Sunday, March 1, 2026

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या शुभहस्ते आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त परभणीत वॉकॅथॉनचा उत्साहपूर्ण प्रारंभ

 



आंतरराष्ट्रीय महिला दिन (८ मार्च) निमित्त आयोजित करण्यात आलेल्या ५ कि.मी. वॉकॅथॉन कार्यक्रमाचा दिनांक १ मार्च २०२६ रोजी सकाळी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या शुभहस्ते हिरवा झेंडा दाखवून उत्साहात प्रारंभ करण्यात आला. आर्य वैश्य महिला महासभा, परभणी यांच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी महिलांचे शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ राहण्यासाठी नियमित चालणे व व्यायाम अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगितले. “आजचे चालणे, उद्याचे चांगले आरोग्य” हा संदेश समाजात पोहोचवण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले. महिलांच्या सक्षमीकरणासाठी आरोग्य, शिक्षण व स्वावलंबन या तीन बाबी अत्यंत महत्त्वाच्या असून वॉकॅथॉनसारखे उपक्रम सकारात्मक जीवनशैली घडविण्यास मदत करतात, असे मत त्यांनी व्यक्त केले.

या वॉकॅथॉनमध्ये शहरातील विविध क्षेत्रांतील महिला, युवती तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. सर्व सहभागी महिलांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण व्हावी, महिलांमध्ये एकोपा वाढावा तसेच आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे महत्त्व अधोरेखित व्हावे, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजक समिती सदस्य डॉ. अर्चना डमढेरे, श्रीमती वैष्णवी वट्टमवार, श्रीमती संपदा वट्टमवार,  श्रीमती सारिका वट्टमवार, स्वयंसेवक व सहभागी महिलांचे माननीय कुलगुरूंनी अभिनंदन केले.

यावेळी विभाग प्रमुख डॉ. हिराकांत काळपांडे, दंत चिकित्सक डॉ. पंकज ढमढेरेयांची प्रमुख उपस्थिती होती. परभणीत महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित हा वॉकॅथॉन नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरला असून आरोग्यदायी समाजनिर्मितीच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.


Saturday, February 28, 2026

वनामकृवित अनुसूचित जातीतील महिलांसाठी क्षमता बांधणी प्रशिक्षणाचा यशस्वी समारोप

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचे अध्यक्षीय भाषण : कृषिरत महिलांच्या सक्षमीकरणासाठी उपक्रमांचे कौतुक, प्रशिक्षण व मूल्यांकनावर भर

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ अंतर्गत अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प – कृषिरत महिला केंद्राच्या वतीने भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या भुवनेश्वर येथील केंद्रीय कृषिरत महिला संस्थान पुरस्कृत अनुसूचित जाती उपयोजने (एससीएसपी) अंतर्गत अनुसूचित प्रवर्गातील महिलांसाठी क्षमता बांधणी प्रशिक्षणाचे दिनांक २६ ते २८ फेब्रुवारी २०२६ दरम्यान आयोजन करण्यात आले.

या प्रशिक्षणाचा समारोप दिनांक २८ फेब्रुवारी २०२६ रोजी माननीय माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, सहयोगी अधिष्ठाता तथा केंद्र समन्वयिका डॉ नीता गायकवाड, उमग – ग्रामविकासचे अध्यक्ष श्री. जयाजी पाईकराव (अमर, ता. कळमनुरी, जि. हिंगोली), श्रीमती सुशीलाताई पाईकराव आदी मान्यवर उपस्थित होते.

अध्यक्षीय भाषणात माननीय माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी भारतीय कृषि अनुसंधान परिषद अंतर्गत भुवनेश्वर येथील केंद्रीय कृषिरत महिला संस्थान यांच्या शेतकरी महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या कार्याचे मनःपूर्वक कौतुक केले. महिलांची शेतीतील भूमिका व सहभाग अत्यंत महत्त्वाचा असून त्यांची क्षमता वृद्धिंगत करण्यासाठी तसेच उद्योग उभारणीसाठी अनुसूचित जाती उपयोजनेअंतर्गत महिलांना साहित्य उपलब्ध करून देण्यात आल्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले.

सदर साधने व अवजारे महिलांच्या शारीरिक रचनेनुसार तयार करण्यात आली असून त्यांचा वापर करताना महिलांना थकवा न येता सुलभ व आरामदायीरीत्या काम करता येईल, असे त्यांनी नमूद केले. शासनाने अनुसूचित जातीतील महिलांची क्षमता वाढवण्यासाठी हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविला असल्याचे त्यांनी सांगितले.

