Wednesday, March 31, 2021

समाजाची गरज असतांना योग्‍य वेळी रक्‍तदान ..... कुलगुरू मा डॉ अशोक ढवण

वनामकृवितील कृषी महाविद्यालयाच्‍या वतीने राष्‍ट्रीय सेवा योजनेंतर्गत रक्‍तदान शिबिर

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या विद्यार्थ्‍यी कल्‍याण अधिकारी कार्यालयात परभणी कृषी महाविद्यालयाच्‍या वतीने राष्‍ट्रीय सेवा योजनेंतर्गत दिनांक 31 मार्च रोजी रक्‍तदान शिबिराचे आयोजन करण्‍यात आले होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण हे होते तर शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, प्राचार्य डॉ सय्यद ईस्‍माईल, विद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख, शासकीय रक्‍तपेढीचे प्रमुख डॉ उदय देशमुख, श्री कुणाल चव्‍हाण, श्री मोतीराम चव्‍हाण आदींची प्रमुख उपस्थिती होती.

अध्‍यक्षीय भाषणात कुलगुरू मा डॉ अशोक ढवण म्‍हणाले की, आज थॅलेसिमिया व इतर रूग्‍नांना  रक्‍ताची मोठी गरज भासत आहे. करोना रोगाच्‍या प्रादुर्भाव परिस्थितीत रक्‍तदान करतांना मर्यादा येत आहेत. समाजाची गरज असतांना योग्‍य वेळी रक्‍तदान करून कृषिच्‍या विद्यार्थीनी सामाजिक बांधीलकी जपली, असे ते म्‍हणाले.   

डॉ उदय देशमुख म्‍हणाले की, रक्‍त देण्‍याची गरज नियमितपणे थॅलेसेमिया, गरोदर महिला, अनेमिया, अपघातात जखमी आदी रग्‍नांना जास्‍त असते. सद्यस्थिती राज्‍यात रक्‍ताचा तुडवटा जाणवत आहे,

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ अनुराधा लाड यांनी केले तर आभार डॉ अनंत बडगुजर यांनी मानले. यावेळी विद्यापीठातील 25 पेक्षा जास्‍त अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्‍यांनी रक्‍तदान केले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी डॉ विनोद शिंदे, डॉ सुहास देशमुख, डॉ आशाताई देशमुख, डॉ डि एफ राठौड आदींनी परिश्रम घेतले.

Saturday, March 27, 2021

वनामकृवि तर्फे दोन दिवसीय स्पर्धा परिक्षा ऑनलाईन प्रशिक्षण वर्ग

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि विद्या विभागाद्वारे व राष्ट्रीय कृषि उच्च शिक्षण प्रकल्प (नाहेप) सहकार्याने मागासवर्गीय पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या विषयज्ञान विकासासाठी “दोन दिवसीय ऑनलाईन मार्गदर्शन प्रशिक्षण वर्गाचे दिनांक २६ ते २७ मार्च दरम्यान आयोजित करण्‍यात आले असुन दिनांक २६ मार्च रोजी मार्गदर्शन वर्गाचे उदघाटन गुंटुर (आंध्रप्रदेश) येथील आचार्य एन. जी. रंगा कृषी विद्यापीठाचे अधिष्ठाता (कृषी) डॉ. प्रतापकुमार रेडडी, वनामकृविचे माजी विस्तार शिक्षण संचालक डॉ. जी. एस. जाधव यांच्‍या प्रमुख उपस्थित झाले तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संशोधन संचालक डॉ. डी. पी. वासकर हे उपस्थित होते. 

मार्गदर्शनात प्रमुख पाहुणे डॉ. प्रतापकुमार रेड्डी यांनी राष्‍ट्रीय पातळीवरील कृषि संशोधनाशी संबंधीत स्पर्धा परीक्षासाठी तयारी करतांना कशा प्रकारे नियोजन करावे याबाबत मार्गदर्शन केले. स्‍पर्धा परिक्षेची तयारी करतांना निश्चित ध्‍येय ठेवुन तयारी करावी. योग्‍यरित्‍या नियोजन करून तयारी केल्‍यास निश्चितच यश प्राप्‍त होते असे ते म्‍हणाले. तर डॉ. जी. एस. जाधव यांनी सदरिल मार्गदर्शन वर्गाचा विद्यार्थ्यांनी लाभ घेण्‍याचे आवाहन केले.

अध्यक्षीय समारोपात डॉ. डी. पी. वासकर म्‍हणाले की, स्‍पर्ध परिक्षेची तयारी करणा-या विद्यार्थ्‍यांकरता वेळोवेळी प्रश्नमंजुषा, चर्चासत्रे, अभ्यासवर्ग आदींचे आयोजन करावे. नावाजलेल्या संस्‍थेस व विद्यापीठांना भेटी देवून माहिती जाणून घ्यावी असे आवाहन करून मार्गदर्शन वर्ग आयोजीत केल्याबद्दल आयोजकांना शुभेच्छा दिल्या.

