Sunday, August 16, 2026

माननीय कृषिमंत्री ना. श्री. दत्तात्रय भरणे यांची वनामकृविच्या बायोमिक्स संशोधन केंद्रास भेट


महाराष्ट्र राज्याचे माननीय कृषि मंत्री तथा वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे प्रतिकुलपती मा. ना. श्री. दत्तात्रय भरणे यांनी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत कार्यरत बायोमिक्स संशोधन केंद्रास १५ ऑगस्ट रोजी भेट देऊन केंद्रातील संशोधन व विविध उपक्रमांची माहिती जाणून घेतली.

यावेळी माननीय कृषिमंत्री ना. श्री. दत्तात्रय भरणे यांनी केंद्रातील संशोधन कार्याची पाहणी करून शेतकऱ्यांच्या उत्पादनवाढीसाठी आणि शाश्वत शेतीच्या विकासासाठी संशोधन व तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे प्रसार करण्याच्या महत्त्वावर भर दिला.

यावेळी विधानसभा सदस्य मा. आ. डॉ. राहुल पाटील, मा. आ. श्री. रत्नाकर गुट्टे, मा. आ. श्री. बालाजी कल्याणकर, मा. आ. श्री. राजेश विटेकर, विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि, संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे, कुलसचिव श्री. पुरभा काळे, विद्यापीठ अभियंता श्री. दीपक कशाळकर, अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य, विभाग प्रमुख डॉ. राजेश कदम व डॉ. हरिहर कौसडीकर तसेच बायोमिक्स संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. चंद्रशेखर अंबाडकर यांची उपस्थिती होती.

भेटीदरम्यान माननीय कृषिमंत्री ना. श्री. दत्तात्रय भरणे यांना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी सांगितले की, बायोमिक्सच्या वापरामुळे हळद, अद्रक, फळपिके व भाजीपाला पिकांमध्ये विक्रमी उत्पादन मिळाले असून, शाश्वत व पर्यावरणपूरक शेतीच्या दृष्टीने हे तंत्रज्ञान अत्यंत महत्त्वाचे ठरत आहे. बायोमिक्सच्या वापरामुळे जमिनीतील उपयुक्त बुरशी व जिवाणूंची संख्या वाढून वनस्पतींची पोषणक्षमता, रोगप्रतिकारशक्ती आणि उत्पादनक्षमता सुधारत असल्याचे विविध प्रयोगांतून निष्पन्न झाले आहे. सध्या मराठवाड्यासह महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये बायोमिक्सची लोकप्रियता झपाट्याने वाढत असून, त्याच्या वापराकडे शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर कल वाढला आहे. या तंत्रज्ञानाला आंतरराष्ट्रीय स्तरावरही पसंती व मान्यता मिळत असून, हैदराबाद येथील आंतरराष्ट्रीय अर्ध-शुष्क उष्णकटिबंधीय पीक संशोधन संस्था (ICRISAT – International Crops Research Institute for the Semi-Arid Tropics) यांनी बायोमिक्सच्या ४ टन पुरवठ्याची मागणी केली होती. त्यानुसार नुकताच ४ टन बायोमिक्सचा पुरवठा करण्यात आला आहे. भविष्यात शेतकरी प्रशिक्षण, प्रात्यक्षिके आणि क्षेत्रीय चाचण्यांची व्याप्ती वाढवून या तंत्रज्ञानाचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचा मानस यावेळी माननीय कुलगुरूंनी व्यक्त केला.

बायोमिक्स संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. चंद्रशेखर अंबाडकर यांनी केंद्रामध्ये सुरू असलेले विविध संशोधन कार्य, विकसित तंत्रज्ञानाचे हस्तांतरण तसेच शेतकऱ्यांच्या शेतावर बायोमिक्सच्या वापरामुळे झालेली उत्पादनवाढ याबाबत मान्यवरांना सविस्तर माहिती दिली. या भेटीप्रसंगी बायोमिक्स विभागातील सर्व शास्त्रज्ञ, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.



 

वनामकृविद्वारा आयोजित ‘देशी गोवंश, नैसर्गिक शेती व मसाला पिके’ विषयावरील परिसंवादास शेतकरी व महिला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

शेतीचा विकास हा उत्पादनवाढीसोबतच शेतकऱ्यांचे उत्पन्न, जमिनीचे आरोग्य आणि सुरक्षित अन्ननिर्मिती यांचा समतोल साधणारा असावा - माननीय कृषि मंत्री तथा विद्यापीठाचे माननीय प्रतिकुलपती ना. श्री. दत्तात्रय भरणे

प्रगत व फायदेशीर शेतीसाठी ‘सिल्क अँड मिल्क’सह कृषि प्रक्रिया उद्योगांना चालना – माननीय राज्यमंत्री तथा पालकमंत्री ना. श्रीमती मेघना साकोरे-बोर्डीकर

शेतकरी, विद्यार्थी आणि संशोधनाच्या विकासासाठी विद्यापीठाचा सातत्यपूर्ण पुढाकार - माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि





भारत सरकारची राष्ट्रीय कृषि विकास योजना, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागाच्या संयुक्त विद्यमानेदेशी गोवंश, नैसर्गिक शेती व मसाला पिके’ या विषयावरील परिसंवादाचे आयोजन दिनांक १५ ऑगस्ट २०२६ रोजी करण्यात आले. या परिसंवादाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे माननीय कृषि मंत्री तथा विद्यापीठाचे प्रतिकुलपती मा. ना. श्री. दत्तात्रय भरणे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमास सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) माननीय राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मा. ना. श्रीमती मेघना साकोरे-बोर्डीकर, परभणी महानगरपालिकेचे महापौर मा. श्री. सय्यद इकबाल सय्यद खाजा तसेच परभणी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष श्री. श्रीकांत विटेकर यांची विशेष उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि होते. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून विधानसभा सदस्य मा. आ. श्री. रत्नाकर गुट्टे, मा. आ. श्री. बालाजी कल्याणकर, मा. आ. श्री. राजेश विटेकर तसेच सेलू नगरपरिषदेचे अध्यक्ष श्री. मिलिंद सावंत उपस्थित होते.