या योजनेअंतर्गत प्रशिक्षण घेतलेल्या महिलांना प्रत्यक्षात कितपत लाभ होत आहे याचे मूल्यांकन करणे आवश्यक असून त्याचबरोबर त्यांच्या सामाजिक व आर्थिक स्थितीत किती सुधारणा झाली आहे, हेही तपासावे, असे त्यांनी स्पष्ट केले. यामुळे भविष्यात अशा योजना अधिक प्रभावीपणे राबविण्यास मदत होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले.

तसेच महिलांना साधने व अवजारे देतानाच त्यांचा योग्य वापर कसा करावा, याचे प्रशिक्षण देणे आणि त्या साधनांच्या उपलब्धतेबाबत सविस्तर माहिती देणेही तितकेच आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यापीठाच्या ‘शेतकरी देवो भव’ या भावनेतून सुरू असलेले कार्य या उपक्रमांद्वारे प्रत्यक्षात साकार होत असल्याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ. नीता गायकवाड यांनी केले. आपल्या भाषणात त्यांनी नमूद केले की परभणी व हिंगोली जिल्ह्यातील सहा गावांमधून एकूण १८० महिलांनी या प्रशिक्षण कार्यक्रमात सक्रिय सहभाग नोंदविला. या महिलांना आजोला (अॅझोला) उत्पादन तसेच गांडूळ खत निर्मिती या आधुनिक व शाश्वत तंत्रज्ञानाचे सखोल प्रशिक्षण देण्यात आले असून, त्याद्वारे त्यांच्या कौशल्यविकासासोबतच आर्थिक स्वावलंबनाची क्षमता विकसित करण्यात आली आहे.

या प्रशिक्षणाच्या माध्यमातून महिलांना केवळ तांत्रिक ज्ञानच नव्हे तर उद्योगशील दृष्टीकोन निर्माण करण्यावर विशेष भर देण्यात आला. त्यांना सक्षम उद्योजिका घडविण्याच्या उद्देशाने मार्गदर्शन, प्रेरणा व आवश्यक पाठबळ देण्यात आले. तसेच योजनेच्या वतीने संबंधित उद्योग उभारणीसाठी लागणारी आवश्यक साधनसामग्रीही उपलब्ध करून देण्यात आली.

या सर्व उपक्रमांमुळे प्रशिक्षणार्थी महिलांना स्वतःचा उद्योग सुरू करून स्थिर उत्पन्नाचे साधन निर्माण करता येईल आणि त्या निश्चितच ‘लखपती दीदी’ म्हणून पुढे येतील, असा विश्वास डॉ. नीता गायकवाड यांनी व्यक्त केला.

सूत्रसंचालन डॉ. किशोर कौसडीकर यांनी केले, तर आभार डॉ. नीता गायकवाड यांनी मानले. यावेळी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या कळमनुरी तालुका व्यवस्थापक श्रीमती स्मिता कटके यांचीही प्रमुख उपस्थिती होती

तीन दिवस कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. नीता गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्पातील यंग प्रोफेशनल प्रसाद देशमुख, आशा पवार, सादिया यास्मिन, चंद्रप्रकाश लहाडे, अमीर शेख तसेच महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.



वनामकृविमध्ये वनस्पती मायक्रोबायोम व जैव-इनपुट्स विषयावर भाकृअप प्रायोजित २१ दिवसीय हिवाळी शाळेचे (प्रशिक्षण ) उद्घाटन

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि: गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण, शेतकरीकेंद्रित विस्तार आणि जैविक शेतीवर विद्यापीठाचा ठाम भर

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील वनस्पती रोगशास्त्र विभागाच्या वतीने भारतीय कृषि अनुसंधान परिषद (ICAR) प्रायोजित शाश्वत कृषिसाठी वनस्पती मायक्रोबायोम जैव-इनपुट्सच्या संवर्धन तंत्रज्ञानातील नवकल्पना” (Innovations in Plant Microbiome Bio-inputs Culturing Techniques for Sustainable Agriculture) या विषयावरील  २१ दिवसीय हिवाळी शाळेच्या (अभ्यासिकेच्या) उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन शनिवार, दिनांक २८ फेब्रुवारी २०२६ रोजी करण्यात आले. हा उद्घाटन कार्यक्रम विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीतील परिसंवाद सभागृहात उत्साहात पार पडला.

या उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून भाकृअप, नवी दिल्ली येथील सहसंचालक (मानव संसाधन विकास) डॉ. सीमा जग्गी ऑनलाईन उपस्थित होत्या.व्यासपीठावर शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, कुलसचिव श्री. संतोष वेणीकर, सहयोगी अधिष्ठाता, डॉ. प्रविण वैद्य विभाग प्रमुख डॉ. प्रफुल्ल घंटे, अभ्यासिका संचालक डॉ. गजेंद्र जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.