प्रास्‍ताविकात कृषिविद्या विभाग विभाग प्रमुख तथा आयोजक डॉ. बी. व्ही. आसेवार यांनी केले. सुत्रसंचलन डॉ. मिर्झा आय.ए.बी तर आभार प्रा. ज्योती गायकवाड यांनी म्‍हणाले. सदरिल प्रशिक्षण वर्गाचे आयोजन कुलगुरु मा डॉ अशोक ढवण व शिक्षण संचालक डॉ. डी. एन. गोखले यांच्‍या मार्गदर्शनानुसार करण्‍यात आले असुन दोन दिवसीय प्रशिक्षणात विद्यार्थ्यांना कनिष्‍ठ संशोधन फेलो, वरिष्‍ठ संशोधन फेलो, राष्‍ट्रीय पात्रता परिक्षा, कृषि संशोधन सहाय्यक आदी राष्‍ट्रीय पातळीवरील कृषिच्‍या स्पर्धापरीक्षाबाबत राष्ट्रीय पातळीवरील नामवंत तज्ञांचे मार्गदर्शन करणार आहेत. यात विद्यापीठातील डॉ. मिर्झा आय. ए. बी., तिरुपाथुर (तामीळनाडू) येथील फिनीक्स कोचिंग सेंटरचे डॉ. एम. जगदीश, जोधपुर (राजस्थान) येथील कृषी संशोधन केंद्राचे संशोधक डॉ. मुला राम, कानपुर येथील कृषी विद्याचे शास्‍त्रज्ञ डॉ. कांनचेती मृनालीनी आदींचे मार्गदर्शन लाभणार आहे.

Wednesday, March 24, 2021

तेलबिया संशोधनाच्‍या दृष्‍टीने वनामकृवि व हैद्राबाद येथील भारतीय तेलबिया संशोधन संस्था यांच्यात सामंजस्य करार

तेलबिया पिकांच्‍या संशोधन कार्य होणार अधिक वृध्दिंगत

तेलबिया संशोधनाच्‍या दृष्‍टीने हैद्राबाद येथील भारतीय तेलबिया संशोधन संस्था आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी यांच्यात दिनांक २२ मार्च रोजी सामंजस्य करार हैद्राबाद येथे करण्यात आला. सामंजस्य करार विद्यापीठाचे कुलगुरु मा. डॉ. अशोक ढवण यांच्‍या प्रमुख उपस्थिती करण्‍यात आला. सामंजस्‍य करारावर भारतीय तेलबिया संशोधन संस्थेच्‍या संचालिका डॉ. एम. सुजाता व विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर यांनी स्वाक्ष-या केल्या. यावेळी विद्यापीठातील लातुर येथील तेलबिया संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. एम. के. घोडके, संशोधन संपादक डॉ. मदन पेंडके, हैद्राबाद येथील शास्त्रज्ञ डॉ. सुधाकर बाबुडॉ. रत्नकुमार हे उपस्थित होते.

भारतीय तेलबिया संशोधन संस्‍था देशातील तेलबिया पिक संशोधनात अग्रगण्‍य संस्‍था असुन दोन संस्थांमध्ये होत असलेल्या संशोधन कार्यासाठी तसेच पदव्युत्तर व आचार्य अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या संशोधनासाठी हा सामंजस्य करार महत्‍वाचा ठरणार आहे. करारामुळे विद्यापीठांतर्गत असलेल्या कृषि जैवतंत्रज्ञान तसेच कृषि विद्याशाखेतील विविध विद्यार्थ्यांना भारतीय तेलबिया संशोधन संस्थाहैद्राबाद येथील विविध प्रयोगशाळेत संशोधनात्मक कार्य करता येणे शक्य होणार आहे. विद्यापीठास्तरावरील तेलबिया पिकांच्‍या संशोधन कार्य अधिक वृध्दिंगत होण्याच्या दृष्टीने या कराराचा फायदेशीर ठरणार आहे. यासोबतच दोन्ही संस्थांमध्ये विविध तंत्रज्ञानाचे देवाणघेवाण होणार आहे. भविष्यात दोन्ही संस्थांमार्फत एकत्रित संशोधन प्रकल्प सादर करण्यात येतील तसेच तेलबियांपासुन विविध मुल्यवर्धीत पदार्थ निर्मिती तंत्रज्ञान विविध महिला बचत गट व शेतकरी गटांना तांत्रिक मार्गदर्शन करण्यात येईल.

दिनांक २२ मार्च रोजी जागतिक जल दिनाचे औचित्य साधुन विद्यापीठाचे कुलगुरु मा. डॉ. अशोक ढवण यांचे कृषि क्षेत्रात पाण्याचा सुयोग्य वापर या विषयावर विशेष व्याख्यानही ऑनलाईन आयोजित करण्यात आले होते. यात देशातील विविध संशोधन केंद्र व संस्थेतील शास्‍त्रज्ञांनी सहभाग घेतला होतो.

मराठवाडयात कृषी प्रक्रिया उद्योगात मोठ्या संधी ...... कुलगुरू मा डॉ अशोक ढवण

वनामकृवितील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात आयोजित शेतमाल प्रक्रिया लघुउद्योग प्रशिक्षणाचे उदघाटन

देशांतर्गत शेतमाल प्रक्रिया आणि मुल्यवर्धनाचे प्रमाण इतर देशांच्या तुलनेत भारतात अत्‍यंत कमी असुन कृषी माल प्रक्रियेच्या अभावी अन्‍नधान्ये, भाजीपाला व फळे यांची मोठ्या प्रमाणात नासाडी होते. शेतमालेचे नुकसान टाळण्यासाठी छोटे छोटे कृषी उद्योग सुरु होणे आवश्यक आहे. मराठवाडयात कृषी प्रक्रिया उद्योगात मोठ्या संधी उपलब्ध असल्याचे मत कुलगुरू मा डॉ. अशोक ढवण यांनी व्‍यक्‍त केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्‍या कृषी प्रक्रिया अभियांत्रिकी विभाग यांचे तर्फे भारतीय कृषी अनुसंधान परिषद अनुदानित कौशल्य विकास योजने अंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गातील लाभार्थीकरिता “शेतमाल प्रक्रिया लघु उद्योग” याविषयावर दिनांक २३ ते २६ मार्च दरम्यान प्रशिक्षणाचे आयोजन करण्‍यात असुन दि. २३ मार्च रोजी प्रशिक्षणाचे उदघाटनाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर, मुख्‍य आयोजक सहयोगी अधिष्ठाता डॉ. उदय खोडके आदींची प्रमुख उपस्थिती होती.

