Wednesday, January 20, 2021

लातुर येथील गळीतधान्ये संशोधन केंद्रात जवस दिन साजरा


देशात अन्नधान्याची कमतरता नाहीपरंतु तेलबिया पिकाखालील लागवडीचे क्षेत्र फारच कमी आहे. दरवर्षी देशाला खाद्यतेलाची मोठया प्रमाणात आयात करावी लागतेत्‍याकरिता मोठी किंमत मोजावी लागते. शेतकरी बांधवानी तेलबिया पिक लागवड करावी. मराठवाडयातील कोरडवाहु क्षेत्रात रब्‍बी हंगामात जवस हे पिक एक चांगले पर्याय ठरेलअसे प्रतिपादन कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांनी केले. 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या लातुर ये‍थील गळीतधान्‍ये संशोधन केंद्र आणि हैद्राबाद येथील तेलबिया संशोधनालय यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने लातुर येथील गळीतधान्‍ये संशोधन केंद्रात जवस दिन साजरा (दिनांक २० जानेवारीकरण्‍यात आलाकार्यक्रमाच्‍या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास हैद्राबाद येथील शास्‍त्रज्ञ डॉ एस एन सुधाकरबाबुसंशोधक संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकरहैद्राबाद येथील जवस प्रकल्‍पाचे शास्‍त्रज्ञ डॉ ए एल रत्‍नकुमारगळीतधान्‍ये विशेषज्ञ डॉ एम के घोडके आदींची प्रमुख उपस्थिती होती.

कुलगुरू मा डॉ अशोक ढवण पुढे म्‍हणाले कीविद्यापीठ विकसित एखादा वाण जेव्हा शेतकरी बांधवाना पसंद पडतोत्‍यामागे कृषी शास्त्रज्ञाची मोठी मेहनत असते. लातुर येथील गळीत धान्‍य संशोधन केंद्राची स्‍थापना १९५६ साली झालीतेलबिया पिकांमध्‍ये अनेक चांगले वाण या संशोधन केंद्राने दिले. याच केंद्राने विकसित केलेले जवसाचे लातूर-९३  हे वाण अत्‍यंत चांगले असुन जवस लागवड ही आर्थिकदृष्‍टया फायदेशीर ठरेल असे ते म्‍हणाले.  

शास्‍त्रज्ञ डॉ एस एन सुधाकरबाबू मार्गदर्शनात जवसाचे आहारातील महत्‍व वाढत असुन शेतकरी बांधवाना जवस लागवड करून जवस प्रक्रिया उद्योग उभारण्‍याची संधी असल्‍याचे म्‍हणाले तर शास्रज्ञ डॉ ए एलरत्नकुमार म्हणाले कीजवस हे महत्वाचे रब्बी पीक आहेत्याचा वापर पेंट उद्योगात होत आहे त्यामुळे हे पीकाचे महत्‍व वाढणार आहे.  

डॉ दत्तप्रसाद वासकर म्‍हणाले कीजवसाचे लातूर-९३ या हे वाण २०१७ मध्ये प्रसारित करण्‍यात आलाा. केवळ तीन महिन्‍यात येणारे चांगले उत्पादन देणारे वाण आहे. लातुर येथील प्रक्षेत्रावर पंधरा एकर जवस वाणाची लागवड करण्‍यात आली आहे. तसेच लातुर येथील विभागीय कृषि सहसंचालक डॉ टि एन जगताप म्‍हणाले कीजवस दिवस एक दिवसाचा न ठेवता तो तंत्रज्ञान सप्‍ताह म्‍हणुन साजरा करून शेतकरी बांधवाना जवस लागवडी पासुन प्रक्रिया उद्योगाबाबत प्रशिक्षण देण्‍याची गरज असल्‍याचे म्‍हणाले.

कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक डॉ एम के घोडके यांनी केले. सुत्रसंचालन डॉ मुटकुळे यांनी केले तर आभार डॉ मोहन धुपे यांनी मानले. कार्यक्रमास लातुर परिसरातील शेतकरी मोठया संख्‍येने उपस्थित होते. या प्रसंगी जवस पीक प्रात्‍यक्षिकांचे आयोजन करण्‍यात आले होतेसंशोधन केंद्राच्‍या पंधरा एकर प्रक्षेत्रावर विद्यापीठ विकसित नवीन वाण लातुर ९३ लागवड करण्‍यात आली असुन इतर ४० वाणाचे ‍पिक प्रात्‍यक्षिकात समावेश आहे. कृषि प्रदर्शनीचेही आयोजन करण्‍यात आले होते. बचत गट सदस्‍यांना जवस लागवडप्रक्रियाव मुल्‍यवर्धन यावर प्रशिक्षण देण्‍यात आले.

तांत्रिक सत्रात तेलबिया संशोधन व पुढील वाटचाल यावर डॉ दत्‍तप्रसाद वासकरसुर्यफुल लागवडीवर डॉ एस एन सुधाकरबाबुजवस लागवडीवर डॉ ए एल रत्‍नकुमारजवस मुल्‍यवर्धन यावर श्री उदय देवळाणकरजवस शेतक-यांसाठी वरदान यावर प्रगतशील शेतकरी श्री अशोक चिंते आदींनी मार्गदर्शन केले. 

कार्यक्रमात सुधारित तंत्रज्ञानाने जवस लागवड करणारे व जवस मुल्‍यवर्धन करून विविध प्रक्रिया पदार्थ तयार करणा-या सहा प्रगतशील शेतक-यांचा माननीय कुलगुरू यांच्‍या हस्‍ते सत्‍कार करण्‍यात आला. विद्यापीठ शास्‍त्रज्ञ लिखित जवस लागवडप्रक्रियाव मुल्‍यवर्धन या पुस्‍तकाचे विमोचन करण्‍यात आले. भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्‍या योजनेतुन अनुसुचित जाती व जमातीच्‍या शंभर शेतकरी व महिला शेतकरी यांना मान्‍यवरांच्‍या हस्‍ते फवारणी यंत्र, वैभव विळा, ताडपत्री आदी कृषि निविष्‍ठांचे वाटप करण्‍यात आले.