अध्यक्षीय भाषणात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी सांगितले की, मागील वर्षी याच विभागामार्फत आयोजित दहा दिवसांच्या प्रशिक्षण कार्यक्रमास प्रशिक्षणार्थींनी अत्यंत सकारात्मक व उत्कृष्ट अभिप्राय दिला होता. यंदाच्या प्रशिक्षणातूनही तसाच गुणवत्तापूर्ण प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या प्रशिक्षणामध्ये कर्नाटक, तेलंगणा, केरळ, राजस्थान, छत्तीसगड व महाराष्ट्र या सहा राज्यांतील एकूण २५ प्रशिक्षणार्थी सहभागी झाले असून, यामध्ये विविध कृषि विद्यापीठे व कृषि विज्ञान केंद्रांतील शास्त्रज्ञ व प्राध्यापकांचा सहभाग असल्याने प्रशिक्षणाचा दर्जा अधिक उंचावेल, असे त्यांनी नमूद केले. पुढे त्यांनी महाराष्ट्र हे देशातील कृषि क्षेत्राला दिशा देणारे आणि ‘लाईटहाऊस’ म्हणून ओळखले जाणारे राज्य असून, हरितक्रांतीचे जनक स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या दूरदृष्टीतून विभागनिहाय चार कृषि विद्यापीठांची स्थापना करण्यात आली. त्यामुळे महाराष्ट्रात माळी प्रशिक्षणापासून ते पीएच.डी.पर्यंतचे सुसंगत कृषि शिक्षण उपलब्ध झाले आहे.

विद्यापीठामार्फत जैविक शेतीला चालना देण्यासाठी वेस्ट डी-कंपोजर, जैविक कीटकनाशके व जैविक खते यांचे उत्पादन केले जात असून, त्यातून विषमुक्त शेतीस प्रोत्साहन मिळत आहे. रासायनिक खतांचा कमीत कमी वापर करून नैसर्गिक व सेंद्रिय शेतीसाठी आवश्यक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य महाराष्ट्र शासन व विद्यापीठ संयुक्तपणे करीत आहेत.

प्रशिक्षणार्थींनी विद्यापीठातील संशोधन प्रकल्प, सहा कोटी रुपयांहून अधिक उलाढाल असलेला बायोमिक्स उत्पादन प्रकल्प, कॉमन इन्क्युबेशन सेंटर तसेच विद्यापीठाच्या मध्यवर्ती प्रक्षेत्राच्या अखत्यारीतील सुमारे ४,००० एकर बिजोत्पादन क्षेत्राची पाहणी करावी, असे आवाहन त्यांनी केले.

विद्यापीठातील बायोमिक्स उत्पादने विद्यापीठाच्या चारही कृषि विज्ञान केंद्रांच्या माध्यमातून विक्रीस उपलब्ध करून दिली जात असल्यामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांना अन्य जिल्ह्यात जाऊन खरेदी करण्याची गरज उरलेली नाही, असे सांगितले.

याबरोबरच त्यांनी विद्यापीठातील सर्व संचालनालये व प्रशासकीय विभाग परस्पर समन्वयाने कार्यरत असून, सर्वांगीण विकासावर भर दिला जात आहे. विद्यापीठ शेतकरीकेंद्रित विस्तार कार्य, विद्यार्थी केंद्रित शिक्षण, कर्मचारी केंद्रित प्रशासन आणि नाविन्यपूर्ण संशोधन या चार स्तंभांवर कार्यरत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांच्या हितासाठी ‘शेतकरी देवो भव:’ या भावनेतून दर महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासोबत’ या उपक्रमांतर्गत कुलगुरूपासून शास्त्रज्ञांपर्यंत सर्वजण शेतकऱ्यांच्या बांधावर प्रत्यक्ष मार्गदर्शन करतात. तसेच आठवड्यातून दोन दिवस सायंकाळी सात ते नऊ या वेळेत ऑनलाईन मार्गदर्शनही दिले जाते.

पायाभूत सुविधांच्या विकासासाठी केंद्र व महाराष्ट्र शासनाकडून मोठ्या प्रमाणावर आर्थिक सहाय्य मिळाल्याबद्दल त्यांनी शासनाचे आभार मानले. प्रशिक्षणार्थींचे स्वागत व अभिनंदन करून त्यांनी विद्यापीठातील पायाभूत सुविधा व संशोधन उपक्रमांची पाहणी करून आपले मौल्यवान अभिप्राय नोंदवावेत, असे आवाहन केले.