आपल्‍या भाषणात शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले म्हणाले कि, अन्नधान्य, डाळ आणि अन्य शेतमाल यांचे प्रक्रिया करून आवश्यक पाकेजिंग केल्यास शेतकऱ्यांना निश्चितपणे अधिक आर्थिक मोबदला मिळतो. तर संचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकर मार्गदर्शनात म्‍हणाले की, आहारातील चिंच, अद्रक, लसून यावर प्रक्रिया करून त्यावर आधारित छोटे छोटे उद्योग सुरु करण्यास मराठवाडयात खूप वाव असल्याचे नमूद केले. सहयोगी अधिष्ठाता डॉ. उदय खोडके म्‍हणाले की, कृषी प्रक्रिया उद्योग याचा देशाच्या विकासातील सहभाग वाढत असून सध्या देशात २५ लाख असंघटीत प्रक्रिया उद्योग आहेत ज्यामुळे अनेकांना रोजगार निर्मितीच्या संधी उपलब्ध होत आहे.

प्रास्ताविक कृषी प्रक्रिया अभियांत्रिकी विभागाच्या प्रमुख व आयोजक डॉ. स्मिता खोडके यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा. मधुकर मोरे यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. प्रमोदिनी मोरे यांनी केले. सदरिल प्रशिक्षणात लघुउद्योग सुरु करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या विविध विषयावर जसे विविध शासकीय योजना, अर्थ सहाय्यासाठी बँक व इतर संस्थांची माहिती, प्रकल्प अहवाल तयार करणे यासह सोयबिन प्रक्रिया उद्याग, हळद व अद्रक प्रक्रिया, फळे व भाजीपाला प्रक्रिया, जवसापासून मूल्यवर्धित पदार्थ तयार करणे इ. माहिती व प्रात्यक्षिके घेण्यात घेणार असल्याचे सांगितले.याशिवाय विविध शेतमाल प्रक्रिया यंत्रे व सामुग्री, वेष्ठ्नीकरण, ब्रान्डईंग व विपणन यावर प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन होणार आहे. प्रशिक्षणात ३० पेक्षा जास्त पुरुष आणि महिलांचा अनुसूचित जाती प्रवर्गातील लाभार्थी सहभाग नोंदविलेला आहे. कार्यक्रमास महाविद्यालयातील विभागप्रमुख, प्राध्यापक व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.

वनामकृवित मधमाशी पालनावर तीन दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन

पिकामध्‍ये परागसिंचनात मधमाध्‍यांचे महत्‍वाचे स्‍थान ...... शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषी किटकशास्त्र विभागाच्‍या वतीने भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली अनुदानीत कौशल्य विकास आधारित अनुसूचित जाती उपयोजना अंतर्गत मधमाशी पालन या तीन दिवसीय प्रशिक्षनाचे  २३ ते २५ दरम्यान आयोजित करण्यात असुन दिनांक 23 मार्च रोजी प्रशिक्षणाचे उदघाटन शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले यांच्‍या हस्‍ते झाले. उपविभागीय कृषी अधिकारी श्री. सागर खटकाळे, विभाग प्रमुख डॉ.संजीव बंटेवाड, डॉ. पुरुषोत्तम नेहरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

मार्गदर्शनात डॉ धर्मराज गोखले म्‍हणाले की, पिकामध्‍ये परागसिंचनासाठी किटकसृष्‍टीतील मधमाध्‍यांचे महत्‍वाचे स्‍थान असुन शेतक-यांनी शेतीपुरक जोडधंद्या म्‍हणुन मधमाशी पालन केल्‍यास आर्थिकदृष्टया फायदा होऊन मधमाश्‍यांमुळे पिक उत्‍पादनात वाढ होते. मधामध्‍ये औषधी गुणधर्मा असुन औषधी उद्योगात मोठी मागणी आहे.

उपविभागीय कृषी अधिकारी श्री. सागर खटकाळे यांनी कृषि विभागा मार्फत सदरील मधमाशी पालनासाठी असलेल्या विविध शासकीय योजना व अनुदान याची माहिती सांगितली.

कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक डॉ.संजीव बंटेवाड यांनी केले. सुत्रसंचालन डॉ.फारीया खान यांनी केले तर डॉ. श्रद्धा धुरगुडे यांनी आभार मानले. तांत्रिक सत्रात डॉ. पुरुषोत्तम नेहरकर यांनी परागसिंचनासाठी कीटकसृष्टीतील मधमाश्यांचे स्थान व मधमाशांच्या प्रजाती यावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमास विभागातील डॉ. पुरुषोत्तम झंवर, डॉ धीरजकुमार कदम, डॉ. सदाशिव गोसलवाड, डॉ. मिलिंद सोनकांबळे, डॉ. बस्वराज भेदे, डॉ. अनंत लाड, डॉ. संजोग बोकन, डॉ. राजरतन खंदारे, श्री. दिपक लाड आदीसह प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.

