Friday, May 27, 2022

नौकरी शोधनारे नव्‍हे तर नौकरी देणारे कृषी पदवीधर घडावीत..... प्राचार्य डॉ सय्यद ईस्‍माईल

कृषि महाविदयालय परभणी जिल्हयातील पंधरा गावात राबविणार ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम

ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमात कृषिच्‍या विद्यार्थ्‍यांना पदवीच्‍या पहिल्‍या तीन वर्षात प्राप्‍त केलेल्‍या ज्ञानाचा आणि कृषि तंत्रज्ञानाचा शेतकरी बांधवाच्‍या शेतात प्रत्‍यक्ष वापर करण्‍याच्‍या दृष्‍टीने प्रसार करावा. कृषी पदवी अभ्‍यासक्रमाच्‍या सातव्या सत्रात कृषि संलग्‍न व्‍यवसाय आणि कृषि निगडित कंपन्‍याचा अभ्‍यास करण्‍याची विद्यार्थ्‍यांना संधी आहे, यामुळे विद्यार्थ्‍यांमध्‍ये कृषी उद्योजकतेची बीजे रोवली जातील. भविष्‍यात केवळ नौकरी शोधनारे नव्‍हे तर नौकरी देणारे कृषी पदवीधर घडले पाहिजेत, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ सय्यद ईस्‍माईल यांनी केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील परभणी कृषी महाविद्यालयाच्‍या कृषि पदवीच्‍या  सातव्‍या सत्रात ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम (रावे) आणि कृषी औद्यागिक संलग्‍नता उपक्रम रा‍बविण्‍यात येतो. या उपक्रमात कार्यरत विद्यार्थ्‍यांना कृषिदुत व कृषिकन्‍या असे संबोधले जाते. या कृषिदुत व कृषिकन्‍यांकरिता दिनांक २६ मे रोजी प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले होते, कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानावरून ते बोलत होते. व्‍यासपीठावर रावे समन्‍वयक विभाग प्रमुख डॉ राजेश कदम, विभाग प्रमुख डॉ आर जी भाग्‍यवंत, विभाग प्रमुख डॉ संजीव बटेवाड, विभाग प्रमुख डॉ डिगांबर पेरके, सोयाबीन पैदासकार डॉ शिवाजी मेहत्रे, ज्‍वार पैदासकार डॉ के आर कांबळे, मध्‍यवर्ती रोपवाटीका प्रभारी डॉ संतोष बरकुले, शिक्षण विभागाचे प्रभारी डॉ रणजित चव्‍हाण आदींची प्रमुख उपस्थिती होती.

प्राचार्य डॉ सय्यद ईस्‍माईल पुढे म्‍हणाले की, अनेक प्रगतशील शेतकरी नाविन्‍यपुर्ण शेती करतात, त्‍यांच्‍या कडुन अनेक बाबी शिकण्‍याची संधी कृषिच्‍या विद्यार्थ्‍यांना आहे. शेतीतील शेतकरी बांधवाच्‍या समस्‍या जवळुन अनुभवयास मिळणार असल्‍याचे ते म्‍हणाले.

प्रास्‍ताविकात डॉ राजेश कदम म्‍हणाले की, पुढील चार महिने महाविद्यालयातील २३० विद्यार्थी पंधरा गावात ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कृषि तंत्रज्ञानावर आधारित विविध प्रात्‍यक्षिके दत्तक गावात घेणार असुन एक महिना विविध कृषि निगडित कंपन्‍यामध्‍ये काम करण्‍याची संधी मिळणार असल्‍याचे सांगुन रावे कार्यक्रमाबाबत सविस्‍तर माहिती देऊन मार्गदर्शन केले.

कार्यक्रमात डॉ आर जी भाग्‍यवंत, डॉ दिगांबर पेरके, डॉ संजीव बटेवाड, डॉ के आर कांबळे, डॉ शिवाजी मेहत्रे, डॉ संतोष बरकुले, डॉ रणजित चव्‍हाण आदींनी मार्गदर्शन केले. तांत्रिक सत्रात विविध विषयावर डॉ पी आर नेहरकर, इंजि. बी पी सावंत, ्‍ही बी न  डज्ञॅ जी भांग्‍यवंत डॉ विशाल अवसरमल, डॉ डि व्‍ही बैनवाड, डॉ महेश दडके, डॉ आर व्‍ही भालेराव, डॉ एस एल वाईकर, डॉ वानखेडे आदींनी मार्गदर्शन केले.  

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ प्रविण कापसे यांनी केले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी कार्यक्रम अधिकारी डॉ एस आर जक्‍कावाड, डॉ विक्रम घोळवे, डॉ अंबिका मोरे, डॉ स‍ुनिता पवार, डॉ अनंत लाड, डॉ आयएबी मिर्चा, डॉ एम एम सोनकांबळे, डॉ एस व्‍ही चिक्षे, डॉ जी एन गोठे, डॉ गोदावरी पवार, प्रा आर सी सावंत आदींनी कार्य केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील सातव्‍या सत्राचे विद्यार्थी कृषिदुत व कृषिकन्‍या मोठया संख्‍येने उपस्थित होते.

Wednesday, May 18, 2022

शेती व शेतकरी यांना समाजात आदराचे स्‍थान मिळाले पाहिजे .... कुलगुरू मा डॉ सुभाष पुरी

वनामकृवित आयोजित खरीप शेतकरी मेळाव्‍यात प्रतिपादन

मेळाव्‍यात शासन पुरस्‍कार प्राप्‍त शेतकरी बांधवाचा विद्यापीठाच्‍या वतीने सत्‍कार करण्‍यात आला 

मार्गदर्शन करतांना माजी कुलगुरू मा डॉ सुभाष पुरी 
अध्‍यक्षीय भाषण करतांना कुलगुरू मा डॉ प्रमोद येवले

