Tuesday, January 20, 2026

वनामकृवित रेशीम कोष न विणण्याच्या समस्यांवर उपाय विषयक तीन दिवसीय प्रशिक्षणाचे उद्घाटन

 रेशीम तंत्रज्ञानात प्राविण्य मिळवून उद्योजक व्हावे  — माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील कीटकशास्त्र विभागातर्फे रेशीम संशोधन योजना अंतर्गत व आयसीएआर अनुसूचित जाती उपयोजनेच्या माध्यमातून रेशीम कोष न विणण्याची समस्या व त्यावरील उपाय” या विषयावर आयोजित तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन मंगळवार दि. २० जानेवारी २०२६ रोजी कीटकशास्त्र विभागात उत्साहात पार पडले.

या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली झाले. उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करताना माननीय कुलगुरू म्हणाले, रेशीम उद्योगामध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मितीची क्षमता आहे. प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनी रेशीम तंत्रज्ञानात प्राविण्य मिळवून स्वतः यशस्वी रेशीम उद्योजक बनावे. केवळ प्रशिक्षणापुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष उद्योग उभारणीच्या दृष्टीने प्रयत्न करावेत.

याप्रसंगी शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले कीरेशीम उद्योग हा कृषिपूरक व्यवसाय असून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सखोल व तांत्रिक प्रशिक्षण घेऊन स्वावलंबी उद्योजक बनावे.

यावेळी व्यासपीठावर सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य, महाराष्ट्र सिल्क असोसिएशनचे श्री. राजेश उरकुडे, कीटकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. पुरुषोत्तम नेहरकर, केंद्रीय रेशीम बोर्डाचे शास्त्रज्ञ श्री. अशोक जाधव, श्रीमती शुभांगी गोरे, तसेच रेशीम संशोधन योजनेचे प्रभारी अधिकारी डॉ. धिरजकुमार कदम, डॉ. चंद्रकांत लटपटे, डॉ. मिलिंद सोनकांबळे, डॉ. अनंत लाड, डॉ. फारिया खान, डॉ. श्रद्धा धुरगुडे व डॉ. राजेंद्र जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.

तीन दिवसीय या प्रशिक्षण कार्यक्रमात रेशीम कोष न विणण्यामागील कारणे, रोग-कीड व्यवस्थापन, योग्य संगोपन पद्धती, गुणवत्तापूर्ण कोष उत्पादन, आधुनिक रेशीम तंत्रज्ञान तसेच उद्योजकतेच्या संधी यावर तज्ज्ञ मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या प्रशिक्षणासाठी एकूण ३० विद्यार्थी सहभागी झाले आहेत.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. पुरुषोत्तम नेहरकर यांनी केले, सूत्रसंचालन डॉ. अनंत लाड यांनी तर आभार प्रदर्शन श्री. धनंजय मोहोड यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. संजोग बोकन, डॉ. राजरतन खंदारे, अनुराग खंडारे, श्री. दत्ता जटाळे व रोहित मोरे यांनी मोलाचे योगदान दिले.



दर्जेदार संशोधनासाठी सकारात्मक दृष्टिकोन व शिस्त आवश्यक – माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

 वनामकृवित पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी ओरिएंटेशन कार्यक्रम संपन्न


