Tuesday, December 17, 2019

वनामकृवित महाराष्‍ट्र कृषी अर्थशास्‍त्र संस्‍थेच्‍या बावीसाव्‍या राष्‍ट्रीय परिषदेचे आयोजन

केंद्र सरकारच्‍या राष्ट्रीय पर्जन्य क्षेत्र प्राधिकरणाचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी तथा शेतक-यांचे उत्‍पन्‍न दुप्‍पट करणे समितीचे अध्‍यक्ष मा डॉ अशोक दलवाई यांची प्रमुख उपस्थिती

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषि अर्थशास्‍त्र विभाग व महाराष्‍ट्र कृ‍षी अर्थशास्‍त्र संस्‍था यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने दिनांक २१ व २२ डिसेंबर रोजी महाराष्‍ट्र कृ‍षी अर्थशास्‍त्र संस्‍थेच्‍या बावीसाव्‍या राष्‍ट्रीय परिषदेचे आयोजन करण्‍यात आले आहे. सदरील परिषदेचे उद्घाटन दिनांक २१ डिसेंबर रोजी सकाळी १०.०० वाजता परभणी कृषी महाविद्यालयाच्‍या सभागृहात केंद्र सरकारच्‍या राष्ट्रीय जिरायती क्षेत्र प्राधिकरणाचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी तथा शेतक-यांचे उत्‍पन्‍न दुप्‍पट करणे समितीचे अध्‍यक्ष मा डॉ अशोक दलवाई यांच्‍या हस्‍ते होणार आहे. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण हे राहणार असुन प्रमुख पाहुणे म्‍हणुन महाराष्‍ट्र राज्‍य कृषी मुल्‍य आयोगाचे अध्‍यक्ष मा श्री पाशा पटेल उपस्थित राहणार आहेत तसेच शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर आदींची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
दोन दिवस चालणा-या सदरील परिषदेत देशातील व राज्‍यातील शंभर पेक्षा जास्‍त कृषि शास्‍त्रज्ञ सहभाग घेणार असुन सन २०२२ पर्यंत शेतक-यांचे उत्‍पन्‍न दुप्‍पट करणे, कृषि विकासाचे सामाजिक-आर्थिक मानके, सुधारित कृषि तंत्रज्ञानाचा परिणाम, कृषि विपणन धोरण, शेतमाल मुल्‍य धोरण आदी विषयांवर सहभागी शास्‍त्रज्ञ संशोधन लेखांचे सादरीकरण करणार आहेत. सदरील परिषदेचा समारोप दिनांक २२ डिसेंबर रोजी हैद्राबाद येथील राष्‍ट्रीय कृषि विस्‍तार व्‍यवस्‍थापन संस्‍थेचे (मॅनेज) संचालक मा डॉ के सी गुम्‍मागोलमठ यांच्‍या प्रमुख उपस्थित होणार आहे. परिषदेत शेतक-यांसाठी शेती या विषयावर मा डॉ अशोक दलवाई तर भारतीय शेतमाल बाजारपेठ सुधारणा यावर मा डॉ के सी गुम्‍मागोलमठ यांचेही मुख्‍य व्‍याख्‍यान होणार असल्‍याची माहिती विभाग प्रमुख डॉ किशोर देशमुख, मुख्‍य आयोजक डॉ दिगंबर पेरके व संस्‍थेचे अध्‍यक्ष डॉ प्रकाश महिंद्रे यांनी दिली आहे.