देश कृषि तंत्रज्ञानाच्‍या आधारे शेतकरी बांधवाच्‍या परिश्रमातुन अन्‍नधान्‍यात स्‍वयंपुर्ण झाला. देशाने अन्‍नधान्‍य उत्‍पादनात उच्‍चांक गाठला. परंतु शेतकरी बांधवाच्‍या उत्‍पन्‍नात पाहिजे तशी वाढ झाली नाही. शेतक-यांपेक्षा शेतमालाचा व्‍यापारी मोठे होत आहेत, शेतकरी कुटुबांतीलच एखादी तरी व्‍यक्‍ती शेतमाल व्‍यापारी झाली पाहिजे. आज युवा पिढी शेती व्‍यवसायाकडे येत नाही. शेती करणा-या युवकांना समाजात मानाचे स्‍थान दिले जात नाही. शेती व शेतकरी यांना समाजात आदराचे स्‍थान मिळाले पाहिजे. समाजाची मानसिकता बदलण्‍याची गरज असल्‍याचे  प्रतिपादन इम्‍फाळ येथील केंद्रीय कृषि विद्यापीठ तसेच राहुरी येथील महात्‍मा फुले कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू मा डॉ सुभाष पुरी यांनी केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या सुवर्ण महोत्‍सवी जयंती निमित्‍त विस्‍तार शिक्षण संचालनालय व कृषि विभाग, महाराष्‍ट्र शासन यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने दिनांक १८ मे रोजी आयोजित खरीप शेतकरी मेळाव्‍याच्‍या उदघाटनाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा. डॉ. प्रमोद येवले होते तर व्‍यासपीठावर शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर, कुलसचिव डॉ धिरजकुमार कदम, प्रगतशील शेतकरी रेणवसिध्‍द लामतुरे, मुख्‍य शिक्षण विस्‍तार अधिकारी डॉ प्रशांत देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती.

माजी कुलगुरू डॉ सुभाष पुरी पुढे म्‍हणाले की, आज देशातील गोदामे अन्‍नधान्‍याने भरली असल्‍याने देशात शांती आहे. अन्‍यथा श्रीलंके सारखी स्थिती झाली असती. श्रीलंकेत कोणताही विचार न करता रासायनिक खत व औषधावर बंदी करून सेंद्रीय शेती करण्‍याचे बंधन शेतक-यांवर लादले, तेथे अन्‍नधान्‍याची मोठी कमतरता नि‍र्माण झाली. सेंद्रीय शेतीचे धोरण अभ्‍यासपुर्णपणे राबविण्‍याची गरज आहे. शेती निविष्‍ठाच्‍या दरात मोठी वाढ होत असुन उत्‍पादन खर्च वाढत आहे. हवामान बदलाचा मोठा परिणाम शेतीवर होत आहे, यावर संशोधनाच्‍या आधारे मार्ग काढावे लागतील.

अध्‍यक्षीय भाषणात कुलगुरू मा. डॉ. प्रमोद येवले म्‍हणाले की, कृषि तंत्रज्ञानाने देशात हरित क्रांती व धवल क्रांती झाली. परभणी कृषि विद्यापीठाने विविध पिकांचे अनेक वाण विकसित केले असुन अनेक तंत्रज्ञान शिफारसी शेतक-यांना दिला आहेत. मागील पन्‍नास वर्षात मराठवाडयातील कृषी विकासात विद्यापीठाााचे भरीव असे योगदान आहे. विद्यापीठावर शेतकरी बांधवांचा मोठा विश्‍वास आहे. विद्यापीठातील पन्‍नास टक्क्यांपेक्षा जास्‍त प्राध्‍यापक व शास्‍त्रज्ञांची पदे रिक्‍त असुन दर्जेदार कृषि शिक्षण व संशोधना करिता विद्यापीठातील ही पदे भरणे गरजेचे आहे. करोना रोगाच्‍या प्रादुर्भाव व लॉकडाऊन परिस्थितीतही शेती व शेतकरी थांबला नाही, कोठेही शेतमालाचा तुटवडा जाणवला नाही की शेतमालाची भाव वाढ झाली नाही. शेतकरीही करोना योध्‍दा प्रमाणे अविरत काम करत होता, असे मत त्‍यांनी व्‍यक्‍त केले.

मनोगतात प्रगतशील शेतकरी अभिमान आवचर म्‍हणाले की, शेतकरी बांधवाचा कृषी विद्यापीठावर मोठा विश्‍वास असुन शेतीतील शाश्‍वत उत्‍पादन वाढीचे तंत्रज्ञान विद्यापीठानेच  शेतक-यांना दिले आहे.

कार्यक्रमाच्‍या प्रास्‍ताविकात डॉ देवराव देवसरकर म्‍हणाले की, विद्यापीठ विकसित अनेक वाण शेतक-यांमध्‍ये प्रचलित असुन मराठवाडयात सोयाबीन व तुर पिकांच्‍या वाणाची मोठी लागवड केली जाते. बदलत्‍या हवामानात आंतरपिक पध्‍दती, एकात्मिक किड - रोग व्‍यवस्‍थापन तंत्रज्ञानाचा अवलंब करणे गरजेचे आहे.

कार्यक्रमात शासन पुरस्‍कार प्राप्‍त शेतीनिष्‍ठ शेतकरी बांधवाचा मान्‍यवरांच्‍या हस्‍ते शाल, श्रीफळ देऊन सत्‍कार करण्‍यात आला. मेळाव्‍यात आयोजित खरीप पिक परिसंवादात विविध विषयावर विद्यापीठ शास्‍त्रज्ञांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी आयोजित कृषि प्रदर्शनास मोठा प्रतिसाद दिला. मान्‍यवरांच्‍या हस्‍ते विद्यापीठ विकसित बियाणे विक्रीचे उदघाटन करण्‍यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ सुनिता पवार, डॉ प्रितम भुतडा, डॉ अरूण गुट्टे यांनी केले तर आभार मुख्‍य विस्‍तार शिक्षणाधिकारी डॉ प्रशांत देशमुख यांनी मानले. मेळाव्‍यास शेतकरी बांधव, महिला शेतकरी, कृषी विस्‍तारक, विद्यापीठातील प्राध्‍यापक, शास्‍त्रज्ञ, अधिकारी, कर्मचारी आदी मोठया संख्‍येने उपस्थित होते.

मेळाव्‍यात पुढील शासन पुरस्‍कार प्राप्‍त शेतीनिष्‍ठ शेतकरी बांधवाचा सत्‍कार करण्‍यात आला.

