 |
| मार्गदर्शन करतांना आंतरराष्ट्रीय नामांकित शास्त्रज्ञ तथा नवी दिल्ली येथील भारतीय कृषि शास्त्रज्ञ निवड मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. चारुदत्त मायी |
 |
| राष्ट्रिय परिसंवादेचे उदघाटन प्रसंगी दिपप्रज्वलन करतांना आंतरराष्ट्रीय नामांकित शास्त्रज्ञ तथा नवी दिल्ली येथील भारतीय कृषि शास्त्रज्ञ निवड मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. चारुदत्त मायी, विद्यापीठाचे प्रभारी कुलगूरू तथा शिक्षण संचालक तथा अधिष्ठाता (कृषि) डॉ. विश्वास शिंदे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण आदी |
 |
| अध्यक्षीय भाषण करतांना प्रभारी कुलगूरू तथा शिक्षण संचालक तथा अधिष्ठाता (कृषि) डॉ. विश्वास शिंदे |
देशातील एकुण 11.6 दशलक्ष हेक्टर कापुस
क्षेत्रापैकी 10.4 दशलक्ष हेक्टर क्षेत्रावर बीटी कापसाचे तंत्रज्ञान पोहचले आहे.
भविष्यात देशाने निश्चीत केलेले अन्न सुरक्षेचे उदिष्ट साध्य करण्यासाठी
जैवतंत्रज्ञानाशिवाय पर्याय नाही, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय नामांकित शास्त्रज्ञ
तथा नवी दिल्ली येथील भारतीय कृषि शास्त्रज्ञ निवड मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ.
चारुदत्त मायी यांनी केले. ते वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी
अंतर्गत असलेल्या वनस्पती रोगशास्त्र विभाग व नवी दिल्ली
येथील भारतीय वनस्पती रोगशास्त्र संस्था (Indian Phytopathological Society, IARI, New Delhi) यांच्या संयुक्त
विद्यमाने आयोजीत ‘अन्नसुरक्षे करिता पिकांवरील रोगांचे
निदान व एकात्मिक व्यवस्थापन’ या विषयावरील
राष्ट्रीय परिसंवादाचे (पश्चिम क्षेत्रीय) उदघाटनाप्रसंगी
बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे प्रभारी कुलगूरू तथा शिक्षण
संचालक तथा अधिष्ठाता (कृषि) डॉ. विश्वास शिंदे होते तर विस्तार शिक्षण संचालक
डॉ. अशोक ढवण, हैद्राबाद येथील राष्ट्रीय वनस्पती आरोग्य व्यवस्थापन संस्थेचे
संचालक डॉ. ए. यु. एकबोटे, भारतीय कृषि संशोधन
संस्थेच्या विभागीय केंद्राचे प्रमुख डॉ. व्हि. व्हि. दातार, सोलापुर येथील डाळींब संशोधन
केंद्राचे माजी संचालक डॉ. व्ही. टी. जाधव, भारतीय कृषि संशोधन संस्थेच्या विभागीय केंद्राचे प्रमुख माजी प्रमुख
डॉ. के. के. झोटे, कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. डि. बी. देवसरकर यांची
प्रमुख उपस्थिती होती.
डॉ मायी पुढे म्हणाले की, सन 2002 पर्यतंच्या
दोन दशकात कापसाचे उत्पादन 14 ते 15 दशलक्ष गाठीपर्यंत स्थिरावले होते ते आता 35
दशलक्ष पर्यंत पोहचले आहे. तसेच 2003 साली कापसाची निर्यात नगण्य होती, ती आज 10
दशलक्ष गाठीपर्यत पोहचली आहे. सध्या देशामध्ये बिटी कापसाप्रमाणेच
जैवतंत्रज्ञानावर आधारीत विविध पिकांतील साधारणत: 10 प्रकारचे वाण तयार असुन मान्यतेची
वाट पहात आहेत. यामध्ये भरपुर जीवनसत्व अ युक्त भातामधील गोल्डन राईस, बिटी
वांगे, बिटी मका, जास्त प्रथिनयुक्त बटाटेचे वाण आदिंचा समावेश होतो. शेतक-यांना
कीड व रोग व्यवस्थापनावर मोठा खर्च करावा लागतो, रोग व कीड प्रतीकारक वाण
निर्मीतीमुळे शेतक-यांना कमी उत्पादन खर्चात जास्त उत्पन्न मिळु शकते. वसंतराव
नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ मार्फत संशोधीत केलेले तुर, हरभरा, मुग आदीच्या रोग
प्रतीकारक वाण देशातच नाही तर विदेशात ही वापरले जातात. कृषि पदविधरांनी कृषिच्या
मुलभूत संशोधनात योगदान देणे आवश्यक असुन राष्ट्रिय पातळीवरील कृषि क्षेत्रातील
संशोधकांच्या पदाकरीत प्रयत्न करण्याचा सल्लाही यावेळी त्यांनी कृषि
पदविधरांना दिला.
अध्यक्षीय भाषणात प्रभारी कुलगूरू तथा शिक्षण
संचालक तथा अधिष्ठाता (कृषि) डॉ. विश्वास शिंदे म्हणाले की, अन्न सुरक्षा व
पिकांचे रोग व्यवस्थापन यात निकडचा संबंध आहे. दरवर्षी पिकांमध्ये रोग व कीडी
मुळे 37 ते 40 टक्के नुकसान होते, त्याची अंदाजे किंमत 2 अब्ज अमेरिकन डॉलर
होते. 2050 सालीच्या देशाची लोकसंख्येला अन्न पुरवण्यासाठी शेतीचे उत्पादन
दुप्पट करावे लागेल. यासाठी पिक रोगशास्त्र व कीडशास्त्राचे योगदान मोलाचे
ठरणार आहे. विशेषता जैवीक व अजैवीक ताण, हवामान बदल, नैसर्गीक संसाधनाची कमतरता,
काढणी पश्चात अन्नधान्याची होणारी हानी यामुळे अन्न सुरक्षेचे उदिदष्ट गाठण्यास
अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यादृष्टिने हा राष्ट्रिय परिसंवाद अत्यंत महत्वाचा
आहे.
परिसंवादास महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा या तीन राज्यांतुन
वनस्पती रोग शास्त्रज्ञ, प्राध्यापक, विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित
होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बदनापुर कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ
डी एन धुतराज यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ विना भालेराव यांनी
केले तर आभार प्रदर्शन डॉ ए पी सुर्यवंशी यांनी केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी डॉ
के टी आपेट, प्रा आर डब्लु देशमुख, डॉ जे पी जगताप, डॉ व्ही एम घोळवे, डॉ के डी
नवगीरे, डॉ डी जी हिंगोले, डॉ पी एच घंटे, डॉ एस एल बडगुज, प्रा आर व्ही देशमुख, तसेच विविध समित्याच्या
सदस्यानी परीश्रम घेतले.