यावेळी माननीय जिल्हाधिकारी श्री. संजयसिंह चव्हाण (भाप्रसे), माननीय पोलीस अधीक्षक श्री. पंकज कुमावत (भापोसे), जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नतिशा माथुर (भाप्रसे) यांच्यासह संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे, कुलसचिव श्री. पुरभा काळे, विद्यापीठ अभियंता श्री. दीपक कशाळकर, लातूर विभागाचे विभागीय कृषि सहसंचालक श्री. महेशकुमार तीर्थकर, परभणी आत्माचे संचालक श्री. दौलत चव्हाण, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी श्री. भास्कर कोळेकर (परभणी), श्री. प्रदीप कच्छवे (हिंगोली) यांच्यासह विद्यापीठातील अधिकारी, शास्त्रज्ञ, कर्मचारी, विद्यार्थी, शेतकरी व महिला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करताना राज्याचे कृषि मंत्री मा. ना. श्री. दत्तात्रय भरणे म्हणाले की, पर्जन्यमानातील अनिश्चितता आणि बदलत्या हवामान परिस्थितीमुळे शेतकऱ्यांसमोर अनेक आव्हाने निर्माण झाली असून, त्याचा शेती उत्पादनावर प्रतिकूल परिणाम होत आहे. यामुळे शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे इतकेच नव्हे तर मदत प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचली पाहिजे, यावर त्यांनी भर दिला.

यावेळी त्यांनी महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या स्मृतींना उजाळा देत, शेतकरी म्हणून त्यांनी केलेल्या निष्ठापूर्ण कार्याचे स्मरण करून त्यांना अभिवादन केले. आपण स्वतः शेतकरी कुटुंबातून आलो असल्याने शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी अधिक प्रभावीपणे कार्य करण्याची आपली बांधिलकी असल्याचे त्यांनी नमूद केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने विकसित केलेले विविध कृषि तंत्रज्ञान, आधुनिक कृषि अवजारे व यंत्रसामग्री शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहेत. या तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे अवलंब करून उत्पादनक्षमता तसेच शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.

माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली वर्ष २०२६ हे आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून साजरे केले जात असताना, महाराष्ट्र शासनाने महिला शेतकऱ्यांच्या योगदानाला योग्य मान्यता देण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. महिला शेतकऱ्यांना तंत्रज्ञान, बाजारपेठ, वित्तपुरवठा आणि निर्णयप्रक्रियेत समान संधी मिळणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.

महिला शेतकरी पहाटेपासून शेतात कष्ट करण्यासोबतच कुटुंबातील जबाबदाऱ्याही समर्थपणे पार पाडतात. त्यांच्या या योगदानाचा सन्मान होणे आवश्यक आहे. महिला सक्षम झाल्यास कुटुंबाबरोबरच समाजाची प्रगतीही अधिक वेगाने होते, असेही माननीय कृषि मंत्री श्री. भरणे यांनी नमूद केले.

शेतकऱ्यांच्या हितासाठी शासनाने कर्जमाफीसह विविध महत्त्वपूर्ण निर्णय घेतले असून, शेतीचे आरोग्य सुधारण्यासाठी रासायनिक निविष्ठांचा अनावश्यक वापर कमी करून सेंद्रिय निविष्ठांचा वापर वाढविणे गरजेचे आहे. नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देत शाश्वत शेतीच्या दिशेने वाटचाल करणे ही काळाची गरज आहे. शेतीचा विकास हा केवळ उत्पादनवाढीपुरता मर्यादित न राहता शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे, जमिनीचे आरोग्य जपणे आणि सुरक्षित अन्ननिर्मिती यांचा समतोल विचार करणारा असला पाहिजे, असे त्यांनी प्रतिपादन केले. तसेच, शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या मोफत वीज योजनेची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात स्थापन करण्यात आलेल्या प्रगत कीटकनाशक तपासणी व अवशेष विश्लेषण प्रयोगशाळेच्या माध्यमातून शेतमालातील कीटकनाशक अवशेषांची तपासणी करणे, सुरक्षित अन्न उत्पादनाला चालना देणे तसेच नैसर्गिक व सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देणे शक्य होणार आहे. ही प्रयोगशाळा शेतकरी, ग्राहक आणि संपूर्ण कृषि क्षेत्राच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

शेतकऱ्यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आनंदी व प्रसन्न जीवन जगावे. सर्वासोबत आपुलकीचे संबंध जपावेत, असे आवाहन करताना त्यांनी उपस्थितांना आनंद द्यावा आणि आनंद घ्यावा असा संदेश दिला. कृषि शिक्षण घेणारे विद्यार्थी, शेतकरी आणि संपूर्ण कृषि क्षेत्राच्या कल्याणासाठी शासनाच्या माध्यमातून सातत्याने कार्य करण्याची ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.

माननीय पालकमंत्री ना. श्रीमती मेघना साकोरे- बोर्डीकर म्हणाल्या की, भारताचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी जी यांच्या आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेतून केंद्र शासनाने शेतकरी कल्याणासाठी विविध योजना राबविल्या जात असून, त्यातून शेतकऱ्यांचा आत्मसन्मान वाढण्यास मदत झाली आहे. महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस जी, यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्ज मुक्त योजना आणली असून, शेतकऱ्यांना पुन्हा कर्ज घेण्याची गरज पडू नये, या उद्देशाने शासन कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांच्या वीज थकबाकीबाबत शासनाने घेतलेल्या निर्णयांचाही त्यांनी उल्लेख केला. जागतिक महिला वर्षाच्या निमित्ताने महिला शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविण्यात येत असून, त्यांना समाजात योग्य ओळख आणि सन्मान मिळावा यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.

आपण स्वतः सेंद्रिय शेती पद्धतीचा अवलंब करत असल्याचे सांगत सेंद्रिय व नैसर्गिक शेती ही काळाची गरज झाली आहे, त्यामुळे विद्यापीठाने आयोजित केलेला हा परिसंवाद अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी नमूद केले. परिसंवादातून मिळणारे ज्ञान शेतकऱ्यांनी आत्मसात करून प्रत्यक्ष शेतीमध्ये त्याचा उपयोग करावा, असे आवाहन त्यांनी केले.

शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी प्रत्येकी पाच शेतकरी दत्तक घेऊन त्यांना मार्गदर्शन करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार शास्त्रज्ञांनी कार्य पूर्ण करून शाश्वत शेतीला चालना दिल्याचे त्यांनी सांगितले.

पश्चिम महाराष्ट्रातील प्रगत शेतीचे उदाहरण दिले जाते; त्याच धर्तीवर परभणी आणि मराठवाड्यातही प्रगत व फायदेशीर शेती विकसित व्हावी यासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत.सिल्क अँड मिल्क’ तसेच कृषि प्रक्रिया उद्योगांना चालना देण्यासाठी पुढाकार घेतला जात असून, या योजना मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कृषि प्रक्रिया उद्योगांना चालना देणे ही आपली जबाबदारी समजून आपण सातत्याने प्रयत्न करणार असून, माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी जी यांच्या आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेला बळ देण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे कार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी त्यांनी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या नेतृत्वाखाली मराठवाड्यातील शेतीच्या विकासासाठी विद्यापीठाकडून प्रामाणिकपणे प्रयत्न सुरू असल्याचे नमूद केले. विद्यापीठातील संशोधन, तंत्रज्ञान आणि ज्ञानाचा प्रत्यक्ष लाभ मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आजच्या कार्यक्रमात महिला शेतकरी आणि महिलांचा उत्स्फूर्त सहभाग उल्लेखनीय असल्याचे नमूद करून, विद्यापीठाच्या प्रशिक्षण व विस्तार उपक्रमांमुळे महिला शेतकरी आणि विद्यापीठ यांच्यातील संपर्क अधिक दृढ होत असल्याचे त्यांनी कौतुकाने सांगितले.

स्वागतपर भाषणात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी माननीय कृषि मंत्री ना. श्री. दत्तात्रय भरणे यांनी शेतकरी, विद्यार्थी आणि विद्यापीठाच्या कल्याणासाठी केलेल्या कार्याबद्दल तसेच विद्यापीठास आवर्जून भेट देऊन विविध उपक्रमांची पाहणी केल्याबद्दल त्यांचे आभार मानले. माननीय पालकमंत्री ना. श्रीमती मेघना साकोरे-बोर्डीकर तसेच उपस्थित सर्व मान्यवरांचेही त्यांनी स्वागत व आभार मानले. तसेच त्यांनी  विद्यापीठाच्या स्थापनेपासूनच्या वाटचालीचा आढावा घेत विद्यापीठाने शिक्षण, संशोधन आणि विस्तार शिक्षण क्षेत्रात मिळविलेल्या उल्लेखनीय यशाची माहिती दिली.

नवीन शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य विकास, उद्योजकता आणि नवोपक्रमाची क्षमता विकसित करण्यावर विद्यापीठाचा भर असल्याचे त्यांनी सांगितले. संशोधन क्षेत्रातही विद्यापीठाने उल्लेखनीय कामगिरी केली असून, विद्यापीठाच्या २५ अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्पांपैकी १० संशोधन केंद्रांनी देशपातळीवर अव्वल स्थान मिळविले असल्याचे त्यांनी नमूद केले.

शेतकरी देवो भव’ या भावनेतून विद्यापीठाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत.माझा एक दिवस माझ्या बळीराजासोबत’ या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यापीठातील शास्त्रज्ञ थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करीत आहेत. तसेच दर मंगळवार आणि शुक्रवार सायंकाळी ७ ते ९ या वेळेत ऑनलाइनशेतकरी-शास्त्रज्ञ संवाद’ आयोजित करण्यात येत असून, त्यातून शेतकरी-शेतकरी आणि शेतकरी-शास्त्रज्ञ यांच्यातील संवादाच्या माध्यमातून कृषि तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविले जात आहे.

माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस जी यांच्या निर्देशानुसार विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात ११ प्रगतिशील शेतकऱ्यांनाशेतकरी शास्त्रज्ञ’ म्हणून सन्मानित करण्यात आले असून, पद्मश्री माननीय श्री दादा लाड यांना डी.एस्सी. पदवी देऊन गौरविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांना विविध निविष्ठांचे वितरण

कार्यक्रमादरम्यान विद्यापीठाच्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना प्राथमिक स्वरूपात प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. तसेच MIDH योजनेअंतर्गत हळद उत्पादक शेतकऱ्यांना विद्यापीठाच्या बायोमिक्स उत्पादनाचे वितरण माननीय कृषि मंत्री ना. श्री. दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी पूर्णा व पालम तालुक्यांतून आलेल्या शेतकरी गटांनी माननीय कृषि मंत्री ना. श्री. दत्तात्रय भरणे यांचा विशेष सत्कार केला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. वीणा भालेराव आणि डॉ. रणजित चव्हाण यांनी केले, तर आभार डॉ. सुनीता पवार यांनी मानले. या कार्यक्रमास परभणी व हिंगोली जिल्ह्यांतील १२०० हून अधिक शेतकरी व महिला शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.









नैसर्गिक शेती व सेंद्रिय उत्पादनांना चालना देण्यासाठी वनामकृवित प्रगत कीटकनाशक तपासणी व अवशेष विश्लेषण प्रयोगशाळेचे उद्घाटन

माननीय कृषिमंत्री ना. श्री. दत्तात्रय भरणे यांच्या शुभहस्ते लोकार्पण; शेतमालातील कीटकनाशक अवशेष तपासणीसह सुरक्षित अन्न उत्पादनाला मिळणार चालना



भारत सरकारची राष्ट्रीय कृषि विकास योजना, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागाच्या संयुक्त विद्यमाने वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या कीटकशास्त्र विभागात नैसर्गिक शेती आणि सेंद्रिय उत्पादनास प्रोत्साहन देण्यासाठी प्रगत कीटकनाशक तपासणी व अवशेष विश्लेषण प्रयोगशाळे’चे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे माननीय कृषि मंत्री तथा विद्यापीठाचे प्रतिकुलपती मा. ना. श्री. दत्तात्रय भरणे यांच्या शुभहस्ते स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने दिनांक १५ ऑगस्ट २०२६ रोजी करण्यात आले.

