वसंतराव नाईक
मराठवाडा कृषी विद्यापीठातील अखिल भारतीय समन्वयित कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प व
भाकृअप - केंद्रीय कोरडवाहू शेती संशोधन संस्था - क्रिडा, हैदराबाद यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २८ एप्रिल २०२६ रोजी परभणी
जिल्ह्यातील बाभुळगाव येथे “संतुलित खत व्यवस्थापनाबाबत जनजागृती अभियान” माननीय
कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या प्रेरणेतून आणि
संशोधन संचालक डॉ. खिजर बेग यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले. या
कार्यक्रमाचा उद्देश शेतकऱ्यांना मृदा आरोग्य सुधारणा, पीक उत्पादनवाढ व शेतीचा खर्च कमी करण्यासाठी संतुलित पोषण व्यवस्थापनाचे
महत्त्व पटवून देणे हा होता.
यावेळी अ.भा.स.
कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्पाचे मुख्यशास्त्रज्ञ डॉ. आनंद गोरे यांनी कोरडवाहू
शेतीमध्ये संतुलित खत व्यवस्थापनाचे महत्त्व स्पष्ट करून मृदा परीक्षणावर आधारित
खतांचा वापर करण्याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी पिकांना आवश्यक
अन्नद्रव्यांचा योग्य पुरवठा होण्यासाठी तसेच दिर्घकालीन मृदा सुपीकता
टिकवण्यासाठी मृदा परीक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. या मध्ये सेंद्रीय खतांचा
वापर,
जिवाणू खतांचा वापर, पिक अवशेष व्यवस्थापन,
आंतरपीक पद्धती यावर भर देण्याचे आव्हान केले. याशिवाय येत्या खरीप
हंगामात हवामान बद्लानुरूप तंत्रज्ञान उदा. वेळेवर मशागत, योग्य
वाणांची निवड, बी. बी. एफ. तंत्रज्ञान, आंतरपीक पद्धती, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन
यावर भर द्यावा असे सांगीतले. डॉ. पी. एच.
गौरखेडे, कनिष्ठ शास्त्रज्ञ (मृदाशास्त्र) यांनी स्थानिक
उपलब्ध सेंद्रिय संसाधने, हिरवळीचे खत व एकात्मिक अन्नद्रव्य
व्यवस्थापन यांचे महत्त्व सांगून मृदा उत्पादनक्षमता टिकवून ठेवण्याबाबत
मार्गदर्शन केले.
श्रीमती ज्योती
चांदणे (कृषी सहाय्यक), कृषी विभाग श्री. एस. एन.
शेख (वरिष्ठ संशोधन सहयोगी) व श्री. एस. एम. खाटिंग (यंग प्रोफेशनल-वन) यांनी
शेतकऱ्यांशी संवाद साधून सेंद्रिय खतांचा व रासायनिक खतांचा कार्यक्षम वापर,
उत्पादन खर्च कमी करून उत्पादन कसे टिकवता येईल याबाबत मार्गदर्शन
केले.
हा कार्यक्रम कृषी
विभाग,
परभणी यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला. या अभियानात २६
शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. सर्व शेतकऱ्यांनी मृदा परीक्षणावर आधारित संतुलित खत
व्यवस्थापन पद्धती अवलंबण्याबाबत उत्सुकता दर्शविली.
कार्यक्रमादरम्यान शास्त्रज्ञांनी बाभुळगाव प्रगतशील शेतकरी श्री. ज्ञानोबा पारधे यांच्या शेतावर भेट देऊन विविध शेती उपक्रमांची माहिती दिली. पशुखाद्यासाठी मुरघास (सायलेज) तयार करण्याची पद्धत, तण नियंत्रणासाठी करण्यात येणाऱ्या आंतरमशागत प्रक्रिया, तसेच पीक अवशेष जमिनीत मिसळून मृदा सुपीकता, सूक्ष्मजीव व सेंद्रिय अन्नद्रव्य वाढविण्याचे महत्त्व याबाबत माहिती देण्यात आली. तसेच श्री. शिवाजी दळवे यांच्या शेतावरील संत्रा बागेलाही या वेळी भेट देण्यात दिली. याप्रसंगी फळबाग व्यवस्थापन, अन्नद्रव्य व्यवस्थापन व मृदा आरोग्य टिकविण्याबाबत चर्चा करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्र संचालन डॉ. पी. एच. गौरखेडे, कनिष्ठ शास्त्रज्ञ (मृदाशास्त्र) यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री. एस. एन. शेख (वरिष्ठ संशोधन सहयोगी) व श्री. एस. एम. खाटिंग (यंग प्रोफेशनल-वन) यांनी पुढाकार घेतला.



.jpeg)


.jpeg)









.jpeg)










.jpeg)
.jpeg)

.jpeg)