Tuesday, March 23, 2021

वनामकृवित आयोजित काढणीपश्चात तंत्रज्ञान व अन्न प्रक्रिया यावरील प्रशिक्षणास सुरूवात

शेतकरी महिलांनी शेतमाल प्रक्रिया व मुल्‍यवर्धनाचे कौशल्‍य अवगत करून प्रक्रिया उद्योग सुरू करावेत ..... शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या अन्नतंत्र महाविद्यालयातील अन्न प्रक्रिया विभागाच्‍या वतीने भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली अनुदानीत कौशल्य विकास योजने अंतर्गत अनुसुचित जाती प्रवर्गातील महिला लाभार्थीसाठी दिनांक 22 मार्च ते 27 मार्च दरम्‍यान काढणीपश्चात तंत्रज्ञान व अन्न प्रक्रिया यावर सहा दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन प्रशिक्षणाचे उद्घाटन 22 मार्च रोजी करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले होते तर आयोजक प्राचार्य डॉ. उदय खोडके, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या परभणी जिल्हा समन्वयक श्रीमती निता अंभोरे, अन्न प्रक्रिया तंत्रज्ञान विभागाच्‍या विभाग प्रमुख डॉ. विजया पवार, डॉ.सुरेंद्र सदावर्ते आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

अध्यक्षीय भाषणात शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले म्हणाले की, पिक काढणी वेळेस बाजारातील आवक वाढल्यामुळे कमी किमतीत शेतकरी बांधवाना कच्च्या मालाची विक्री करावी लागते. शेतमालावर प्रक्रिया व मुल्यवर्धन केल्यास निश्चितच आर्थिक लाभ जास्‍त होऊन उन्‍नती साधता येते. शेतकामात महिलांचा प्रमुख वाटा असुन त्यांच्यात उपजतच कौशल्यामुळे पीक लागवड ते काढणीपर्यंत सर्व काम चांगल्‍या प्रकारे केले जाते. शेतमाल प्रक्रिया व मुल्‍यवर्धनाचे कौशल्‍य शेतकरी महिलांनी अवगत करून शेतमाल प्रक्रिया उद्योग सुरू करावेत, असा सल्‍ला  त्‍यांनी दिला.

मार्गदर्शनात श्रीमती निता अंभोरे म्हणाल्या की, अन्न प्रक्रिया उद्योगामध्ये महिला सक्षम होत असुन अन्न प्रक्रिया उद्योगासाठी लागणारा कच्चामाल, मनुष्यबळ उपलब्ध असल्यामुळे घरगुती आधुनिक यंत्र सामुग्रीचा वापर करुन अन्न प्रक्रिया गृहउद्योग सुरु करता येतील व त्यांच्या निर्यातीसाठी संधी उपलब्ध होतील. 

प्राचार्य डॉ. उदय खोडके यांनी अन्न प्रक्रिया उद्योगासाठी राज्यस्तरावरील अन्न प्रक्रिया व नियोजन या योजने बाबत माहिती दिली. तसेच जागतिक जल दिनानिमीत्त्त अन्नाबरोबर पाण्याचे महत्व नमुद केले. तसेच डॉ. विजया पवार यांनी सहा दिवसीय प्रशिक्षणाबाबत माहिती दिली.

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन दिपाली गजमल यांनी केले व आभार डॉ. सुरेंद्र सदावर्ते यांनी मानले. कार्यक्रमास डॉ. राजेश क्षिरसागर, डॉ. हेमंत देशपांडे, डॉ. दिलीप मोरे, डॉ. कैलास गाढे आदीसह महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. प्रशिक्षणासाठी ग्रामीण भागातील निवडक 30 अनुसुचित जातीच्या महिलांनी सहभाग नोंदविला आहे. प्रशिक्षणार्थीसाठी कोव्हिड-19 च्या नियमांचे पालन करत सर्व आवश्यक सामग्रीच्या किटचे मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

वनामकृविच्‍या वतीने आयोजित तण व्‍यवस्‍थापन प्रशिक्षणाचे उदघाटन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत कृषिविद्या विभागाद्वारे व राष्ट्रीय कृषि उच्च शिक्षण प्रकल्प (नाहेप) सहकार्याने मागासवर्गीय कृषि पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या विषयज्ञान विकासासाठी “एकात्मिक तण व्यवस्थापन तथा तणनाशकाचा कार्यक्षम वापर” या विषयावर तीन दिवसीय विशेष ऑनलाईन प्रशिक्षण दि. 23 ते 25 मार्च दरम्यान आयोजित केले असुन प्रशिक्षणाचा उदघाटन दिनांक 23 मार्च रोजी झाले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्‍हणुन जबलपूर येथील भारतीय तण विज्ञान संस्थेचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सुशिलकुमार हे उपस्थित होते तर अध्यक्षस्थानी परभणी कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सय्यद इस्माईल हे होते. आयोजक कृषिविद्या विभागाचे विभाग प्रमुख डॉ. बी.व्ही. आसेवार, नाहेप प्रकल्‍पाचे प्रमुख अन्वेषक डॉ. गोपाळ शिंदे आदींची प्रमुख उपस्थित होते.

मार्गदर्शनात डॉ. सुशिलकुमार म्‍हणाले की, सद्यस्थितीत तणामुळे उदभवणारे पीक नुकसान व तणनाशकांच्या अति वापराने होणारे दुष्परिणाम, सेंद्रीय शेतीमध्ये तण व्यवस्थापन, तणनाशकांना प्रतीकारक करणारी तणे आदी बाबींचा विचार केल्यास एकात्मिक तण व्‍यवस्‍थापन हाच योग्य पर्याय आहे. अध्यक्षीय समारोपात डॉ. सय्यद इस्माईल यांनी तणनाशकांच्या अयोग्य वापरामुळे जमीनीतील सुक्ष्म जीवावर विपरीत परिणाम घडवुन जमिनीचे जैविक आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता असते, त्यामुळे तणनाशकांचा योग्य प्रमाणात वापर आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले.