रावसाहेब ढगे (शिरसवाडी ता जि जालना), दत्‍तात्रय जाधव (उदंडवडगाव पो. मोरगाव ता जि बीड), नानासाहेब गायके (मु सुलातनाबाद ता गंगापुर जि औरंगाबाद), तात्‍यासाहेब गोरे (मुपो आंरगाव ता भुम जि उस्‍मानाबाद), सिकंदर जाधव (मु. जळगाव फेरण चिकलठाणा ताजि औरंगाबाद), सतिश खडके (मुपो वाघोली वरूड ता जि उस्‍मानाबाद), श्रीमती मेघाताई देशमुख (झरी), दिनकर पाटील (लातुर रोड), बालचंद्र घुनावत (मु पो लाखेगाव, पैठण), मल्लिकार्जुन सोनावणे (मु झरेगाव, ता जि उस्‍मानाबाद), अभिमान आवचर (वडवाडी, बोरखेड, बीड), प्रल्‍हाद गवारे (चिंचवडगाव वडवणी, बीड), पंजाबराव हारे (जवळगाव, अंबाजोगाई बीड), ओमकार मसकल्‍ले (महादेववाडी, देवणी, लातुर), मुरलीधर नागटिळक (मुरूड, लातुर), निवृत्‍ती दिडोरे (औरंगपुर, औरंगाबाद), सुचिता सिगारे (खेडगांव अंबड), चौरंगनाथ वाघमोडे (शिराळा, परंड), नागनाथ पाटील (लिंबाळवाडी नळगांव, चाकुर), आण्‍णसाहेब जगताप (सावरगांव, माजलगांव), अंबादास बनसोड (धावडा आमठाणा, औरंगाबाद), दत्‍तात्रय कदम (दहामदरी अर्धापुर), देवराव शिंदे (मुरसुल पुर्णा), राजेश इंगळे (माटेगाव कसाबखेडा, कन्‍नड), प्रभावती लामतुरे (तेर, उस्‍मानाबाद), सुदाम शिरवत (मुलानी वाडगाव पैठण), धोडीराम सुपारे (टाकळगाव देवगाव हदगांव), अभयकुमार काळुंके (रायपुर परतुर), प्रताप काळे (धानोरा काळे, पुर्णा), कृषी सहाय्यक वसंत कातबने आदींचा सत्‍कार करण्‍यात आला.

मेळाव्‍याचे उदघाटन करतांना मान्‍यवर
कृषी प्रदर्शनाचे उदघाटन करतांना मान्‍यवर

जैविक रोग व्‍यवस्‍थापन घडीपत्रिकेचे विमोचन करतांना

Saturday, May 14, 2022

वनामकृवित खरीप शेतकरी मेळावा व कृषी प्रदर्शनाचे आयोजन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या ५० व्‍या वर्धापन दिनानिमित्‍त विस्‍तार शिक्षण संचालनालय व कृषि विभाग, महाराष्‍ट्र शासन यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने खरीप शेतकरी मेळाव्‍याचे आयोजन दिनांक १८ मे बुधवार रोजी सकाळी ११.०० वाजता विद्यापीठातील विद्यार्थी कल्‍याण अधिकारी कार्यालया जवळील सुवर्ण जयंती दीक्षांत सभागृहात करण्‍यात आले आहे. मेळाव्‍याचे उदघाटन इम्‍फाळ येथील केंद्रीय कृषि विद्यापीठ तथा राहुरी येथील महात्‍मा फुले कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू मा डॉ सुभाष पुरी यांच्‍या हस्‍ते होणार असुन कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा. डॉ. प्रमोद येवले हे राहणार आहेत. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्‍हणुन पुणे येथील अटारीचे संचालक मा डॉ लाखन सिंग आणि महात्‍मा फुले कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू मा डॉ. राजाराम देशमुख यांची उपस्थिती लाभणार आहे. कार्यक्रमास राज्‍यसभा सदस्‍या मा. खासदार श्रीमती फौजिया खान, परभणी लोकसभा सदस्‍य मा. खासदार श्री संजय ऊर्फ बंडु जाधव, विधान परिषद सदस्‍य मा आमदार श्री सतीश चव्‍हाण, विधान परिषद सदस्‍य मा आमदार श्री विक्रम काळे, विधान परिषद सदस्‍य मा आमदार श्री विप्‍लव बाजोरिया, विधान परिषद सदस्‍य मा आमदार श्री. बाबाजानी दुर्राणी, विधानसभा सदस्‍य मा आमदार डॉ राहुल पाटील, पाथरी विधानसभा सदस्‍य मा आमदार श्री सुरेश वरपुडकर, जिंतुर विधानसभा सदस्‍या मा आमदार श्रीमती मेघनाताई बोर्डीकर, गंगाखेड विधानसभा सदस्‍य मा आमदार डॉ रत्‍नाकर गुट्टे आदींची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. 

मेळाव्‍यात आयोजित खरीप पिक परिसंवादात कापुस लागवड, सोयाबीन लागवड, कडधान्‍य लागवड, कीड व्यवस्‍थापन, हवामान आधारीत शेती सल्‍ला आदी विषयांवर विद्यापीठ शास्‍त्रज्ञ मार्गदर्शन करणार असुन शेतक-यांच्‍या कृषि विषयक प्रश्‍न व शंकाचे शास्‍त्रज्ञ निरासरनही करणार आहेत. याप्रसंगी कृषि प्रदर्शनीचेही आयोजन करण्‍यात आले असुन विद्यापीठ विकसित विविध तंत्रज्ञान आधारी दालनासह शेती निविष्‍ठांचे खासगी कंपन्‍या व बचत गटाच्‍या दालनाचा समावेश राहणार आहे. यावेळी मान्‍यवरांच्‍या हस्‍ते विद्यापीठ विकसित बियाणे विक्रीचे उदघाटनही होणार आहे. सदरिल मेळाव्‍यास जास्‍तीत जास्‍त शेतकरी बांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन विस्‍तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर, जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री विजय लोखंडे,  मुख्‍य विस्‍तार शिक्षण अधिकारी डॉ प्रशांत देशमुख आदींनी केले आहे.