डॉ. सीमा जग्गी यांनी या प्रशिक्षणासाठी प्रत्यक्ष (फिजिकली) उपस्थित राहण्याची इच्छा व्यक्त करत भारतभरातील विविध संस्थांकडून अनेक प्रस्ताव मंजुरीसाठी प्राप्त झाले होते. मात्र, या प्रशिक्षण कार्यक्रमाचा विषय सध्याच्या परिस्थितीशी सुसंगत व अत्यंत आवश्यक असल्याने त्याची प्राधान्याने निवड करण्यात आली. पुढील २१ दिवसांत प्रशिक्षणार्थींनी या विषयाचे सखोल ज्ञान आत्मसात करावे, तसेच विद्यापीठात उपलब्ध असलेल्या संपूर्ण भारतात उल्लेखनीय अशा विविध संशोधन प्रकल्पांबरोबरच इतर सुविधा यांची माहिती घ्यावी, असे त्यांनी आवाहन केले. या प्रशिक्षणाचा पुरेपूर लाभ घेऊन आपल्या क्षमता विकसित कराव्यात, असेही त्यांनी स्पष्ट केले. यासोबतच, प्रशिक्षणामध्ये प्रात्यक्षिके व प्रक्षेत्र भेटींवर अधिक भर देण्याची सूचना त्यांनी आयोजकांना केली. भारत सरकार अधिकाऱ्यांच्या क्षमता बांधणीवर विशेष भर देत असून, यासाठी तीन, आठ, दहा, पंधरा तसेच एकवीस दिवसांचे विविध कालावधीचे प्रशिक्षण कार्यक्रम राबविले जातात, असे त्यांनी नमूद केले. सहभागी प्रशिक्षणार्थींनी परस्पर ज्ञानाचे आदान-प्रदान करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

स्वागतपर भाषणात विभागप्रमुख डॉ. प्रफुल्ल घंटे यांनी केले, तर प्रस्ताविक अभ्यासक्रम संचालक व संशोधन उपसंचालक डॉ. गजेंद्र जगताप यांनी मांडले. सूत्रसंचालन डॉ. मीनाक्षी पाटील यांनी केले असून आभार अभ्यासक्रम समन्वयक डॉ. चंद्रशेखर अंबडकर यांनी मानले.

सदर हिवाळी शाळेमध्ये वनस्पती मायक्रोबायोम, जैव-खते तसेच जैव-इनपुट्सच्या उत्पादन व वापरातील नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन देण्यात येणार असून, शाश्वत कृषि विकासाच्या दृष्टीने हे प्रशिक्षण अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.



Inauguration of an ICAR-Sponsored 21-Day Winter School (Training Programme) on Plant Microbiome and Bio-Inputs at VNMKV

 

Hon’ble Vice-Chancellor Prof. (Dr.) Indra Mani: Strong emphasis by the University on quality training, farmer-centric extension, and organic farming.

 

The Department of Plant Pathology of Vasantrao Naik Marathwada Agricultural University, Parbhani, organized the inaugural programme of a 21-day Winter School (Academic Programme) sponsored by the Indian Council of Agricultural Research (ICAR) on the theme “Innovations in Plant Microbiome Bio-inputs Culturing Techniques for Sustainable Agriculture.”

The inauguration was held on Saturday, 28 February 2026, and took place with great enthusiasm at the Symposium Hall of the University Administrative Building.

The inaugural ceremony was presided over by Hon’ble Vice-Chancellor Prof. (Dr.) Indra Mani,.
Dr. Seema Jaggi, Assistant Director General (Human Resource Development), Indian Council of Agricultural Research, New Delhi, attended the event online as the chief guest. Also present on the dais were Director of  Instruction Dr. Bhagwan Asewar, Director of Research Dr. Khizar Baig, Director of Extension Education Dr. Rakesh Ahire, Registrar shri Santosh Venikar, Associate Dean Dr. Pravin Vaidya, Head of the Department Dr. Prafull Ghante, Course Director Dr. Gajendra Jagatap along with other dignitaries.

In his presidential address, Hon’ble Vice Chancellor Prof. (Dr.) Indra Mani stated that the ten-day training programme organized by the same department last year had received extremely positive and excellent feedback from the trainees. He expressed confidence that this year’s training would also elicit a similarly high-quality response. He informed that a total of 25 trainees from six states Karnataka, Telangana, Kerala, Rajasthan, Chhattisgarh, and Maharashtra are participating in the programme. As scientists and professors from various agricultural universities and Krishi Vigyan Kendras are involved, he noted that the overall quality and impact of the training would be further enhanced.

Further, he highlighted that Maharashtra is a state known for providing direction to the country’s agricultural sector and is often referred to as a “lighthouse.” With the visionary leadership of the late Vasantrao Naik, four agricultural universities were established on a regional basis. As a result, Maharashtra now offers a comprehensive agricultural education system ranging from basic Mali training to Ph.D. level studies.