यावेळी विधानसभा सदस्य मा. आ. श्री. रत्नाकर गुट्टे, मा. आ. श्री. बालाजी कल्याणकर, मा. आ. श्री. राजेश विटेकर, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि, संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे, कुलसचिव श्री. पुरभा काळे, विद्यापीठ अभियंता श्री. दीपक कशाळकर, अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य, कीटकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. पुरुषोत्तम नेहरकर, डॉ. राजेश कदम व डॉ. हरिहर कौसडीकर यांची उपस्थिती होती.

शेतमालातील कीटकनाशक अवशेषांची होणार तपासणी

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात स्थापन करण्यात आलेल्या या प्रगत प्रयोगशाळेच्या माध्यमातून शेतमालातील कीटकनाशक अवशेषांची तपासणी, सुरक्षित अन्न उत्पादनाला चालना तसेच नैसर्गिक व सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देणे शक्य होणार आहे. शेतमालामध्ये कीटकनाशकांचा शिफारशीनुसार वापर, योग्य मात्रा व योग्य वेळेचे पालन तसेच काढणीपूर्व कालावधीचे महत्त्व याबाबतही शेतकरी व संबंधित घटकांमध्ये जनजागृती करण्यास या प्रयोगशाळेची मदत होणार आहे.

प्रयोगशाळेत नमुना तयार करणे, अर्कनिर्मिती व शुद्धीकरणासाठी विविध आधुनिक उपकरणांची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. यामध्ये हाय-स्पीड होमोजेनायझर, मल्टी-ट्यूब व्हॉर्टेक्स मिक्सर, नायट्रोजन इव्हॅपोरेटर, रोटरी इव्हॅपोरेटर, सेंट्रीफ्यूज, मायक्रोपिपेट्स, अचूक वजनकाटे आदी उपकरणांचा समावेश आहे. कीटकनाशक अवशेषांच्या विश्लेषणासाठी LC-MS/MS आणि GC-MS/MS सारख्या अत्याधुनिक विश्लेषण प्रणालींचाही समावेश आहे. या उपकरणाचे प्रात्यक्षिक विभागातील शास्त्रज्ञांनी दिले.

सुरक्षित अन्न उत्पादनासाठी महत्त्वपूर्ण पाऊल

यावेळी मार्गदर्शन करताना मा. ना. श्री. दत्तात्रय भरणे यांनी सांगितले की, शेतमालातील कीटकनाशक अवशेषांची तपासणी, सुरक्षित अन्न उत्पादन आणि नैसर्गिक व सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने ही प्रयोगशाळा अत्यंत महत्त्वपूर्ण ठरेल. या प्रयोगशाळेच्या माध्यमातून शेतकरी, ग्राहक आणि संपूर्ण कृषि क्षेत्राला लाभ होणार असून, गुणवत्तापूर्ण व सुरक्षित शेतमाल उत्पादनाला चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कीटकनाशकांचा शिफारशीनुसार वापर करण्याचे आवाहन

कीटकनाशकांचा अतिरेकी अथवा चुकीचा वापर केल्यास शेतमालामध्ये अवशेष राहण्याची शक्यता असते. त्यामुळे कीटकनाशकांचा वापर करताना शिफारशीनुसार औषध, योग्य प्रमाण, योग्य वेळ आणि सुरक्षित पद्धतीचा अवलंब करणे आवश्यक आहे. फवारणी करताना मास्क, हातमोजे व संरक्षक कपड्यांचा वापर करणे, फवारणीच्या वेळी खाणे-पिणे टाळणे तसेच फवारणीनंतर हात व चेहरा स्वच्छ धुणे यासारख्या सुरक्षिततेच्या उपायांचे पालन करणे गरजेचे आहे.

कीटकनाशकांचा काळजीपूर्वक व शास्त्रीय पद्धतीने वापर केल्यास शेतकरी, ग्राहक आणि पर्यावरणाच्या सुरक्षिततेला हातभार लागेल. शिफारस केलेले औषध – योग्य प्रमाण – योग्य वेळ – सुरक्षित भविष्य’ या संदेशातून कीटकनाशकांच्या विवेकपूर्ण वापराबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यावेळी विभागातील सर्व शास्त्रज्ञ, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

सदरील प्रयोगशाळा उभारणीच्या प्रवासात विद्यमान संशोधन संचालक डॉ भगवान आसेवार, माजी संशोधन संचालक डॉ डी पी वासकर, डॉ खिजर बेग, विद्यमान अधिष्ठाता डॉ. प्रवीण वैद्य, माजी अधिष्ठाताडॉ. सय्यद इस्माईल  यांच्या मार्गदरशनाखाली डॉ पी एस नेहरकर, डॉ संजीव बंटेवाड, डॉ धीरज कदम डॉ पी आर झंवर डॉ मिलिंद सोनकांबळे डॉ अनंत लाड श्री अनुराग खंदारे, श्री बालाजी कोकणे व विभागातील कर्मचारी यांनी वेळोवेळी प्रत्येक टप्प्यावर योगदान दिले.







Saturday, August 15, 2026

वनामकृविच्या उत्तरा मुलींच्या वसतिगृहात अभ्यासिका कक्षाचे उद्घाटन

विद्यार्थिनींनी अभ्यासिका सुविधेचा जास्तीत जास्त उपयोग करून ज्ञान व कौशल्य वृद्धिंगत करावे – माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील कृषि महाविद्यालयाच्या उत्तरा मुलींच्या वसतिगृहातील अभ्यासिका कक्षाचे उद्घाटन स्वातंत्र्यदिनाच्या औचित्यावर शनिवार, दि. १५ ऑगस्ट २०२६ रोजी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

यावेळी मार्गदर्शन करताना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि म्हणाले की, विद्यार्थिनींच्या शैक्षणिक प्रगतीसाठी अभ्यासाचे पोषक वातावरण आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे ही विद्यापीठाची महत्त्वाची जबाबदारी आहे. या अभ्यासिका कक्षामुळे विद्यार्थिनींना शांत व सुविधायुक्त वातावरणात नियमित अभ्यास करता येईल. विशेषतः स्पर्धा परीक्षा, उच्च शिक्षण आणि विविध व्यावसायिक संधींसाठी विद्यार्थिनींनी या सुविधेचा जास्तीत जास्त उपयोग करून आपल्या ज्ञानात व कौशल्यात भर घालावी.

