Sunday, September 15, 2019

वनामकृविच्‍या लातुर येथील कृषि महाविद्यालयात शेतकरी मेळाव्‍याचे आयोजन


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील विस्‍तार शिक्षण संचालनालय व कृषि विभाग (महाराष्‍ट्र शासन) यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने मराठवाडा मुक्‍ती संग्राम दिनानिमित्‍त दिनांक १७ सप्‍टेंबर रोजी सकाळी ११.०० वाजता रबी शेतकरी मेळाव्‍याचे आयोजन लातुर येथील कृषि महाविद्यालयाच्‍या सभागृहात करण्‍यात आले असुन मेळाव्‍याचे उदघाटन लातुर जिल्‍हयाचे पालकमंत्री तथा राज्याचे  अन्‍न व नागरी पुरवठा मंत्री मा नामदार श्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्‍या हस्‍ते होणार आहे. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण हे राहणार असुन राज्‍य कृषि मुल्‍य आयोगाचे अध्‍यक्ष मा श्री पाशा पटेल, लोकसभा सदस्‍य मा खासदार श्री सुधाकर श्रृंगारे, मा खासदार श्री ओमप्रकाश राजेनिंबाळकर, लातुर जिल्‍हा परिषद अध्‍यक्ष मा श्री मिलींद लातुरे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. तसेच प्रमुख अतिथी म्‍हणुन कृषि आयुक्‍त मा श्री सुहास दिवसे, जिल्‍हाधिकारी मा श्री जी श्रीकांत, लातुर जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी मा श्री विपीन इटनकर, विधानपरिषद सदस्‍य मा आमदार श्री सतीश चव्‍हाण, मा आमदार श्री विक्रम काळे, मा आमदार श्री सुरेश धस, विधानसभा सदस्‍य मा आमदार श्री अमित देशमुख, मा आमदार श्री विनायकराव पाटील, मा आमदार श्री सुधाकर भालेराव, मा आमदार श्री बसवराज पाटील, आमदार श्री त्र्यंबक नाना भिसे, लातुर महा‍नगरपालिका महापौर मा श्री सुरेश पवार आदींची उपस्थिती लाभणार आहे.
मेळाव्‍याच्‍या तांत्रिक सत्रात हवामान बदलावर आधारीत पिक पध्‍दतीवर डॉ बी व्‍ही आसेवार, सुधारित हरभरा लागवड तंत्रज्ञानावर डॉ डी के पाटील, गळीत धान्‍य लागवड तंत्रज्ञानावर डॉ एम के घोडके तर रबी हंगामातील किडी व्‍यवस्‍थापनावर डॉ एस डी बंटेवाड आदी विद्यापीठ शास्‍त्रज्ञ मार्गदर्शन करणार असुन विद्यापीठ शिफारसीत तंत्रज्ञानावर आधारित व इतर संलग्‍न विभागांचे प्रदर्शनीचेही आयोजन करण्‍यात आले आहे. मेळाव्यात विद्यापीठ संशोधित बियाणांची विक्री होणार आहे. सदरिल शेतकरी मेळाव्‍यास शेतकरी बांधवानी जास्‍तीत जास्‍त संख्‍येने उपस्थित राहण्‍याचे आवाहन विस्‍तार शिक्षण संचालक डॉ पी जी इंगोले, संशोधन संचालक डॉ डी पी वासकर, लातुर विभागीय कृषि सहसंचालक डॉ टी एम जगताप, लातुर जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी डी एस गावसाने, मुख्‍य विस्‍तार शिक्षण अधिकारी डॉ पी आर देशमुख आदींनी केले आहे.

