Friday, January 31, 2020

कापूस पिकातील संशोधनाबद्दल विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. डी. बी. देवसरकर यांना राष्ट्रीय पुरस्कार

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. डी. बी. देवसरकर यांना भुवनेश्‍वर येथील ओरिसा कृषि व तंत्रज्ञान विद्यापीठात "कापूस पिकाच्या समस्या व उपाययोजना'' यावर दिनांक २२ ते २४ जानेवारी दरम्यान आयोजित राष्ट्रीय परिसंवादात कापूस पिकातील उल्लेखनीय संशोधन कार्याबद्दल प्राफेशनल एक्सलन्स पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे. परिसंवादात ओरिसा कृषि व तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ. आर. के. अग्रवाल व उद्यपुर येथील महाराणा प्रताप कृषि व तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ. एन. एस. राठोड यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सदरिल परिसंवादाचे आयोजन कापूस संशोधन व विकास संघटना, हिस्सार आणि भारतीय कृषि संशोधन परिषद, नवी दिल्ली यांच्यातर्फे करण्यात आले होते.
विद्यापीठाचे कपाशीचे देशी वाण, अमेरिकन सरळ व संकरित वाण विकसीत करण्‍यात डॉ. डी. बी. देवसरकर यांनी कापूस पैदासकार आणि कापूस विशेषज्ञ म्हणून मोलाचे योगदान आहे. यात एनएचएच २०६, एनएचएच २५० व एनएचएच ७१५ हे अमेरिकन संकरित कपाशीचे वाण व एनएच ६१५ व एनएच ६३५ हे अमेरिकन कपाशीचे सरळ वाण मध्य भारतासाठी लागवडीकरिता प्रसारीत करण्यात आले. पीएचए ४६, पीए १८३, पीए ०८, पीए ५२८ व पीए ७४० हे  देशी कापूस वाण प्रसारित करण्यात त्यांनी मोलाचा वाटा उचलला आहे. बी टी कापूस उत्पादन तंत्रज्ञान, एकात्मीक कीड व रोगांच्या व्यवस्थापनावर संयुक्त संशोधन समिती मार्फत विविध शिफारशी करण्यात मोलाचा सहभाग आहे. या शिफारशी पीक प्रात्यक्षीके, शेतकरी मेळावे, कृषि प्रदर्शने, कृषि दिंडी इत्यादी माध्यमाद्वारे शेतक-यांपर्यत पोहचविण्याचे कार्यही त्यांनी केले आहे. त्‍यांनी आचार्य व पदव्‍युत्‍तर पदवीच्‍या विद्यार्थ्‍यांना संशोधन मार्गदर्शक म्हणून काम केले असुन आंतरराष्‍ट्रीय व राष्‍ट्रीय नियतकालीकात मध्‍ये संशोधनपर व इतर माध्‍यमातुन मराठी लेखांचे लिखान केले आहे. तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिसंवादामध्ये सहभाग नोंदवून संशोधन लेखांचे सादरीकरण केले.