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत कृषि महाविद्यालय, परभणी येथे शैक्षणिक वर्ष २०२५–२६ साठी नव्याने प्रवेश घेतलेल्या प्रथम वर्ष एम.एस्सी. व पीएच.डी. (कृषि/उद्यानविद्या) विद्यार्थ्यांसाठी ओरिएंटेशन कार्यक्रमाचे आयोजन दिनांक २० जानेवारी २०२६ रोजी करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि हे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि म्हणाले की, विद्यार्थ्यांनी शिक्षण व संशोधन यांचा समतोल व योग्य समन्वय साधणे अत्यंत आवश्यक आहे. संशोधन हे केवळ पदवी प्राप्तीसाठी नसून समाज, शेतकरी आणि देशाच्या प्रगतीसाठी दिशादर्शक ठरणारे असावे. उत्कृष्ट व नाविन्यपूर्ण संशोधनासाठी मन प्रसन्न, सकारात्मक, जिज्ञासू व उत्साही असणे गरजेचे आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी दैनंदिन जीवनात शिस्त, वेळेचे नियोजन व नैतिक मूल्यांचे पालन करावे, तसेच शैक्षणिक व महाविद्यालयीन नियमावलीचे काटेकोर पालन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. संशोधन प्रक्रियेत सातत्य, चिकाटी, प्रामाणिक प्रयत्न आणि वैज्ञानिक दृष्टिकोन या बाबी अनिवार्य असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच विद्यार्थी व संशोधन मार्गदर्शक यांच्यात परस्पर विश्वास, ऐक्य व जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले, तर समन्वय अधिक दृढ होऊन संशोधन अधिक दर्जेदार, परिणामकारक व समाजोपयोगी ठरू शकते. अशा संशोधनातूनच विद्यापीठाची शैक्षणिक प्रतिमा अधिक भक्कम होत असून देशाला सक्षम संशोधक घडविण्याचे कार्य साध्य होईल, असे प्रतिपादन त्यांनी केले.

प्रमुख अतिथी डॉ. भगवान आसेवार यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की, संशोधनामध्ये आधुनिक तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence) यांचा प्रभावी वापर करून अचूक शेतीतील विविध संशोधन बाबी साधाव्यात. आपण भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या (ICAR) ‘अ’ दर्जा प्राप्त विद्यापीठात शिक्षण घेत आहोत, याचा अभिमान बाळगून उच्च दर्जाचे संशोधन करावे, असे त्यांनी नमूद केले. विद्यापीठास राष्ट्रीय पातळीवरील अनेक पुरस्कार प्राप्त झाले असून, नुकताच कोरडवाहू शेती संशोधन केंद्रास ‘बेस्ट परफॉर्मिंग सेंटर’ पुरस्कार मिळाल्याचे त्यांनी सांगितले. याच गुणवत्तेमुळे देशभरातून पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी १६८ पैकी ४० विद्यार्थी या विद्यापीठात प्रवेश घेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विविध राज्यांतील विद्यार्थ्यांमुळे ज्ञानाचे आदान–प्रदान होऊन संशोधन अधिक समृद्ध होईल, असेही त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अधिष्ठाता व प्राचार्य डॉ. प्रवीण वैद्य यांनी केले. त्यांनी विद्यार्थ्यांना संशोधन प्रकल्पांचे विषय शेतकरीकेंद्रित, समाजोपयोगी व काळानुरूप आवश्यक असलेले निवडावेत, असे आवाहन केले.

शिक्षण प्रभारी डॉ. रणजीत चव्हाण यांनी महाविद्यालयीन नियमावलीची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली. या कार्यक्रमास विद्यापीठातील विविध विभागांचे विभागप्रमुख, प्राध्यापक, संशोधन मार्गदर्शक तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अनुराधा लाड यांनी केले, तर डॉ. मकरंद भोगावकर यांनी आभार प्रदर्शन केले.







‘जसे अन्न तसे मन’ — नैसर्गिक शेतीचा स्वीकार काळाची गरज : माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

 वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाद्वारा ‘नैसर्गिक शेतीमधील अनुभव’ विषयावर ऑनलाइन मार्गदर्शन


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील सेंद्रीय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्र आणि शेकरू फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सेंद्रीय व नैसर्गिक शेती प्रशिक्षण व संवाद मालिके अंतर्गत नैसर्गिक शेतीमधील अनुभव’ या विषयावर दि. २० जानेवारी २०२६ रोजी ऑनलाइन पद्धतीने मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी भूषविले. प्रमुख मार्गदर्शक म्हणून मौजे तिवसा (जिल्हा यवतमाळ) येथील नैसर्गिक शेती तज्ज्ञ पद्मश्री श्री. सुभाष शर्मा यांनी आपल्या अनुभवांवर आधारित सखोल मार्गदर्शन केले.

