि संजिवनी प्रकल्प –
पोकरा (Nanaji Deshmukh Krishi Sanjivani Prakalp (PoCRA) यांच्यात दिनांक २३ एप्रिल २०२६ रोजी मुबई येथे सामंजस्य करार (MoU)
करण्यात आला आहे.
हा करार महाराष्ट्रातील प्रमुख पिक पद्धतींमध्ये संसाधन उत्पादकता
वाढविण्यासाठी आणि हवामान बदलास प्रतिकारक्षमता सुधारण्यासाठी संरक्षणात्मक शेती (Conservation Agriculture for enhancing resource productivity and
improving climate resilience in major cropping systems of Maharashtra) या महत्त्वपूर्ण विषयावर आधारित असून, राज्यातील
प्रमुख पिक पद्धतींमध्ये संसाधनांचा कार्यक्षम वापर व हवामान बदलाशी सामना करण्याची
क्षमता वाढविणे हा यामागील मुख्य उद्देश आहे. वर्ष २०२६ पासून हा उपक्रम
राबविण्यात येणार आहे.
मुंबई येथे झालेल्या या करारावर वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय
कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि आणि पोकरा प्रकल्पाच्या प्रकल्प संचालिका श्रीमती मीनल
करणवाल (भाप्रसे) यांनी स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी विद्यापीठाचे शिक्षण संचालक
डॉ. भगवान आसेवार, कृषि रसायन आणि मृदा शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ हरिहर कौसडीकर दोन्ही
संस्थांतील वरिष्ठ अधिकारी व तज्ज्ञ उपस्थित होते.
या कराराच्या माध्यमातून मृदासंवर्धन, जलव्यवस्थापन,
कमी खर्चिक व पर्यावरणपूरक शेती पद्धती, तसेच
शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी तांत्रिक मार्गदर्शन व संशोधनात्मक सहकार्य
करण्यात येणार आहे.
माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी यावेळी सांगितले की, बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर शाश्वत शेती पद्धतींचा
अवलंब करणे ही काळाची गरज बनली आहे. नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन करत
उत्पादनक्षमतेत वाढ साध्य करण्यासाठी आधुनिक व नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर
अत्यावश्यक आहे. या सामंजस्य कराराच्या माध्यमातून संशोधन, तंत्रज्ञान
हस्तांतरण आणि कौशल्य विकासाला चालना मिळणार असून, शेतकऱ्यांना
अत्याधुनिक तंत्रज्ञान, सुधारित शेती पद्धती व दर्जेदार साधनसामुग्रीचा
(इनपुट्सचा) लाभ मिळेल. यामुळे केवळ कृषी उत्पादनक्षमता वाढणार नाही तर शेती अधिक
लाभदायक, टिकाऊ आणि हवामान बदलास प्रतिरोधक बनण्यास मोठी मदत
होईल.
तर पोकरा प्रकल्पाच्या वतीने या सहकार्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना हवामान
अनुकूल शेती पद्धती आत्मसात करण्यास चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
हा करार राज्यातील कृषी क्षेत्रासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरणार असून, संशोधन व प्रत्यक्ष शेती यांच्यातील दुवा अधिक मजबूत होणार
आहे.









.jpeg)









.jpeg)
.jpeg)

.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)




.jpeg)







