Thursday, March 5, 2015

कृषी विद्यापीठे सर्वांगीण ग्रामीण विकासाची केंद्रे बनू शकतात...भारतीय अणुउर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष मा. डॉ. अनिल काकोडकर

राज्‍याचे राज्‍यपाल महामहिम श्री. चेन्‍नमनेनी विद्यासागर राव यांच्‍या अध्‍यक्षतेखाली समारंभ संपन्‍न 
परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचा विसावा दीक्षान्‍त समारंभ महाराष्‍ट्र राज्‍याचे राज्‍यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती महामहिम श्री. चे. विद्यासागर राव यांच्‍या अध्‍यक्षतेखाली दि. ५ मार्च रोजी उत्‍साहात संपन्‍न झाला. महसुल व कृषि मंत्री तथा विद्यापीठाचे प्रति कुलपती मा. ना. श्री. एकनाथराव खडसे व परिवहनमंत्री तथा परभणीचे पालकमंत्री मा. ना. श्री. दिवाकरराव रावते हे प्रमुख पाहुणे म्‍हणुन उपस्थिती होते तर भारतीय अणुउर्जा आयोगाचे माजी अध्‍यक्ष मा. डॉ. अनिल काकोडकर यांनी दीक्षान्‍त भाषण केले. याप्रसंगी व्‍यासपीठावर कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु, अकोला येथील डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ रवीप्रकाश दाणी, विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्‍य मा श्री केदार साळुंके, मा श्री रविंद्र देशमुख, मा श्री अनंतराव चोंडे, मा सौ सुस्मिता पवार, मा श्री गोविंदराव देशमुख, मा श्री राहुल सोनवणे, शिक्षण संचालक तथा अधिष्‍ठाता डॉ अशोक ढवण, कुलसचिव डॉ दिनकर जाधव यांची उपस्थिती होती.
जलसंधारण कृषी क्षेत्रातील कार्याबद्दल मराठवाडा शेती सहाय्य मंडळाचे विश्‍वस्‍त मा. श्री. विजयअण्‍णा बोराडे यांना कृषिरत्‍न’ या मानद उपाधीने माननीय राज्‍यपाल यांच्‍या हस्‍ते सन्‍मानित करण्‍यात आले तर विद्यापीठांतर्गत विविध विद्याशाखेतील एकूण ३८१७ स्‍नातकांना विविध पदवी (३२१३), पदव्‍युत्तर (५७६) व आचार्य (२८) पदवीने माननीय कुलपती महोदयांव्‍दारे अनुग्रहीत करण्‍यात आले. याप्रसंगी माननीय कुलपती महोदयांनी स्‍नातकांना सत्‍याच्‍या मार्गावर राहुन देशासाठी व समाजासाठी आपले कर्तव्‍य प्रामाणिकपणे पार पाडण्‍याची शपथ दिली.
       दीक्षान्‍त भाषणात स्‍नातकांना मार्गदर्शन करतांना भारतीय अणुउर्जा आयोगाचे माजी अध्‍यक्ष मा. डॉ. अनिल काकोडकर म्‍हणाले की, सुशिक्षित व्यक्ती म्हणून राष्ट्र निर्मितीच्या कामात क्षमतेनुसार आपणास महत्वपूर्ण भूमिका निभावयाची असुन नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाला व उद्योजकतेला आजच्या युगात भरपूर वाव आहे. देशाची प्रगती पाहता, सक्षम व्यक्तींना अधिकाधिक संधी मिळत जाणार आहेत. संपुर्ण आयुष्यात सतत अध्‍यापनाची प्रवृत्ती बाळगून आपली ज्ञान केंद्रे, उद्योग व समाज एकमेकांशी निगडीत ठेवून आपण देशासाठी भरीव योगदान देवू शकतो.
