Friday, February 22, 2013

मराठवाडा कृषि विद्यापीठाचा 19 वा दिक्षांत समारंभ संपन्‍न

           मराठवाडा कृषि विद्यापीठाचा 19 वा दिक्षांत समारंभ दि. 22 फेब्रुवारी 2013 रोजी संपन्‍न झाला.  या दिक्षांत समारंभात देशातील शेतीस नवीन दिशा देवुन आंतरराष्‍ट्रीयस्‍तरावर एक प्रतिष्‍ठा प्राप्‍त करुन दिली, या अभूतपूर्व कार्याबद्दल केंद्रीय कृषि मंत्री मा.ना.श्री शरदच्रद्रजी पवार यांना डॉक्‍टर ऑफ सायन्‍स या मानद उपाधीने गौरविण्‍यात आले. तर कृषिक्षेत्रातील ज्ञान म‍हर्षिस त्‍यांच्‍या कृषि शिक्षण व संशोधनातील अतूलनिय योगदानाबद्दल मा. डॉ. किर्ती सिंग, माजी कुलगुरू, नरेंद्र देवा कृषि विद्यापीठ, हिमाचल प्रदेश कृषि विश्‍वविद्यालय व माजी अध्‍यक्ष कृषि वैज्ञानिक निवड मंडळ, नवी दिल्‍ली यांना कृषि रत्‍न या मानद उपाधीने गौ‍रविण्‍यात आले.
  या समारंभाचे अध्‍यक्षस्‍थान मराठवाडा कृषि विद्यापीठाचे प्रतिकुलपती तथा महाराष्‍ट्र राज्‍याचे कृषि मंत्री मा. ना. श्री राधाकृष्‍णजी विखे पाटील यांनी भुषविले. या समारंभास प्रमुख पाहुणे म्‍हणुन मा. डॉ. किर्ती सिंग व महाराष्‍ट्र राज्‍याचे कृषि राज्‍यमंत्री मा.ना.श्री गुलाबरावजी देवकर हे होते. सदरील समारंभास महाराष्‍ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषद, पुणेचे उपाध्‍यक्ष मा. ना. श्री विजयरावजी कोलते तसेच विद्यापीठाच्‍या कार्यकारी परिषदेचे सदस्‍य मा.आ.श्री जयप्रकाशजी दांडेगांवकर, मा.आ.श्री सतीशजी चव्‍हाण व मा.आ.श्री सुरेश जेथलीया यांची‍ विशेष उपस्थिती होती.
  याप्रसंगी मा.ना.श्री शरदच्रद्रजी पवार आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, मला मराठवाडा कृषि विद्यापीठांनी या मानद उपाधीने गौरविण्‍यात आल्‍या बद्दल अत्‍यंत आनंद होत आहे. हा पुरस्‍कार मी 121 कोटी लोकसंख्‍यांना अन्‍नपुरवण्‍याची जबाबदारी असणा-या या देशातील शेतकरी बांधवांना समर्पित करतो. गेल्‍या चार दशकापासून मराठवाडा कृषि विद्यापीठाने या भागातील संतुलीत आर्थीक विकासासोबतच कृषि शिक्षण आणि संशोधनाची संधी प्राप्‍त करुन दिली आहे. या विद्यापीठाने विकसीत केलेल्‍या नवनवीन व सुधारीत तंत्रज्ञान शेतक-यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्‍यासाठी विविध अभिनव विस्‍तार उपक्रम राबवित आहे. 1972 च्‍या महाराष्‍ट्रातील दुष्‍काळाच्‍या प्रसंगीच या विद्यापीठाची स्‍थापना झाली आणि परत एकदा त्‍याच प्रकारच्‍या दुष्‍काळास आपण सामोरे जात आहोत. 1972 च्‍या तुलनेत यावर्षी आपण चारा व अन्‍न आणु शकतो, परंतु पाणी आणु शकत नाही. या परिस्‍थीतीत फळबाग व पशुधन कसे वाचवावे हा प्रश्‍नचिन्‍ह आहे. 1972 च्‍या दुष्‍काळापासुन शिकवण घेऊन संशोधनाच्‍या आधारे विद्यापीठाने कोरडवाहू परिस्‍थीतीत चारा पिके व अन्‍न पिकांतील वाणांचा विकास करुन भरीव कार्य केले आहे. 1972 च्‍या वेळी रोजगार हमी योजनेवर 45 लाख मजुरांची नोंद होती ती आज दोन लाखावर आलेली आहे, परंतु यामध्‍ये सधनशील शेतक-यांचाही समावेश आहे ही स्थिती भयावह आहे. यासाठी शेतक-यांनी पर्यायी उत्‍पन्‍नासाठी पुरक व्‍यवसायाकडे वळावे. या दुष्‍काळामुळे उत्‍पादनात घट तर होणारच आहे परंतु याचा परिणाम अनेक पिढ्यावर होवू शकतो विशेषत: बिकट आर्थिक परिस्थितीमध्‍ये मुलांच्‍या शिक्षणाकडे दुर्लक्ष होण्‍याची शक्‍यता निर्माण झाली आहे. यासाठी शासनाचे प्रतिनिधी, शास्‍त्रज्ञ, सामाजिक कार्यकर्ते या सर्वांनी समर्पित भावनाने कार्य करावे.
