Saturday, August 3, 2019

वनामकृवित बौद्धीक संपदा हक्क विषयावर प्रशिक्षण संपन्न

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथे दिनांक ऑगस्ट रोजी कृषि संशोधन व शिक्षणात बौद्धिक संपदा हक्काचे महत्व या विषयावर प्रशिक्षण आयोजीत करण्यात आले होते. प्रशिक्षणा ग्रेट मिशन ग्रुप कंन्सल्टन्सीचे अध्यक्ष प्रा. गणेश हिंगमिरे यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण हे होते तर संचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकर यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रा. हिंगमिरे यांनी कृषी विद्यापीठाने मोठया प्रमाणात कृषी संशोधन केले आहे, भारतीय चलनाचा परदेशात जाणारा ओघ कमी करण्याकरिता कृषि क्षेत्रात बौद्धिक संपदा हक्क प्राप्त करणे गरजेचे आहे. यामुळे भविष्यात कृषी विद्यापीठे आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकतात.
अध्यक्षीय भाषणात कुलगुरू मा डॉ. अशोक ढवण यांनी कृषिशी निगडीत बाबींचे पेटेंन्ट मिळविणे गरजेचे असून विद्यापीठाचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर मानांकन उंचविण्यास मदत होईकार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. दत्तप्रसाद वासकर यांनी केले. सुत्रसंचलन डॉ. विणा भालेराव यांनी तर आभार प्रदर्शन डॉ एम एस पेंडके यांनी केले. कार्यक्रमास विद्यापीठातील सर्व महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्यसंशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारीविभाग प्रमुखप्राध्यापक व अधिकारी उपस्थित होते. 

सामाजिक विज्ञान महाविद्यालयात गुणवंताचा सत्कार

Thursday, August 1, 2019

मराठवाडयात कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव

कपाशीच्‍या पिकात कामगंध सापळे लावण्‍याचे वनामकृविच्‍या शास्‍त्रज्ञाचे आवाहन
डोम कळी

मराठवाडा विभागात कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आढळून येत असुन सद्या हवामान ढगाळ असल्याणे व कापसाला पाते, फुले लागत असल्याने गुलाबी बोंडअळीचे पतंग सक्रीय झालेले आढळून येत आहे. मादी पतंग पाते, फुले यावर अंडी घालतात, त्यामुळे कपाशीच्या पिकात कामगंध सापळे लावण्याची ही योग्य वेळ आहे. त्या अनुषंगाने वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विदयापीठाच्‍या किटकशास्त्र विभागाच्‍या वतीने गुलाबी बोंडअळीचे व्यवस्थापन करण्यासाठी शेतकऱ्यांना पुढील प्रमाणे उपाय योजना करण्‍याचे आवाहन करण्यात येत आहे. 
सदयस्थितीत करावयाच्‍या उपाय योजना:
कपाशीच्या पिकात नियमित सर्वेक्षण करुन डोमकळ्या दिसून आल्यास त्या तोडून आतील अळीसह नष्ट करावे.
- गुलाबी बोंडअळीसाठीचे कामगंध सापळे हेक्‍टरी पाच प्रमाणे लावावीत, तसेच सापळयात सतत 2 ते 3 दिवस प्रति सापळा सरासरी 8 ते 10 पतंग आढळल्‍यास ही आर्थिक नुकसानीची पातळी समजावी.
- गुलाबी बोंडअळीचे पतंग कामगंध सापळयात अढळल्यास त्वरीत अझाडिरॅक्टीन 1500 पीपीएम 40 - 50 मिली 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
- उपलब्धते प्रमाणे कपाशीत एकरी 3 ट्रायकोकार्ड पानाच्या खालच्या बाजूस लावावेत.
फवारणीसाठी कीटकनाशके
कीडींचा प्रादुर्भाव
कीटकनाशके
प्रती दहा लिटर पाण्‍यात वापराचे प्रमाण
5 टक्के
अझाडिरॅक्टीन 0.15 टक्के
50 मिली
अझाडिरॅक्टीन 0.30 टक्के
40 मिली
क्विनॉलफॉस 25 ए एफ. किंवा
20 मिली
प्रोफेनोफॉस 50 ईसी किंवा
20 मिली
क्लोरोपायरीफॉस 20 ईसी
25 मिली
5-10 टक्के
थायोडीकार्ब 75 डब्ल्युपी किंवा
20 ग्रॅम
इमामेक्टीन बेन्झोएट 5 टक्के एस जी
04 ग्रॅम
10 टक्के पेक्षा जास्त
थायामिथिक्झाम 12.6 टक्के + लॅमडा साहॅलोथ्रीन 9.5 टक्के झेड सी
04 मिली
प्रोफेनोफॉस 40 टक्के + सायपरमेथ्रीन 4 टक्के
20 मिली