कार्यक्रमाच्‍या प्रास्‍ताविकात आयोजक डॉ. बी.व्ही. आसेवार प्रशिक्षणाबाबत माहिती दिली. सुत्रसंचालन सचिव डॉ. सुनिता पवार यांनी केले तर आभार डॉ. मिर्झा आय.ए.बी यांनी मानले. सदरिल प्रशिक्षणाचे आयोजन कुलगुरु मा डॉ. अशोक ढवण व शिक्षण संचालक डॉ. डी. एन. गोखले यांच्‍या मार्गदर्शनाखाली करण्‍यात आले असुन प्रशिक्षणात कौइमतुर येथील तामिळनाडु कृषि विद्यापीठातील कृषिविद्या विभागाचे प्रमुख डॉ. चिन्ना मुथु, डॉ. मुरली अर्थनारी, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. एन. सुनिता, अकोला कृषि विद्यापीठातील तण व्यवस्थापन संशोधन प्रकल्पाचे मुख्‍य शास्‍त्रज्ञ डॉ. जे. पी. देशमुख, संशोधन उपसंचालक डॉ. ए.एस. जाधव, वनस्पती शरीर क्रियाशास्त्रज्ञ डॉ. सुधीर आदी तज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. तीन दिवसीय प्रशिक्षणा दरम्यान विद्यार्थ्यांना तण व्यवस्थापन या विषयातील राष्ट्रीय पातळीवरील नामवंत तज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे, तरी कृषिच्‍या विद्यार्थ्यानी या संधीचा लाभ घ्यावा असे आयोजकांकडुन आवाहन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. विशाल अवसरमल, डॉ. मेघा जगताप, इंजि. रवीकुमार कल्लोजी, डॉ. अनिकेत वाईकर, डॉ. शिवराज शिंदे, रामदास शिंपले आदींनी सहकार्य केले.

Monday, March 22, 2021

माती सजीव ठेवण्‍यासाठी सेंद्रीय खतांचा वापर आवश्‍यक ..... शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले

वनामकृवित आयोजित सेंद्रीय खत निर्मिती तंत्रज्ञान यावरील पाच दिवसीय प्रशिक्षणाचे उदघाटन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील मृद विज्ञान व कृषि रसायनशास्‍त्र विभागाच्‍या वतीने  भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्‍ली अनुदानीत मानव विकास अनुसूचित जाती उपयोजना प्रकल्‍पांतर्गत पाच दिवसीय सेंद्रीय खत निर्मिती तंत्रज्ञानावरील महिला प्रशिक्षणाचे आयोजन दिनांक 22 मार्च ते 26 मार्च दरम्‍यान करण्‍यात आले असुन प्रशिक्षणाचे उदघाटन दिनांक 22 मार्च रोजी करण्‍यात आले. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले हे होते तर आयोजक प्राचार्य डॉ सय्यद ईस्‍माईल, महिला आर्थिक विकास म‍हा‍मंडळच्‍या परभणी जिल्‍हा समन्‍वयक श्रीमती निता अंभोरे, डॉ प्रविण वैद्य, डॉ हेमंत देशपांडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

अध्‍यक्षीय भाषणात डॉ धर्मराज गोखले म्‍हणाले की, शेतीत सेंद्रीय खतांचा वापर न करता केवळ रासायनिक खतांचा अति वापर केल्‍यामुळे दिवसेंदिवस मातीचे आरोग्‍य खालवत आहे , त्‍यामुळे पिकांच्‍या उत्‍पादनातही घट येत आहे. माती सजीव ठेवण्‍यासाठी सेंद्रीय खतांचा वापर अत्‍यंत आवश्‍यक असुन घरच्‍या घरी खत निर्मिती केल्‍यास कमी खर्चात खत उपलब्‍ध होईल. शेतकामात महिलांचाच मोठा वाटा असुन महिलांनी सेंद्रीय खत निर्मिती कौशल्‍य अवगत करून सेंद्रीय खत निर्मिती करावी, असा सल्‍ला त्‍यांनी दिला.

श्रीमती निता अंभोरे म्‍हणाल्‍या की, महिला बचत गटाच्‍या माध्‍यमातुन महिला सक्षम होत असुन शेती पुरक व्‍यवसायाचे कौशल्‍य अवगत करण्‍यासाठी सदरिल प्रशिक्षणाचा उपयोग होईल. महिलांनी शेती पुरक व्‍यवसाय सुरू करून आर्थिक समृध्‍दी साधावी.

प्रास्‍ताविकात डॉ सय्यद ईस्‍माईल यांनी सेंद्रीय व गांडुळ खताचे महत्‍व सांगुन मातीच्‍या आरोग्‍यावरच मानवाचे आरोग्‍य अवलंबुन असल्‍याचे म्‍हणाले. कार्यक्रमात मान्‍यवरांच्‍या हस्‍ते सेंद्रीय खत निर्मिती तंत्रज्ञान पुस्तिकेचे विमोचन  करण्‍यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ पपिता गौरखेडे यांनी केले तर आभार डॉ सुरेश वाईकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्‍वीतेकरिता डॉ अनिल धमक, डॉ रामप्रसाद खंदारे, डॉ स्‍वाती झाडे, डॉ संतोष चिक्षे, स्‍नेहल शिलेवंत, शशीशेखर जावळे आदींनी परिश्रम घेतले. प्रशिक्षणात ग्रामीण भागातील निवडक 20 अनुसूचित जातीच्‍या महिलांनी सहभाग नोंदविला आहे.