Thursday, May 12, 2022

मा ना श्री आदित्‍य ठाकरे यांच्‍या कडुन वनामकृवितील अनुभवातुन शिक्षण प्रकल्‍पातील पदवी विद्यार्थ्‍यांच्‍या उपक्रमाची पाहणी

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील पशुसंवर्धन व दुग्‍ध तंत्रज्ञान विभागातील पदवी अभ्‍यासक्रमातील अनुभवातुन शिक्षण प्रकल्पाच्‍या दालनास राज्याचे पर्यटन, पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री मा.ना. श्री. आदित्य ठाकरे यांनी भेट देऊन पाहणी केली, यावेळी विद्यार्थींनी तयार केलेल्‍या दुग्धजन्य उत्पादनाची पाहणी केली, तसेच पदार्थींची चवही चाखली. मा ना श्री आदित्‍य ठाकरे यांनी विद्यार्थ्‍यांचे कौतुक केले. याप्रसंगी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री मा.ना. श्री. धनंजय मुंढे, मंत्री उच्च व तंत्र शिक्षण मा. ना. श्री. उदय सामंत, कुलगुरु मा. प्रा. डॉ. श्री. प्रमोद येवले, कुलसचिव डॉ. धिरजकुमार कदम, शिक्षण संचालक डॉ. डी. एन. गोखलेखासदार मा. श्री. संजय जाधव, आमदार परभणी मा डॉ. राहुल पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती. सदरिल विद्यार्थांना विभागाचे प्रमुख डॉ. गजेंद्र लोंढे, डॉ. नरेंद्र कांबळे, डॉ. शंकरजी नरवाडे, डॉ. दत्ता बैनवाड, डॉ. रमेश पाटील आदींचे मार्गदर्शन लाभले

Tuesday, May 10, 2022

वनामकृवित विज्ञान संकुलाचे मा ना श्री आदित्‍य ठाकरे यांच्‍या हस्‍ते भुमिपुजन संपन्‍न

 वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठत उभारण्‍यात येणा-या विज्ञान संकुलाचे भुमिपूजन सोहळा पर्यटन व पर्यावरण मंत्री मा ना श्री आदित्‍य ठाकरे यांच्‍या हस्‍ते दिनांक 10 मे रोजी संपन्‍न झाले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ व परभणी ऍस्‍ट्रॉनॉमिकल सोसायटी यांच्‍यात झालेल्‍या सामंजस्‍य करारानुसार विद्यापीठ परिसरातील नियोजित जागेवर भव्‍य विज्ञान संकुल उभारण्‍यात येणार असुन संकुल उभारणीसाठी पर्यटन व पर्यावरण मंत्री मा ना श्री आदित्‍य ठाकरे यांनी निधी उपलब्‍ध करून दिला आहे. याकरिता परभणीचे आमदार मा डॉ राहुल पाटील यांच्‍या पुढाकारातुन निधी उपलब्ध झाला आहे. 

याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात मा ना श्री आदित्‍य ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी व्‍यासपीठावर सामाजिक न्‍याय मंत्री तथा परभणी पालकमंत्री मा ना श्री धनंजय मुंडे, उच्‍च व तंत्र शिक्षण मंत्री मा ना श्री उदय सामंत, परभणीचे खासदार मा श्री संजय जाधव, हिंगोलीचे खासदार मा श्री हेमंत पाटील, परभणीचे आमदार मा श्री राहुल पाटील, प्रभारी कुलगुरू मा डॉ प्रमोद येवले, मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्री शिवानंद टाकसाळे, अप्‍पर जिल्‍हाधिकारी श्री राजेश काटकर, परभणी ऍस्‍टॉनॉमिकल सोसायटीचे अध्‍यक्ष डॉ रामेश्‍वर नाईक, शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, कुलसचिव डॉ धीरजकुमार कदम आदींची प्रमुख उपस्थिती होती.

मार्गदर्शनात पर्यटनमंत्री मा ना श्री आदित्‍य ठाकरे म्‍हणाले की, आज समाजास रोजगार, पाणी आदींची गरज आहे. सर्वांनी राजकारणाच्‍या पुढील विचार केला पाहिजे. केवळ शिक्षणच समाजाला व देशाला पुढे नेऊ शकेल. परभणीतील विज्ञान संकुल देशातील पहिलेच भव्‍य संकुल असेल यास कोणत्‍याही प्रकारचा निधी कमी पडु दिला जाणार नाही. ग्रामीण भागातील विद्यार्थ्‍यांमध्‍ये जागतिक पातळीचे शास्‍त्रज्ञ घडण्‍याची क्षमता आहे. या विज्ञान संकुलामुळे भावी जागतिक शास्‍त्रज्ञ ग्रामीण भागातुन घडतील, हा अत्‍यंत अभिनव उपक्रम आमदार डॉ राहुल पाटील यांच्‍या संकल्‍पनेतुन साकारत आहे. परभणी हे 'जगात जर्मनी अन भारतात परभणी' असे न घेता जगात परभणी' असे नावारूपाला येईल. परभणी कृषि विद्यापीठातील डिजिटल तंत्रज्ञानावरील प्रकल्‍पामुळे शेतकरी बांधवाचे कष्‍ट कमी करणारे यंत्र विकसित होत आहेत.

भाषणात मा ना श्री धनंजय मुंडे म्‍हणाले की, परभणी कृषि विद्यापीठाने डिजिटल शेत तंत्रज्ञान निर्मितीमध्‍ये पुढाकार घेतला आहे. विद्यापीठाचे अनेक विद्यार्थी प्रशासनात विविध पदावर कार्यरत आहेत. मराठवाडात मोठया प्रमाणावर पर्यटन विकासास वाव आहे. विज्ञान संकुलास पालकमंत्री म्‍हणुन निधी कमी पडु देणार नसल्‍याचे आश्‍वासन त्‍यांनी दिले.   

मा ना श्री उदय सामंत म्‍हणाले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्‍यांमध्‍ये वैज्ञानिक दृष्‍टीकोन विकसित व्‍हावा याकरिता अकृषि विद्यापीठातही विज्ञान संकुलाची संकल्‍पना राबविण्‍याचा प्रयत्‍न केला जाईल.

खासदार मा श्री संजय जाधव म्‍हणाले की, आज विज्ञानाचे युग असुन  परभणीतील विज्ञान संकुल उभारणारे देशातील पहिलेच कृषि विद्यापीठ असेल. परभणी पर्यटन विकासास मोठा वाव असुन मा ना श्री आदित्‍य ठाकरे याकरिता प्रयत्‍न करावेत असे म्‍हणाले.