वरील कीटकनाशकाचे प्रमाण हे साध्या पंपासाठी असुन पेट्रोल पंपासाठी हे प्रमाण तीनपट वापरावे. गुलाबी बोंडअळीमुळे होणारे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी वेळीच जागरूक राऊन वरील प्रमाणे उपाययोजना कराव्यात असे वाहन किटकशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ. पी.आर.झंवर, शास्‍त्रज्ञ डॉ. . जी. बडगुजर आणि डॉ. के. जी. अंभुरे यांनी केले आहे.
सध्या आढळून येत असलेली सुरुवातीच्या अवस्थेतील शेंदरी बोंडअळी

Tuesday, July 30, 2019

मराठवाडयातील चारशे गावांत कृषीदुत व कृषीकन्‍या करीत आहेत कृषी तंत्रज्ञानाचा जागर

वनामकृवि अंतर्गत असलेल्‍या सत्‍ताविस कृषि महाविद्यालयाच्‍या २६४६ विद्यार्थ्‍यांचा उपक्रमात सहभाग
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत एकुण सत्‍ताविस (२७) घटक व संलग्‍न कृषी महाविद्यालय असुन कृषि पदवी अभ्‍यासक्रमाच्‍या सातव्‍या सत्रात ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रम (रावे) राबविण्‍यात येतो. या सत्रातील विद्यार्थांना कृषिदुत व कृषिकन्‍या असे संबोधन्‍यात येते, हे विद्यार्थ्‍यी प्रत्‍यक्ष शेतक-यांच्‍या शेती कसण्‍याचे तंत्र व ग्रामीण जीवन पध्‍दतीचा अभ्‍यास करतात, तसेच विद्यापीठ शिफारसीत कृषि तंत्रज्ञानावर आधारित विविध प्रात्‍यक्षिके व कार्यक्रम आयोजित करून कृषी तंत्रज्ञान शेतक-यांपर्यंत पोहचविण्‍यासाठी विस्‍ताराचे कार्य करतात, हे विद्यार्थ्‍यी साधारणत: पंधरा आठवडे दत्‍तक गांवात कार्यरत असतात. यावर्षी एकुण सत्‍ताविस (२७) घटक व संलग्‍न कृषि महाविद्यालयातील २६४६ विद्यार्थ्‍यींनी सातव्‍या सत्रात नोंदणी केलेली असुन मराठवाडयातील आठ जिल्‍हयातील चारशे गावांची निवड हा कार्यक्रम राबविण्‍यासाठी करण्‍यात आली आहे.
गतवर्षी माननीय कुलगुरू डॉ अशोक ढवण यांच्‍या सुचनेनुसार कृषीदुत व कृषीकन्‍याच्‍या माध्‍यमातुन संपुर्ण मराठवाडयात कापसावरील गुलाबी बोंडअळी व्‍यवस्‍थापन तंत्रज्ञानाचा प्रसार करण्‍यात आला होता, त्‍याची दखल कृषि आयुक्‍तालयानेही घेतली. यावर्षीही मका पिकावरील लष्‍करी अळी, कापसावरील गुलाबी बोंडअळी, हुमणी कीड आदींचा प्रा़दुर्भाव