वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण अधिकारी कार्यालयामार्फत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९६ वी जयंतीचे सुवर्ण जयंती दिक्षांत सभागृहात दिनांक १९ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता करण्यात आले असुन या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि हे राहणार. त्यांच्या हस्ते श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन करण्यात येणार असुन माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. तसेच दुपारी ४.०० वाजता शिवजयंतीनिमित्त भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले असून विद्यापीठातील विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी असे आवाहन विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम यांनी केले आहे.
जनसंपर्क अधिकारी, विस्तार शिक्षण संचालनालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी
Public Relations Officer, Directorate of Extension Education, Vasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeeth, Parbhani - 431 402 (M.S.) (Maharashtra) INDIA
Monday, February 16, 2026
Sunday, February 15, 2026
वनामकृविच्या सेंद्रिय व नैसर्गिक शेती संशोधन केंद्रास मान्यवरांची भेट; मृदा आरोग्य व पोषणमूल्य अभ्यासावर भर
वसंतराव
नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी
येथील सेंद्रिय व नैसर्गिक शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्रास दिनांक १५ फेब्रुवारी २०२६ रोजी मान्यवरांनी भेट दिली. या भेटीत
विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि, नवी दिल्ली येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषद अंतर्गत राष्ट्रीय वनस्पती
जैवतंत्रज्ञान संशोधन केंद्राचे जैवतंत्रज्ञान विषयातील सेवानिवृत्त ख्यातनाम
राष्ट्रीय प्राध्यापक प्रा. (डॉ.) नागेंद्र कुमार सिंह, सहयोगी संचालक (बियाणे) तथा वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. हिराकांत काळपांडे, करडई पैदासकार तथा प्रभारी अधिकारी डॉ. राजेश धूतमल,
शास्त्रज्ञ डॉ. संतोष शिंदे यांचा समावेश होता.
मान्यवरांनी
केंद्रातील सेंद्रिय व नैसर्गिक शेतीवरील विविध संशोधन प्रयोगांची पाहणी केली.
यामध्ये भाजीपाला,
तृणधान्य, कडधान्य व तेलबिया पिकांवरील संशोधन,
हरभरा+करडई व हरभरा+जवस आंतरपीक पद्धती, रबी
ज्वारी आदी पिकांवरील प्रयोगांचा समावेश होता. तसेच भारतीय कृषि अनुसंधान परिषद (आयसीएआर) प्रायोजित नैसर्गिक
शेती मॉडेल फार्मलाही त्यांनी भेट दिली.
या प्रसंगी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी नैसर्गिक व
सेंद्रिय शेतीमुळे मातीतील सेंद्रिय कर्ब (Soil Organic Carbon) मध्ये
होणारे हळूहळू सकारात्मक बदल तसेच शेतमालाच्या पोषणमूल्यातील सुधारणा यांचा
शास्त्रीय अभ्यास करण्यावर भर दिला. पारंपरिक शिफारस केलेल्या ‘पॅकेज ऑफ
प्रॅक्टिसेस’ची तुलना नैसर्गिक शेतीतील नवीन इनपुट्ससोबत करून उत्पादनासह इतर
लाभांचे सखोल मूल्यांकन करावे, असेही त्यांनी नमूद केले.
राष्ट्रीय
प्राध्यापक प्रा. (डॉ.) नागेंद्र कुमार सिंह यांनी
शेतकरी वापरत असलेल्या विविध शेती पद्धतींचे स्पष्ट परिभाषण व दस्तऐवजीकरण
करण्याची गरज अधोरेखित केली. तसेच नवीन शिफारस केलेल्या उपाययोजनांशी तुलना करून
अतिरिक्त लाभांचा अभ्यास करावा आणि नैसर्गिक शेतीखाली विविध वाणांचे परीक्षण व
मूल्यांकन करावे,
अशी सूचना त्यांनी केली.
यावेळी सेंद्रिय संशोधन प्रकल्पाचे प्रभारी अधिकारी डॉ. आनंद गोरे यांनी केंद्रातील संशोधन व प्रशिक्षण उपक्रमांची माहिती दिली, तर डॉ पपीता गौरखेडे, यांनी नैसर्गिक शेती मॉडेल फार्मवरील उपक्रमांचे सादरीकरण केले. या भेटीप्रसंगी डॉ. विवेक घुगे, डॉ. तेजस्विनी कच्छवे यांच्यासह संशोधक, शास्त्रज्ञ व कर्मचारी उपस्थित होते. मान्यवरांच्या मार्गदर्शनामुळे नैसर्गिक व सेंद्रिय शेतीतील संशोधनाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
ज्वारी संशोधन अधिक बळकट करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान व आंतरविभागीय सहकार्य आवश्यक – माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि
वसंतराव नाईक
मराठवाडा कृषि विद्यापीठ अंतर्गत कार्यरत
ज्वारी संशोधन केंद्रास विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा.