ते पुढे म्हणाले की, विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणासोबतच त्यांना आत्मविश्वास, नेतृत्वगुण आणि स्पर्धात्मक दृष्टिकोन विकसित करण्याच्या संधी मिळणे आवश्यक आहे. विद्यापीठातील विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी आवश्यक पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी विद्यापीठ प्रशासन सातत्याने प्रयत्नशील आहे.

यावेळी विद्यापीठाचे संचालक शिक्षण डॉ. बाबासाहेब ठोंबरे, संचालक संशोधन डॉ. भगवान आसेवार, संचालक विस्तार शिक्षण डॉ. राकेश अहिरे, कुलसचिव श्री. पुरभा काळे, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम यांच्यासह विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी व मान्यवर उपस्थित होते.

विद्यार्थिनींना शांत, सुसज्ज आणि अभ्यासपूरक वातावरण उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या अभ्यासिका कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. विशेषतः स्पर्धा परीक्षा तसेच शैक्षणिक अभ्यासासाठी हा कक्ष विद्यार्थिनींसाठी उपयुक्त ठरणार आहे. या सुविधेमुळे विद्यार्थिनींना नियमित अभ्यासासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध होऊन त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला चालना मिळणार आहे.

महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य, मुख्य वसतिगृह अधीक्षक डॉ. रावसाहेब भाग्यवंत आणि सहायक अधीक्षिका डॉ. मिनाक्षी पाटील यांच्या पुढाकारातून हा उपक्रम साकारण्यात आला. यावेळी वसतिगृहातील सर्व विद्यार्थीनी तसेच संबंधित अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विद्यार्थिनींच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन उपलब्ध करून देण्यात आलेल्या या सुविधेचे उपस्थितांनी स्वागत केले. अभ्यासिका कक्षामुळे विद्यार्थिनींना स्पर्धा परीक्षा, उच्च शिक्षण व विविध शैक्षणिक संधींसाठी अधिक प्रभावीपणे तयारी करता येणार असून, त्यांच्या सर्वांगीण विकासास निश्चितच हातभार लागणार आहे.






स्वातंत्र्यदिनाच्या ८०व्या वर्षानिमित्त विकसित, आत्मनिर्भर भारतासाठी एकजुटीने कार्य करण्याचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचे आवाहन

 वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात भारताचा ८०वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा



स्वातंत्र्यदिन हा प्रत्येक भारतीयासाठी गौरवाचा आणि भावनेचा दिवस असून, देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्याग, संघर्ष, साहस व बलिदान देणाऱ्या असंख्य ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण करण्याचा हा पवित्र दिवस आहे, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात भारताचा ८०वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यापीठाच्या मुख्य प्रांगणात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना ते बोलत होते.

माननीय कुलगुरूंनी राष्ट्रपिता महात्मा गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस, सरदार वल्लभभाई पटेल, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, लोकमान्य टिळक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह सर्व ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांना आदरांजली अर्पण केली.

पुढे बोलताना कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि म्हणाले की, भारत आज विज्ञान, तंत्रज्ञान, अंतराळ संशोधन, डिजिटल तंत्रज्ञान, स्टार्टअप, जैवतंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांसारख्या विविध क्षेत्रांत वेगाने प्रगती करीत आहे. आर्थिकदृष्ट्या समृद्ध भारताबरोबरच आत्मनिर्भर, समावेशक, पर्यावरणपूरक, तंत्रज्ञानसक्षम आणि सामाजिकदृष्ट्या न्याय्य भारत निर्माण करणे आवश्यक आहे. ‘विकसित भारत @2047’ हा संकल्प प्रत्येक नागरिकासाठी राष्ट्रीय मिशन असल्याचे त्यांनी सांगितले.

कृषि विद्यापीठ म्हणून शेतकरी आणि कृषी क्षेत्राप्रती विद्यापीठाची जबाबदारी अधिक मोठी आहे. भारताच्या प्रगतीचा मार्ग गाव आणि शेतातून जातो. शेतकरी हा केवळ अन्नदाता नसून देशाच्या अर्थव्यवस्थेचा आणि अन्नसुरक्षेचा महत्त्वपूर्ण आधारस्तंभ आहे, असे कुलगुरूंनी स्पष्ट केले.

हवामान बदल, अनियमित पाऊस, पाणीटंचाई, मृदा आरोग्याचा ऱ्हास, वाढता उत्पादन खर्च आणि बाजारातील अनिश्चितता ही कृषी क्षेत्रासमोरील प्रमुख आव्हाने आहेत. या आव्हानांवर विज्ञान, नवकल्पना आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उपाय शोधण्याची गरज आहे. कमी पाण्यात अधिक उत्पादन, कमी खर्चात अधिक उत्पन्न आणि हवामान बदलाचा सक्षमपणे सामना करणारी लवचिक व शाश्वत शेती विकसित करण्यावर भर देणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

विद्यापीठाच्या शैक्षणिक, संशोधन आणि विस्तार शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचा आढावा घेताना कुलगुरूंनी सांगितले की, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), ड्रोन तंत्रज्ञान, रोबोटिक्स, रिमोट सेन्सिंग, इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT) आणि डिजिटल कृषि यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे कृषी क्षेत्रात मोठ्या संधी निर्माण होत आहेत. विद्यापीठाच्या माध्यमातून ड्रोन तंत्रज्ञान, डिजिटल फार्मिंग, कृत्रिम बुद्धिमत्ता, माहिती-आधारित कृषि सल्ला आणि विविध नवकल्पनांना प्रोत्साहन दिले जात आहे.