Tuesday, September 10, 2019

सोशल मिडियाचा अयोग्‍य वापरामुळे तरूणांमधील विचार करण्‍याचे साम‍‍र्थ्‍य कमी होत आहे.....युवा व्‍यक्‍ते श्री अविनाश भारती

वनामकृवितील परभणी कृषि महाविद्यालयात आयोजित गणेशोत्‍सव 2019 कार्यक्रमात प्रतिपादन
भारत हा तरूणांचा देश आहे, परंतु आज तरूणवर्ग मोठया प्रमाणावर सोशल मिडियामध्‍येच तल्‍लीन आहे. आपल्‍या आयुष्‍यातील अमुल्‍य वेळ सोशल मिडियावर वाया घालवत आहेत. कोणताही संदेश विचार न करता आपण सोशल मिडियावर पुढे पाठवत आहोत. यामुळे तरूणांमध्‍ये विचार करण्‍याचे सामर्ध्‍य कमी होत आहे, असे प्रतिपादन युवा व्‍यक्‍ते श्री अविनाश भारती यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील परभणी कृषि महाविद्यालयात गणेशोत्‍सव 2019 निमित्‍त दिनांक 10 सप्‍टेंबर रोजी व्‍याख्‍यानाचे आयोजन करण्‍यात आले होते, त्‍याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी प्रभारी विभाग प्रमुख (विस्तार शिक्षण) डॉ आर पी कदम हे होते तर विभाग प्रमुख (कृषीविद्या) डॉ बी व्‍ही आसेवार, डॉ जे व्‍ही ऐकाळे, डॉ आर व्‍ही चव्‍हाण, गणेशोत्‍सव समिती अध्‍यक्ष अमर आमले, उपाध्‍यक्ष अभिजित पोरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
युवा व्‍यक्‍ते श्री अविनाश भारती पुढे म्‍हणाले की, सोशल मिडियाचा वापर सकारात्‍मक कार्यासाठी करा. जीवनात कोणतेही यश प़्राप्‍त करण्‍यासाठी स्‍वत:शी व व वेळेशी प्रामाणिक रहा. आई-वडीलांना देवा समान माना. कृषिच्‍या विद्यार्थ्‍यांनी शेती व शेतकरी यांच्‍यासाठी कार्य करण्‍याची गरज असुन मातीशी व देशाशी इमान राखा, असा सल्‍ला त्‍यांनी दिला. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक डॉ आर व्‍ही चव्‍हाण यांनी केले तर सुत्रसंचालन अक्षय गोडभरले यांनी केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्‍यापक, कर्मचारी व विद्या‍र्थ्‍यी मोठया संख्‍येने उपस्थित होते.

Wednesday, September 4, 2019

वनामकृवितील डिजिटल शेती प्रशिक्षण प्रकल्प देशातील एक उत्कृष्ट प्रशिक्षण केंद्र म्हणुन विकसित व्हावा

'कृषि उत्‍पादकता वाढीकरिता यंत्रमानव, ड्रोन व स्‍वयंचलित यंत्राव्‍दारे डिजिटल शेती' यावरील सेंटर ऑफ एक्सेलन्‍सचे उदघाटन