पाथरी तालुक्‍यातील मौजे वडी येथे शेतकरी मेळावा संपन्‍न

ऊस लागवड ठिबक पध्‍दतीने करण्‍याचा डॉ यु एन आळसे यांचा सल्‍ला
कृषि विभाग, परभणी व वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या वतीने दिनांक 28 जानेवारी रोजी पाथरी तालुक्‍यातील मौजे वडी येथे शेतकरी मेळाव्‍याचे आयोजन करण्‍यात आले होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी सरपंच श्री शिवाजीराव कुरे हे होते तर कार्यक्रमास जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री संतोष आळसे, कृषि विद्यावेत्‍ता डॉ यु एन आळसे, प्रा एस एस शिंदे, तालुका कृषि अधिकारी श्री व्‍ही ए शिंदे, कृषि अधिकारी श्री नांदे, कृषि पर्यवेक्षक श्री गिराम, श्री चव्‍हाण आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मार्गदर्शनात डॉ यु एन आळसे म्‍हणाले की, यावर्षी मोठया प्रमाणात पाऊस झाला असुन जायकवाडी प्रकल्‍पातुन शेतीसाठी चार आवर्तन पाणी सोडण्‍यात येणार आहेत, यामुळे शेतक-यांचा नगदी पिक म्‍हणुन ऊस लागवडीकडे मोठा कल आहे. परंतु शेतकरी बांधवानी ठिबक पध्‍दतीने ऊस लागवड करण्‍याचा सल्‍ला देऊन ठिबक पध्‍दतीने ऊस लागवड केल्‍यास 40 टक्के पाण्‍यात बचत होऊन उत्‍पन्‍नात 20 टक्के वाढ होते, असे ते म्‍हणाले.
जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री संतोष आळसे यांनी नानाजी देशमुख कृषि संजीवणी प्रकल्‍पाबाबत माहिती देऊन शेतक-यांनी या प्रकल्‍पाचा लाभ घेण्‍याचे आवाहन केले. या प्रकल्‍पात वैयक्तिक लाभाबरोबरच नैसर्गिक साधनसंपत्‍तीचे व्‍यवस्‍थापन करण्‍यासाठी भरपुर निधी उपलब्‍ध असल्‍याचे सांगितले. यात फळबाग लागवड, ठिबक व तुषार सिंचन, शेडनेट, शेती औजारे, पाईप, मोटार आदीसह शेतीपुरक जोडधंदे शेळीपालन व कुक्कटपालन आदींबाबीचा समाविष्‍ठ असल्‍याचे सांगितले. प्रा एस एस शिंदे यांनी विद्यापीठाच्‍या संशोधन, शिक्षण व विस्‍तार शिक्षण कार्याबाबत माहिती दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कृषि अधिकारी श्री नांदे यांनी केले आभार श्री चव्‍हाण यांनी मानले. मेळाव्‍यास गावातील शेतकरी मोठया संख्‍येने उपस्थित होते.

Monday, January 27, 2020

कृषि विद्यापीठाच्‍या तंत्रज्ञानामुळे आदिवासी शेतक-यांच्‍या जीवनाचा कायापालट.......कुलगुरू मा डॉ अशोक ढवण