विद्यार्थी आणि युवा शास्त्रज्ञांनी या तंत्रज्ञानाचा केवळ वापरकर्ता न राहता नवोन्मेषक व तंत्रज्ञाननिर्माता बनावे. विद्यापीठाच्या प्रयोगशाळांमध्ये विकसित होणारे तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचून त्याचा प्रत्यक्ष लाभ शेतकऱ्यांना मिळावा, हा विद्यापीठाचा प्रमुख प्रयत्न आहे. तसेच कृषि विद्यापीठ हे केवळ शिक्षण देणारी संस्था नसून ज्ञान, संशोधन, नवोन्मेष आणि शेतकरी सेवेचे केंद्र आहे. मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या स्थानिक गरजा व समस्यांचा अभ्यास करून त्यावर स्थानिक पातळीवर वैज्ञानिक आणि परिणामकारक उपाय विकसित करण्यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील राहील, असे माननीय कुलगुरूंनी सांगितले.

विद्यार्थी हे भारताच्या भविष्याचे निर्माते आहेत. ज्ञान, तंत्रज्ञान आणि उपलब्ध संधींचा योग्य उपयोग करून विद्यार्थ्यांनी सकारात्मक दृष्टिकोन, शिस्त, परिश्रम आणि राष्ट्राप्रती जबाबदारीची भावना जोपासावी. केवळ नोकरी मिळविण्याऐवजी रोजगारनिर्माते होण्याचा संकल्प करावा. कृषि उद्योजकता, अॅग्री-स्टार्टअप्स, अन्नप्रक्रिया, डिजिटल कृषि, जैवतंत्रज्ञान आणि कृषिव्यवसाय या क्षेत्रांत युवकांसाठी मोठ्या संधी उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांच्या ज्ञानाचा आणि कौशल्याचा उपयोग समाज व शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी व्हावा, असे त्यांनी नमूद केले.

जल, मृदा, जैवविविधता आणि नैसर्गिक संसाधने ही केवळ वर्तमान पिढीची संपत्ती नसून भावी पिढ्यांचीही अमूल्य ठेव आहे. त्यामुळे जलसंधारण, मृदासंवर्धन, नैसर्गिक संसाधनांचा विवेकपूर्ण वापर, जैवविविधता संवर्धन आणि हवामान-स्मार्ट कृषि यांना प्राधान्य देण्याचे आवाहन त्यांनी केले.

पाच राष्ट्रीय संकल्प घेण्याचे आवाहन

स्वातंत्र्यदिनाच्या या राष्ट्रीय पर्वानिमित्त प्रत्येकाने पाच संकल्प घेण्याचे आवाहन कुलगुरूंनी केले. राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य देणे, कृषि व शेतकरी कल्याणासाठी ज्ञान व कौशल्याचा उपयोग करणे, विज्ञान, नवोन्मेष आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करणे, जल-मृदा-पर्यावरणाचे संरक्षण करणे आणि विकसित व आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीत योगदान देणे, हे पाच संकल्प त्यांनी मांडले.

ज्ञानातून राष्ट्रनिर्माण, विज्ञानातून कृषि उत्थान, नवोन्मेषातून आत्मनिर्भरता आणि आपल्या कर्मातून विकसित भारत” या ध्येयाने सर्वांनी कार्य करण्याचे आवाहन करताना कुलगुरूंनी सांगितले की, स्वातंत्र्य हे स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानातून मिळाले असून ते सार्थक करण्याची जबाबदारी आजच्या पिढीची आहे.

हर शेतकरी समृद्ध होवो, प्रत्येक युवा सशक्त होवो, प्रत्येक गाव आत्मनिर्भर होवो आणि प्रत्येक नागरिकाला आपल्या राष्ट्राचा अभिमान वाटो,” अशी अपेक्षा व्यक्त करून त्यांनी “जय जवान! जय किसान! जय विज्ञान! जय अनुसंधान! जय हिंद! जय महाराष्ट्र!” असा संदेश दिला. तसेच विद्यापीठातील सर्व संचालक, प्रशासकीय अधिकारी, महाविद्यालयांचे अधिष्ठाता, प्राध्यापक, शास्त्रज्ञ, विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि कर्मचारी यांना ८०व्या स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.

या समारंभास विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे, कुलसचिव श्री. पुरभा काळे, विद्यापीठ अभियंता श्री. दीपक कशाळकर, अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य, डॉ. राजेश क्षीरसागर, डॉ. राहुल रामटेके, डॉ. विश्वनाथ खंदारे, डॉ. नीता गायकवाड, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम, छात्रसेना अधिकारी डॉ. जयकुमार देशमुख, क्रीडा शिक्षक डॉ. संघर्ष शृंगारे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. उदय वाईकर यांनी केले.












माननीय कृषि मंत्री ना. श्री. दत्तात्रय भरणे यांच्या शुभहस्ते वनामकृवित नैसर्गिक शेती व सेंद्रिय उत्पादनास चालना देण्यासाठी प्रगत कीटकनाशक तपासणी व अवशेष विश्लेषण प्रयोगशाळेचे उद्घाटन

यानिमित्त आयोजित देशी गोवंश, नैसर्गिक शेती व मसाला पिके’ विषयावरील परिसंवादास शेतकरी व महिला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग



भारत सरकारची राष्ट्रीय कृषि विकास योजना, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागाच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठाच्या कीटकशास्त्र विभागात नैसर्गिक शेती आणि सेंद्रिय उत्पादनास प्रोत्साहन देण्यासाठी प्रगत कीटकनाशक तपासणी व अवशेष विश्लेषण प्रयोगशाळेचे’ उद्घाटन तसेच देशी गोवंश, नैसर्गिक शेती व मसाला पिके’ या विषयावरील परिसंवादाचे आयोजन स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने दिनांक १५ ऑगस्ट २०२६ रोजी करण्यात आले.

प्रयोगशाळेचे उद्घाटन आणि परिसंवादाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे माननीय कृषि मंत्री तथा विद्यापीठाचे प्रतिकुलपती मा. ना. श्री. दत्तात्रय भरणे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमास सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मा. ना. श्रीमती मेघना साकोरे-बोर्डीकर, परभणी महानगरपालिकेचे महापौर मा. श्री. सय्यद इकबाल सय्यद खाजा तसेच परभणी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष श्री. श्रीकांत विटेकर यांची विशेष उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि होते. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून विधानसभा सदस्य मा. आ. डॉ. राहुल पाटील, मा. आ. श्री. रत्नाकर गुट्टे, मा. आ. श्री. बालाजी कल्याणकर, मा. आ. श्री. राजेश विटेकर तसेच सेलू नगरपरिषदेचे अध्यक्ष श्री. मिलिंद सावंत उपस्थित होते.