(डॉ.) इन्द्र मणि
यांच्या नेतृत्वाखाली दिनांक १५ फेब्रुवारी २०२६
रोजी
शास्त्रीय पाहणी भेट देण्यात आली. या वेळी नवी
दिल्ली येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषद अंतर्गत राष्ट्रीय वनस्पती जैवतंत्रज्ञान
संशोधन केंद्राचे जैवतंत्रज्ञान विषयातील सेवानिवृत्त ख्यातनाम राष्ट्रीय
प्राध्यापक प्रा. (डॉ.) नागेंद्र कुमार सिंह, उद्यानविद्या महाविद्यालयाचे
सहयोगी अधिष्ठाता डॉ. विश्वनाथ खंदारे तसेच सहयोगी संचालक (बियाणे)डॉ. हिराकांत काळपांडे
उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शनात
माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी
ज्वारीतील पोषणमूल्याशी संबंधित गुणधर्मांचे अचूक विश्लेषण करण्यासाठी प्रयोगशाळा
पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यावर भर दिला. बदलत्या हवामान परिस्थितीला तोंड
देणाऱ्या व उद्योगांच्या गरजांनुसार उपयुक्त ठरणाऱ्या वाणांच्या विकासावर संशोधन
केंद्राने लक्ष केंद्रित करावे, जेणेकरून ज्वारीस बाजारपेठेत मागणी वाढून
शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळेल, असे त्यांनी सांगितले. तसेच
अन्नतंत्रज्ञान व कृषि अभियांत्रिकी
विभागांशी समन्वय साधून विकसित होणारी तंत्रज्ञाने व्यवहार्य, वापरास सुलभ आणि शेतकरी-केंद्रित असावीत, अशा सूचना
माननीय कुलगुरूंनी दिल्या.
या पाहणीदरम्यान
ज्वारी पिकावरील सुरू असलेल्या संशोधन कार्याचा आढावा घेण्यात आला. मार्गदर्शन
करताना प्रा. (डॉ.) नागेंद्र कुमार सिंह यांनी
विद्यमान ज्वारी जनुकसंपदेतील (germplasm) विशिष्ट व उच्च मूल्याच्या
गुणवैशिष्ट्यांचे संवर्धन, मूल्यमापन आणि शोध घेण्याची
नितांत गरज अधोरेखित केली. प्रजनन प्रक्रिया वेगवान करण्यासाठी प्रगत फिनोटायपिंग
व जीनोटायपिंग तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करावा, तसेच
सध्याच्या ज्वारी उत्पादनातील अडथळे दूर करण्यासाठी जैवतंत्रज्ञान तज्ज्ञांशी
सहकार्य वाढवावे, अशी ठाम शिफारस त्यांनी केली.
या भेटीमुळे ज्वारी संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञ व कर्मचाऱ्यांना पुढील स्तरावर संशोधन कार्य नेण्यासाठी महत्त्वपूर्ण दिशा व प्रेरणा मिळाल्याचे चित्र दिसून आले.
वनामकृविच्या बायोमिक्स संशोधनामुळे शाश्वत शेतीला नवी दिशा – माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि
परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ अंतर्गत कार्यरत
बायोमिक्स संशोधन केंद्रास दिनांक १५ फेब्रुवारी २०२६ रोजी विद्यापीठाचे माननीय
कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि तसेच नवी दिल्ली येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषद
अंतर्गत राष्ट्रीय वनस्पती जैवतंत्रज्ञान संशोधन केंद्र येथील जैवतंत्रज्ञान
विषयातील सेवानिवृत्त ख्यातनाम राष्ट्रीय प्राध्यापक प्रा. (डॉ.) नागेंद्र कुमार
सिंह यांनी भेट दिली.
या प्रसंगी विद्यापीठाचे संचालक शिक्षण डॉ. भगवान आसेवार, सहयोगी अधिष्ठाता डॉ.
विश्वनाथ खंदारे, संचालक बियाणे संशोधन डॉ. हिराकांत काळपांडे उपस्थित होते.