कळमनुरीतील आदिवासी बहुल मौजे वाई येथे शेतकरी मेळावा संपन्‍न

परभणी कृषि विद्यापीठाने आदिवासी उपप्रकल्‍पांतर्गत आदिवासी बहुल मौजे वाई गाव दत्‍तक घेऊन गेल्‍या पाच वर्षापासुन कृषि तंत्रज्ञान विस्‍ताराचे कार्य करीत आहे, आज या गावातील शेती व शेतक-यांच्‍या जीवनाचा कायापालट झाला असुन गावांतील आदिवासी शेतक-यांच्‍या शेतीतील उत्‍पादन व उत्‍पन्‍नात भरिव अशी वाढ झाली. विशेषत: पाणी व्‍यवस्‍थापनाचे तंत्रज्ञानाच्‍या आधारे सोयाबीन, गहु, हरभरा, हळद, ऊस आदी पिकांच्‍या उत्‍पादनात दुप्‍पटीपेक्षा जास्‍त वाढ झाली. यामुळे आदिवासी शेतक-यांचा सामाजिक व आर्थिक स्‍तर उंचावला आहे, ही विद्यापीठासाठी अभिमानाची बाब, असे प्रतिपादन कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांनी केले. 
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील अखिल भारतीय समन्‍वयीत संशोधन प्रकल्‍पातंर्गत पाणी व्‍यवस्‍थापन योजनेमार्फत आदिवासी उपप्रकल्‍पाच्‍या वतीने हिंगोली जिल्‍हयातील कळमनुरी तालुक्‍यातील वाई गावात दिनांक 26 जानेवारी रोजी आयोजित शेतकरी मेळाव्‍यात ते बोलत होते. व्‍यासपीठावर संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकरसरपंच शकुराव मुकाडे, प्रकल्‍पाचे मुख्‍य शास्‍त्रज्ञ डॉ अशोक कडाळे, संशोधन उपसंचालक डॉ अशोक जाधव, शास्‍त्रज्ञ डॉ गजानन गडादे, श्री राम कडाळे, श्री कैलास कडाळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कुलगुरू मा डॉ अशोक ढवण पुढे म्‍हणाले की, प्रकल्‍पापुर्वी गावातील शेतकरी केवळ खरिप हंगामातच पिक लागवड करीत होते तसेच इतर वेळी गावातील वृध्‍द सोडता शेतकरी व युवक मोठया प्रमाणात ऊसतोडीकरिता स्‍थलांतर करत होते. पंरतु प्रकल्‍पातंर्गत गावातील आदिवासी शेतक-यांना आधुनिक ठिंबक व तुषार सिचंन संचाचे वाटप करण्‍यात आले व त्‍याचा शेतकरी बांधवानी कार्यक्षमरित्‍या वापर केला. आज अनेक आदिवासी शेतकरी हळद व ऊस या नगदी पिकांकडे वळाले असुन गाव रोजगाराची वाढ झाली, गावांतुन होणारे ऊसतोडीसाठीचे स्‍थलांतर पुर्णपणे थांबले आहे. ऐवढेच नव्‍हे तर गावातील शेतक-यांचा शेतीकडे पाहण्‍याचा दृष्‍टीकोन पुर्णपणे बदलला आहे. गावातील कच्‍च्‍या घरांची जागी पक्‍क्‍या घरांनी घेतली असुन गावातील मुलामुलींचा शिक्षणातही प्रगती झाल्‍याचे दिसून येत आहे. ऐवढयावरच कृषि विद्यापीठ थांबणार नसुन गावातच शेतीपुरक जोडधंदे व शेतमाल प्रक्रिया उद्योगास चालना देण्‍यासाठी विद्यापीठ प्रयत्‍न करणार असल्‍याचे आश्‍वासन त्‍यांनी दिले. 
मार्गदर्शनात संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर मौजे वाई गांवात परभणी कृषि विद्यापीठाने गेल्‍या पाच वर्षात राबविलेल्‍या कृषि तंत्रज्ञान विस्‍तार कार्यामुळे गावात मोठा बदल झाला असुन कृषि तंत्रज्ञानाची गंगाच गावात अवतरली असे म्‍हणाले.
सरपंच श्री शकुराव मुकाडे आपल्‍या मनोगतात म्‍हणाले की, परभणी कृषि विद्यापीठाच्‍या प्रयत्‍नामुळे आदिवासी शेतक-यांचे जीवन समृध्‍दीकडे वाटचाल करित असून विद्यापीठ शास्‍त्रज्ञ व आदिवासी शेतकरी यांचे नात दृढ झाले आहे. तर मनोगतात माजी सरपंच श्री नामदेव लाखाडे म्‍हणाले की, विद्यापीठाने वाटप केलेल्‍या तुषार व ठिबक सिचंन संचामुळे व पाणी व्‍यवस्‍थापन तंत्रज्ञानामुळे गावातील 180 हेक्‍टर बागायती जमिनीत वाढ होऊन 478 हेक्‍टर जमिन बागायती झाली, विशेषत: ही जमीन खडकाळ व मुरमाड आहे. 
मेळव्‍यात तीन तुषार सिंचन संचाचे तर 16 आदीवासी शेतक-यांना ठिबकच्‍या उपनळयाचे मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्‍यात आले. यावेळी शिवार फेरीच्‍या माध्‍यमातुन दत्‍तक शेतक-यांच्‍या शेतात राबविण्‍यात येत असलेल्‍या विविध पिक प्रात्‍यक्षिके व उपक्रमास कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांनी भेट देऊन शेतक-यांशी मुक्‍त संवाद साधला.
कार्यक्रमाचे प्रास्‍ताविकात डॉ अशोक कडाळे यांनी आदिवासी उपप्रकल्‍पांतर्गत मौजे वाई गावांत राबविण्‍यात येत असलेल्‍या विविध कार्याची माहिती दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री प्रकाश पतंगे यांनी केले तर आभार डॉ गजानन गडदे यांनी मानले. कार्यक्रमास डॉ के आर कांबळे, डॉ स्मिता सोंळकी, डॉ लक्ष्‍मणराव जावळे, डॉ अनुराधा लाड आदीसह गावातील शेतकरी बांधव व भगिनी मोठया संख्‍येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी नंदुकमार गिराम, प्रभाकर सावंत, देवेंद्र कु-हा, अंजली इंगळे, प्रकाश मोते, कृषी पर्यवेक्षक नंदु वाईकर, कृषि सहाय्यक माधव मोटे आदीसह गावक-यांनी परिश्रम घेतले. मेळाव्‍यास गावातील शेतकरी बांधव व भगिनी मोठया संख्‍येने उपस्थित होते.