बघता, विद्यापीठाचे माननीय कुलगुरू मा डॉ अशोक ढवण, कृषि आयुक्‍त मा श्री सुहास दिवसे व शिक्षण संचालक डॉ प्रदीप इंगोले यांच्‍या सुचनेनुसार कीड व्‍यवस्‍थापन तंत्रज्ञान प्रसार मोहिम कृषि विभाग व कृषि विज्ञान केंद्र, संशोधन केंद्राच्‍या सहकार्याने संपुर्ण मराठवाडयात राबविण्‍यात येत आहे. तसेच ग्रामीण कृषी कार्यानुभव अंतर्गत कृषीदुत व कृषीकन्‍या कृषी तंत्रज्ञानावर आधारित विविध प्रात्‍यक्षिके, चर्चासत्र, शेतकरी मेळावे, जनावरांचे लसीकरण, वृक्षलागवड, माती परिक्षण, बोर्डो मिश्रण व कंपोस्‍ट खत तयार करणे, जैविक खतांची बीजप्रक्रिया आदी कार्यक्रम राबविण्‍यात येत आहेत. विद्यापीठाच्‍या वतीने परिस्थितीनुसार देण्‍यात येणारे कृषि सल्‍ले घडीपत्रिका, भितीपत्रिका आदीच्‍या माध्‍यमातुन शेतकरी बांधवापर्यंत पोहोविण्‍याचे कार्य करण्‍यात येत आहे. सद्यस्थितीत गुलाबी बोंडअळीच्‍या व्‍यवस्‍थापनासाठी कामगंध सापळे महत्‍वाचे असुन सदरिल दत्‍तक गांवात कामगंध सापळे निवडक शेतक-यांच्‍या शेतीत लावण्‍यात येऊन त्‍याबाबत कृषी किटकशास्‍त्रज्ञ मार्गदर्शन करित आहेत. याबाबत जालना, औरंगाबाद व परभणी येथे कार्यशाळेत कृषि महाविद्यालयातील तज्ञांना मार्गदर्शन करण्‍यात आले. नुकतेच जालना जिल्‍हयातील खरपुडी कृषि विज्ञान केंद्र व कृषि विभागाच्‍या वतीने राबविण्‍यात येत असलेल्‍या गुलाबी बोंडअळी व्‍यवस्‍थापन मोहिमे अंतर्गत खरपुडी येथील कृषि महाविद्यालयाच्‍या कृषिदुतांनी मौजे वानडगांव येथील शेतक-यांच्‍या कपाशीच्‍या शेतावर ७५० कामगंध सापळे लावण्‍याकरिता मदत केली.  निवडलेल्‍या चारशे गावां व्‍यतिेरिक्‍त आजूबाजूच्‍या गावांसह एक हजारपेक्षा जास्‍त गावांत कृषीदुत व कृषीकन्‍यांनी कामगंध सापळाच्‍या प्रात्‍यक्षिके देऊन मार्गदर्शन केल आहे. जुन व जुलै महीण्‍यात ही विविध उपक्रम राबविण्‍यात आले असुन पुढील ऑगस्‍ट व सप्‍टेबर महिण्‍यापर्यंत कृषिदुत व कृषिकन्‍या सदरिल गावांत कार्यरत राहणार आहेत. या उपक्रमाच्‍या माध्‍यमातुन कृषी पदवीचे विद्यार्थ्‍यींना प्रत्‍यक्ष कृषी विस्‍तार कार्याचा अनुभव मिळत असल्‍याची माहिती रावे विद्यापीठ समन्‍वयक डॉ राकेश आहिरे यांनी दिली.

