जमिनीचे आरोग्य टिकवून संतुलित पीक पोषण करणे ही काळाची गरज : डॉ. हरिहर कौसडीकर
माननीय पंतप्रधान
श्री नरेंद्र मोदीजी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माननीय केंद्रीय कृषि व किसान
कल्याण मंत्री श्री शिवराज सिंह चौहानजी यांच्या नेतृत्वात दि. १ जून ते ३० जून
२०२६ या कालावधीत देशभर राबविण्यात येत असलेल्या
“खेत बचाओ अभियान” अंतर्गत मौजे रावराजुर, ता. पालम, जि. परभणी येथे शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम दिनांक २ जून २०२६ रोजी
उत्साहात संपन्न झाला. प्रशिक्षणाचे आयोजन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा.
(डॉ.) इन्द्र मणि यांच्या पुढाकारातून आणि विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे
यांच्या मार्गदर्शनखाली विभाग प्रमुख डॉ. हरिहर कौसडीकर यांनी केले.
यावेळी विद्यापीठाचे
हवामान शास्त्रज्ञ डॉ. कैलास डाखोरे, डॉ. अभय जाधव, परभणीचे
विख्यात अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. केदार खटिंग, रावराजुर गावचे श्री अशोकरावजी शिंदे, तसेच प्राणा कंपनीचे श्री. ध्रुव साकोरे यांच्यासह पंचक्रोशीतील सुमारे
२०० शेतकरी उपस्थित होते.
या अभियानांतर्गत
मार्गदर्शन करताना डॉ. हरिहर कौसडीकर म्हणाले की, जमिनीचे आरोग्य
टिकवून संतुलित पीक पोषण करणे ही काळाची गरज आहे. माती परीक्षणाच्या माध्यमातून
शेतकऱ्यांनी योग्य खत व्यवस्थापन करून उत्पादन खर्च कमी करावा. तसेच पिकांच्या
संतुलित पोषणासाठी उपलब्ध विविध पर्यायांची माहितीही त्यांनी दिली. याबरोबरच,
विद्यापीठामार्फत तयार करण्यात येणाऱ्या निविष्ठांचा मोठ्या
प्रमाणावर वापर करून शास्त्रीय माहिती मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी विद्यापीठाच्या
संपर्कात राहावे, असे आवाहन त्यांनी केले.
एल-निनोच्या
पार्श्वभूमीवर कोणत्या पिकांची निवड करावी आणि पेरणी कोणत्या कालावधीत करावी, याबाबत
डॉ. कैलास डाखोरे यांनी मार्गदर्शन केले. तसेच संपूर्ण खरीप हंगामातील संभाव्य
पर्जन्यमानाबाबतची सविस्तर माहितीही त्यांनी शेतकऱ्यांना दिली.
यानंतर डॉ. अभय जाधव
यांनी फेरसाळ लागवड तंत्रज्ञानाविषयी माहिती दिली. डॉ. केदार खटिंग यांनी मानवी
आरोग्यासाठी मातीचे आरोग्य अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगून, विद्यापीठातील
तज्ज्ञांनी दिलेल्या मार्गदर्शनानुसार शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेऊन सेंद्रिय
शेतीचा अवलंब करावा, असे आवाहन केले.
यावेळी श्री. ध्रुव
साकोरे यांनी कार्बन क्रेडिट संदर्भातील माहिती देऊन, प्राणा
कंपनीसोबत समन्वय साधून शेतकऱ्यांनी कार्बन क्रेडिटचा लाभ घ्यावा, असे सांगितले.
कार्यक्रमाचे नियोजन श्री. हेमचंद्र शिंदे यांनी केले, तर प्राध्यापक नितीन शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. याच कार्यक्रमात डॉ. हरिहर कौसडीकर आणि डॉ. केदार खटिंग यांच्या हस्ते गावातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतांच्या माती परीक्षणाचे अहवाल वितरित करण्यात आले.

.jpeg)



.jpeg)

.jpeg)









.jpeg)







.jpeg)

.jpeg)

.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)