यावेळी माननीय जिल्हाधिकारी श्री. संजयसिंह चव्हाण (भाप्रसे), माननीय पोलीस अधीक्षक श्री. पंकज कुमावत (भापोसे), जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नतिशा माथुर (भाप्रसे) यांच्यासह संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे, कुलसचिव श्री. पुरभा काळे, विद्यापीठ अभियंता श्री. दीपक कशाळकर, लातूर विभागाचे विभागीय कृषि सहसंचालक श्री. महेशकुमार तीर्थकर, परभणी आत्माचे संचालक श्री. दौलत चव्हाण, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी श्री. भास्कर कोळेकर (परभणी), श्री. प्रदीप कच्छवे (हिंगोली) यांच्यासह विद्यापीठातील अधिकारी, शास्त्रज्ञ, कर्मचारी, विद्यार्थी, शेतकरी व महिला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रयोगशाळेच्या उद्घाटनानंतर मान्यवरांनी विद्यापीठाच्या वनस्पती रोगशास्त्र विभागांतर्गत कार्यरत बायोमिक्स प्रयोगशाळेला तसेच अन्न तंत्र महाविद्यालयातील सामायिक उष्मायन  केंद्राला (कॉमन इन्क्युबेशन सेंटर) भेट देऊन तेथील कार्याची माहिती घेतली.

परिसंवादाच्या उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करताना राज्याचे कृषि मंत्री मा. ना. श्री. दत्तात्रय भरणे म्हणाले की, पर्जन्यमानातील अनिश्चितता आणि बदलत्या हवामान परिस्थितीमुळे शेतकऱ्यांसमोर अनेक आव्हाने निर्माण झाली असून, त्याचा शेती उत्पादनावर प्रतिकूल परिणाम होत आहे. यामुळे शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे इतकेच नव्हे तर मदत प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचली पाहिजे, यावर त्यांनी भर दिला.

यावेळी त्यांनी महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या स्मृतींना उजाळा देत, शेतकरी म्हणून त्यांनी केलेल्या निष्ठापूर्ण कार्याचे स्मरण करून त्यांना अभिवादन केले. आपण स्वतः शेतकरी कुटुंबातून आलो असल्याने शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी अधिक प्रभावीपणे कार्य करण्याची आपली बांधिलकी असल्याचे त्यांनी नमूद केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने विकसित केलेले विविध कृषि तंत्रज्ञान, आधुनिक कृषि अवजारे व यंत्रसामग्री शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहेत. या तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे अवलंब करून उत्पादनक्षमता तसेच शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.

माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली वर्ष २०२६ हे आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून साजरे केले जात असताना, महाराष्ट्र शासनाने महिला शेतकऱ्यांच्या योगदानाला योग्य मान्यता देण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. महिला शेतकऱ्यांना तंत्रज्ञान, बाजारपेठ, वित्तपुरवठा आणि निर्णयप्रक्रियेत समान संधी मिळणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.

महिला शेतकरी पहाटेपासून शेतात कष्ट करण्यासोबतच कुटुंबातील जबाबदाऱ्याही समर्थपणे पार पाडतात. त्यांच्या या योगदानाचा सन्मान होणे आवश्यक आहे. महिला सक्षम झाल्यास कुटुंबाबरोबरच समाजाची प्रगतीही अधिक वेगाने होते, असेही माननीय कृषि मंत्री श्री. भरणे यांनी नमूद केले.

शेतकऱ्यांच्या हितासाठी शासनाने कर्जमाफीसह विविध महत्त्वपूर्ण निर्णय घेतले असून, शेतीचे आरोग्य सुधारण्यासाठी रासायनिक निविष्ठांचा अनावश्यक वापर कमी करून सेंद्रिय निविष्ठांचा वापर वाढविणे गरजेचे आहे. नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देत शाश्वत शेतीच्या दिशेने वाटचाल करणे ही काळाची गरज आहे, असे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या मोफत वीज योजनेची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात स्थापन करण्यात आलेल्या प्रगत कीटकनाशक तपासणी व अवशेष विश्लेषण प्रयोगशाळेच्या माध्यमातून शेतमालातील कीटकनाशक अवशेषांची तपासणी करणे, सुरक्षित अन्न उत्पादनाला चालना देणे तसेच नैसर्गिक व सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देणे शक्य होणार आहे. ही प्रयोगशाळा शेतकरी, ग्राहक आणि संपूर्ण कृषि क्षेत्राच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

शेतकऱ्यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आनंदी व प्रसन्न जीवन जगावे. सर्वासोबत आपुलकीचे संबंध जपावेत, असे आवाहन करताना त्यांनी उपस्थितांना आनंद द्यावा आणि आनंद घ्यावा असा संदेश दिला. कृषि शिक्षण घेणारे विद्यार्थी, शेतकरी आणि संपूर्ण कृषि क्षेत्राच्या कल्याणासाठी शासनाच्या माध्यमातून सातत्याने कार्य करण्याची ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.

विद्यार्थ्यांशी साधला संवाद

कार्यक्रमानंतर माननीय कृषि मंत्री  ना. श्री. दत्तात्रय भरणे यांनी विद्यापीठातील कृषि व संलग्न शाखांमधील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या अडचणी व अपेक्षा जाणून घेतल्या. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, “शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी कठोर मेहनत घ्या, प्रामाणिकपणे कार्य करा, नीती-मूल्यांचे पालन करा आणि आई-वडिलांचा सन्मान करा.” कृषि शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी भविष्यातील कृषि क्षेत्राच्या विकासासाठी ज्ञान, तंत्रज्ञान आणि मूल्यांची सांगड घालत कार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

माननीय पालकमंत्री ना. श्रीमती मेघना साकोरे- बोर्डीकर म्हणाल्या की, भारताचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी जी यांच्या आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेतून केंद्र शासनाने शेतकरी कल्याणासाठी विविध योजना राबविल्या जात असून, त्यातून शेतकऱ्यांचा आत्मसन्मान वाढण्यास मदत झाली आहे. महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस जी, यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्ज मुक्त योजना आणली असून, शेतकऱ्यांना पुन्हा कर्ज घेण्याची गरज पडू नये, या उद्देशाने शासन कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांच्या वीज थकबाकीबाबत शासनाने घेतलेल्या निर्णयांचाही त्यांनी उल्लेख केला. जागतिक महिला वर्षाच्या निमित्ताने महिला शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविण्यात येत असून, त्यांना समाजात योग्य ओळख आणि सन्मान मिळावा यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.