वनामकृवित प्रजासत्‍ताक दिन साजरा

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या मुख्‍य प्रांगणात कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांच्‍या हस्‍ते ध्‍वजारोहण करून प्रजासत्‍ताक दिन साजरा करण्‍यात आला. यावेळी कुलसचिव श्री रणजित पाटील, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले आदीसह विविध महाविद्यालयाचे प्राचार्य, विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्‍यी मोठया संख्‍येने उपस्थित होते. यावेळी भारताच्‍या संविधानामधील उद्देशिकेचे कुल‍सचिव श्री रणजित पाटील यांच्‍या मार्गदर्शनाखाली सामुहिकरित्‍या वाचन करण्‍यात आले.
कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांनी प्रजासत्‍ताक दिनांच्‍या सर्वांना शुभेच्‍छा देऊन देशाला कल्‍याणकारी राष्‍ट्र निर्मितीसाठी अन्‍न सुरक्षा व पोषण सुरक्षेची गरज असुन हे उद्देष्‍ट साध्‍य करण्‍यासाठी कृषि विद्यापीठाची निर्णायक भुमिका आहे, यासाठी आपणास सर्वांना आपले योगदान द्यावे लागेल असे ते म्‍हणाले. याप्रसंगी छात्रसेना अधिकारी डॉ जयकुमार देशमुख यांच्‍या मार्गदर्शनाखाली छात्रसैनिकांनी मान्‍यवरांना मानवंदना दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री उदय वाईकर यांनी केले.  

Friday, January 24, 2020

परभणी कृषि विद्यापीठास सर्वसाधारण विजेतेपद तर उपविजेतेपद राहुरी संघास

वनामकृवित आयोजित महाराष्ट्र राज्य कृषि विद्यापीठे व महाबीज कर्मचारी क्रीडा स्पर्धेचा समारोप 
संतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात आयोजित राज्‍यातील चारही कृषि विद्यापीठे व महाबीज यांच्‍या राज्‍यस्‍तरिय कर्मचारी क्रीडा स्‍पर्धेत परभणी कृषि विद्यापीठाने सर्वसाधारण विजेतेपद तर उपविजेतेपद राहुरी संघाने पटकावले. 
स्‍पर्धेचा समारोप दिनांक 24 जानेवारी रोजी झाला, कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलसचिव श्री रणजित पाटील होते तर प्रमुख पाहुणे म्‍हणून परभणी जिल्‍हा बॅडमिंटन असोशियनचे सचिव श्री रविंद्र देशमुख हे उपस्थित होते. व्‍यासपीठावर महाबीजचे विभागीय व्‍यवस्‍थापक श्री गणेश चिरूडकर, राहुरीचे विद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉ गायकवाड, अकोलाचे डॉ कुबडे, आयोजक विद्यार्थ्‍यी कल्‍याण अधिकरी डॉ महेश देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती
अध्‍यक्षीय भाषणात कुलसचिव श्री रणजित पाटील यांनी खेळामुळे दैनंदिन कामात उत्‍साह व ऊर्जा टिकून राहतो, कामातील ताण कमी होते असे म्‍हणाले तर प्रमुख पाहुणे श्री रविंद्र देशमुख आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, कामाच्‍या व्‍यापात आपण आपल्‍या आरोग्‍याकडे दुर्लक्ष करतो, परंतु खेळामुळे शारिरीक क्षमता टिकून राहते.
या राज्‍यस्‍तरिय क्रीडा स्‍पर्धेत अकोला येथील डॉ पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, राहुरी येथील महात्‍मा फुले कृषि विद्यापीठ, दापोली येथील डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, यजमान वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ व अकोला येथील महाबीज येथील दोनशे पेक्षा जास्‍त कर्मचारी सहभागी झाले होते. यावेळी स्‍पर्धेतील विजेत्‍यास मान्‍यवरांच्‍या हस्‍ते बक्षीस वितरण करण्‍यात आले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक डॉ महेश देशमुख यांनी केले. सुत्रसंचालन डॉ पपिता गौरखेडे यांनी केले तर आभार श्री अशोक खिल्‍लारे यांनी मानले. कार्यक्रमास स्‍पर्धेक खेळाडु, विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी मोठया संख्‍येने उपस्थित होते.