To promote organic farming, the university is producing waste decomposers, bio-pesticides, and organic fertilizers, thereby encouraging toxin-free agriculture. He added that the Government of Maharashtra and the university are jointly working to disseminate technologies required for natural and organic farming to farmers, with minimal use of chemical fertilizers.

He appealed to the trainees to visit and review the university’s research projects, the Biomix production unit with an annual turnover exceeding ₹6 crore, the Common Incubation Center, and approximately 4,000 acres of seed production area under the jurisdiction of the university’s central farm.

He also mentioned that Biomix products of the university are made available for sale through all four Krishi Vigyan Kendras of the university, ensuring that farmers in the Marathwada region no longer need to travel to other districts to purchase these inputs.

Additionally, he emphasized that all directorates and administrative departments of the university work in close coordination, with a strong focus on holistic development. He clarified that the university functions on four key pillars: farmer-centric extension activities, student-centric education, employee-centric administration, and innovative research.

For the welfare of farmers, under the spirit of “Shetkari Devo Bhava,” the initiative “Maza Ek Divas Maza Balirajasobat” (One Day with My Farmer) is implemented on the second Wednesday of every month, during which everyone, from the Vice Chancellor to scientists, provides on-field guidance directly at farmers’ fields. Moreover, online advisory services are also provided twice a week from 7:00 p.m. to 9:00 p.m.

He expressed gratitude to the Central Government and the Government of Maharashtra for the substantial financial support received for the development of infrastructure. While welcoming and congratulating the trainees, he appealed to them to visit the university’s infrastructure and research initiatives and to share their valuable feedback.

Dr. Seema Jaggi expressed her willingness to attend this training programme in person (physically), and several proposals from various institutions across India had been received for approval. However, as the theme of this training programme is highly relevant to the present situation and extremely essential, it was selected on priority. She appealed to the trainees to acquire in-depth knowledge of the subject over the next 21 days and to familiarize themselves with the various research projects of national importance being implemented at the university, along with other available facilities. She also emphasized that the trainees should take full advantage of the training to enhance their capacities. In addition, she suggested to the organizers that greater emphasis should be placed on practical sessions and field visits during the training.

She further noted that the Government of India is giving special emphasis to capacity building of officials, and for this purpose, training programmes of various durations such as three, eight, ten, fifteen, and twenty-one days are being conducted. She also appealed to the participating trainees to engage in mutual exchange of knowledge.

The welcome address was delivered by Head of the Department Dr. Prafulla Ghante, while the introductory remarks were presented by Course Director and Associate Director of Research Dr. Gajendra Jagtap. The programme was anchored by Dr. Meenakshi Patil, and the vote of thanks was proposed by Course Coordinator Dr. Chandrashekhar Ambadkar.

Under this Winter School, experts will provide guidance on innovative technologies related to plant microbiome, bio-fertilizers, and the production and use of bio-inputs. From the perspective of sustainable agricultural development, this training is expected to be highly beneficial.


 


Friday, February 27, 2026

वनामकृविच्या विद्यार्थ्यांचे अखिल भारतीय वुडबॉल स्पर्धेत सुवर्णयश

 माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी केले विद्यार्थ्यांचे अभिनंदन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ मान्यता प्राप्त, श्री आनंदी आत्मानंद सरस्वती उर्फ रंगनाथ महाराज संस्थान, नाव्हा (ता. व जि. जालना) संचलित श्री रंगनाथ महाराज कृषि महाविद्यालय येथील विद्यार्थ्यांनी मध्यांचल प्रोफेशनल युनिव्हर्सिटी, भोपाळ (मध्य प्रदेश) येथे दिनांक २२ ते २७ फेब्रुवारी २०२६ दरम्यान  आयोजित अखिल भारतीय वुडबॉल स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले.

या उल्लेखनीय यशाबद्दल विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि आणि शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले. तसेच संस्थेचे अध्यक्ष श्री राहुल बोंद्रे, उपाध्यक्ष श्री. लक्ष्मणराव कुलकर्णी आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विलास पाटील यांनीही सर्व खेळाडूंचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

या स्पर्धेत देशभरातील 110 विद्यापीठांमधील विद्यार्थ्यांचा सहभाग होता. त्यामधून महाविद्यालयाचे विद्यार्थी सचिन घोडकेओम करवंदे यांनी उत्कृष्ट खेळ सादर करत सुवर्णपदक मिळवले. तसेच महाविद्यालयाच्या संघाने—श्रीधन वाघ, ऋषिकेश क्षीरसागर, रितेश चंद, सिताराम वाघ, सोमनाथ चाटे आणि नागेश घुबेयांच्या समन्वयपूर्ण खेळाच्या जोरावर भारतात चौथा क्रमांक प्राप्त केला.