मार्गदर्शन करताना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी सांगितले
की, बायोमिक्सच्या वापरामुळे हळद, अद्रक, फळपिके व भाजीपाला या पिकांमध्ये विक्रमी उत्पादन साध्य झाले असून हे
शाश्वत व पर्यावरणपूरक शेतीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. जमिनीतील मित्र बुरशी व
मित्र जिवाणूंची संख्या वाढून वनस्पतींची पोषणक्षमता, रोगप्रतिकारशक्ती
व उत्पादनक्षमता सुधारत असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे बायोमिक्सचे उत्पादन
व प्रसार अधिक व्यापक स्तरावर वाढविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
प्रा. (डॉ.) नागेंद्र कुमार सिंह यांनी जैवतंत्रज्ञानाधारित इनपुट्समुळे खर्चात
बचत, जमिनीची सुपीकता टिकवणे आणि दीर्घकालीन उत्पादनवाढ साध्य होते, असे प्रतिपादन केले. संशोधन–विस्तार–शेतकरी या त्रिसूत्रीचा प्रभावी
समन्वय साधल्यास मराठवाड्यातील शेती अधिक सक्षम होईल, असेही
त्यांनी नमूद केले.
सध्या बायोमिक्सची ख्याती शेतकऱ्यांमध्ये झपाट्याने वाढत असून, वापराकडे मोठ्या
प्रमाणावर कल वाढलेला आहे. भविष्यात शेतकरी प्रशिक्षण, प्रात्यक्षिके
व क्षेत्रीय चाचण्या वाढवून तंत्रज्ञानाचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत
पोहोचविण्याचा मानस यावेळी व्यक्त करण्यात आला.
या भेटीदरम्यान बायोमिक्स संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. चंद्रशेखर
अंबाडकर यांनी केंद्रातील संशोधन कार्य, तंत्रज्ञान हस्तांतरण व
शेतकऱ्यांच्या शेतात बायोमिक्सच्या वापरामुळे झालेल्या उत्पादनवाढीबाबत सविस्तर
माहिती दिली. या वेळी बायोमिक्स विभागातील श्री कपिल निर्वंळ, श्री राम रनेर तसेच इतर कर्मचारी उपस्थित होते.
वनामकृविच्या करडई संशोधन केंद्रास मान्यवरांची भेट; आधुनिक जैवतंत्रज्ञानावर भर
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत कार्यरत असलेल्या
करडईवरील अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प (AICRP on Safflower) केंद्रास दिनांक १५ फेब्रुवारी २०२६ रोजी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा.
(डॉ.) इन्द्र मणि तसेच नवी दिल्ली येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषद अंतर्गत
राष्ट्रीय वनस्पती जैवतंत्रज्ञान संशोधन केंद्राचे जैवतंत्रज्ञान विषयातील
सेवानिवृत्त ख्यातनाम राष्ट्रीय प्राध्यापक प्रा. (डॉ.) नागेंद्र कुमार सिंह यांनी
भेट दिली.
या भेटीदरम्यान मान्यवरांनी केंद्रावर सुरू असलेल्या करडई पिकाच्या संशोधन
उपक्रमांचा सविस्तर आढावा घेतला. सध्या केंद्रावर पैदास (Breeding) २१,
अग्रोनॉमी ६, रोगशास्त्र ८ अशा चाचण्या सुरू
असून ८०० हून अधिक जर्मप्लाझम संग्रह उपलब्ध आहे. सुमारे ४ हेक्टर क्षेत्रावर प्रात्यक्षिक
व चाचणी प्रयोग राबविले जात आहेत.
करडई पिकातील सुधारित वाणनिर्मिती, रोग-किड व्यवस्थापन, उत्पादनवाढीचे तंत्रज्ञान, तेलगुणवत्ता सुधारणा तसेच
हवामान बदलास अनुरूप संशोधन या बाबींवर मान्यवरांनी समाधान व्यक्त केले.
शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी जैवतांत्रिक हस्तक्षेप, बियाणे
शुद्धता राखणे आणि संशोधनातून विकसित तंत्रज्ञानाचे प्रभावी हस्तांतरण यावर अधिक
भर देण्याचे मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी मार्गदर्शनात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी मराठवाडा
विभागातील कोरडवाहू शेतीसाठी करडई पिकाचे महत्त्व अधोरेखित करून संशोधन निष्कर्ष
थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचे निर्देश दिले. तर प्रा. (डॉ.) नागेंद्र कुमार
सिंह यांनी आधुनिक जैवतंत्रज्ञानाच्या सहाय्याने उत्पादनक्षमता वाढविणे व
ताणतणाव-सहनशील वाण विकसित करण्यासाठी संशोधन अधिक बळकट करण्याचा सल्ला दिला.