Monday, July 29, 2019

वनामकृवि अंतर्गत संपुर्ण मराठवाडयात राबविण्यात येत असलेला ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रम

वनामकृवि अंतर्गत असलेल्‍या कृषि महाविद्यालयाच्‍या वतीने ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत राबविण्‍यात आलेल्‍या उपक्रमाचे काही छायाचित्र




Friday, July 26, 2019

मौजे टाकळगव्‍हाण येथे पाचशेपेक्षा जास्‍त जनावरांचे लसीकरण

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील परभणी कृषी महाविद्यालयाच्‍या ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत एकात्मिक शेती पध्‍दती केंद्र येथे कार्यरत असलेल्‍या कृषीदुतांनी मौजे टाकळगव्‍हाण येथे जनावरांचे लसीकरण शिबिराचे आयोजन दिनांक 22 जुलै रोजी केले होते. या शिबिरात पाचशे पेक्षा जास्‍त जनावरांचे लसीकरण पशुवैद्यकिय अधिकारी डॉ सय्यद रहीम यांनी केले. पाऊसाळी हंगामात जनावरांना विविध रोगांची लागण होते, त्‍यामुळे वेळीच उपचार करण्‍याची गरज असल्‍याचे पशुवैद्यकिय अधिकारी डॉ सय्यद रहीम यांनी सांगुन जनावरांच्‍या विविध रोग व उपचाराबाबत माहिती दिली. सदरिल कार्यक्रम प्राचार्य डॉ धर्मराज गोखले, रावे समन्‍वयक डॉ राकेश अहिरे, केंद्र प्रमुख डॉ ए एस कार्ले, कार्यक्रम अधिकारी डॉ ए टी शिंदे, डॉ एस टी शिराळे यांच्‍या मार्गदर्शनाखाली कृषीदुत कृष्‍णा उफाड, वैभव राऊत, निलेश वैद्य, लोकडेश्‍वर शिंदे, कृष्‍णा शिंदे, राजकुमार राचरकर, अच्‍युत पिल्‍लेवाड, विशाल सरोदे, आनंद डोंगरे, प्रद्युम्‍न वाघ आदीं यशस्‍वीरित्‍या पार पाडला.