या विद्यार्थ्यांना विद्यापीठाचे विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम, क्रीडा अधिकारी डॉ. संघर्ष शृंगारे, महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षक श्री वाघ यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेतर्फे मार्गदर्शक आणि प्रशिक्षक व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे तसेच सर्व खेळाडूंचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले.

Thursday, February 26, 2026

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय कृषि विकास योजनेअंतर्गत पेडगाव (ता. परभणी) येथे शेतकरी प्रशिक्षण शिबिर संपन्न


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ अंतर्गत मृद विज्ञान व कृषि रसायनशास्त्र विभागामार्फत राष्ट्रीय कृषि विकास योजना (RKVY) अंतर्गत मौजे पेडगाव (ता. परभणी) येथे दिनांक २६ फेब्रुवारी २०२६ रोजी शेतकरी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. हे प्रशिक्षण शिबिर माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.

या प्रशिक्षण शिबिरात पेडगाव परिसरातील संत्रा, कागदी लिंबू, केळी व भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. उत्पादन खर्च कमी करून पिकांचे उत्पादन वाढविण्याच्या दृष्टीने बीज प्रक्रिया, जैविक व सेंद्रिय खते, विद्राव्य खते तसेच सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खतांचा एकात्मिक खत व्यवस्थापनात कसा उपयोग करावा, याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

उपसंशोधन संचालक तथा मृद विज्ञान व कृषि रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. हरिहर कौसडीकर यांनी प्रत्यक्ष बागेत प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जमिनीचे आरोग्य व पीक पोषणासंदर्भातील समस्यांचे निराकरण करून दाखविले. तसेच रासायनिक खतांचा संतुलित व मर्यादित वापर, माती परीक्षणाचे महत्त्व आणि जैविक खतांच्या वापरातून जमिनीचे आरोग्य सुधारण्याची गरज असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले.

मृद विज्ञान विभागातील दीर्घकालीन खतप्रयोग योजनेचे प्रमुख डॉ. रामप्रसाद खंदारे यांनी राष्ट्रीय कृषि विकास योजना, प्रशिक्षण शिबिराची भूमिका स्पष्ट केली तसेच रासायनिक खत वापराचा जमिनीवर होणारा परिणाम व पिकांच्या उत्पादकतेशी असलेले नाते यावर मार्गदर्शन केले.

या शिबिरात शेतकऱ्यांना केवळ तांत्रिक माहितीच देण्यात आली नाही, तर प्रतिनिधीक स्वरूपात विद्यापीठाद्वारे उत्पादित एनपीके कन्सोर्शियम जैविक खत, सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त व विद्राव्य खतांचे वितरणही करण्यात आले. माती परीक्षण, खतांचा योग्य प्रमाणात व योग्य पद्धतीने वापर कसा करावा, याचे सविस्तर प्रात्यक्षिकही घेण्यात आले.

विद्यापीठातील विविध सेवा व उपलब्ध निविष्ठांची माहिती देत शेतकऱ्यांनी कृषि विद्यापीठाशी सातत्याने संपर्कात राहावे, असे आवाहन डॉ. कौसडीकर यांनी केले. हे प्रशिक्षण शिबिर श्री. विजय गंगाधर जंगले यांच्या शेतावर आयोजित करण्यात आले होते.

शिबिरात पारधी बाळासाहेब आनंदराव, राजेश्वर सिताराम शिंदे, कुलदीप जगदीशराव देशमुख, राजेश दिलीपराव देशमुख, अर्जुन मुंजाभाऊ शिंदे, आप्पाराव गायकवाड, चंद्रकांत किशनराव देशमुख, संजय ठोंबरे, रमेश बापूराव पारधी, विजय गंगाधर जंगले, कृष्णा मुकुंदराव घुले यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते. शेतकऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवत विविध फळझाडे व पिकांबाबतच्या पीक पोषण समस्यांचे समाधान करून घेतले.









वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ अंतर्गत कृषिरत महिला केंद्रात अनुसूचित प्रवर्गातील महिलांसाठी क्षमता बांधणी प्रशिक्षणाचे उद्धाटन

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ अंतर्गत अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प – कृषिरत महिला केंद्राच्या वतीने भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या भुवनेश्वर येथील केंद्रीय कृषिरत महिला संस्थान पुरस्कृत अनुसूचित जाती उपयोजने (एससीएसपी) अंतर्गत अनुसूचित प्रवर्गातील महिलांसाठी क्षमता बांधणी प्रशिक्षणाचे दिनांक २६ ते २८ फेब्रुवारी २०२६ दरम्यान आयोजन करण्यात आले. माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि आणि संशोधन संचालक डॉ खिजर बेग यांच्या मार्गदर्शनखाली प्रशिक्षणाचे नियोजन करण्यात आले.