Sunday, March 21, 2021

ऑनलाईन सेंद्रीय शेती प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप

सेंद्रीय शेतीमध्ये स्थानिक निविष्‍ठाचा वापर करणे गरजेचे ..... डॉ. अे. एस. राजपुत

नागपूर येथील क्षेत्रीय जैविक शेती केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र आणि हैद्राबाद येथील शाश्वत शेती केंद्र यांचे संयुक्त विद्यमाने दिनांक १५ मार्च ते २१ मार्च दरम्यान सात दिवसीय ऑनलाईन सेंद्रीय शेती प्रशिक्षणाचे करण्‍यात आले होते, प्रशिक्षणाचा समारोपीय कार्यक्रम दिनांक २१ मार्च संपन्‍न झाला. कार्यक्रमाच्‍या अध्यक्षस्‍थानी जबलपूर येथील सेंद्रीय शेती प्रादेशिक केंद्राचे प्रादेशिक संचालक डॉ. अे. एस. राजपुत हे होते तर प्रमुख पाहूणे म्‍हणुन गाझियाबाद येथील राष्‍ट्रीय सेंद्रीय शेती केंद्राचे संचालक डॉ. गगनेश शर्मा, सहयोगी संचालक (बियाणे) डॉ. के. एस. बेग, नागपुर येथील विभागीय सेंद्रीयशेती केंद्राचे शास्‍त्रज्ञ डॉ वाचस्‍पती, प्रमुख अन्वेषक डॉ आनंद गोरे, डॉ जी व्‍ही रमणजानेयुलु आदींची प्रमुख उपस्थिती होती.

अध्‍यक्षीय भाषणात डॉ. अे. एस. राजपुत म्‍हणाले की, सेंद्रीय शेतीमध्ये स्थानिक निविष्‍ठाचा वापर करणे गरजेचे आहे. करोना रोगाच्‍या प्रार्दुभाव परिस्थीतीत सेंद्रीय उत्पादन विक्रिमध्ये ३० ते ३५ टक्के वाढ झाली असून भारत आशियामध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचलो आहे तर जगामध्ये आठव्‍या स्थानावरुन पाचव्या स्थानावर पोहोचलो असुन ही बाब सेंद्रीय शेतीकरिता महत्वाची आहे. तर प्रमुख पाहुणे डॉ. गगनेश शर्मा म्‍हणाले की, जमीन सजीव ठेवण्‍याकरिता सेंद्रीय शेतीची कास धरावी लागेल. शेतकरी बांधवानी केवळ सेंद्रीय शेती करू नये तर सेंद्रीय शेतमाल विक्रीचे ज्ञान अवगत करावे, सेंद्रीय शेतमाल प्रक्रिया करून उद्योजक बनावे

मार्गदर्शनात डॉ. के. एस. बेग म्‍हणाले की, जैविक शेती केल्यामुळे जमिनीची उपजाऊ क्षमता वाढते. सेंद्रीय शेतमाला मोठी मागणी असुन सेंद्रीय मालास बाजारपेठ सुविधा विकसित कराव्‍या लागतील. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक डॉ. आनंद गोरे यांनी केले. सुत्रसंचलन डॉ. प्रविण कापसे यांनी तर आभार डॉ. जी. व्ही. रामानजनेयुलु यांनी मानले.

सदरिल प्रशिक्षण वनामकृविचे कुलगुरु मा. डॉ. अशोक ढवण, गाझीयाबाद येथील राष्ट्रीय जैविक शेती केंद्राचे संचालक डॉ. गगनेश शर्मा व संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्‍यात आले होते. प्रशिक्षणात  महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, तामिळनाडू, तेलंगणा, आंध्रप्रदेश आदी राज्‍यातील तरुण शेतकरी बांधवानी सहभाग नोंदविला तसेच ऑस्ट्रेलिया आणि सौदी अरेबियातील भारतीय युवकांनी सहभागी घेतला. प्रशिक्षणात सेंद्रीय शेतीमध्ये पेरणी, वाण, लागवडीच्या पध्दती, कीड व रोग व्यवस्थापन, सेंद्रीय शेतीचे प्रमाणीकरण व सेंद्रीय मालाची प्रक्रिया इत्यादी विषयावर देशातील नामांकित संशोधन संस्था, स्वयंसेवी संस्था, आयसीएआर संस्थामधील तज्ञांनी मार्गदर्शन केले. प्रशिक्षण यशस्वीतेसाठी चंद्रकला, व्हिन्यासा, अभिजीत कदम, डॉ. सुनिल जावळे, श्रीधर पतंगे, सतिश कटारे, योगेश थोरवट आदींनी परिश्रम घेतले.

Saturday, March 20, 2021

वनामकृवित तेलबिया उत्‍पादन तंत्रज्ञान प्रशिक्षण संपन्‍न

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील अखिल भारतीय समन्‍वयीत करडई संशोधन प्रकल्‍पाच्‍या वतीने राष्‍ट्रीय तेलबिया उत्‍पादन अभियानांतर्गत दिनांक १९ मार्च रोजी तेलबिया उत्‍पादन तंत्रज्ञान या विषयावर प्रशिक्षण कार्यक्रम संपन्‍न झाला. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू डॉ अशोक ढवण हे होते तर प्रमुख अतिथी म्‍हणुन संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, महाबीजचे विभागीय व्‍यवस्‍थापक श्रीअरूण सोनोने हे उपस्थित होते.