       कृषी विद्यापीठांमुळे देशात हरितक्रांती होऊन अन्नधान्यात देश स्‍वयंपुर्ण झाला, परंतु सतत वाढत चाललेल्या गरजा लक्षात घेता अजूनही फार मोठा पल्ला गाठायचा आहे. देशात लोकसंख्येचा मोठा हिस्सा ग्रामीण भागात वसतो असुन शेती हेच उपजीविकेचे प्रमुख साधन आहे. ग्रामीण भागातील सरासरी उत्पन्न शहरी भागापेक्षा कितीतरी कमी असुन ही विषमता कमी करणे, शहरीकरणावरील ताण कमी करणे, शेती व शेती पुरक उद्योगाने व इतर मुल्यवर्धनातून आपल्या अर्थव्यवस्थेला बळकटी आणणे, हि आपल्या पुढील प्रमुख आव्हाने होत. यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा विकास करणे अत्यंत गरजेचे आहे. कृषी विद्यापीठांनी आपल्या कार्याची व्याप्ती वाढविल्‍यास सर्वांगीण ग्रामीण विकासाची केंद्रे बनू शकतात. जनुकीयदृष्‍टया सुधारित (बीटी) कपाशीमुळे कापसाचे एकूण उत्पादन वाढले हे एक निर्विवाद सत्य असुन या तंत्रज्ञानामुळे भारतासारख्या प्रचंड लोकसंख्या असलेल्या देशाच्या भविष्यकालीन अन्नसूरक्षीततेस चांगला हातभार लागू शकतो. यासाठी सुरक्षित व योग्‍य संशोधन व्यापक प्रमाणात होणे अत्यंत आवश्यक आहे.
प्रास्‍ताविकात कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांनी विद्यापीठाच्‍या कृषि शिक्षण, संशोधन व विस्‍तार शिक्षण क्षेत्रातील कार्याचा माहिती देतांना सांगितले की, विद्यापीठाने पाण्‍याचा ताण सहन करणा-या विविध पीकांची विकसित केले असुन शेतकरी मोठया प्रमाणावर त्‍याचा अवलंब करित आहेत. मराठवाडयातील सद्य दुष्‍काळस्थितीस धैर्याने तोंड देण्‍यासाठी आठही जिल्‍हयात राबविण्‍यात येत असलेल्‍या उमेद उपक्रमास शेतक-यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. मराठवाडा विभागासाठीचा कृषी शिक्षणाचा २०३० पर्यंतचा आराखडा विद्यापीठाने तयार केला असुन यामुळे या भागातील कृषी शिक्षणाच्‍या प्रगतीस सहाय्यभुत ठरेल.
कृषि संशोधनातील अतुलनीय योगदानाबाबत डॉ विलास पाटील व डॉ सय्यद ईस्‍माईल यांना राधाकिशन शांती मल्‍होत्रा पारितोषिकाने तर डॉ एस पी मेहत्रे, डॉ सय्यद ईस्‍माईल व डॉ सुमंत जाधव यांना उत्‍कृष्‍ट शिक्षक पारितोषिकांनी मान्‍यवरांच्‍या हस्‍ते सन्‍मानित करण्‍यात आले.
याप्रसंगी शितल केंद्रे, प्रियंका शेळके, प्रियंका पाटील, मक्‍का अनुशा यांना पदव्‍युत्‍तर पदवीत विशेष प्राविण्‍यासह ऊर्त्‍तीण झाल्‍याबद्दल सुवर्ण पदकाने गौरविण्‍यात आले. तसेच निरजकुमार तिवारी, कादरी सयदा अमरिन, राधेशाम होंडे, प्रीती रूपनार, मनिषा झा, पल्‍लवी हींगे, पांडुरंग बेळगे, अवस्‍थी के, रेश्‍मी भगत, निलेश कानवडे, स्‍नेहल कार्ले, सावन जैस्‍वाल, कृ‍ष्‍णा भोकरे, महेश चौधरी यांना पदवीत विशेष प्राविण्‍यासह उर्त्‍तीण झाल्‍याबद्दल सुवर्ण पदकाने गौरविण्‍यात आले. प्रसांथ एैला, आरती भोसले, सुनिल पाटील, अनुराग श्रीवास्‍तव, अजीतप्रकाश शर्मा यांना रोख पुरस्‍काराने गौरविण्‍यात आले.
    कार्यक्रमास खासदार मा श्री संजय जाधव, आमदार मा श्री राहुल पाटील, जिल्‍हाधिकारी मा श्री एस पी सिंग, महापौर मा सौ संगिताताई वडकर, माजी कुलगुरू मा डॉ के पी गोरे, मा डॉ व्‍ही के पाटील, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, विद्यापीठ नियंत्रक श्री अप्‍पासाहेब चाटे यांच्‍यासह प्रतिष्‍ठीत नागरि‍क, विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी मोठया संख्‍येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ आशा आर्या व डॉ दयानंद मोरे यांनी केले.