प्रशिक्षणाचे उद्धाटन दिनांक २६ फेब्रुवारी २०२६ रोजी माननीय कुलसचिव श्री. संतोष वेणीकर यांच्या  अध्यक्षतेखाली संपन्न झाले. यावेळी व्यासपीठावर विद्यापीठ अभियंता श्री. दीपक कशाळकर, सहयोगी अधिष्ठाता डॉ. राहुल रामटेके (कृषि अभियांत्रिकी ), डॉ नीता गायकवाड (सामुदायिक विज्ञान), सहाय्यक कुलसचिव श्री. राम खोबे, उमग – ग्रामविकासचे अध्यक्ष श्री. जयाजी पाईकराव (अमर, ता. कळमनुरी, जि. हिंगोली), श्रीमती सुशीलाताई पाईकराव आदी मान्यवर उपस्थित होते.

अध्यक्षीय भाषणात माननीय कुलसचिव श्री. संतोष वेणीकर यांनी नमूद केले की कुशल व डायनॅमिक महिला म्हणजे काय, याचे उत्तम उदाहरण या महाविद्यालयाच्या नवनियुक्त सहयोगी अधिष्ठाता डॉ. नीता गायकवाड आहेत. महाराष्ट्रात एकमेव असलेल्या या महाविद्यालयाचे बळकटीकरण व सर्वांगीण विकास करण्यासाठी त्यांच्यावर मोठी जबाबदारी असून, या कार्यासाठी विद्यापीठ प्रशासन सदैव त्यांच्या पाठीशी उभे राहील, असे त्यांनी स्पष्ट केले. या प्रशिक्षण कार्यक्रमास महिलांचा लाभलेला उत्स्फूर्त प्रतिसाद खरोखरच कौतुकास्पद असून, हे महाविद्यालयाच्या यशाचे द्योतक आहे. सध्या महिलांचे सबलीकरण झालेले असून त्या शेती, उद्योग-व्यवसाय, रोजगार, शिक्षण आदी सर्वच क्षेत्रांत सक्रियपणे कार्यरत आहेत. तथापि, सर्वसाधारणपणे प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये पुरुषांनाच प्राधान्य दिले जात असे. मात्र, या महाविद्यालयातील अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प (कृषिरत महिला) अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या प्रशिक्षणामुळे महिलांच्या क्षमतांचा निश्चितच विकास होईल, असा विश्वास माननीय कुलसचिव यांनी व्यक्त केला. तसेच महिलांवरील ताण कमी होण्यासाठी व आरोग्यवर्धनासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. प्रशिक्षणादरम्यान आहार-विहाराविषयी सविस्तर माहिती देऊन महिलांचे शारीरिक व मानसिक संतुलन वाढवावे, तसेच स्वतःच्या आरोग्यासाठी आध्यात्मिक कृतींचा अंगीकार करावा, असे आवाहनही त्यांनी केले.

विद्यापीठ अभियंता श्री. दीपक कशाळकर यांनी हे प्रशिक्षण अत्यंत प्रभावी ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. तसेच प्रशिक्षणाच्या दरम्यान विद्यापीठामध्ये डॉ. राहुल रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असलेल्या सौरऊर्जा प्रकल्पाची पाहणी करावी व सौरऊर्जेवर चालणाऱ्या उपकरणे व अवजारांना प्रोत्साहन द्यावे, असे त्यांनी नमूद केले.

डॉ. राहुल रामटेके यांनी क्षमता बांधणीनंतर महिलांमध्ये नवचैतन्य निर्माण होईल व त्यांच्यात नाविन्यपूर्ण कौशल्यांचा विकास होईल, असे सांगितले. तसेच या प्रशिक्षणातून मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग उत्पादन ते विक्री व्यवस्थापनापर्यंत करून उद्योग-व्यवसाय उभारावा व स्वतःचे तसेच कुटुंबाचे सबलीकरण साधावे, असे आवाहन त्यांनी केले. याबरोबरच विद्यापीठात राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांना भेट देण्याचीही त्यांनी विनंती केली.

सहाय्यक कुलसचिव श्री. राम खोबे यांनी आपल्या मार्गदर्शनात महिला स्वावलंबन व सबलीकरणासाठी क्षमता बांधणीचे महत्त्व विशद केले.