आमदार मा डॉ राहुल पाटील म्‍हणाले की, मनोरंजन, शिक्षण आणि रोजगार ही तीन उद्दीष्‍ट डोळयासमोर ठेऊन देशातील भव्‍य असे जागतिक दर्जाचे विज्ञान संकुल परभणी साकारत आहे, याकरिता पर्यटन मंत्री मा ना श्री आदित्‍य ठाकरे यांनी भरीव असा निधी दिला आहे.  नवीन राष्‍ट्रीय शैक्षणिक धोरणात बहुशाखीय शिक्षणास प्राधान्‍य देण्‍यात आले असुन यास अनुरूप हे विज्ञान संकुल असणार आहे. यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्‍यांमध्‍ये वैज्ञानिक दृष्‍टीकोन वाढीस लागणार आहे.

प्रभारी कुलगुरू मा डॉ प्रमोद येवले म्‍हणाले की, परभणी कृषि विद्यापीठाने गेल्‍या पन्‍नास वर्षात कृषि विकासात भरीव असे योगदान दिले असुन आज विद्यापीठापुढे मनुष्‍यबळाची कमतरता असुन लवकर नौकर भरतीची आवश्‍यकता असल्‍याचे ते म्‍हणाले. 

प्रास्‍ताविकात डॉ रामेश्‍वर नाईक म्‍हणाले की, परभणीतील विज्ञान संकुलात सर्व विज्ञान एकाच छत्राखाली पाहण्‍यास मिळणार आहे. यामुळे समाजात विज्ञानवादी दृष्‍टीकोन वाढीस लागणार आहे. सुत्रसंचालन डॉ रणजित चव्‍हाण आणि डॉ दुर्गादास डोंबे यांनी केले. यावेळी परभणी ऍस्‍ट्रॉनॉमिकल सोसायटीने राबविलेल्‍या विविध वैज्ञानिक उपक्रमांची आणि तांबट शॉर्ट फिल्‍मचे सादरीकरण करण्‍यात आले. तसेच डे टाईम ऍस्‍ट्रॉनॉमी मध्‍ये सुर्यदर्शन व सौर डाग यांचे निरीक्षण करण्‍यात आले. इग्नायटेड माईंडस या विद्यार्थी गटांनी तयार केलेल्‍या रिसर्च पेलोड सॅटॅलाईट चे प्रक्षेपण करण्‍यात आले. कार्यक्रमास विद्यापीठातील प्राध्‍यापक, अधिकारी, कर्मचारी, विज्ञानप्रेमी, विद्यार्थी व नागरिक मोठया संख्‍येने उपस्थित होते.


Saturday, May 7, 2022

डॉ अशोक ढवण हे मातीशी नाते जपणारे व्‍यक्‍तीमत्‍व ....... कृषिरत्‍न मा श्री विजयअण्‍णा बोराडे

वनामकृवित माजी कुलगुरू मा. डॉ अशोक ढवण यांचा निरोप समारंभ तर प्रभारी कुलगुरू मा. डॉ प्रमोद येवले यांचा स्‍वागत समारंभ संपन्‍न

डॉ अशोक ढवण एक संवेदनशील व्‍यक्‍तीमत्‍व पण तेवढेच कठोर प्रशासक म्‍हणुन कार्य केले. डॉ ढवण यांचे विद्यापीठाचे विद्यार्थी ते कुलगुरू असा विद्यापीठाशी असलेले प्रदीर्घ नाते आहे. डॉ ढवण मातीशी नाते जपणारे व्‍यक्‍ती असुन हे भविष्‍यातही शेतकरी व शेती विकास याच क्षेत्रात ते आपले योगदान देतील. मागील पन्‍नास वर्षाच्‍या कार्यकाळात परभणी कृषी विद्यापीठाने मराठवाडयातील कृषि क्षेत्रास भरीव असे कार्य केले. सोयाबीन, कापुस, तुर आदी पिकांचे विविध अधिक उत्‍पादक वाण तसेच बायोमिक्‍स सारख्‍या निविष्‍ठा विद्यापीठाने विकसित केल्‍या. डॉ ढवण यांच्‍या संकल्‍पनेतुन विद्यापीठ विकसित बियाणे व निविष्‍ठा विंकेद्रीत स्‍वरूपात विक्रीमुळे मराठवाडयातील प्रत्‍येक जिल्‍हयातील शेतकरी बांधवाना याचा लाभ होत आहे, असे प्रतिपादन मराठवाडा शेती सहाय्य मंडळाचे विश्‍वस्‍त कृषीरत्‍न मा श्री विजयअण्‍णा बोराडे यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांचा कार्यकाळ दिनांक ६ मे रोजी पुर्ण झाला. महाराष्‍ट्राचे राज्‍यपाल तथा वनामकृविचे कुलपती मा श्री भगतसिंह कोश्‍यारी यांनी विद्यापीठाच्‍या कुलगुरूपदी औरंगाबाद येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ प्रमोद येवले यांची नियुक्‍ती केली आहे. मा डॉ प्रमोद येवले यांनी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांच्‍या कडुन दिनांक ६ मे रोजी पदभार स्‍वीकारला. यानिमित्‍त विद्यापीठाच्‍या वतीने दिनांक ६ मे रोजी कृतज्ञता आणि स्‍वागत समारंभाचे आयोजन करण्‍यात आले होते,  या कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षीय भाषणात मा श्री विजयअण्णा बोराडे बोलत होते. व्‍यासपीठावर मा डॉ अशोक ढवण व त्‍यांच्‍या सुविद्य पत्‍नी सौ. उषाताई ढवण, नुतन कुलगुरू मा डॉ प्रमोद येवले, विधान परिषद सदस्‍य तथा विद्यापीठ कार्यकारणी सदस्‍य मा आमदार श्री सतिश चव्‍हाण, परभणी विभानसभा सदस्‍य तथा विद्यापीठ कार्यकारणी सदस्‍य मा आमदार डॉ राहुल पाटील, नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक मा श्री निसार तांबोळी, कवि प्रा इंद्रजित भालेराव, शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर, कुलसचिव डॉ धिरजकुमार कदम, नियंकत्र श्रीमती दिपाराणी देवतराज आदींची व्‍यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.