शेती क्षेत्रापुढे अनेक आव्‍हाने आहेत, आव्‍हानाचा सामना आपण विविध तंत्रज्ञानाच्‍या माध्‍यमातुन करित आहोत. भावी काळात कृषि क्षेत्रात कृत्रित बुध्‍दीमत्‍ता, यंत्रमानव, ड्रोन व स्‍वयंचलित यंत्राचा वापर वाढणार आहे. ही बाब डोळयासमोर ठेऊन भारतीय कृषि संशोधन परिषदेने परभणी कृषि विद्यापीठास डिजिटल शेतीवर आधारित प्रशिक्षण प्रकल्‍प पुढील तीन वर्षाकरिता मंजुर केला असुन हा प्रकल्‍प देशातील एक उत्‍कृष्‍ट प्रशिक्षण केंद्र म्‍हणुन विकसित व्‍हावा, असे मत भारतीय कृषि संशोधन परिषदेतील प्रकल्‍पाचे राष्‍ट्रीय समन्‍वयक मा डॉ पी के घोष यांनी व्‍यक्‍त केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठास प्रगत कृषि विज्ञान व तंत्रज्ञान केंद्र राष्‍ट्रीय कृषी उच्‍च शिक्षण प्रकल्‍पांतर्गत 'कृषि उत्‍पादकता वाढीकरिता यंत्रमानव, ड्रोन व स्‍वयंचलित यंत्राव्‍दारे डिजिटल शेती' यावरील सेंटर ऑफ एक्सेलन्‍स प्रशिक्षण प्रकल्‍पास नवी दिल्‍ली येथील भारतीय कृषि संशोधन परिषदेने मान्‍यता दिली असुन दिनांक 4 सप्‍टेंबर रोजी आयोजित सदरील प्रकल्‍पाच्‍या उदघाटन प्रसंती ते बोलत होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण हे होते तर व्‍यासपीठावर शिक्षण संचालक डॉ प्रदिप इंगोले, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, राष्‍ट्रीय समन्‍वयक डॉ प्रभात कुमार, आयआयटी खरगपुरचे डॉ व्‍ही के तिवारी, आयआयटी पवईचे डॉ अमित अरोरा, प्रकल्‍पाचे मुख्‍य शास्‍त्रज्ञ डॉ गोपाल शिंदे आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे,
मा डॉ पी के घोष पुढे म्‍हणाले की, सदरिल प्रकल्‍पाच्‍या माध्‍यमातुन प्रशिक्षण घेणारे विद्यार्थ्‍यी व प्राध्‍यापक यांचे डिजिटल शेतीत मोठे योगदान ठरणार आहे. या प्रकल्‍पात डिजिटल शेती संबंधीत विविध आंतरराष्‍ट्रीय व राष्‍ट्रीय संस्‍था तसेच कंपन्‍या, उद्योजक यांचे जाळे तयार होण्‍यास मदत होणार आहे.
अध्‍यक्षीय भाषणात कुलगुरू मा डॉ अशोक ढवण म्‍हणाले की, शेतक-यांचे उत्‍पन्‍न दुप्‍पट करण्‍याचे उदिदष्‍ट साध्य करण्यासाठी शेतीतील उत्‍पादन खर्च कमी करणे, विविध निविष्‍ठाचे कार्यक्षमरित्‍या उपयोग करणे यासाठी तंत्रज्ञानाची गरज आहे. येणारे युग हे डिजिटल तंत्रज्ञानाचे असुन शेतीत देखिल डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर आपणास करावा लागणार आहे. यादृष्‍टीने परभणी कृषि विद्यापीठाने पुढाकार घेऊन डिजिटल शेतीला लागणारे मनुष्‍यबळ निर्मितीकरिता सदरिल प्रशिक्षण प्रकल्‍प हाती घेतला आहे. यात डिजिटल शेतीच्‍या तंत्रज्ञानात्‍मक देवाणघेवाण करिता जगातील अग्रगण्‍य विद्यापीठाशी सामंजस्‍य करार केला असुन यात अमेरिकेतील वॉशिग्‍टन स्‍टेट युनिव्‍हर्सिटी तसेच स्‍पेन, युक्रेन व बेलारूस येथील विद्यापीठांचा समावेश आहे. तसेच पवई व खरगपुर येथील आयआयटी संस्‍थेचे नॉलेज सेंटर म्‍हणुन सहकार्य लाभणार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.
यावेळी राष्‍ट्रीय समन्‍वयक डॉ प्रभात कुमार, आयआयटी खरगपुरचे डॉ व्‍ही के तिवारी व आयआयटी पवईचे डॉ अमित अरोरा यांनी आपले मनोगत व्‍यक्‍त केलेप्रकल्‍पाचे मुख्‍य शास्‍त्रज्ञ डॉ गोपाल शिंदे यांनी सन 2019 ते 2022 या तीन वर्ष कालावधी करिता संकल्‍पीत असलेल्‍या सदरिल प्रशिक्षण प्रकल्‍पाची माहिती सादरीकरणाव्‍दारे मांडली. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक प्राचार्य डॉ उदय खोडके यांनी केले, सूत्रसंचालन डॉ वीणा भालेराव यांनी केले तर आभार प्रकल्‍प मुख्‍य समन्‍वयक डॉ आर पी कदम यांनी मानले. याप्रसंगी विविध संस्‍थेनी शेतीतील उपयुक्‍त ठरू शकणारे कृत्रिम बुध्‍दीमत्‍तावर आधारित डिजिटल साधने, यंत्रमानव, ड्रोनव्‍दारे फवारणी आदींचे प्रात्‍यक्षिक दाखविण्‍यात आले. कार्यक्रमास विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी, शास्‍त्रज्ञ, प्रगतशील शेतकरी, व विद्यार्थ्‍यी मोठया संख्‍येने उपस्थित होते.
सदिरल प्रकल्‍पात यंत्रमानव, ड्रोन व स्‍वयंचलीत यंत्र सारखी डिजीटल साधनांचा समावेश असणा-या विविध संशोधन प्रयोगशाळा निर्माण करून विद्यार्थ्‍यी व संशोधक प्राध्‍यापकांना प्रशिक्षणाची सुविधा निर्माण करण्‍यात येणार आहे. या केंद्राव्‍दारे कौशल्‍य प्राप्‍त प्रशिक्षणार्थी डिजिटल शेतीचे तंत्र शेतक-यांपर्यंत नेण्‍याचा प्रयत्‍न करणार आहेत. यात डिजिटल शेतीच्‍या तंत्रज्ञानात्‍मक देवाणघेवाण करिता जगातील अग्रगण्‍य विद्यापीठाशी सामंजस्‍य करार केला असुन यात अमेरिकेतील वॉशिग्‍टन स्‍टेट युनिव्‍हर्सिटी तसेच स्‍पेन, युक्रेन व बेलारूस येथील विद्यापीठांचा समावेश आहे. तसेच पवई व खरगपुर येथील आयआयटी संस्‍थेचे नॉलेज सेंटर म्‍हणुन सहकार्य लाभणार आहे. प्रकल्‍पास अठरा कोटी रूपयांचा निधी मंजुर करण्‍यात आला आहे, यात पन्‍नास टक्के वाटा जागतिक बॅक व पन्‍नास टक्के वाटा भारत सरकार कडुन भारतीय कृषि संशोधन परिषदेच्‍या माध्‍यमातुन प्राप्‍त होणार आहे. 




