Friday, March 13, 2015

गृहविज्ञान महाविद्यालयाच्‍या वतीने विविध गावात ग्रामीण महिलामध्‍येही उमेद जागृती


मराठवाडयातील शेतक-यांना सद्य दुष्‍काळस्थितीस धैर्याने तोंड देण्‍यासाठी व शेतकऱ्यांचे मनोबल उंचावण्यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या विविध गावात उमेद कार्यक्रम राबविण्‍यात येत असुन गृहविज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने प्राचार्य प्रा विशाला पटणम यांच्‍या मार्गदर्शनात सोनपेठ तालुक्‍यातील मौजे नरवाडी, अव्‍वलगाव, धार डिघोळ तसेच परळी तालुक्‍यातील मौजे कौठळी येथे या उपक्रमाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. यात संबंधित गावात शालेय विद्यार्थ्‍यांनी प्रभारफेरी काढुन जागर करण्‍यात आला. रासेयोच्‍या कार्यक्रम अधिकारी डॉ वीणा भालेराव यांनी बचतगटाच्‍या माध्‍यमातुन आर्थिक स्‍वावलंबन, विविध गृहउद्योग, कौटुंबिक स्‍तरावर पाण्‍याची बचत, खर्चातील काटकसर, उज्‍वल जीवनासाठी शिक्षण आदी विषयावर मार्गदर्शन केले. या गावात घरोघर फिरून रासेयोच्‍या स्‍वयंसेवकांनी स्‍वाईन फ्लु व इतर संसर्गजन्‍य आजारांत कौटुंबिक पातळीवरील उपाययोजना याबाबत माहिती दिली. कार्यक्रम यशस्‍वतेसाठी स्‍वयंसेविका मनिषा गोरे, पारूली कच्‍छवे, शुभांगी काटे, मुक्‍ता तिडके आदींने परिश्रम घेतले. यासाठी नरवाडी येथील लांजेश्‍वर बचत गट अध्‍यक्षा लक्ष्‍मीबार्इ जोगदंड, अव्‍वलगाव ये‍थील मुख्‍याध्‍यापक श्री कासंडे सर, पोलिस पाटील श्री तावडे, शिक्षक श्री शिंदे तसेच धार डिघोळ येथील अंगणवाडीताई मनकर्णा काटे यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमास ग्रामस्थ, महिला व किशोरवयीन मुली मोठया संख्‍येने उपस्थित होते.