     हवामानातील व तापमानातील बदल हे एक शेतीक्षेत्रातील मोठा प्रश्‍न आहे. या हवामानातील बदलात तग धरणा-या तंत्रज्ञानाचा विकास करणे अत्‍यंत आवश्‍यक आहे. आज पदवी घेतलेल्‍या पदवीधारक विद्यार्थ्‍यांना माझे आवाहन आहे की या क्षेत्रामध्‍ये भविष्‍यात संशोधन करावे. जागतिक व देश पातळीवर आर्थिक, सामाजिक व तंत्रज्ञान विकासाचा दर अतिवेगाने वाढत आहे आणि याच्‍याशी अनुकूल असा कृषि शिक्षण यंत्रणेत आमूलाग्र बदल करण्‍याची गरज आहे असे प्रतिपादन मा. ना. श्री शरदचंद्रजी पवार यांनी केले आहे. पुढे विद्यार्थ्‍यांना सल्ला देतांना म्‍हणाले की, कृषि पदवीधारकांनी सरकारी नौकरीच्‍या मागे न लागता उद्योजक बनावे आणि विद्यापीठाने सुध्‍दा कृषि उद्योजक निर्माण करण्‍यासाठी अभ्‍यासक्रमात योग्‍य तो बदल करावा. शेतक-यांचे अविरत परिश्रम व शासनाच्‍या अनुकूल धोरणामुळे देश आज जगामध्‍ये प्रमुख कृषि उत्‍पादक देश आहे. आज आपण जगात दुध उत्‍पादनात पहिल्‍या क्रमांकावर तर फळ भाजीपाला व मत्‍स्‍य उत्‍पादनात  दुस-यां क्रमांकावर आहोत ही अभिमानाची गोष्‍ट आहे आणि यासाठी या देशातील प्रत्‍येक शेतक-यांचे आपण आभार मानले पाहिजे. मला दिलेली डॉक्‍टर ऑफ सायन्‍स ही मानद उपाधी मी शेतक-यांना स‍मर्पित करतो असे उदगार मा. ना. श्री शरदचंद्रजी पवार यांनी काढले.
     याप्रसंगी विद्यापीठातील कार्यबाबत प्रभावीत होउन विद्यापीठासाठी वातानुकूलीत सभागृह, मुलींसाठी नवीन वसतीगृह, हवामान बदलास अनुकूल अशा ज्‍वारी व तुर पिकांचे वाण विकसीत करण्‍यासाठी संशोधन केंद्रास तसेच अद्यावत कृषि संग्रहालयाच्‍या उभारणीसाठी केंद्र सरकारकडुन 100 टक्‍के निधी देण्‍याचे आश्‍वासन मा. कृषि मंत्री श्री शरदचंद्रजी पवार यांनी दिले.
    कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा. डॉ. किर्तीसींग यांना कृषिरत्‍न या मानद उपाधीने गौरविण्‍यात आल्‍यानिमित्‍य आपल्‍या स्विकृत भाषणात म्‍हणाले की, कृषि पदवीधरांचे अभिनंदन करतो ज्‍यांनी कृषि क्षेत्रात शिक्षण घेण्‍याचा निर्णय घेऊन कृषि क्षेत्रात सेवा करण्‍याची सुवर्ण संधी प्राप्‍त करून घेतली आहे. राष्‍ट्रपिता महात्‍मा गांधी म्‍हणाले होते की, जबाबदार नागरीकांनी गरीबांची व शेतक-यांची काळजी घेणे आवश्‍यक आहे. या गोष्‍टीचा समाजाला विसर पडला नाही पाहिजे. मला या गोष्‍टीचा फार अभिमान आहे की, मराठवाडा कृषि विद्यापीठ हे राष्‍ट्रीय कृषि संशोधन यंत्रणेचा मुख्‍य घटक आहे आणि तो मोठ्या वेगाने प्रगती करीत आहे. या ठिकाणी निर्माण केलेले मनुष्‍यबळ हे देशाला व राज्‍याला अग्रस्‍थानी नेण्‍यास निश्‍चीतच मदत करील अशी आशा त्‍यांनी व्‍यक्‍त केली्  ते पुढे म्‍हणाले कि, विद्यापीठाने 125 पेक्षा जास्‍त वाण, 700 पेक्षा तंत्रज्ञान शिफारशी व 20 कृषि औजारांची निर्मिती करुन शेतक-यापर्यंत नेल्‍या आहेत आणि यामुळे या भागातील व राज्‍यातील कृषि व संलग्‍न क्षेत्रातील उत्‍पादकता वेगाने वाढत आहे. विद्यापीठ अत्‍याधुनिक दृकश्राव्‍य उपकरणे, टचस्‍क्रीन, एसएमएस सेवा, कृषि माहिती वाहिणी आदि या विस्‍तार शिक्षण क्षेत्रात नवनवीन मुलभूत सुविधांचा वापर करीत आहे हि कौतुकास्‍पद आहे. सध्‍या नैसर्गीक संसाधनावरील जैविक व अजैविक ताण वाढत आहे तर पाणी आणि जमीनीची उपलब्‍धता कमी होत आहे. 2005-06 मध्‍ये दरडोई लागवडी खालील क्षेत्र 1.23 हेक्‍टर होते ते कमी होऊन 2010-11 मध्‍ये 1.16 हेक्‍टर पर्यंत आले आहे. या सर्वांचा विचार करुन जमीनीचा योग्‍य वापरासाठी धोरण ठरवणे आवश्‍यक आहे. योग्‍य तंत्रज्ञानाची निर्मिती करणे व कृषि बाजार यंत्रणेची मजबुतीकरण करण्‍यासाठी देशात शितगृहांचे जाळे निर्माण करणे आवश्‍यक आहे तसेच ठि‍कठिकाणी अन्‍नप्रक्रिया केंद्र उभारणे आवश्‍यक आहे. अन्‍नधान्याची नासाडी कमी करण्‍यासाठी काढणी पश्‍चात व्‍यवस्‍थापन व शेतमाल प्रक्रिया या क्षेत्रास प्राधान्‍य द्यावे लागेल. सध्‍या पाण्‍याचे व्‍यवस्‍थापन करणे अत्‍यंत आवश्‍यक असुन सर्वांच्‍या सहभागाने जमीनीतील पाण्‍याची पातळी वाढण्‍यासाठी प्रयत्‍न करावेत. तसेच सुक्ष्‍म सिंचन योजनेला प्राधान्‍य दिल्‍यास जास्‍तीत जास्‍त शेतीला देऊ शकू. शिक्षण हे सामाजिक व आर्थिक परिवर्तनाचा महत्‍वाचे साधन आहे आणि याचा वापर आपण ग्रामीण आणि दुर्लक्षीत भागांच्‍या विकासासाठी करणे आवश्‍यक आहे असे प्रतिपादन मा. डॉ. किर्ती सींग यांनी केले.
