Thursday, July 6, 2017

गृहविज्ञान महाविद्यालयाचे रूपांतर सामाजिक विज्ञान महाविद्यालयात

सामाजिक विज्ञान: विद्यार्थ्‍यांना व्यावसायिभिमूख करणारा अभिनव अभ्‍यासक्रमास यावर्षी पासुन सुरूवात
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत असलेल्‍या परभणी येथील गृहविज्ञान महाविद्यालयाचे रूपांतर सन २०१७-१८ या शैक्षणिक वर्षापासून सामाजिक विज्ञान महाविद्यालय (कम्‍युनिटी सायन्य कॉलेज) असे करण्‍यात आले असुन हा अभ्‍यासक्रम अधिक व्‍यावसायिभिमुख करण्‍यात आला आहे. भारतात सन १९२० दरम्यान ब्रिटीश राजवटीत गृह विज्ञान अभ्यासक्रमाची बीजे रूजविण्यात येऊन पुढे त्याची पाळेमुळे देशभर फैलावत गेली. मध्यंतरीच्या कालावधीत या अभ्यासक्रमात अनेक परिवर्तने झाली. तथापी आधुनिक काळाची गरज लक्षात घेऊन विद्यार्थ्‍यांना अधिक व्यावसायिभिमुख बनवण्यासाठी भारत सरकार; भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली; विविध राज्यातील कृषि विद्यापीठे तथा महाराष्ट्र शासन यांनी एकत्रितपणे पाऊले उचलत गृहविज्ञान पदवी अभ्यासक्रमाची व्याप्ती वृध्दिंगत करण्याच्या हेतूने अनेक बदल करून्‍ त्याचे नामांतर सामाजिक विज्ञान अभ्यासक्रमात करण्यात आले आहे. या अनुषंगाने महाविद्यालयातील विभागांच्या पारंपारिक नांवात बदल करण्यात येऊन संपूर्ण अभ्यासक्रमातही समाजाच्‍या गरजेनुसार अनेक सुधारणा करण्यात आल्या. सदरील अभ्यासक्रमास अभियांत्रिकी, वैद्यकीय या अभ्यासक्रमांप्रमाणे व्यावसायिक अभ्यासक्रमाचा दर्जा प्राप्त होण्यासाठी विद्यार्थ्‍यांना ही पदवी प्राप्त करण्यासाठी चार वर्षीय अभ्यासक्रमात (+) एकूण १८० क्रेडीट्सह परस्पर-पूरक असणा­या विविध ५८ विषयांचा अभ्यास करावा लागणार आहे. विद्यार्थ्‍यांना दर्जेदार पध्दतीने हे शिक्षण पूर्ण करता यावे या उद्देशाने प्रात्याक्षिके व प्रत्यक्ष अनुभावांवर भर देऊन हॅन्डस ऑन ट्रेनिंगला (HOT) प्राधान्य देण्यात आलेले आहे. असा हा अद्ययावत अभ्यासक्रम स्टुडन्टस् रेडी प्रोग्राम (Student Ready - Students Rural Entrepreneurship Awareness and Development Yojana) म्हणून राबवण्यात येणार आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण करतांना विद्यार्थ्‍यांना प्रारंभीक तीन वर्षांच्या कालावधीत सामाजिक विज्ञान अभ्यासक्रमातील प्रमुख विषयांचे अध्ययन करावे लागणार असून अंतीम चतुर्थ वर्षात विद्यार्थ्‍यांच्या आवडीनूसार व प्रथम तीन वर्षात त्यांनी प्राप्त केलेल्या गुणांआधारे महाविद्यालयातील चार विभागांपैकी कोणत्याही एका विभागा व्यावसायिकतेच्या दृष्टिकोनातून त्यांना ठोस प्रशिक्षण देऊन सक्षम केले जाणार आहे. याकरिता प्रख्यात संस्थांमध्ये इम्प्लांट ट्रेनिंग, ग्रामीण विभागात कार्य करण्याचा प्रत्यक्ष अनुभव येण्यासाठी रावे (RAWE- Work Experience in Rural Areas) तथा अंतीम सत्रात व्यावसायिकतेसंबंधी आवश्यक असणा­या क्षमता विद्याथ्र्यांमध्ये विकसित होण्यासाठी अनुभवमय अध्ययन कार्यक्रम (ELP- Experiential Learning Programme) अशा अभिनव उपक्रमांचा समावेश या अभ्यासक्रमात केलेला आहे. भारतातील विविध राज्यांमध्ये कृषि विद्यापीठाशी संलग्नीत असणारे गृह विज्ञान महाविद्यालय यापुढे सामाजिक विज्ञान महाविद्यालय म्हणून ओळखल्या जाणार असून अशा सर्व महाविद्यालयांमध्ये समान धर्तीवर हा अभ्यासक्रम राबवला जाणार आहे. यामुळे विद्यार्थ्‍यांना देशातील विविध राज्यात उच्च शिक्षण घेण्याचा मार्ग सोपा झाला आहे. तसेच राज्यस्तरीय तथा राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा परीक्षांमध्ये यश प्राप्त करण्यासाठी विद्यार्थ्‍यांसाठी हा अभ्यासक्रम निश्चितच लाभदायी असेल, अशी माहिती गृहविज्ञान महाविद्यालयाच्‍या सहयोगी अधिष्‍ठाता तथा प्राचार्या प्रा. विशाला पटणम यांनी दिली.
महाराष्ट्रात असणा­या एकूण चार कृषि विद्यापीठांपैकी केवळ परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठामध्ये सन २०१७-१८ या शैक्षणिक वर्षापासून हा अभ्यासक्रम राबवला जाणार असून त्यासाठीची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. 

