Friday, February 19, 2016

स्त्री- भ्रुण हत्या थांबविण्यासाठी तरूणांनी पुढाकार घ्यावा ...... शिवव्याख्याते प्रा. यशवंत गोसावी

वनामकृवित शिवजयंती उत्‍सव निमित्‍त आयोजित व्‍याख्‍यानमालेचे गुंफले तिसरे पुष्‍प

शत्रुही ज्‍यांचे गौरवाने नाव घेतात असे राजे शिवाजी, सर्वांना सोबत घेऊन जाणारा राजा होता. आज शिवाजी घडवायचा असेल तर जिजाऊ घडली पाहिजे, यासाठी स्‍त्रीयांचा आदर समाजाने केला पाहिजे, स्‍त्री-भ्रुण हत्‍या थांबल्‍या पाहिजेत, यासाठी तरूणांनी पुढाकार घ्‍यावा, असे प्रतिपादन पुणे येथील शिवव्‍याख्‍याते प्रा. यशवंत गोसावी यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या वतीने शिवजयंती उत्‍सव साजरा करण्‍यात येत असुन यानिमित्‍त आयोजित व्‍याख्‍यानमालेचे तिसरे पुष्‍प गुंफतांना दिनांक १९ फेब्रवारी रोजी ते बोलत होतेकार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण हे होतेव्‍यासपीठावर कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉडीएनगोखलेअन्‍नतंत्र महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा पी एन सत्‍वधर, गृहविज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्या प्रा विशाला पटणमविद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉमहेश देशमुखविद्यार्थी प्रतिनिधी प्रतिक पठाडेकृष्‍णा होगे यांची उपस्थिती होती.
शिवव्‍याख्‍याते प्रा. यशंवत गोसावी पुढे म्‍हणाले की, जगात महापुरूष कसे घडले, आजच्‍या तरूणांनी इतिहास वाचावा, अभ्‍यास करावा. शेतक-यांसाठी, समाजासाठी, दुर्बलासाठी तरूणांनी कार्य करावे. संस्‍कार विकत मिळत नसतात, यासाठी विचारपीठे उभे करावी लागतात, याच प्रकारचे विचारपीठ महाविद्यालय व विद्यापीठ उपलब्‍ध करू देतात, याचा विद्यार्थ्‍यांनी लाभ घ्‍यावा, असे ते म्‍हणाले.
अध्‍यक्षीय समारोपात शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण यांनी तरूणांनी विचारवंताचे विचार ग्रहण करावीत. विचारवंताची विचारच माणसाच्‍या जीवनाची दिशा बदलुन टाकतात असे सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन विद्यार्थ्‍यी विजय घाटुळ यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा विजय जाधव यांनी केले. कार्यक्रमास विद्यापीठातील प्राध्‍यापक, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्‍यी मोठया संख्‍येने उपस्थित होते.