Monday, July 22, 2019

वनामकृवित होणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण केंद्र

देशातील एकमेव डिजिटल शेती तंत्रज्ञानावर आधारित सेंटर ऑफ एक्सेलन्स
कृषी उत्पादकता वाढीसाठी भारतीय शेतीतील रोबोट, ड्रोन व स्वयंचलित यंत्राची उपयुक्तता प्रशिक्षणाव्‍दारे समजुन होणार वापर
जागतिकस्‍तरावर प्रगत देशात कृषिक्षेत्रात यंत्रमानव, ड्रोन व स्‍वयंचलित यंत्राचा वापर वाढत असुन डिजिटल शेती करून अधिक व दर्जेदार कृषी उत्पादन कार्यक्षमरित्‍या शेतकरी करित आहेत, यात कृत्रिम बुध्दीमत्ता व इंटरनेट ऑफ थिंग्सयांचाही वापर होत आहे. हे डिजिटल तंत्रज्ञान भारतीय शेती व शेतक-यांच्या परिस्थितीस अनुकुल बनविण्याची गरज असुन त्यासाठी लागणारे उच्चतम कौशल्य प्राप्त मनुष्ययबळाची निर्मिती करावी लागणार आहे. हा दृष्टीकोन ठेऊन परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने कृषि उत्‍पादकता वाढीसाठी यंत्रमानव, ड्रोन व स्‍वयंचलित यंत्राव्‍दारे डिजिटल शेतीयावरील सेंटर ऑफ एक्‍सेलन्‍स प्रशिक्षण प्रकल्‍प नवी दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन परिषदेस सादर केला होता. भारतीय कृषी संशोधन परिषदेच्‍या राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्पांतर्गत या प्रकल्‍पास मान्यता दिल्याची राष्ट्रीय संचालक डॉ राकेशचन्द्र अग्रवाल यांनी नुकतेच विद्यापीठास पत्राव्दारे कळविले आहे. अशा प्रकारचा आंतरराष्‍ट्रीय दर्जाचा प्रकल्‍प देशातील एकमेव प्रशिक्षण प्रकल्‍प ठरणार असुन विद्यापीठात आदर्श असे प्रगत कृषि विज्ञान आणि तंत्रज्ञान केंद्र (CAAST – Centre for Advanced Agricultural Science & Technology) स्‍थापन करण्‍यात येणार आहे.
सदरिल प्रकल्प विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ अशोक ढवण व माजी कुलगुरू मा डॉ बी. व्यंकटेशवरुलू यांच्या प्रेरणेने तसेच माजी शिक्षण संचालक डॉ विलास पाटील, शिक्षण संचालक डॉ प्रदिप इंगोले, कुलसचिव श्री रणजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्पाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ गोपाल शिंदे व प्रकल्प समन्वयक डॉ राजेश कदम यांनी सादर केला होता. या प्रकल्पाची प्राथमिक संकल्पना प्रमुख शास्‍त्रज्ञ डॉ गोपाळ शिंदे यांची असुन शास्त्रयुक्त चाचणी व अन्वेषण हे उच्‍चस्‍तरीय सोळा सदस्‍यीय कुलगुरु समिती व्‍दारे झाले आहे.
हा प्रशिक्षण प्रकल्प सन २०१९ ते २०२२ या तीन वर्ष कालावधी करीता संकल्पीत असुन यास अठरा कोटी रूपयांचा निधी मंजुर करण्यात आला आहे, यात पन्नास टक्के वाटा जागतिक बॅक व पन्नास टक्के वाटा हा भारत सरकार कडुन भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या माध्यामातुन प्राप्त होणार आहे. यात यंत्रमानव (रोबोट), ड्रोन व स्वयंचलीत सारखी डिजीटल साधनांचा समावेश असणा-या विविध संशोधन प्रयोगशाळा निर्माण करून विद्यार्थ्यी व संशोधक प्राध्यापकांना प्रशिक्षणाची सुविधा निर्माण करण्यात येणार आहे. या केन्द्राव्‍दारे कौशल्य प्राप्त प्रशिक्षणार्थी डि‍जिटल शेतीचे तंत्र शेतक-यांपर्यंत नेण्याचा प्रयत्‍न करणार आहेत.
