Wednesday, April 19, 2023

महिला सुक्ष्‍म उद्योजक विकास कार्यशाळा संपन्‍न

वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठ, शेतकरी उत्‍पादक गट आमराई व एस.पी. जैन रिसर्च इन्स्टिट्यूट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १९ एप्रिल रोजी महिला कुशल सूक्ष्म उद्योजक विकास कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास उद्घाटक म्हणून कुलगुरू मा डॉ. इन्‍द्र मणि हे होते तर खासदार मा श्रीमती फौजिया खान, एस.पी.जैन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च च्‍या अधिष्‍ठाता डॉ. चंद्रलिका परमार, अन्न तंत्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश क्षीरसागर, आमराई डॉ.सॅम्युअल नाजरेद, प्राचार्या डॉ.जया बंगाळे, डॉ. स्मिता खोडके, बँक ऑफ इंडिया मुंबई श्रीमती ममता भट, डॉ. ज्योत्स्ना इंगळे, श्रीमती ठाकूर आदी प्रमुख व्याख्याते उपस्थित होते.

अध्‍यक्षीय भाषणात कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि म्‍हणाले की, विद्यापीठ शास्‍त्रज्ञ विविध कृषि उद्योग, प्रक्रिया उद्योग, मुल्‍यवर्धीत पदार्थ निर्मिती यावर वेळोवेळी तांत्रिक मार्गदर्शन करतात. यासोबत विविध संस्‍थाच्‍या सहकार्याने उद्योग उभारी करिता मदत केल्‍यास महिला उद्योजकता विकासास मोठा हातभार लाभेल. कृषी विद्यापीठ कृषि उद्योजकता विकासाकरिता वेळोवेळी प्रशिक्षणाचे आयोजन करते.

खासदार मा श्रीमती फौजिया खान म्‍हणाल्‍या की, ग्रामीण महिलांना शेती पुरक व्‍यवसाय करण्‍यास मोठा वाव असुन यामुळे महिला सक्षमीकरण होऊन ग्रामीण विकासास हातभार लाभेल.

कार्यशाळेचा उद्देश जिल्ह्यातील उद्योजकांना एकत्र करून प्रशिक्षण, ब्रॅण्डिंग, योग्य पॅकिंग करून त्यांना मार्केट उपलब्ध करून देण्यासाठी मुंबई येथील एस पी जैन कॉलेज, अमराई सहकार्य करणे. ग्रामीण भागातील महिलांनी उत्पादित केलेल्या प्रक्रिया पदार्थ एका छत्रा खाली आणून त्यांचा व्यवसाय वृद्धिंगत करण्यास मदत होईल. पारंपरिक अन्नपदार्थ वेगवेगळ्या ऑनलाईन मार्केट, मॉल, व्यवसायिक यांच्या मदतीने विक्री व्यवस्था सक्षम करण्यास मदत होईल. कार्यशाळेत विद्यापीठातील तज्ञांनी मार्गदर्शन केले.

शेतकरी उत्‍पादक कंपनी व स्‍वयंसहाय्यता गटाचे प्रतिनिधी प्रगतशील शेतकरी श्री नरेश शिंदे, श्री सुशील कांबळे, श्री सुकेशनी चौधरी, श्री युवराज गव्हाणे, श्री अनिल समिंद्रे आदीसह महिला बचत गटाच्या प्रतिनिधी व उद्योजक महिला उपस्थित होत्या. असोला, मुरुंब, ब्राह्मणगाव, पिंगळी आणि इतर गावातील महिला उद्योजिकांच सहभाग होता.