स्‍पर्धेचे निकाल
सांघीक खेळात पुरूष गटात क्रिकेट स्‍पर्धेत वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ विजेता ठरला तर महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरीचा संघ उपविजेता ठरला. व्हॉलीबॉल स्‍पर्धेत परभणी विद्यापीठ व अकोला विद्यापीठ हे संयुक्तपणे विजेते ठरले. कबड्डीदापोली कृषि विद्यापीठाने प्रथमस्‍थान तर व्दितीयस्‍थान महाबीज, अकोलाने पटकावले. बास्केटबॉल स्‍पर्धेत परभणी विद्यापीठ प्रथम ठरला तर राहुरी विद्यापीठ व्दितीय ठरली. बॅडमिंटन स्‍पर्धेत परभणी कृषि विद्यापीठाने प्रथम तर दापोली विद्यापीठाने व्दितीय स्‍थान पटकावले तसेच टेबल टेनिस स्‍पर्धेत राहुरी कृषि विद्यापीठ प्रथम तर दापोली कृषि विद्यापीठ व्दितीय ठरली. बुध्दीबळमध्‍ये परभणी विद्यापीठ संघ विजेता तर दापोली कृषि विद्यापीठ संघ उपविजेता ठरला तर रस्सीखेचमध्‍ये दापोली कृषि विद्यापीठ विजेता तर उपविजेता राहुरी कृषि विद्यापीठ संघ ठरला.
सांघीक खेळ महिला गटात बॅडमिंटनमध्‍ये अकोला कृषि विद्यापीठाचा संघ विजेता तर राहुरी संघ उपविजेता ठरला. टेबल टेनिस मध्‍ये राहुरी संघ प्रथम स्‍थानावर राहिला तर व्दितीयस्‍थानावर अकोला कृषि विद्यापीठ राहिला. बुध्दीबळ स्‍पर्धेत अकोला कृषि विद्यापीठ विजेता तर व्दितीयस्‍थानी राहुरी परभणी कृषि विद्यापीठाने संयुक्‍तपणे उपविजेते ठरले. कॅरम स्‍पर्धेत परभणी कृषि विद्यापीठ प्रथम तर महाबीज, अकोला व्दितीय ठरला. 
रांगोळी स्‍पर्धेत अकोला विद्यापीठाची प्रेरणा चिकटे प्रथम ठरती तर व्दितीयस्‍थानी राहुरीची सिमा मिस्त्री व परभणीची मंजुषा रेवणवार संयुक्‍तपणे राहिल्‍या तसेच तृतीयस्‍थानी अकोला विद्यापीठाची नितिमा जाधव व महाबीजची किरण ढगे संयुक्तपणे राहिल्‍या. आठशे मीटर धावणे पुरुष गटात महाबीजचा सागर मालटे प्रथम तर व्दितीय विलास पायघनतृतीयस्‍थान वरद सिरसाट (राहुरी)  यांनी पटकावले. चारशे मीटर धावणे पुरुष गटात प्रथम राहुरी रविंद्र बनसोड तर व्दितीय परभणीचे एस. यु. चव्हाण तृतीय दापोलीचे राजेंद्र गुजर ठरले व उत्तेजनार्थ बक्षीस बालाजी डोईजड यांना देण्‍यात आले. चारशे मीटर धावणे महिला गटात प्रथम महाबीजची कल्याणी आचमोर ठरली तर व्दितीय परभणीची सारिका भोईतृतीय राणी पोले ठरली.
गीतगायन स्‍पर्धेत प्रथम दापोलीचे डॉ. प्रफुल अहिरे तर व्दितीय परभणीचे डॉ.विशाल अवसरमल तृतीयस्‍थानी राहुरीचे डॉ.जयप्रकागायकवाड राहीले. मिमीक्रीमध्‍ये प्रथमस्‍थान विजय सावंत यांनी पटकावला तर व्दितीयस्‍थान डॉ जया बंगाळे यांनी पटकावला.