यासाठी परभणी कृषी विद्यापीठाने अॅग्री-रोबोट्स, अॅग्री-ड्रोन्स व अॅग्री-स्वयंचलित यंत्राच्या तंत्रज्ञानात्‍मक देवाणघेवाण करिता जगातील अग्रगण्य विद्यापीठाशी सामंजस्य‍ करार केला असुन यात अमेरिकेतील वॉशिंग्टन स्टेट युनिव्हर्सिटी तसेच स्पेन, युक्रेन व बेलारूस येथील विद्यापीठांचा समावेश आहे. तसेच पवई व खरगपुर येथील आयआयटी संस्थेचे नॉलेज सेंटर म्हणून सहकार्य लाभणार आहे.
याप्रशिक्षण केंद्रांचे कार्य चार मुख्य भागात चालणार आहे, यात हवामान आधारित डिजिटल ज्ञानात्मक पाठबळ केंद्र, बी-बियाणे प्रक्रिया व रोपवाटीका स्वयंचलित केंद्र, स्मार्ट पोर्टेबल मशीनरी केंद्र व अन्न प्रक्रिया स्वयंचलित केंद्र यांचा समावेश आहे. प्रकल्पात दर्जेदार व अधिक कृषी उत्पादन निर्मिती करण्याकरिता भारतीय शेतीत यंत्रमानव (रोबोट), ड्रोन व स्वयंचलित यंत्राचा वापर वाढण्‍यासाठी  लागणारे उच्चतम कौशल्य प्राप्त मनुष्यबळ निर्मिती करण्यात येणार आहे. सदरिल प्रशिक्षण केंद्रात डिजिटल शेती तंत्रज्ञानावर आधारित पदव्युत्तर व आचार्य पदवी प्राप्त विद्यार्थ्यांकरीता एक वर्षाचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम राहणार असुन संशोधक प्राध्यापक यांना आंतरराष्ट्रीय स्‍तरावर प्रशिक्षित करण्यात येणार आहे. या प्रशिक्षणार्थीच्या माध्यमातुन प्रसार व मदत केंद्र स्थापीत करण्यात येणार असुन याचा लाभ लहान व मध्यमवर्गीय शेतक-यांना होणार आहे. या केंन्द्रांतर्गत विविध विज्ञान व अभियांत्रीकी शाखेतील विद्यार्थ्यी सहभाग घेऊ शकणार असुन यामुळे विविध तंत्रज्ञान व विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांचा एकत्रित सहभागातुन कृषी उत्पादकता वाढविण्यात मदत होईल.
एक वर्षाच्या या अभ्यासक्रमात सहा महिन्याचे दोन सत्र राहणार असुन यंत्रमानव (रोबोट) विभाग, ड्रोन विभाग व स्वयंचलित यंत्र विभाग अशा तीन विभागात प्रत्येकी चाळीस विद्यार्थ्यांचा प्रवेश राहणार आहे. असे एकुण १२० विद्यार्थ्यी प्रमाणपत्र अभ्यासक्रमात सहभाग घेतील. यात विज्ञान व अभियांत्रिकी शाखेतील पद्व्यत्तर व आचार्य पदवीधारक विद्यार्थ्यी प्रवेश घेऊ शकतील. याविषयावर आधारित आंतरराष्ट्रीय परिसंवाद व कार्यशाळेचे आयोजनही करण्यात येणार असुन प्रशिक्षणार्थींना आंतरराष्ट्रीय स्तरवरील विविध विद्यापीठे व संशोधन संस्थाच्या वतीने आयोजित कार्यशाळेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.
या प्रशिक्षीत विद्यार्थ्यां व प्राध्यापकांव्‍दारे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील डिजिटल शेती तंत्रज्ञान व्यवस्थापनाचे संपर्काचे जाळे तयार होणार आहे. डिजिटल शेतीकरिता कृषी उपयुक्त मोबाईल अॅप्सची निर्मिती करण्यात येणार आहे. या प्रकल्पात किमान तीनशे उच्चतम कौशल्य प्राप्त कृषी उद्योजक निर्मीती करण्यारचे विद्यापीठाचे उद्दीष्टे असुन यांच्या‍ मार्फत डिजिटल शेतीचा प्रसार होणे अपेक्षीत आहे.