अध्यक्षीय भाषणात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि म्हणाले की, नैसर्गिक शेती ही केवळ शेती पद्धत नसून ती शाश्वत विकासाकडे नेणारी एक व्यापक चळवळ आहे. उत्पादन खर्च कमी करून शेतकऱ्यांचा आर्थिक ताण कमी करणे, जमिनीचे आरोग्य जपणे आणि पर्यावरणीय संतुलन राखणे हे नैसर्गिक शेतीचे मुख्य उद्दिष्ट आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने नैसर्गिक शेतीला एक अभियान म्हणून राबविण्याचा संकल्प केला असून विद्यापीठातील सर्व घटक व संलग्न महाविद्यालयांमध्ये नैसर्गिक शेतीची मॉडेल्स विकसित करण्यात आली आहेत. यामुळे शेतकरी कर्जमुक्तीकडे वाटचाल करतील. तसेच त्यांनी पुढे सांगितले की, शुद्ध व सकस अन्नामुळे मानवी आरोग्य आणि मानसिक संतुलन अबाधित राहते. ‘जसे अन्न तसे मन’ या तत्त्वाची पूर्तता नैसर्गिक शेतीतून होते. म्हणूनच नैसर्गिक शेतीचा प्रसार व स्वीकार ही काळाची गरज आहे. यावेळी त्यांनी पद्मश्री श्री. सुभाष शर्मा यांच्या ज्ञान, अनुभव व कार्याचे विशेष कौतुक करून विद्यापीठात प्रत्यक्ष मार्गदर्शनासाठी त्यांना निमंत्रित केले.

या कार्यक्रमाचे आयोजन संशोधन संचालक डॉ. खिजर बेग यांच्या मार्गदर्शनाखाली सेंद्रीय शेती प्रकल्प केंद्राचे प्रमुख डॉ. आनंद गोरे तसेच डॉ. मीनाक्षी पाटील यांनी केले.

पद्मश्री श्री. सुभाष शर्मा यांनी नैसर्गिक शेती म्हणजे काय, नैसर्गिक शेती कशी करावी, पीक रचना व पीक विविधीकरण, जमीन आरोग्य सुधारणा, कीड-रोग-तण व्यवस्थापन, मजूर व बाजारपेठ व्यवस्थापन याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे देत शंका समाधान केले.

या कार्यक्रमात शेतकरी बंधु-भगिनींनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला. प्रश्नोत्तर सत्रात नैसर्गिक शेतीसंबंधी विविध प्रश्न उपस्थित करण्यात आले असून त्यावर पद्मश्री श्री. सुभाष शर्मा यांनी समाधानकारक मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. आनंद गोरे यांनी केले, तर सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन डॉ. मीनाक्षी पाटील यांनी केले. या कार्यक्रमास विद्यापीठातील शास्त्रज्ञ तसेच शेतकरी बंधु-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण झूम मीटिंग, युट्यूब चॅनल व फेसबुक या सामाजिक माध्यमांद्वारे करण्यात आले.

पद्मश्री श्री. सुभाष शर्मा 


Monday, January 19, 2026

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वात परभणी येथील AICRP (Dryland) प्रकल्पास ‘बेस्ट परफॉर्मिंग सेंटर’ पुरस्कार

 वनामकृविच्या कोरडवाहू शेती संशोधन केंद्राला राष्ट्रीय पातळीवर गौरव

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत कार्यरत अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प (AICRP – Dryland), परभणी यांना बेस्ट परफॉर्मिंग सेंटर’ (Best Performing Centre) हा मानाचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

हा पुरस्कार दि. १९ जानेवारी २०२६ रोजी आसाम राज्यातील गुवाहाटी येथे आयोजित २९ व्या द्वैवार्षिक (Biennial) कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभात प्रदान करण्यात आला. सदर पुरस्कार भारतीय कृषी संशोधन परिषदेचे (ICAR) माननीय महासंचालक डॉ. एम. एल. जाट यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