अध्‍यक्षीय भाषणात कुलगुरू मा डॉ अशोक ढवण म्‍हणाले की, मराठवाडयात तेलबीया पिक लागवडीखालील क्षेत्र व उत्‍पादकता वाढीस मोठा वाव आहे. तेलबीया पिकांचे सुधारित लागवड तंत्रज्ञान तसेच काढणी पश्‍चात तंत्रज्ञानाचा शेतकरी बांधवामध्‍ये प्रसाराकरिता कृषि विज्ञान केंद्रे व विस्‍तार कृषि विद्यावेत्‍ता विशेष प्रयत्‍न करावेत. 

संशोधन संचालक डॉ वासकर यांनी विद्यापीठ विकसित तेलबीया पिकांचे वाण, त्‍यासाठीचे यांत्रिकीकरण, करडई व कारळ पिकांचे औषधी मुल्‍य व बाजार व्‍यवस्‍था याबाबत मार्गदर्शन केले.

कार्यक्रमात मान्‍यवरांच्‍या हस्‍ते करडई व कारळ लागवड तंत्रज्ञान या पुस्तिकेचे विमोचन करण्‍यात आले. तांत्रिक सत्रात डॉ एस बी घुगे, प्रा प्रितम भुतडा, डॉ संतोष पवार, डॉ जाधव यांनी करडई व कारळ पिकांचे वाण, लागवड तंत्रज्ञान,  किड रोग व्‍यवस्‍थापन याबाबत मार्गदर्शन केले. करडई संशोधन प्रकल्‍पाचे प्रभारी अधिकारी डॉ एस बी घुगे यांनी प्रास्‍ताविक केले तर सुत्रसंचालन प्रा प्रा प्रितम भुतडा यांनी केले. प्रशिक्षणास मराठवाडयातील कृषि विज्ञान केंद्रे व विद्यापीठांतर्गत विस्‍तार कृषि विद्यावेत्‍ता, महाबीज क्षेत्र अधिकारी, प्रगतशील शेतकरी प्रशिक्षणास उपस्थित होते.

Friday, March 19, 2021

वनामकृविच्‍या वतीने मौजे भोसा येथे शेतकरी मेळावा संपन्‍न

अनुसूचित जाती उपयोजनेंतर्गत कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांच्‍या हस्‍ते तुषार सिंचन संचाचे वाटप


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील अखिल भारतीय समन्‍वयीत सिंचन पाणी व्‍यवस्‍थापन संशोधन प्रकल्‍पाच्‍या वतीने अनुसूचित जाती उपयोजना अंतर्गत दिनांक १९ मार्च रोजी मौजे भोसा (ता मानवत जि परभणीयेथे शेतकरी मेळावा व तुषार सिंचन संच वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण हे होते तर संशोधन संचालक डॉ दत्‍त्‍प्रसाद वासकरमानवत पंचायत समिती सदस्‍य श्री दत्‍तराव जाधवसरपंच श्री सुभाषराव जाधवउपसरपंच श्री महादेव जाधव, प्रकल्‍पाचे मुख्‍य शास्‍त्रज्ञ डॉ अशोक कडाळेकृषि विद्यावेत्‍ता डॉ गजानन गडदे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

मार्गदर्शनात कुलगुरू मा डॉ अशोक ढवण म्‍हणाले कीअनेक गावात पाण्‍याची मुबलकता असतेपरंतु पाण्‍याचा काटेकोरपणे वापर करणे गरजेचे आहे. आधुनिक सिंचन पध्‍दती तुषार सिंचन व ठिंबक सिंचन पध्‍दतीचा वापर केल्‍यास पाण्‍याचे काटेकोरपणे वापर होऊन उत्‍पादन वाढ होते. विद्यापीठ विविध माध्‍यमातुन आधुनिक कृषी तंत्रज्ञान तळागाळातील शेतकरी बांधवापर्यंत पोहचविण्‍याकरिता प्रयत्‍नशिल असल्‍याचे ते म्‍हणाले.

संशोधक संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर म्‍हणाले कीउन्‍हाळयात जनावरांना चारा पिकांची कमतरता जाणवतेशेतकरी बांधवानी उन्‍हाळयातील चारा पिकांची लागवड करावी. विद्यापीठात विविध जातीचे चारापिकांची ठोंबे उपलब्‍ध असुन त्‍याचा वापर करावा.

प्रास्‍ताविकात डॉ अशोक कडाळे यांनी तुषार सिंचन संचाचा कार्यक्षम वापर करण्‍यासाठी सिंचनाकरिता तुषार सिंचन संचाचा सकाळी व संध्‍याकाळी वापर करण्‍याचा सल्‍ला दिला.

कार्यक्रमात कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांच्‍या हस्‍ते मौजे भोसा येथील निवडक ६ अनुसूचित जातीच्‍या महिला शेतकरी व शेतकरी बांधवांना तुषार सिंचन संचाचे वाटप करण्‍यात आले.  तर सुत्रसंचालन डॉ गजानन गडदे यांनी केले तर आभार श्री दत्‍तराव जाधव यांनी मानले. कार्यक्रमास गावातील शेतकरी बांधव व शेतकरी महिला उपस्थित होते. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी नंदकुमार गिरामविलास जाधवरत्‍नाकर पाटीलदेवेंद्र कु-हाबालु रणेर आदींनी परिश्रम घेतले.