श्री.जयाजी पाईकराव यांनी महिलांच्या सबलीकरणाचे विविध टप्पे विशद केले. सुरुवातीला जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाला उधारी असे म्हटले जायचे. त्यानंतर जिच्या हाती पैशाची दोरी, ती जगाला उधारी असे संबोधले जाऊ लागले. आता मात्र जिच्या हाती उद्योगाची दोरी, ती जगाला उधारी असे संबोधले जात असल्याचे त्यांनी नमूद केले. सध्या उद्योग-व्यवसायाच्या माध्यमातून महिलांचे मोठ्या प्रमाणात सबलीकरण होत आहे. पूर्वी सुमारे ३० टक्के असलेली कर्ज परतफेडीची क्षमता आता ९८ टक्क्यांपर्यंत वाढल्याचे त्यांनी सांगितले. महिलांची क्षमता वाढविण्यासाठी कृषि विद्यापीठाच्या माध्यमातून व भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या निधीतून राबविण्यात येत असलेला हा प्रशिक्षण कार्यक्रम प्रभावी ठरेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. तसेच ‘उमेद’च्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती देत, या प्रशिक्षणातील महिलांचा सहभाग हा त्याचाच एक भाग असल्याचे त्यांनी नमूद केले. हिंगोली जिल्ह्यातील दोन गावांमधून ४० हून अधिक महिलांनी या प्रशिक्षणात सहभाग घेतल्याची माहितीही त्यांनी दिली.

प्रास्ताविकात डॉ. नीता गायकवाड यांनी महिलांनी आपली सर्व कामे बाजूला ठेवून प्रशिक्षणात सहभाग घेतल्याबद्दल त्यांचे आभार मानले. तसेच अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्पामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची व महाराष्ट्रातील १४५ गावांमध्ये करण्यात आलेल्या विस्तार कार्याची माहिती दिली. याशिवाय या क्षमता बांधणी प्रशिक्षणामध्ये आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानांची व प्रात्यक्षिकांचीही माहिती त्यांनी सविस्तर दिली.

उद्घाटन समारंभात संगीताविषयी उगम गीत सादर करण्यात आले, तर कल्पना सुगंधी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे आभार डॉ. नीता गायकवाड यांनी मानले, तर सूत्रसंचालन डॉ. एकनाथ लंगोटे यांनी केले.

या कार्यक्रमामध्ये हिंगोली जिल्ह्यातील ४० हून अधिक महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी केंद्र समन्वयक तथा वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. नीता गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्पातील यंग प्रोफेशनल प्रसाद देशमुख, आशा पवार, सादिया यास्मिन, चंद्रप्रकाश लहाडे, अमीर शेख तसेच महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

या प्रशिक्षण कार्यक्रमामार्फत अनुसूचित प्रवर्गातील महिलांच्या कौशल्यविकासाला चालना देऊन त्यांची आत्मनिर्भरता वाढविणे तसेच कृषिपूरक उपजीविकेच्या संधी विस्तारित करण्यावर विशेष भर देण्यात येणार आहे.
















Wednesday, February 25, 2026

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या मार्गदर्शनाखाली कृषि अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी कॅम्पस मुलाखतीत घवघवीत यश


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ अंतर्गत कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय (सीएईटी)परभणी येथील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. महाविद्यालयातील तीन विद्यार्थ्यांची व्हीएसटी टीलर्स  ट्रॅक्टर्स लि. (VST Tillers Tractors Ltd), बेंगळुरू येथे निवड झाली आहे. ही निवड दिनांक २५ फेब्रुवारी २०२६ रोजी महाविद्यालयाच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलच्या वतीने आयोजित कॅम्पस मुलाखतीदरम्यान करण्यात आली.

सदर कॅम्पस मुलाखत विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि तसेच शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडली. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना सहयोगी अधिष्ठाता डॉ. राहुल रामटेके यांच्या उपस्थितीत कंपनीच्या मानव संसाधन विभागाचे प्रमुख इंजि. तेजस्वीइंजि. शशिकांत पाटील आणि प्राजना मॅडम यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली.

या कॅम्पस मुलाखतीत दर्शन जाधवश्रेयस वाजे आणि अखिलेश मांदले या तीन विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली असूनत्यांना वार्षिक ४.२ लाख रुपयांचे आकर्षक वेतन पॅकेज मिळणार आहे. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्लेसमेंट ऑफिसर प्रा. दत्तात्रय पाटीलट्रेनिंग को-ऑर्डिनेटर डॉ. मधुकर मोरे तसेच प्रा. अनिकेत वाईकर यांनी विशेष परिश्रम घेतले.

या यशाबद्दल विद्यापीठातील वरिष्ठ अधिकारीमहाविद्यालयातील विभागप्रमुख व प्राध्यापकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच चालू सत्रात विविध सिंचन कंपन्या व पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम राबविणाऱ्या स्वयंसेवी संस्थांच्या कॅम्पस मुलाखतींचेही आयोजन करण्यात येणार आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या क्षेत्रात कार्य करण्याची संधी मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त करत महाविद्यालयाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.