Tuesday, September 3, 2019

मनुष्‍यांनी इतिहासापासुन धडा घेतला पाहिजे...... डॉ गणेश राऊत

परभणी कृषि महाविद्यालयात गणेशोत्‍सव 2019 निमित्‍त आयोजित व्‍याख्‍यानात प्रतिपादन
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील परभणी कृषि महाविद्यालयात गणेशोत्‍सवानिमित्‍त्‍ दिनांक 3 सप्‍टेबर रोजी इतिहासाकडुन काय शिकावे या विषयावर पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठातील इतिहास विभागाचे विभाग प्रमुख डॉ गणेश राऊत यांच्‍या व्‍याख्‍यानाचे आयोजन करण्‍यात आले होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी प्रभारी प्राचार्य डॉ सय्यद ईस्‍माइल हे होते तर व्‍यासपीठावर विभाग प्रमुख डॉ एस डी बंटेवाड, मुख्‍य वसतीगृह अधिक्षक डॉ आर पी कदम, डॉ संदिप बडगुजर, गणेश उत्‍सव समितीचे अध्‍यक्ष अमर आमले, उपाध्‍यक्ष अभिजित पोरे आदींची प्रमुख उपस्थिती होती. डॉ गणेश राऊत आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, जगातील कोणतेही बदल प्रथम मनुष्‍याच्‍या मनात होतात, नंतर ते प्रत्‍यक्षात येतात. मनुष्‍यांनी इतिहासापासुन धडा घेतला पाहिजे. इतिहासाची पुर्नोरोयुक्‍ती होत असते. महात्‍मा गांधी, महात्‍मा फुले व बाबासाहेब आंबेडकर यांनी व्‍यवस्था बदलुन सुधारणेसाठी कार्य केले. आजही इतिहासातील अनेक बाबींचा उपयोग मनुष्‍याना करित असतो. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक डॉ संदिप बडगुजर यांनी केले तर सुत्रसंचालन अक्षय गोडभरले यांनी केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्‍यापक, विद्यार्थ्‍यी मोठया संख्‍येने उपस्थित होते.