Thursday, March 18, 2021

अधिक आर्थिक फायद्यासाठी पीक पध्दतीमध्ये बदल करणे आवश्यक ....... डॉ. दत्‍तप्रसाद वासकर

वनामकृविच्‍या वतीने मौजे आडगाव (ता. पालम जि. परभणी) येथे शेतकरी मेळावा संपन्‍न  

शेतकऱ्यांच्या शेतमालाचे उत्पादन आर्थिक उत्पन्न वाढीच्या दृष्टीने विद्यापीठाने विकसित केलेल्या विविध पीक पध्दती, पिकाचे वाण, शेतीतील आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करणे गरजेचे असुन पीक पध्दतीमध्ये बदल करावा लागेल, असे प्रतिपादन संचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकर यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील अखिल भारतीय कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प अंतर्गत असलेल्‍या कोरडवाहू एकात्मिक शेती पद्धती योजनाहैद्राबाद येथील केंद्रीय कोरडवाहू संशोधन संस्था यांचे संयुक्‍त विद्यममाने दिनांक १६ मार्च रोजी मौजे आडगाव (ता. पालम जि. परभणी) येथे शेतकरी मेळाव्‍याचे आयोजन करण्‍यात आले होते,  मेळाव्‍याच्‍या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्‍हणुन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. संतोष आळसे हे उपस्थित होते तर मुख्यशास्त्रज्ञ डॉ. वासुदेव नारखेडे, पालम तालुका कृषि अधिकारी श्री. आबासाहेब देशमुख, निवृत्त कृषि उपसंचालक श्री. पांडुरंग ब्याळे, उपसरपंच श्री रमाकांत पौडशेटे, मंडळ कृषि अधिकारी श्रीमती आश्विनी वणवे, मंडळ कृषि अधिकारी श्रीमती सविता गलांडे, कृषि सहाय्यक श्री. दादाराव आनंदराव, श्री. बाबुमियाँ शेख, रिलायन्स फाऊंडेशन प्रतिनिधी श्री प्रकाश साळुंके, मुख्याध्यापक श्री. त्र्यंबक ब्याळे आदींची उपस्थिती होती. 

मार्गदर्शनात डॉ. वासकर पुढे म्‍हणाले की, कोरडवाहू भागात पाण्‍यास मोठे महत्‍व आहे. पाण्याची उपलब्धता वाढविण्याच्या दृष्टीने विहीर तसेच कुपनलिका पुनर्भरण करणे गरजेचे असुन पावसाचे पाणी साठवण करण्यासाठी शेततळ्याचा अवलंब प्रत्येक शेतकऱ्याने करावा. कोरडवाहू परिस्थितीत बाजरा आणि जवस ही चांगले उत्‍पन्‍न देऊ शकते, याकरिता यापासुन मूल्यवर्धक पदार्थाची निर्मिती बाजारात विक्री करावी लागेल, असे मत त्‍यांनी व्‍यक्‍त केले.

भाषणात श्री. संतोष आळसे यांनी शासनाच्या विविध शेतीविषयक योजनांबाबत मार्गदर्शन केले. विकेल ते पिकेल या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी बाजारातील गरजेनूसार शेतीतील पीक पध्दतीमध्ये बदल करावा त्यातून नफा मिळवावा, असे आवाहन केले. श्री. पांडुरंग ब्याळे यांनी पाण्याची कमतरता, पावसाचा खंडकाळ, मजुरांची कमतरता आदीवर मार्गदर्शन केले तर श्री आबासाहेब देशमुख यांनी शासनाच्या शेतीविषयक विविध योजनांची माहिती दिली.

मेळाव्याचे तांत्रिक सत्रात आयोजक मुख्यशास्त्रज्ञ डॉ. वासुदेव नारखेडे यांनी पीक पीक पध्दती, एकात्मिक शेती पध्दतीमध्ये फळपीके, शेळीपालन, दुग्धव्यवसाय, कुक्कूटपालन चारा व्यवस्थापन यावर मार्गदर्शन केले तर कृषि अभियंता डॉ. मदन पेंडके यांनी विहीर कुपनलिका पुनर्भरण तंत्रज्ञान, रुंद वरंबा सरी (बीबीएफ) पध्दती यावर मार्गदर्शन केले.

हैद्राबाद येथील केंद्रीय कोरडवाहू संशोधन संस्था विद्यापीठातील अखिल भारतीय कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने मौजे आडगाव (ता. पालम जि. परभणी) येथे २०१८-१९ पासूनकोरडवाहू एकात्मिक शेती पद्धतीही योजना राबविण्यात येत असुन योजनेअंतर्गत गावातील २८ शेतकऱ्यांची निवड करण्यात आलेली आहे, यात २० कोरडवाहू   अल्पओलीताखालील शेतकऱ्यांचा समावेश आहे. या निवडीक शेतकऱ्यांना खरीप रब्बी हंगामात घेण्यात येणाऱ्या विविध पिकांचे विद्यापीठ विकसित वाणाचे बियाणे तसेच शेतकऱ्यांकडे उपलब्ध असलेल्या जनावरांचे दुग्ध उत्पादनवाढीसाठी खनिज मिश्रणाचेही वाटप करण्यात आले आहे. योजनेअंतर्गत शेतीशी जोडधंदे शेळीपालन कुक्कुटपालन यासंबंधीत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येते. यात एक हेक्टर क्षेत्रामध्ये एकात्मिक शेती पध्दतीचा वापर करुन शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या उत्पादनात आर्थिक उत्पन्नात वाढीच्या दृष्टीने कार्य सुरु आहेकार्यक्रमास आडगाव येथील शेतकरी गावकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती सारिका नारळे यांनी केले तर आभार श्रीमती आम्रपाली गुंजकर यांनी म्‍हणाले. मेळाव्याच्या आयोजनासाठी श्री. मल्लिकार्जुन ब्याळे, श्री. मोरेश्वर राठोड, श्री. सुमित सुर्यवंशी आदींनी परिश्रम घेतले.