आपण स्वतः सेंद्रिय शेती पद्धतीचा अवलंब करत असल्याचे सांगत सेंद्रिय व नैसर्गिक शेती ही काळाची गरज झाली आहे, त्यामुळे विद्यापीठाने आयोजित केलेला हा परिसंवाद अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी नमूद केले. परिसंवादातून मिळणारे ज्ञान शेतकऱ्यांनी आत्मसात करून प्रत्यक्ष शेतीमध्ये त्याचा उपयोग करावा, असे आवाहन त्यांनी केले.

शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी प्रत्येकी पाच शेतकरी दत्तक घेऊन त्यांना मार्गदर्शन करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार शास्त्रज्ञांनी कार्य पूर्ण करून शाश्वत शेतीला चालना दिल्याचे त्यांनी सांगितले.

पश्चिम महाराष्ट्रातील प्रगत शेतीचे उदाहरण दिले जाते; त्याच धर्तीवर परभणी आणि मराठवाड्यातही प्रगत व फायदेशीर शेती विकसित व्हावी यासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. सिल्क अँड मिल्क’ तसेच कृषि प्रक्रिया उद्योगांना चालना देण्यासाठी पुढाकार घेतला जात असून, या योजना मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कृषि प्रक्रिया उद्योगांना चालना देणे ही आपली जबाबदारी समजून आपण सातत्याने प्रयत्न करणार असून, माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी जी यांच्या आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेला बळ देण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे कार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी त्यांनी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या नेतृत्वाखाली मराठवाड्यातील शेतीच्या विकासासाठी विद्यापीठाकडून प्रामाणिकपणे प्रयत्न सुरू असल्याचे नमूद केले. विद्यापीठातील संशोधन, तंत्रज्ञान आणि ज्ञानाचा प्रत्यक्ष लाभ मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आजच्या कार्यक्रमात महिला शेतकरी आणि महिलांचा उत्स्फूर्त सहभाग उल्लेखनीय असल्याचे नमूद करून, विद्यापीठाच्या प्रशिक्षण व विस्तार उपक्रमांमुळे महिला शेतकरी आणि विद्यापीठ यांच्यातील संपर्क अधिक दृढ होत असल्याचे त्यांनी कौतुकाने सांगितले.

स्वागतपर भाषणात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी माननीय कृषि मंत्री ना. श्री. दत्तात्रय भरणे यांनी शेतकरी, विद्यार्थी आणि विद्यापीठाच्या कल्याणासाठी केलेल्या कार्याबद्दल तसेच विद्यापीठास आवर्जून भेट देऊन विविध उपक्रमांची पाहणी केल्याबद्दल त्यांचे आभार मानले. माननीय पालकमंत्री ना. श्रीमती मेघना साकोरे-बोर्डीकर तसेच उपस्थित सर्व मान्यवरांचेही त्यांनी स्वागत व आभार मानले.

यावेळी माननीय कुलगुरूंनी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या स्थापनेपासूनच्या वाटचालीचा आढावा घेत विद्यापीठाने शिक्षण, संशोधन आणि विस्तार शिक्षण क्षेत्रात मिळविलेल्या उल्लेखनीय यशाची माहिती दिली.

नवीन शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य विकास, उद्योजकता आणि नवोपक्रमाची क्षमता विकसित करण्यावर विद्यापीठाचा भर असल्याचे त्यांनी सांगितले. संशोधन क्षेत्रातही विद्यापीठाने उल्लेखनीय कामगिरी केली असून, विद्यापीठाच्या २५ अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्पांपैकी १० संशोधन केंद्रांनी देशपातळीवर अव्वल स्थान मिळविले असल्याचे त्यांनी नमूद केले.

शेतकरी देवो भव’ या भावनेतून विद्यापीठाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. माझा एक दिवस माझ्या बळीराजासोबत’ या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यापीठातील शास्त्रज्ञ थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करीत आहेत. तसेच दर मंगळवार आणि शुक्रवार सायंकाळी ७ ते ९ या वेळेत ऑनलाइन शेतकरी-शास्त्रज्ञ संवाद’ आयोजित करण्यात येत असून, त्यातून शेतकरी-शेतकरी आणि शेतकरी-शास्त्रज्ञ यांच्यातील संवादाच्या माध्यमातून कृषि तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविले जात आहे.

माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस जी यांच्या निर्देशानुसार विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात ११ प्रगतिशील शेतकऱ्यांना शेतकरी शास्त्रज्ञ’ म्हणून सन्मानित करण्यात आले असून, पद्मश्री माननीय श्री दादा लाड यांना डी.एस्सी. पदवी देऊन गौरविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांना विविध निविष्ठांचे वितरण

कार्यक्रमादरम्यान विद्यापीठाच्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना प्राथमिक स्वरूपात प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. तसेच MIDH योजनेअंतर्गत हळद उत्पादक शेतकऱ्यांना विद्यापीठाच्या बायोमिक्स उत्पादनाचे वितरण माननीय कृषि मंत्री ना. श्री. दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी पूर्णा व पालम तालुक्यांतून आलेल्या शेतकरी गटांनी माननीय कृषि मंत्री ना. श्री. दत्तात्रय भरणे यांचा विशेष सत्कार केला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. वीणा भालेराव आणि डॉ. रणजित चव्हाण यांनी केले, तर आभार डॉ. सुनीता पवार यांनी मानले. या कार्यक्रमास परभणी व हिंगोली जिल्ह्यांतील १२०० हून अधिक शेतकरी व महिला शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.