वनामकृवित डिजिटल शेतीवर आधारित प्रशिक्षण प्रकल्‍पाचे उदघाटन

'कृषि उत्‍पादकता वाढीकरिता यंत्रमानव, ड्रोन व स्‍वयंचलित यंत्राव्‍दारे डिजिटल शेती' यावरील सेंटर ऑफ एक्सेलन्‍सचे उदघाटन
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठास प्रगत कृषि विज्ञान व तंत्रज्ञान केंद्र राष्‍ट्रीय कृषी उच्‍च शिक्षण प्रकल्‍पांतर्गत 'कृषि उत्‍पादकता वाढीकरिता यंत्रमानव, ड्रोन व स्‍वयंचलित यंत्राव्‍दारे डिजिटल शेती' यावरील सेंटर ऑफ एक्सेलन्‍स प्रशिक्षण प्रकल्‍पास नवी दिल्‍ली येथील भारतीय कृषि संशोधन परिषदेने मान्‍यता दिली असुन सदरिल प्रकल्‍पाचे उदघाटन दिनांक 4 सप्‍टेंबर रोजी प्रकल्‍पाचे राष्‍ट्रीय समन्‍वयक मा डॉ पी के घोष यांच्‍या हस्‍ते होणार आहे. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण राहणार असुन शिक्षण संचालक डॉ प्रदिप इंगोले, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, राष्‍ट्रीय समन्‍वयक डॉ प्रभात कुमार, आयआयटी खरगपुरचे डॉ व्‍ही के तिवारी, आयआयटी पवईचे डॉ अमित अरोरा, राहुरी कृषी विद्यापीठाचे डॉ एस डी गोरंटीवार, अकोल कृषी विद्यापीठाचे डॉ एस आर काळबांडे, प्राचार्य डॉ यु एम खोडके आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे,
सदरिल प्रकल्‍प सन 2019 ते 2022 या तीन वर्ष कालावधी करिता संकल्‍पीत असुन यास अठरा कोटी रूपयांचा निधी मंजुर करण्‍यात आला आहे, यात पन्‍नास टक्के वाटा जागतिक बॅक व पन्‍नास टक्के वाटा भारत सरकार कडुन भारतीय कृषि संशोधन परिषदेच्‍या माध्‍यमातुन प्राप्‍त होणार आहे. यात यंत्रमानव, ड्रोन व स्‍वयंचलीत यंत्र सारखी डिजीटल साधनांचा समावेश असणा-या विविध संशोधन प्रयोगशाळा निर्माण करून विद्यार्थ्‍यी व संशोधक प्राध्‍यापकांना प्रशिक्षणाची सुविधा निर्माण करण्‍यात येणार आहे. या केंद्राव्‍दारे कौशल्‍य प्राप्‍त प्रशिक्षणार्थी डिजिटल शेतीचे तंत्र शेतक-यांपर्यंत नेण्‍याचा प्रयत्‍न करणार आहेत. यात डिजिटल शेतीच्‍या तंत्रज्ञानात्‍मक देवाणघेवाण करिता जगातील अग्रगण्‍य विद्यापीठाशी सामंजस्‍य करार केला असुन यात अमेरिकेतील वॉशिग्‍टन स्‍टेट युनिव्‍हर्सिटी तसेच स्‍पेन, युक्रेन व बेलारूस येथील विद्यापीठांचा समावेश आहे. तसेच पवई व खरगपुर येथील आयआयटी संस्‍थेचे नॉलेज सेंटर म्‍हणुन सहकार्य लाभणार आहे, अशी माहिती कार्यक्रमाचे आयोजक प्रकल्‍पाचे प्रमुख शास्‍त्रज्ञ डॉ गोपाल शिंदे व प्रकल्‍प मुख्‍य समन्‍वयक डॉ आर पी कदम यांनी दिली.