सत्‍कारास उत्‍तर देतांना कुलगुरू मा डॉ अशोक ढवण म्‍हणाले की, जीवनात नैतिकता अत्‍यंत महत्‍वाची असुन कोणत्‍याही परिस्थितीत नैतिकता मार्ग सोडु नका. सामुदायिक प्रयत्‍नाने कोणतीही संस्‍था उभी राहते. शेतकरी व विद्यार्थ्‍यांकरिता समर्पित भावनेने कार्य करा. परभणी कृषी विद्यापीठाचा विद्यार्थी ते कुलगुरू पदापर्यंतच्‍या प्रवासात अनेकांनी सहकार्य केले. कुलगुरू पदाच्‍या कार्यकाळात कृषी विद्यापीठ निर्मित बियाणे केवळ परभणी मुख्‍यालयी विक्री न करता, मराठवाडयातील प्रत्‍येक जिल्‍हयात विकेंद्रित स्वरूपात विक्री व्‍यवस्‍था केली. विद्यापीठात मर्यादित मनुष्‍यबळ असुन सर्वांच्‍या प्रयत्‍नातुन बिजोत्‍पादनात वाढ झाली केली तसेच विद्यापीठ महसुलात वाढ झाली. गेल्‍या चार वर्षाच्‍या काळात स्‍वच्‍छ विद्यापीठ, हरित विद्यापीठ, सुरक्षित विद्यापीठ उपक्रम सर्वांच्‍या सामुदायिक प्रयत्‍नातुन यशस्‍वीपणे राबविली. याचा लाभ भविष्‍यातही होणार आहे.

नुतन कुलगुरू मा डॉ प्रमोद येवले आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, परभणी कृषि विद्यापीठात मागील पन्‍नास वर्षात अनेक चांगले संशोधन कार्य झाले. विद्यापीठाचे संशोधन हे जागतिक दर्जेचे आणि समाजभिमुख असले पाहिजे. विद्यापीठाने शेतकरी व समाजाच्‍या अपेक्षा कितपत पुर्ण केल्‍या यांचे वेळोवेळी मुल्‍याकंन झाले पाहिजे, असे मत त्‍यांनी व्‍यक्‍त केले.

मा आमदार श्री सतिश चव्‍हाण म्‍हणाले की, डॉ अशोक ढवण यांनी विद्यापीठात समर्पित भावनेने कार्य केले. विद्यापीठासमोर असलेल्‍या अनेक अडचणीत खंबीरपणे निर्णय घेतले. विद्यापीठाचे हितास त्‍यांनी प्रथम प्राधान्‍य दिले.   

मा आमदार डॉ राहुल पाटील, डॉ अशोक ढवण हे आदर्शवत व शिस्‍तप्रिय व्‍यक्‍तीमत्‍व असुन संस्‍थेच्‍या हिता करिता एकनिष्‍ठेने कार्य केले. नवीन शैक्षणिक धोरताना बहुशाखीय शिक्षणास प्राधान्‍य असुन याचा विचार करून विद्यापीठात आंतरराष्‍ट्रीय दर्जेचे विज्ञान संकुल उभारण्‍याचे काम त्‍यांच्‍या प्रयत्‍न होत आहे.  

मा श्री निसार तांबोळी म्‍हणाले की, डॉ अशोक ढवण यांनी विद्यापीठात प्रदीर्घ अशी सेवा दिली. आजच्‍या तरूण पिढीपुढे एक शिस्‍तप्रिय व आदर्श व्‍यक्‍तीमत्‍व असुन अनेक अडचणीत गुणवत्‍ता टिकवुन ठेवण्‍याचा त्‍यांनी प्रयत्‍न केला.

कवि प्रा इंद्रजित भालेराव म्हणाले की, कुलगुरूपद हा काटेरी मुकुट असतो. अनेक विरोध सहन करून डॉ ढवण यांनी आपली कारकीर्द यशस्वी केली. ग्रामीण भागातुन शेतकरी कुटूंबातुन शिक्षण घेऊन विद्यापीठाचा विद्यार्थी ते कुलगुरू असा प्रवास निश्चितच इतरांना प्रेरणादायी आहे. त्‍यांनी आयुष्याची प्रेरणादायी कथा आत्मकथनातून लोकांसमोर मांडावी, अशी अपेक्षा त्‍यांनी व्‍यक्‍त केली.

कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्‍यवरांच्‍या हस्‍ते माननीय कुलगुरू डॉ अशोक ढवण यांचा शाल श्रीफल देऊन सपत्‍नीक सत्‍कार करण्‍यात आला तसेच अनेक मान्‍यवरांनी आपले मनोगत व्‍यक्‍त केले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक कुलसचिव डॉ धिरजकुमार कदम यांनी केले. सुत्रसंचालक डॉ रणजित चव्‍हाण यांनी केले तर आभार डॉ प्रविण कापसे यांनी मानले. कार्यक्रमास प्रगतशील शेतकरी श्री कांतराव देशमुख, श्री रविंद्र देशमुख, डॉ रामेश्‍वर नाईक, डॉ दिवाण आदीसह विविध महाविद्यालयाचे प्राचार्य, विभाग प्रमुख, विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी मोठया संख्‍येने उपस्थित होते.

Friday, May 6, 2022

वनामकृविचे प्रभारी कुलगुरू मा डॉ प्रमोद येवले यांनी स्‍वीकारला पदभार

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांचा कार्यकाळ दिनांक ६ मे रोजी पुर्ण झाला. महाराष्‍ट्राचे राज्‍यपाल तथा वनामकृविचे कुलपती मा श्री भगतसिंह कोश्‍यारी यांनी विद्यापीठाच्‍या कुलगुरूपदी औरंगाबाद येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ प्रमोद गोंविदराव येवले यांची नियुक्‍ती केली आहे. मा डॉ प्रमोद येवले यांनी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांच्‍या कडुन दिनांक ६ मे रोजी पदभार स्‍वीकारला. यावेळी विधान परिषद सदस्‍य तथा विद्यापीठ कार्यकारणी सदस्‍य मा आमदार श्री सतिश चव्‍हाण, परभणी विभानसभा सदस्‍य तथा विद्यापीठ कार्यकारणी सदस्‍य मा आमदार डॉ राहुल पाटील, नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक मा श्री निस्‍सार तांबोळी, कुलसचिव डॉ धिरजकुमार कदम, श्री रविंद्र देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती.