Wednesday, January 22, 2020

कर्मचारी क्रीडास्‍पर्धेमुळे कर्मचा-यांची कार्यक्षमता वाढीस लागण्‍यास मदत होईल..... कुलगुरू मा डॉ विलास भाले

खेळामुळे शारीरिक आरोग्‍याबरोबरच मानसिक आरोग्‍य चांगले राहते, प्रत्‍येकांनी एकतरी खेळ किंवा छंद जोपासला पाहिजे. राज्‍यातील चारही कृषि विद्यापीठे व महाबीज कर्मचारी क्रीडा स्‍पर्धेमुळे अधिकारी व कर्मचारी यांच्‍यातील नाते दृढ होण्‍यास मदत होईल तसेच संस्‍थेतील कार्यालयीन वातावरण खेळीमेळीचे राहुन कार्यक्षमता वाढण्‍यास मदत होईल, असे प्रतिपादन डॉ पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ विलास भाले यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात राज्‍यातील चारही कृषि विद्यापीठ व महाबीज यांच्‍या कर्मचारी क्रीडा स्‍पर्धेचे आयोजन दिनांक 22 ते 24 जानेवारी दरम्‍यान करण्‍यात आले असुन सदरिल स्‍पर्धेच्‍या उदघाटनाप्रसंगी (दिनांक 22 जानेवारी) ते बोलत होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण हे होते तर व्‍यासपीठावर शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, कुलसचिव श्री रणजित पाटील, अकोला विद्यापीठाचे कुलसचिव डॉ पी आर कडु, महाबीजचे श्री प्रभुल्‍ल लहाने, विद्यापीठ नियंत्रक श्री एन एस राठोड, विद्यार्थ्‍यी कल्‍याण अधिकरी डॉ महेश देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती. 
अध्‍यक्षीय भाषणात कुलगुरू मा डॉ अशोक ढवण म्‍हणाले की, राज्‍यातील कृषि विद्यापीठात मनुष्‍यबळाचा मोठा तुडवडा आहे, आज प्रत्‍येक जणावर कामाचा ताण आहे. क्रीडास्‍पर्धेमुळे दैनंदिन तणावातुन काही प्रमाण कर्मचा-यांना मुक्‍त वातावरणात वावरता येईल. खेळामुळे कर्मचा-यांमधील संघभावना वाढीस लागण्‍यास मदत होईल, संघाभावनेमुळे अनेक कार्य सहज पुर्ण होतात, असे प्रतिपादन त्‍यांनी केले.  
मनोगतात शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले यांनी खेळामुळे जीवनात खेळाडुवृत्‍ती वाढ होते असे सांगितले तर प्रास्‍ताविकात विद्यार्थ्‍यी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख यांनी क्रीडा स्‍पर्धे आयो‍जनाबाबतची भुमिका विशद केली. यावेळी वनामकृवि ध्‍वजाचे ध्‍वजारोहन कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांच्‍या हस्‍ते तर क्रीडास्‍पर्धेच्‍या ध्‍वजाचे ध्‍वजारोहन कुलगुरू मा डॉ विलास भाले यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. क्रीडाज्‍योतीचे प्रज्‍वलन कुलसचिव श्री रणजित पाटील यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. तसेच सहभागी संघानी संचलन करून मान्‍यवरांना मानवंदना दिली. सुत्रसंचालन डॉ पपित गौरखेडे यांनी केले तर आभार डॉ सचिन मोरे यांनी मानले.  
सदरिल स्‍पर्धेत तेरा क्रीडा प्रकारात अकोला येथील डॉ पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठदापोली येथील बाबासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठमहात्‍मा फुले कृषि विद्यापीठवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ व महाबीज येथील दोनशे पेक्षा जास्‍त अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले आहे. यात क्रिकेट, व्‍हॉलीबॉल, बॅडमिंटन, बॉस्‍केटबॉल, टेबलटेनिस, रस्‍सीखेच, कबडडी, धावणे, रांगोळी, बुध्‍दीबळ आदी मैदानी खेळासह गीतगायन मिमीक्री स्‍पर्धेाही आयोजित करण्‍यात आल्‍या आहेत.
सदरिल स्‍पर्धेचा समारोप व बक्षीस वितरण दिनांक 24 जानेवारी रोजी परभणीचे आमदार मा डॉ राहुल पाटील व परभणी जिल्‍हा बॅडमिंटन असोशियनचे सचिव श्री रविंद्र देशमुख यांच्‍या प्रमुख उपस्थित पार पडणार आहे.