      मराठवाडा कृषि विद्यापीठाने बिजोशितल या संस्‍थेशी सामजंस्‍याचा करार करुन एक‍ नवीन संशोधनाचे व शैक्षणीक दालण विद्यार्थ्‍यासाठी उपलब्‍ध करुन दिले आहे. ‘विद्यापीठ आपल्‍या दारी तंत्रज्ञान शेतावरी’ हा अभिनव विस्‍तार शिक्षण उपक्रम राबवून मराठवाड्यातील शेतक-यामध्‍ये नवचैतन्‍य निर्माण केले आहे ही नक्‍कीच अभिमानाची बाब आहे असे उदगार त्‍यांनी काढले आहे.
    कार्यक्रमाचे प्रास्‍ताविकात विद्यापीठाचे मा. कुलगुरू डॉ. किशनरावजी गोरे यांनी विद्यापीठाच्या कार्याचा आढावा मान्‍यवरांच्‍या समोर मांडला.
     यावर्षी प्रथमच मराठवाडा विभागातील प्रयोगशील शेतकरी बांधवांना ‘एमकेव्‍ही फेलो’ हा पुरस्‍काराचा प्रारंभ करण्‍यात आला त्‍याचे पहिले मानकरी ठरले श्री भैरवनाथ भगवानराव ठोंबरे, त्‍यांना या प्रसंगी सन्‍मानीत करण्‍यात आले. तसेच विद्यापीठातील डॉ. बी. एम. ठोंबरे, डॉ. स्मिता खोडके, डॉ. आशा आर्या, डॉ. अशोक रोडगे, डॉ. एस एस शटगार यांना उत्‍कृष्‍ट शिक्षक या पुरस्‍काराने सन्‍मानीत करण्‍यात आले. कृषि संशोधन क्षेत्रात उल्‍लेखनीय कार्य केल्‍याबददल विद्यापीठातील शास्‍त्रज्ञ डॉ. उदय खोडके व डॉ. व्‍ही. एम. पवार यांना राधाकिशन शांती मल्‍होत्रा पुरस्‍काराने मान्‍यवरांच्‍या हस्‍ते गौरविण्‍यात आले.
     या दिक्षांत समारंभात कृषि विद्यापीठांतर्गत विविध विद्याशाखेतील एकुण 1620 स्‍नातकांना विविध पदवी (१३०६), पदव्‍युत्‍तर (२९९) व आचार्य (१५) पदवीने मानणीय प्रतिकुलपती यांच्‍या शुभहस्‍ते अनुग्रहीत करण्‍यात आले. कु. तेजश्री झगडे, कु. गीता झरकर, कुमार योगेश इंगळे, कुमार देवेंद्र यादव, कुमारी प्रियांका कौल, कु. कुरेशी कौसर या विद्यार्थ्‍यांना सुवर्ण पदकाने गौरविण्‍यात आले. तसेच कु.गीता झरकर, कु जयकिशोर भारती, कु राजदिप राजोरीया, कु गौरी सैनी या विद्यार्थ्‍यांना त्‍यांच्‍या पदवी अभ्‍यासक्रमात उच्‍च श्रेणीने उतीर्ण झाल्‍याबद्दल रोख पुरस्‍काराने गौरविण्‍यात आले.
      व्‍यासपीठावर या प्रसंगी विद्यापीठाचे कुलसचिव श्री का. वी. पागीरे, शिक्षण संचालक तथा अधिष्‍ठाता डॉ. विश्‍वास शिंदे, संशोधन संचालक डॉ. गोवर्धन खंडागळे, विस्‍तार शिक्षण डॉ. अशोक ढवण, कार्यकारी परिषदेचे सदस्‍य यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच आरोग्‍य राज्‍यमंत्री मा. ना. श्रीमती फोजियाखान, पालकमंत्री मा ना श्री  प्रकाशदादा सोळंके, मराठवाड्यातील मा. खासदार, आमदार व प्रतिष्ठित नागरीक, विद्यापीठातील प्राध्‍यापक व कर्मचारीवर्ग, विदयार्थी मोठ्या संख्‍येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ आशा आर्या व डॉ दयानंद मोरे यांनी केले.