सामाजिक विज्ञान पदवी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया पध्दती 
-  इयत्ता १२वी विज्ञान (१०+) किंवा समतूल्य अभ्यासक्रम पूर्ण असणे आवश्यक
- मुला-मुलींसाठी प्रवेश खूला
- संपूर्ण प्रवेश प्रक्रिया ही ऑनलाइन असून त्यासंबंधीचे माहितीपत्रक व अर्ज www.mcaer.org   mahaagriadmission.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
- उमेदवारांनी प्रवेश माहिती पुस्तिका (Prospectus) काळजीपूर्वक वाचून व्यवस्थिपणे प्रवेश अर्ज सादर करावा.
-  प्रवेश अर्ज भरण्याची शेवटची तारीख १० जुलै २०१७ 
या महाविद्यालयात पदवी अभ्यासक्रमाप्रमाणेच पदव्यूत्तर अभ्यासक्रम पूर्ण करण्याची सोय असून अद्यावत प्रयोगशाळा व वर्ग, मार्गदर्शन व समुपदेशन चिकित्सालये, विद्यार्थी कॉन्सलींग व प्लेसमेंट सेल, स्टुडंट- फ्रेंडली शैक्षणिक वातावरण, इंटरनेट, कॉम्प्युटर लॅब, उच्च विद्या विभुषित व अनुभवी प्राध्यापक वृंद आहे.

विद्यार्थ्‍यांना उपलब्ध संधी
सामाजिक विज्ञान या विषयातील पदवीधर व पदव्यूत्तर विद्यार्थ्‍यांना विविध क्षेत्रात कार्य करण्याच्या मुबलक संधी उपलब्ध आहेत. प्रामुख्याने आहारतज्ज्ञ, बालविकास अधिकारी, शाळांचे प्रशासक, कॉन्सलर, मुख्याध्यापक, शिक्षक, महाविद्यालयात प्राध्यापक, इंटेरियर डिझायनर, इव्हेन्ट मॅनेजर, हॉटेल मॅनेजर, अन्न निरीक्षक, फॅशन डिझायनर, बुटीक मॅनेजर, पत्रकारीता, प्रेस रिपोर्टर, अनाऊन्सर आकाशवाणी व दूरदर्शन कार्यक्रम संचलन कर्ता, विस्तार अधिकारी, समाज कल्याण अधिकारी, मल्टीमिडीया डेव्हलपर्स अशा अनेक पदांवर खाजगी निमशासकीय, शासकीय संस्थांमध्ये तसेच विविध योजनांचे प्रकल्प संचालक, संशोधक अशा विविध क्षेत्रात नोकरी-व्यवसाय करून अर्थार्जन करण्यासाठी विद्यार्थ्‍यांना १०० टक्के संधी उपलब्ध आहेत. परंतु असे यश प्राप्त करून आनंदी जीवन व्यतीत करण्यासाठी विद्यार्थ्‍यांनी त्यांच्या संवाद कौशल्यात निपूणता, अभ्यासक्रमातील विविध संकल्पनेत स्पष्टता, वर्गातील १०० टक्के उपस्थिती याबाबत कठोर परिश्रम करणे अतिशय आवश्यक आहे.
सौजन्‍य
प्रा. विशाला पटनम, सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्या
सामाजिक महाविद्यालय, वनामकृवि, परभणी
(भ्रमणध्वनी : 9822754922)
डॉ. जया बंगाळे