सदरिल प्रकल्‍पाच्‍या अधिक माहितीसाठी येथे क्लीक करा

Monday, September 2, 2019

वनामकृविच्‍या उत्तरा मुलींच्या वसतीगृहात गणेश उत्‍सवानिमित्‍त व्‍याख्‍यानाचे आयोजन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील उत्तरा मुलींचे वसतीगृहात गणेश उत्‍सवानिमित्‍त दिनांक 2 सप्‍टेबर रोजी महिलांचे शिक्षण व मुलींचे स्‍वावलंबन या विषयावर परभणी येथील सावित्रीबाई फुले विद्यालयाच्‍या मुख्याध्यापिका सौ. जया बालासाहेब जाधव यांच्‍या व्‍याख्‍यानाचे आयोजन करण्‍यात आले होते. कार्यक्रमास वसतीगृह सहाय्यक अधिक्षीका डॉ मिनाक्षी पाटील व डॉ मेघा सुर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती. मुख्याध्यापिका सौ. जया बालासाहेब जाधव आपल्‍या मार्गदर्शनात म्‍हणाल्‍या की, महिलांचे शिक्षण हे समाज घडविण्यासाठी फार उपयोगी पडते. प्रत्येक मुलींनी जीवनात स्वावलंबी बनण्‍याचा प्रयत्‍न करावा, असा सल्‍ला त्यांनी दिलाडॉ. मेघा सुर्यवंशा यांनी मुलींना भविष्यामध्ये करियरच्या अनेक संधी उपलब्ध असून त्याचा पुरेपूर फायदा घ्यावा असे सांगितले तर प्रास्‍ताविकात डॉ. मिनाक्षी पाटील मुलींना श्रद्धा ही विवेकापुरती मर्यादित असली पाहीजे जर ती विवेकाच्या पुढे गेली की श्रद्धा अविवेकी होते असे मत व्यक्त्त केले
सुत्रसंचलन धनश्री जोशी हिने केले तर आभार पुनम रायकर हिने मानले. कार्यक्रम यस्वीतेसाठी डॉ. स्नेहल शिलेवंत, मृदुला रोजेकर, माया कुन्टे, आरती पाटील, चित्रा कंन्नर, किरण शिंदे, सोनाली इंगळे, गीतांजली केतके, प्रियंका बोर्डे, मेघा कोतुरवार, सुनील शिंदे, राम मोहीते आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास वसतीगृहातील विद्यार्थ्‍यींनी मोठया संख्‍येने उपस्थित होत्‍या. कार्यक्रम आयोजन परभणी कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. धर्मराज गोखले व मुख्य वसतीगृह अधिक्षक डॉ. आर पी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.