यावेळी संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, सहयोगी संचालक (बियाणे) तथा वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. हिराकांत काळपांडे, करडई पैदासकार तथा प्रभारी अधिकारी डॉ. राजेश धूतमल, शास्त्रज्ञ डॉ. संतोष शिंदे आदी उपस्थित होते. केंद्राच्या भविष्यातील संशोधन दिशा, आंतरसंस्थात्मक सहकार्य आणि शेतकरीहिताच्या विविध उपक्रमांबाबत सकारात्मक चर्चा यावेळी झाली.
तुळजाभवानी मातेसमोर शेतकरी कल्याणासाठी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांची भावपूर्ण पूजाअर्चा
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.)
इन्द्र मणि यांनी दिनांक १४ फेब्रुवारी २०२६ रोजी तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी
मंदिरात विद्यापीठ तसेच राज्यातील शेतकरी बांधवांच्या शांती, समृद्धी व संपन्नतेसाठी भावपूर्ण पूजाअर्चा केली.
या प्रसंगी माननीय कुलगुरू यांच्यासमवेत नवी दिल्ली येथील भारतीय कृषि
अनुसंधान परिषद अंतर्गत राष्ट्रीय वनस्पती जैवतंत्रज्ञान संशोधन केंद्राचे
जैवतंत्रज्ञान विषयातील सेवानिवृत्त ख्यातनाम राष्ट्रीय प्राध्यापक प्रा. (डॉ.) नागेंद्र
कुमार सिंह हे उपस्थित होते. या पूजनप्रसंगी तुळजाभवानी मंदिर ट्रस्टच्या वतीने
माननीय कुलगुरू यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
देवीचे दर्शन घेताना माननीय कुलगुरूंनी “शेतकरी देवो भवः” या भावनेचा
उच्चार करत, कृषि विद्यापीठाच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याच्या सर्वांगीण
विकासासाठी सातत्याने व समर्पित भावनेने कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला.
त्यांनी तुळजाभवानी मातेकडे विद्यापीठ, संशोधक, विद्यार्थी तसेच सर्व शेतकरी बांधवांच्या आरोग्य, प्रगती
व कल्याणासाठी विशेष प्रार्थना केली.
या पूजाअर्चेच्या माध्यमातून शेतकरी सक्षमीकरण, आधुनिक तंत्रज्ञानाचा
प्रभावी प्रसार तसेच नव्या कल्पनांच्या आधारे ग्रामीण भारताच्या सर्वांगीण
विकासाचा संदेश देण्यात आला.
यावेळी विद्यापीठातील सहयोगी अधिष्ठाता डॉ. अच्युत भरोसे, सहाय्यक प्राध्यापक
डॉ. किरण थोरात, डॉ. भगवान अरबाड यांच्यासह अन्य मान्यवर
उपस्थित होते.
कृषि विकासासाठी जैवतंत्रज्ञानाधारित प्रगत संशोधन संसाधने व तंत्रज्ञानाचा वापर ही काळाची गरज – माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि
वनामकृविच्या लातूर येथील विलासराव देशमुख कृषि जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात “कृषि विकासासाठी अत्याधुनिक जैवतंत्रज्ञान संसाधने व तंत्रज्ञान” विषयावरील विचारमंथन कार्यशाळा संपन्न
शाश्वत व पर्यावरणपूरक कृषि विकासासाठी जनुकीय पातळीवरील
अचूक संशोधन आवश्यक – प्रा. (डॉ.) नागेंद्र कुमार सिंह
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत कार्यरत विलासराव देशमुख कृषि जैवतंत्रज्ञान महाविद्यालय,
लातूर येथे जैवतंत्रज्ञान विभाग, नवी दिल्ली
यांच्या पुरस्कृत “कृषि विकासासाठी अत्याधुनिक जैवतंत्रज्ञान संसाधने व तंत्रज्ञान”
या विषयावर दिनांक १४ फेब्रुवारी २०२६ रोजी एक दिवसीय विचारमंथन कार्यशाळेचे आयोजन
करण्यात आले.
अध्यक्षस्थानी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून नवी दिल्ली येथील भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली अंतर्गत राष्ट्रीय वनस्पती जैवतंत्रज्ञान संशोधन केंद्राचे जैवतंत्रज्ञान विषयाचे सेवानिवृत्त ख्यातनाम राष्ट्रीय प्राध्यापक प्रा. (डॉ.) नागेंद्र कुमार सिंह उपस्थित होते. यावेळी संचालक शिक्षण डॉ. भगवान आसेवार, संचालक संशोधन डॉ. खिजर बेग, अधिष्ठाता डॉ. बाबासाहेब ठोंबरे, अधिष्ठाता डॉ. अच्युत भरोसे, डॉ. संतोष कांबळे, वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. हिराकांत काळपांडे, गळीत धान्ये विशेषज्ञ डॉ. मोहन धुप्पे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
विचारमंथन कार्यशाळेत विद्यापीठातील पीक पैदास, वनस्पतीशास्त्र, वनस्पती विकृतीशास्त्र व कीटकशास्त्र
विभागातील प्राध्यापक, संशोधक तसेच पदव्युत्तर विद्यार्थी
असे एकूण ४१ संशोधक सहभागी झाले होते.
