शेतीला पूरक व्यवसाय स्वीकारून जोखीम कमी करावी : संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार
शेतीसमोरील वाढती आव्हाने, नैसर्गिक साधनसंपत्तीचा ऱ्हास आणि शेतकऱ्यांच्या
उत्पन्नातील अस्थिरता यावर शाश्वत उपाय शोधण्याच्या उद्देशाने "पर्यावरणपूरक शाश्वत शेती पद्धती" या विषयावर विशेष ऑनलाईन वेबिनारचे
आयोजन करण्यात आले. हा वेबिनार वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या सेंद्रिय शेती संशोधन व
प्रशिक्षण केंद्र, कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प, आणि शेकरू फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ४ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ७.०० वाजता आयोजित
करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.)
इन्द्र मणि होते, तर संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार प्रमुख उपस्थित म्हणून सहभागी झाले.
संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी हवामान बदल, नैसर्गिक
संसाधनांची घट आणि उत्पादन खर्चात वाढ यांसारख्या सध्याच्या शेतीसमोरील आव्हानांचा
ऊहापोह केला. शेतीला पूरक व्यवसायांचा अवलंब करून शेतकरी उत्पन्नात स्थैर्य आणू
शकतात तसेच जोखीम कमी करू शकतात, असे त्यांनी नमूद केले.
मुख्य वक्ते डॉ. आनंद कारले, माजी मुख्य कृषिविद्यावेत्ता व प्रभारी
अधिकारी, अभ्यास कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प यांनी
पर्यावरणपूरक व शाश्वत शेतीची संकल्पना, शेतीपुढील सध्याची
आव्हाने, शाश्वत शेतीचे विविध प्रकार, एकात्मिक
शेती पद्धतीचे महत्त्व, कृषीपूरक व्यवसाय तसेच एक हेक्टर
एकात्मिक शेती मॉडेलचे अर्थशास्त्र याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. कमी खर्चात
अधिक उत्पन्न मिळविण्यासाठी शेतीसोबत पशुपालन, कुक्कुटपालन,
फळबाग, भाजीपाला उत्पादन व इतर पूरक
व्यवसायांचा समन्वय साधणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. भगवान आसेवार यांनी हवामान बदल, नैसर्गिक संसाधनांची घट आणि उत्पादन
खर्चात वाढ यांसारख्या सध्याच्या शेतीसमोरील आव्हानांचा ऊहापोह केला. शेतीला पूरक
व्यवसायांचा अवलंब करून शेतकरी उत्पन्नात स्थैर्य आणू शकतात तसेच जोखीम कमी करू
शकतात, असे त्यांनी नमूद केले.
यावेळी प्रगतशील शेतकरी सौ. मीरा जगदाळे (आपटी, जि. अहिल्यानगर) यांनी
एकात्मिक शेतीचा स्वतःचा अनुभव उपस्थितांसमोर मांडला. भाजीपाला, डाळी, फळपिके, शेळीपालन आणि
कुक्कुटपालन यांचा समन्वय साधून त्यांनी आपल्या शेतीला आर्थिकदृष्ट्या सक्षम
बनविल्याची माहिती त्यांनी दिली. त्यांच्या अनुभवामुळे सहभागी शेतकऱ्यांना
एकात्मिक शेती पद्धतीचा प्रत्यक्ष लाभ समजून घेण्यास मदत झाली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मीनाक्षी पाटील यांनी केले. डॉ. आनंद गोरे यांनी
समन्वयक, तर डॉ. मीनाक्षी पाटील यांनी सह-समन्वयक म्हणून काम पाहिले.
कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. प्रीतम भुतडा यांनी आभार मानले.
या वेबिनारमध्ये राज्यभरातील शेतकरी, कृषी विद्यार्थी, कृषी अधिकारी, कृषी विस्तारक तसेच कृषी क्षेत्रातील
अभ्यासकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून पर्यावरणपूरक व शाश्वत शेतीविषयी
मार्गदर्शनाचा लाभ घेतला.
.jpeg)



.jpeg)




.jpeg)

.jpeg)
.jpeg)

.jpeg)




.jpeg)
.jpeg)
.jpeg)

.jpeg)


.jpeg)

.jpeg)
.jpeg)

.jpeg)

.jpeg)
.jpeg)
.jpeg)