पुरस्कार प्राप्त शेतकरी बांधवाचा विद्यापीठाच्‍या वतीने सत्कार

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राच्‍या वतीने महाराष्ट्र शासन कृषि विभाग पुरस्कार प्राप्त शेतकरी बांधवाचा सत्कार दिनांक ६ मे रोजी कुलगुरू मा डॉ. अशोक ढवण यांच्या हस्‍ते करण्‍यात आला. यावेळी संचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकर, कुलसचिव डॉ. धिरजकुमार कदम, नियंत्रक श्रीमती दीपाराणी देवतराज, प्रमुख अन्‍वेषक डॉ. आनंद गोरे, डॉ. रणजीत चव्हाण, डॉ. पपीता गौरखेडे, डॉ. मिनाक्षी पाटील आदींची उपस्थिती होती.

परभणी जिल्‍हयातील पुरस्‍कार प्राप्‍त शेतकरी श्री. ओंकारनाथ शिंदे रा. सनपुरी (सन २०१७, कृषिभूषण पुरस्कार – सेंद्रीय शेती), श्री. बाबासाहेब रनेर, रा. बाभळगाव, ता. पाथरी (सन २०१८, कृषिभूषण पुरस्कार – सेंद्रीय शेती), श्रीमती मेघाताई देशमुख (सन २०१९, जिजामाता कृषिभूषण पुरस्कार), रा. झरी, श्री. देवराव शिंदे (सन २०१९, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार), रा. मरसुल, ता. पुर्णा व श्री. प्रतापराव काळे (सन २०१९, उद्यान पंडित पुरस्कार) रा. धानोरा (काळे), ता. पुर्णा आदींचा कुलगुरू मा डॉ. अशोक ढवण यांच्या हस्ते पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ देऊन संन्मान करण्यात आला.

मार्गदर्शनात मा डॉ. अशोक ढवण म्हणाले की, पुरस्कार प्राप्त शेतकरी बांधवाचा आदर्श इतर शेतक­यांनी घेतला प‍ाहिजे. विद्यापीठ शास्त्रज्ञ सदैव शेतक­यांना मार्गदर्शनासाठी कार्यतत्पर राहण्‍याचा सल्‍ला त्‍यांनी दिला. मनोगतात श्री. ओंकारनाथ शिंदे यांनी शेतक­यांनी शेतीशी एकनिष्ठ असणे आवश्यक असुन सेंद्रीय शेती करत असतांना सातत्य ठेवणे गरजेचे असल्‍याचे म्‍हणाले तर श्री. प्रतापराव काळे म्हणाले की, सेंद्रीय शेती प्रकल्पातर्फे आयोजित तीस दिवसीस राज्यस्तरीय सेंद्रीय प्रशिक्षण कार्यक्रमामुळे देशभरातील सेंद्रीय शेती पध्‍दतीची माहिती झाली. तसेच श्रीमती मेघाताई देशमुख म्हणाल्या की, विद्यापीठाचे जे तंत्रज्ञान आहे ते शेतक­यांपर्यंत पोहचवणे आवश्यक आहे.

कार्यक्रमाचे प्रास्तविक डॉ. आनंद गोरे यांनी केले. सुत्रसंचलन डॉ. प्रितम भुतडा यांनी केले तर आभार डॉ. मिनाक्षी पाटील यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी दिपक शिंदे, डॉ.सुनिल जावळे, अभिजित कदम, सतिश कटारे, भागवत वाघ, दशरथ गरुड, सचिन रनेर, विठ्ठल खटींग, दत्ता खटींग आदींनी परिश्रम घेतले.



Thursday, May 5, 2022

वनामकृविच्‍या प्रभारी कुलगुरूपदी मा डॉ प्रमोद येवले

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांचा कार्यकाळ दिनांक ६ मे रोजी संपत आहे. महाराष्‍ट्राचे राज्‍यपाल तथा वनामकृविचे कुलपती मा श्री भगतसिंह कोश्‍यारी यांनी विद्यापीठाच्‍या कुलगुरूपदी औरंगाबाद येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ प्रमोद गोंविदराव येवले यांची नियुक्‍ती केली आहे. मा डॉ प्रमोद येवले यांच्‍याकडे ७ मे २०२२ पासुन पुढील आदेशापर्यंत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्‍या कुलगुरू पदाचा अतिरिक्‍त पदभार राहणार आहे. महाराष्‍ट्राचे राज्‍यपाल यांनी ४ मे २०२२ रोजी काढलेल्‍या आदेशात म्‍हटले आहे की, महाराष्‍ट्र कृषी विद्यापीठे (कृ‍षी विद्यापीठ) अधिनियम, १९८३ च्‍या कलम १७ (४) अन्‍वये अधिकारांच्‍या वापर करताना, औरंगाबाद येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ. प्रमोद येवले यांची वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू म्‍हणुन नियुक्‍ती केली आहे. 

Tuesday, May 3, 2022

देशातील कृषी विद्यापीठे स्वावलंबी आणि स्वयंपूर्ण झाली पाहिजे...... मा डॉ आर सी अग्रवाल