अध्यक्षीय भाषणात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि
यांनी वाढती लोकसंख्या, हवामान बदल आणि मर्यादित
नैसर्गिक संसाधने यांचा विचार करता कृषि विकासासाठी जैवतंत्रज्ञान, जीनोम व जनुक बदल तसेच प्रगत संशोधन साधनांचा प्रभावी वापर ही काळाची गरज
असल्याचे प्रतिपादन केले. या तंत्रज्ञानामुळे पीक उत्पादनात वाढ, कीड व रोग प्रतिकारशक्ती विकसित करणे तसेच पौष्टिक अन्नसुरक्षा सुनिश्चित
करणे शक्य झाले असून हे शाश्वत शेतीसाठी अनिवार्य असल्याचे त्यांनी नमूद केले.
भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली अंतर्गत राष्ट्रीय वनस्पती जैवतंत्रज्ञान संशोधन केंद्राचे
राष्ट्रीय प्राध्यापक प्रा. (डॉ.) नागेंद्र कुमार सिंह यांनी सहभागी संशोधकांना
मार्गदर्शन केले. जैवतंत्रज्ञानाच्या माध्यमातून डीएनए पातळीवर आधारित जनुकीय
विकसित पिके, आण्विक जैवतंत्रज्ञानाधारित पीक प्रजनन प्रणाली,
कमी कालावधीत अपेक्षित सुधारणा साध्य करण्यासाठी डीएनए मार्करचा
वापर, प्रयोगशाळेत डीएनए पातळीवर वाणांची अचूक तपासणी,
जैवतंत्रज्ञानाधारित रोग निदान प्रणाली तसेच हवामान-स्मार्ट
पिकांच्या जाती विकसित करण्यासाठी जीनोम एडिटिंगसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर
शाश्वत व पर्यावरणपूरक कृषि विकासासाठी अत्यावश्यक असल्याचे त्यांनी आपल्या
सादरीकरणातून स्पष्ट केले.
संचालक संशोधन डॉ. खिजर बेग यांनी मराठवाड्यातील विविध
पिकांमधील समस्या व त्यावर जैवतंत्रज्ञानाधारित संशोधनाची आवश्यकता याबाबत सविस्तर
सादरीकरण केले. तसेच सर्व संशोधकांनी जनुकीय पातळीवरील संशोधनासाठी आधुनिक
तंत्रज्ञान आत्मसात करून विविध पिकांमध्ये अपेक्षित सुधारणा कशा साधता येतील, यावर सखोल चर्चा करण्यात आली.
शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी महाविद्यालयातील
विविध संशोधन प्रकल्पांचे सादरीकरण करून विद्यार्थ्यांनी जनुकीय पातळीवर पिकांतील
विविध गुणधर्म ओळखून त्यांचे प्रचलित वाणांमध्ये रूपांतर करून नवीन वाणांची
निर्मिती करण्याबाबत मार्गदर्शन केले.
याप्रसंगी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि जिनोमिक्स फाउंडेशन, नवी दिल्ली यांच्यात
जैवतंत्रज्ञान विषयक अत्याधुनिक संशोधनासाठी सामंजस्य करार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.
अच्युत भरोसे यांनी केले. सूत्रसंचालन कु. श्रावणी नवले व विवेक वाघमारे यांनी
केले तर आभार प्रदर्शन डॉ. योगेश भगत यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. सारिका भालेराव, डॉ. राहुल चव्हाण, डॉ. रमेश ढवळे, डॉ. विद्या हिंगे, डॉ. दिप्ती वानखडे, सुरेखा आंबटवाड, सुरेश बिरादार, वीरभद्र दुरुगकर, अश्विनी गरड, अभिजित देशमुख, प्रतीक्षा जाधव, किशोर घोळवे, अंकिता इंगवले, प्रथमेश
पवार, विनोद कदम यांनी विशेष परिश्रम घेतले.
.jpeg)





.jpeg)







.jpeg)

.jpeg)
.jpeg)