Friday, August 23, 2019

कापुस व सोयाबीनवरील किडींचे करा योग्‍य पध्‍दतीने व्‍यवस्‍थापन

वनामकृवितील किटकशास्‍त्रज्ञांचे आवाहन
कपाशीवरील मावा
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील किटकशास्त्र विभागातील शास्त्रज्ञांनी ऑगस्‍ट महिन्यात क्रॉपसॅप प्रकल्पांतर्गत मराठवाडयातील विविध ठिकाणी कापूस व सोयाबीन पिकाच्या प्रक्षेत्रांस भेट दिली असता विविध किडीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. कपाशीवर प्रामुख्याने माव्याचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात आढळून आला असुन काही ठिकाणी तुडतुडे व गुलाबी बोंडअळीच्या डोमकळया आढळून आल्या. सध्या हवामान ढगाळ असल्याने व कपाशीचे पीक पाते, फुले लागण्याच्या अवस्थेत असल्याने गुलाबी बोंडअळीचे पतंग सक्रीय झालेले आढळून येत आहेत. मादी पतंग पाते, फुले यावर अंडी घालतात, त्यामुळे कपाशीच्या पिकात कामगंध सापळे लावण्याची ही योग्य वेळ आहे. सोयाबीन पिकावर प्रामुख्याने चक्रीभुंगा, कोंडीका तसेच पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव आढळून आला. त्या अनुषंगाने विद्यापीठातील किटकशास्‍त्रज्ञांनी पुढील प्रमाणे कापूस व सोयाबीन पिकांवरील किडींचे व्यवस्थापन करण्‍याचे आवाहन शेतक-यांना केले आहे.
कापूस या पिकांत सदयस्थितीत पुढील प्रमाणे व्यवस्थापन करावे : कपाशीच्या पिकात नियमित सर्वेक्षण करुन डोमकळ्या दिसून आल्यास त्या तोडून आतील अळीसह नष्ट करावे. गुलाबी बोंडअळीसाठीचे हेक्‍टरी पाच कामगंध सापळे लावावेत. प्रती सापळा सरासरी 8 ते 10 पतंग सतत 2 ते 3 दिवस आढळुन आल्‍यास ही आर्थिक नुकसानीची पातळी समजावी, व योग्‍य किटकनाशकाची फवारणी करावी. गुलाबी बोंडअळीचे पतंग मोठया प्रमाणात गोळा करुन नष्ट करण्यासाठी हेक्टरी 20 कामगंध सापळे लावावेत. उपलब्धते प्रमाणे कपाशीत एकरी 3 ट्रायकोकार्ड पानाच्या खालच्या बाजूस लावावेत. तसेच इंग्रजी T आकाराचे पक्षीथांबे हेक्टरी 40 या प्रमाणात लावावेत. कापूस पिकामध्ये फुलकिडीच्या व्यवस्थापनासाठी निळे चिकट सापळे तर पांढऱ्या माशीच्या व्यवस्थापनासाठी पिवळे चिकट सापळे लावावेत.

कापुस व सोयाबीनवरील कीड व्‍यवस्‍थापनाकरिता फवारणीसाठी कीटकनाशके

प्रादुर्भाव
कीटकनाशके
प्रती दहा लिटर पाण्‍यात किटकनाशकाचे वापराचे प्रमाण
कापूस
गुलाबी बोंडअळी
प्रोफेनोफॉस 50 ईसी किंवा
20 मिली
थायोडीकार्ब 75 डब्ल्युपी किंवा
20 ग्रॅम
थायामिथिक्झाम 12.6 टक्के + लॅमडा साहॅलोथ्रीन 9.5 टक्के झेड सी
04 मिली
मावा – तुडतुडे व इतर रस शोषक किडी
ॲसीफेट 50 टक्के + इमिडाक्लोप्रीड 1.8 एस.पी. 
20 मिली
फ्लोनीकॅमीड 50 डब्ल्यु जी 
04 ग्रॅम
सोयाबीन
चक्रीभुंगा, कोंडीका अळी, पाने खाणारी अळी
क्लोरॅनट्रानिलीप्रोल 18.5 एस सी.
04 मिली
फ्लुबेंडामाईड 39.35 एस. सी.
04 मिली
थायामिथिक्झाम 12.6 टक्के + लॅमडा साहॅलोथ्रीन 9.5 टक्के झेड सी
04 मिली

वरील किटकनाशकाचे प्रमाण हे साध्या पंपासाठी असून पेट्रोल पंपासाठी हे प्रमाण तीनपट वापरावे. कापूस व सोयाबीन पिकांचे होणारे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी वेळीच जागरूक होऊन वरील प्रमाणे उपाययोजना कराव्यात असे आवाहन किटकशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ. संजीव बंटेवाड, किटकशास्‍त्रज्ञ डॉ. पुरुषोत्तम झंवर, डॉ. अनंत बडगुजर, डॉ. कृष्णा अंभुरे आदींनी केले आहे.
कापसावरील सध्या आढळून येत असलेली सुरुवातीच्या अवस्थेतील गुलाबी बोंडअळी 

सोयाबीन वरील चक्रीभुंगा

सोयाबीन वरील चक्रीभुंगा

सोयाबीनवरील कोंन्डीका
सोयाबीनवरील पाने खाणारी अळी