प्रकल्पाबाबत माननीय कुलगूरू मा डॉ अशोक ढवण यांचे मत
सद्यस्थितीत राज्यात व मराठवाडयात गटशेती व शेतकरी उत्पादक कंपन्याची संकल्पना मुळ धरत असुन शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी ही संकल्‍पना महत्वाची भुमिका बजावु शकते. या प्रकल्पात प्रशिक्षीत तज्ञ शेतकरी उत्‍पादक कंपन्‍याना डिजिटल शेती तंत्रज्ञानाची जोड देऊ शकतील. या प्रकल्‍पात कौशल्‍य प्राप्‍त प्रशिक्षणार्थीच्‍या माध्‍यमातुन कमी खर्चात यंत्रमानव, ड्रोन्स व स्वयंचलित यंत्र आधारे शेती करण्‍यासाठी लहान व मध्यम जमीनधारक शेतक-यांना उपयुक्‍त ठरणार आहे. अत्याधुनिक डिजिटल साधने व्यावसायिक स्‍तरावर प्रचलीत होऊन स्वयंरोजगार निर्मितीसह उद्योजकांना मार्गदर्शन करतील.

शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी देशातील व राज्या‍तील शेतीपुढे मजुरांचा प्रश्न, वाढता निविष्‍ठांचा खर्च, बदलते हवामान व शेतीसाठी कमी होणारे पाण्याची उपलब्धाता अशा प्रमुख समस्या आहेत. या समस्यावर शेतीत डिजिटल तंत्रज्ञानाच्या आधारे मात करणे शक्य होऊ शकेल. या प्रकल्पांतर्गत शेतमजुरीच्या‍ कमरतेवर मात करण्‍यासाठी छोटे संरचनात्मक यंत्रांचा वापर, स्वयंचलित वाहनाव्‍दारे पीक हाताळणी, रोग निदान व उपाय, काढणी व वाहतुक करणे शक्य होईल. ड्रोनव्दारे कार्यक्षमरित्या पिक पाहणी व निरिक्षण, जमिनितील शुष्‍कता, पिकांवरिल रोग व निदान, कीडनाशकांची फवारणी हे कॅमेरा व सेंन्सीर तंत्रज्ञानाव्‍दारे शक्य होईल. अॅग्रीरोबोट व्दा‍रे फळांची व जमिनीची तपासणी, पिक लागवडी करिता मार्गदर्शन, फवारणी, काढणी, विविध रोग व कीडींची ओळख व उपाय, पिकांच्या गरजेनुसार ठिंबक व्‍दारे स्व‍यंचलित पाणी व्यवस्थापन यंत्रणा आदीं तंत्राचा समावेश राहणार आहे. काटेकोर पध्दतीने पिकांची लागवड, खत व पाणी व्यवस्थापन, फवारणी, पिक काढणी, बांधणी, पॅकेजींग आदीकरिता यंत्रमानव, ड्रोन, सेन्सर यंत्रणाचे वापर करण्यात येणार आहे. यंत्राव्दारे कापुस वेचणी, ग्रीन हाऊस तंत्रज्ञान, शेडनेट, मातीचे गुणधर्माचे विश्लेषण, क्षेत्रीय सर्वेक्षण, निरीक्षण आदीचा अंतर्भावासह डिजिटल शेती तंत्रज्ञानास लागणारे मनुष्यबळ निर्मिती करून या क्षेत्रात रोजगार, स्वयंरोजगार संधी व उद्योजकता विकासावर भर देण्यात येणार आहे.

प्रकल्पाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ गोपाल शिंदे यांचे मत - आज प्रगत देशातील शेतीत मोठया प्रमाणात डिजिटल तंत्रज्ञानाचा व स्वंयचलित यंत्राचा वापर होत आहे, परंतु भारतीय शेतीस अनुकूल असे तंत्रज्ञान वापरण्या बाबत हा प्रकल्प एक मार्गदर्शक दिशा ठरेल.
प्रकल्प समन्वयक डॉ राजेश कदम यांचे मत - या प्रकल्पाव्‍दारे शेतीच्या‍ डिजिटलकरणासाठी लागणा-या कुशल मनुष्यबळाची निर्मिती होऊन, त्यांचा उपयोग देशातील व राज्यातील कृषि विकासात होणार आहे.

विद्यापीठ शास्त्रज्ञांची २१ सदस्यीय कोर टीम प्रकल्पासाठी विद्यापीठ शास्त्रज्ञांची २१ सदस्यीय कोर टीम तयार करण्यात आली असुन इतर ४० संशोधक प्राध्यापकांचाही सहभाग राहणार आहे. प्रकल्पा‍ची कार्य यंत्रणा पुढील तीन वर्षात स्थापीत करून दिर्घकाळाकरिता यंत्रणा चालु ठेवत डिजिटल तंत्रज्ञानाचा कृषी उत्पादने वाढवण्याचे कार्य चालु राहील. या प्रकल्पातील कोर टीम मध्ये प्राचार्य डॉ उदय खोडके, डॉ मदन पेंडके, डॉ भगवान आसेवार, डॉ मेघा जगताप, प्रा संजय पवार, डॉ व्ही के इंगळे, डॉ प्रविण वैद्य, डॉ कैलास डाखोरे, डॉ संतोष फुलारी, डॉ विनोद शिंदे, डॉ धीरज कदम, डॉ डि व्ही पाटील, डॉ गोदावरी पवार, डॉ डि. डि. टेकाळे, डॉ एस. आर. गरूड, डॉ बी. एस. आगरकर, डॉ आर. बी. क्षीरसागर, डॉ विणा भालेराव, डॉ प्रविण कापसे आदींचा समावेश असुन इतर चाळीस शास्त्रज्ञांची उपसमिती असणार आहे.