वनामकृवित महाराष्ट्र राज्य कृषि विद्यापीठ व महाबीज कर्मचारी क्रीडा स्पर्धेचे उदघाटन
















वनामकृवि, परभणी आणि राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्था, बारामती यांच्यात संशोधनात्मक सामंजस्य करार

बदलत्‍या हवामानात शाश्‍वत उत्‍पादन देणा-या विविध पिकांचे वाण विकसित करण्‍याच्‍या संशोधनास मिळणार गती
कृषि संशोधन व पदव्युत्तर तसेच आचार्य पदवी संशोधन कार्य वृध्दींगत व्हावे याकरिता वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्था, बारामती यांच्या बारामती येथे दि. 17 जानेवारी रोजी सामंजस्य करार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. कुलगुरु डॉ. शो ढवण होते तर सामंजस्य करारावर संचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकरराष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्थेचे संचालक डॉ. जगदी राणे यांनी स्वाक्ष-या केल्या.
अध्यक्षीय भाषणात कुलगुरु मा. डॉ. अशो ढवण यांनी बदलत्‍या हवामान परिस्थित शाश्‍वत उत्‍पादन देणा-या विविध पिकांच्‍या वाणाचा विकास करणे आवश्‍यक असुन राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्‍थेशी झालेल्‍या सामंजस्‍य करारामुळे या क्षेत्रातील अद्यावत ज्ञानाने संशोधन कार्यास गती प्राप्‍त होईल. या संस्‍थेतील शास्त्रज्ञांनी परभणी कृषि विद्यापीठातील पदव्युत्तर व आचार्य अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्‍यांसाठी विशेष प्रशिक्षण आयोजीत करण्यात येऊन या क्षेत्रातील विद्यार्थ्‍यांचे ज्ञान वृध्‍दींगत होण्‍यास मदत होईल. बारामती येथील शास्त्रज्ञांनी विद्यापीठातील पदव्युत्तर व आचार्य अभ्यासक्रमाच्या काही विषयांच्या तासिका घेवुन विद्यार्थ्‍यांना ज्ञानार्जन करण्‍याचे आवाहन त्‍यांनी केले.
मार्गदर्शनात डॉ. वासकर यांनी कृषि विद्यापीठाच्या संशोधन कार्यावर प्रका टाकला तर डॉ. जगदी राणे यांनी शास्त्रज्ञांना या सामंजस्य कराराचे महत्व विषद करून भविष्यात या सामंजस्य करारामुळे उत्कृष्ट प्रतीचे ताण सहन करणा-या विविध पिकांच्या वाणांमुळे शेतक-यांना होणा-या फायद्या होईल असे मत व्यक्त केले.
सदरिल सामंजस्य करार पुढील 5 वर्ष कालावधीसाठी राहणार असुन करारामुळे कृषि संशोधनास नवीन चालना मिळणार असुन दर्जात्‍मक संशोधन कार्यास मदत होणार आहे. बदलत्‍या हवामानात कमी वअधिक तापमान, पाण्‍याचा ताण सहन करण्‍याच्‍या दृष्‍टीने कापूस, सोयाबीन, कडधान्य (तूर, हरभरा, मूग, आणि उडीद), गळीतधान्य (सुर्यफुल, भुईमुग व जवस), ज्वारी, बाजरी दी पिकांच्या वाणांचे विविध प्रकारच्या चाचण्या अभ्यास राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्था, बारामती येथे भविष्यात करण्यात येईल. तसेच परभणी कृषि विद्यापीठातील पदव्युत्तर व आचार्य पदवीचे विद्यार्थी संशोधन कार्य राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्थेत करु कतील. करारामुळे दोन्ही संस्‍था मार्फत भविष्यात नवोंमेषी संशोधन प्रकल्प केंद्र शासनास आर्थिक साहाय्यासाठी सादर करण्यात येतील. त्याद्वारे उच्च प्रतीचे तंत्रज्ञान विकसीत होण्यास मदत होईल. सद्या राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्थेत मोठया प्रमाणात संशोधन सहयोगी वरिष्ठ संशोधन सहाय्यक यापदावर परभणी कृषि विद्यापीठातील पदव्युत्तर तसेच आचार्य पदवी प्राप्त विद्यार्थी आहेत, ही विशे बाब आहे. कार्यक्रमास उपसंचालक संशोधन डॉ. अशो जाधव, संशोधन संपादक डॉ. मदन पेंडके आदीसह राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्थेचे शास्त्रज्ञ विद्यार्थी मोठया संख्‍येने उपस्थित होते.