     या प्रसंगी मा. कृषि मंत्री मा. ना. श्री शरदचंद्रजी पवार यांच्‍या हस्‍ते भारतीय अनुसंधान परिषदेच्‍या आर्थिक पाटिंबाने उभारण्‍यात आलेल्‍या अनुभवावर आधारीत प्रशिक्षणांतर्गत कडधान्‍य व तेलबिया प्रक्रिया केंद्र, गृह विज्ञान महाविद्यालयातील प्रावरणे उत्‍पादन केंद्र व बिज प्रक्रिया केंद्र आदिंचे उदघाटन करण्‍यात आले.  तसेच मा. ना. श्री शरदचंद्रजी पवार यांनी माती व जल संवर्धन व पाण्‍याचा योग्‍य वापर असलेल्‍या पिंगळगड नाला विकास प्रकल्‍पास भेट देउन या प्रकल्‍पाची प्रसंशा केली. कृषि प्रर्दशनीस भेटी प्रसंगी त्‍यांनी विद्यापीठाने विकसित केलेल्‍या विविध पिकांच्‍या सुधारीत वाणाची व तंत्रज्ञानाची आस्‍थाने विचारपुस केली.


Grand Celebration of 19th Convocation of MKV Parbhani
The Marathwada Krishi Vidyapeeth  Parbhani celebrated its 19th Convocation in the gracious presence of very renowned personalities, Hon.Shri Sharadchandraji Pawar, Union Minister for Agriculture and Food Processing Industries, Govt. of India, Hon. Pro-Chancellor and Minister for Agriculture & Marketing     Shri Radhakrishnaji Vike-Patil, Former Vice-Chancellor and Former Chairman, Agricultural Scientists Recruitment Board (ICAR), Hon.Dr.Kirti Singh, State Minister for Agriculture, Hon. Shri Gulabraoji Deokar, State Minister  Hon.Prof.Smt.Fauzia Khan,  Vice-Chairman, MCAER,  Hon.Shri Vijayraoji Kolte, Hon. Shri Prakashdada Solunke, Guardian Minister and many other dignitaries.  Hon.Vice-Chancellor Dr.Kishanrao Gore gave the welcome address.  The total number of   recipients of various degrees was 1620 including Bachelors 1306, Masters 299 and Doctorates 15. With great pride, Dr.K.P.Gore, the Vice-Chancellor placed on the record, the significant achievements of MKV in the spheres of education, research and extension education.   On this auspicious occasion, Hon.Shri Sharadchandraji Pawar, Union Minister was conferred with the Honoris causa of Doctor of Science and Hon.Dr.Kirti Singh was conferred Honoris causa of Krishi Ratna in token of their significant contributions in the field of Agricultural science and development of the nation.  Hon.Shri Sharadchandraji Pawar dedicated his doctorate degree to the farmers of nation for their noble contribution in agricultural production and feeding the nation. Hon. Shri Sharadchandraji Pawar after paying the visit to Pingalgarh Nala appreciated the invocative venture of MKV for conservation, harvesting and utilization of water for agricultural activities. He inaugurated ICAR financed seed processing unit and two experiential learning units, which are established for providing professional training to UG students. He was very much impressed by the MKV activities and in reciprocation to it, he announced to give liberal financial support for creating new amenities for research and students’ welfare. He showed trust and confidence on Agricultural Scientists and farmers for their sincere efforts and hard work for the nation in combating all any kinds of natural calamities that are affecting agricultural production adversely. Hon. Shri Sharadchandraji Pawar presented the Gold Medals to the meritorious UG and PG candidates. Dr. Kirti Singh in convocation address appreciated the worthy developmental landmarks achieved by the MKV and impressed upon the scientists and teachers to improve the quality of agricultural education. He called upon the graduating students to serve the country with hard work, honesty, sincerity and dedication.   
Dr.Asha Arya,  Dr.Ashok Rodge, Dr.Baba Thombre, Dr.Smita Khodke and Dr.Sharad Shatgar received Best Teacher Awards while Dr.Vasant Pawar and Dr.Uday Khodke received Radhakishan Shanti Malhotra Award for their significant contributions in research.