वनामकृवितील नाहेप प्रकल्‍प अंतर्गत विविध स्‍मार्ट प्रयोगशाळेचे उदघाटन

आयआयटी खरगपुर आणि वनामकृवित सामंजस्‍य करार

नवीन शैक्षणिक धोरणानुसार कृषि शिक्षणात बदल होत असुन यामुळे संपुर्ण कृषि शिक्षण परिसंस्‍थेत आमुलाग्र बदल होत आहेत. दर्जेदार शिक्षणाकरिता देशातील कृषि विद्यापीठे अनेक विदेशीतील व देशातील नामांकीत संस्‍थेशी सामंजस्‍य करार करित आहेत, याचा लाभ विद्यार्थ्‍यांना होणार आहे. नाहेप प्रकल्‍पाच्‍या माध्‍यमातुन विद्यार्थीमधील शेती उपयुक्‍त डिजिटल तंत्रज्ञान व कौशल्‍य वृध्‍दींगत होत आहेत. देशातील कृषि विद्यापीठ जागतिक दर्जेचे विद्यापीठे झाली पाहिजे. देशातील कृषी विद्यापीठे स्वावलंबी आणि स्वयंपूर्ण झाली पाहिजे, असे प्रतिपादन नाहेप प्रकल्‍पाचे राष्‍ट्रीय समन्‍वयक तथा आयसीएआरचे उपमहासंचालक मा डॉ आर सी अग्रवाल यांनी केले. 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील नवी दिल्‍ली येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषद पुरस्‍कृत राष्‍ट्रीय कृषि उच्‍च शिक्षण प्रकल्‍प (नाहेपच्‍या विविध स्‍मार्ट प्रयोगशाळेचे आणि उपक्रमाचे मा डॉ आर सी अग्रवाल यांच्‍या हस्ते दिनांक ३ मे रोजी उदघाटन करण्‍यात आले, याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण हे होते तर शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, कुलसचिव डॉ धिरजकुमार कदम, प्रकल्‍प अन्‍वेषक डॉ गोपाल शिंदे, प्राचार्य डॉ उदय खोडके, पुणे येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे डॉ एस एस ओहल आदींची प्रमुख उपस्थिती होती.

मार्गदर्शनात डॉ आर सी अग्रवाल पुढे म्‍हणाले की, ऑनलाईन शिक्षणाच्‍या माध्‍यमातुन समाजातील शेवटच्‍या विद्यार्थ्‍यांपर्यंत पोहचण्‍याचा प्रयत्‍न केला जात आहे. संपुर्ण देशात व्‍हर्च्‍युअल क्‍लासरूम व अॅग्रीदीक्षा वेब एज्‍युकेशन चॅनलमुळे कृषी शिक्षणाची गुणवत्‍ता वाढणार आहे. यामुळे देशातील व परदेशातील चांगल्‍या कृषी शास्‍त्रज्ञ व प्राध्‍यापकांची व्‍याख्‍याने देशभरातील कृषी पदवीधरांना एकाच प्‍लॅटफॉर्मवर पाहता येणार आहे.  देशातील अनेक कृषी विद्यापीठात मनुष्‍यबळाची कमतरता असुन व्‍हर्च्‍युअल क्‍लासरूम मुळे काही प्रमाणात यावर मात करणे शक्‍य आहे, असे मत त्‍यांनी व्‍यक्‍त करून परभणी कृषि विद्यापीठातील नाहेप प्रकल्‍पातील राबविण्‍यात येत असलेल्‍या विविध उपक्रमाचे कौतुक केले.

अध्‍यक्षीय भाषणात कुलगुरू मा डॉ अशोक ढवण म्‍हणाले की, करोना रोगाच्‍या प्रादुर्भाव व लॉकडाऊन परिस्थितीत नाहेप प्रकल्‍पामुळे ऑनलाईन माध्‍यमातुन परभणी कृषि विद्यापीठाचे तंत्रज्ञान प्रसाराचे आणि अध्‍यापनाचे कार्य अविरत चालु राहीले. नाहेप अंतर्गत वॉशिग्‍टन स्‍टेट विद्यापीठ, आयआयटी खरगपुर, आयआयटी मुंबई आदी जगातील अग्रगण्‍य संस्‍थाशी सामजंस्‍य करार मुळे विद्यार्थी, प्राध्‍यापक, शास्‍त्रज्ञ यांना जागतिक दर्जेचे शिक्षणाची संधी प्राप्‍त होणार आहे. 

याप्रसंगी नाहेप प्रकल्‍पा अंतर्गत विकसित केलेल्‍या व्‍हर्च्‍युअल क्‍लासरूम व अॅग्रीदीक्षा वेब एज्‍युकेशन चॅनल, स्‍वयंचलित हवामान माहिती यंत्रणा, स्‍मार्ट शेती यंत्र कार्यशाळा, स्‍मार्ट शेडनेट, अत्‍याधुनिक स्‍मार्ट पॉलीहाऊस, एआय अॅन्‍ड मेच्‍याट्रोनिक्‍स लॅब, स्‍वयंचलित अन्‍न प्रक्रिया प्रयोगशाळा, तणनाशक मोबाइल अॅप, ईएसपी मोबाईल अॅप, आंतरराष्‍ट्रीय नियतकालिका आदींचे उदघाटन मा डॉ आर सी अग्रवाल यांच्‍या शुभहस्‍ते करण्‍यात आले. 

शिक्षण व संशोधनाकरिता आभासी माध्‍यमातुन आयआयटी खरगपुर यांच्‍याशी सामंजस्‍य करार करण्‍यात आला, यावेळी  आयआयटी खरगपुर चे संचालक डॉ व्‍ही के तिवारी, डॉ टि के भट्टाचार्य, डॉ राजेंद्र माचेवरम आदींची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी डॉ व्‍ही के तिवारी म्‍हणाले की, तंत्रज्ञानाच्‍या जोरावर शेतीतील अनेक समस्‍या सुटू शकतात, सदर सामंजस्‍य करारामुळे विद्यापीठातील पदव्‍युत्‍तर विद्यार्थ्‍यांच्‍या संशोधनास मदत होणार आहे.

कार्यक्रमाच्‍या प्रास्‍ताविकात डॉ गोपाल शिंदे परभणी कृषि विद्यापीठात राबविण्‍यात येत असलेल्‍या नाहेप प्रकल्‍पातील विविध उपक्रमाची माहिती दिली. सुत्रसंचालन डॉ विणा भालेराव यांनी केले तर आभार डॉ कैलास डाखोरे यांनी मानले. कार्यक्रमास विभाग प्रमुख डॉ भगवान आसेवार, डॉ राजेश कदम, डॉ कल्‍याण आपेट, डॉ हिराकांत काळपांडे, डॉ प्रविण वैदय, डॉ नेहारकर आदीसह विद्यापीठातील प्राध्‍यापक, शास्‍त्रज्ञ, अधिकारी कर्मचारी व विद्यार्थी मोठया संख्‍येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्‍वीतेकरिता डॉ गोदावरी पवार, डॉ दयानंद टेकाळे, डॉ बी एस आगरकर, डॉ मेघा सुर्यवंशी, डॉ संतोष फुलारी, डॉ सुनिता पवार आदीसह नाहेप प्रकल्‍पातील संशोधक, अभियंता व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.