हा प्रतिष्ठित राष्ट्रीय पुरस्कार माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या दूरदृष्टीपूर्ण व सक्षम नेतृत्वाखाली शेतकरी देवो भवः’ या भावनेतून राबविण्यात आलेल्या नाविन्यपूर्ण, शेतकरी-केंद्रित संशोधन व विस्तार उपक्रमांचे फलित आहे. माननीय कुलगुरू यांच्या सततच्या मार्गदर्शनातून नाविन्यपूर्ण केलेले उल्लेखनीय संशोधन कार्य, आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी अवलंब, शेतकरी-उपयुक्त व नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाची निर्मिती, उत्पादनवाढीस पूरक संशोधन निष्कर्ष तसेच व्यापक व परिणामकारक विस्तार कार्यातील सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरीच्या आधारे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

यावेळी व्यासपीठावर ICAR च्या नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन (NRM) विभागाचे उपमहासंचालक डॉ. ए. के. नायक, केंद्रीय कोरडवाहू शेती संशोधन संस्था (CRIDA) हैदराबादचे संचालक डॉ. व्ही. के. सिंग तसेच आसाम कृषी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) डेका यांची प्रमुख उपस्थिती होती.

हा पुरस्कार प्राप्त करण्यासाठी केलेल्या कार्यात संशोधन संचालक डॉ. खिजर बेग यांचेही वेळोवेळी मार्गदर्शनाखाली  लाभले. या उल्लेखनीय यशाबद्दल माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि व संशोधन संचालक डॉ. खिजर बेग यांनी दिलेल्या सातत्यपूर्ण प्रेरणा, मार्गदर्शन व प्रोत्साहनाबद्दल प्रकल्पाचे मुख्य शास्त्रज्ञ तथा प्रभारी अधिकारी डॉ. आनंद गोरे यांनी कृतज्ञता व्यक्त केली. हा पुरस्कार संशोधन केंद्राच्या वतीने डॉ. मदन पेंडके, डॉ. गणेश गायकवाड तसेच डॉ. पपिता गौरखेडे यांनी कार्यशाळेत उपस्थित राहून स्वीकारला.

या राष्ट्रीय गौरवामुळे शेतकरी देवो भवः’ या भावनेतून उभारल्या जात असलेल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या कोरडवाहू शेती संशोधन कार्यास नवे बळ मिळाले असून, मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी कोरडवाहू शेतीतील उपयुक्त तंत्रज्ञान विकासास अधिक गती मिळणार आहे.




Under the visionary leadership of Hon’ble Vice-Chancellor Prof. (Dr.) Indra Mani, the AICRP (Dryland) project at Parbhani received the “Best Performing Centre” award.

VNMKV’s Dryland Agriculture Research Centre receives national-level recognition

 

Vasantrao Naik Marathwada Agricultural University, Parbhani’s All India Coordinated Research Project on Dryland Agriculture (AICRP–Dryland), Parbhani has been conferred with the prestigious national award “Best Performing Centre.”

The award was presented during the inaugural ceremony of the 29th Biennial Workshop held on 19 January 2026 at Guwahati, Assam. The honour was bestowed by Ho’ble Dr. M. L. Jat, Director General, Indian Council of Agricultural Research (ICAR).

This prestigious national award is the outcome of innovative, farmer-centric research and extension initiatives implemented under the visionary and capable leadership of Hon’ble Vice-Chancellor Prof. (Dr.) Indra Mani, guided by the philosophy of “Shetkari Devo Bhavah.” Through the Hon’ble Vice-Chancellor’s continuous guidance, the University has undertaken remarkable and innovative research activities, ensured effective adoption of modern technologies, developed farmer-friendly and innovative technologies, generated research outcomes supportive of enhanced agricultural productivity, and carried out extensive and impactful extension work. Based on this sustained excellence and outstanding performance, the award has been conferred.

On this occasion, the Deputy Director General (ICAR - Natural Resource Management – NRM) Dr. A. K. Nayak, the Director of the Central Research Institute for Dryland Agriculture (CRIDA), Hyderabad, Dr. V. K. Singh, and the Hon’ble Vice-Chancellor of Assam Agricultural University, Prof. (Dr.) Deka, were prominently present on the dais.

The efforts undertaken to achieve this prestigious award were also guided from time to time by the Director of Research, Dr. Khizar Baig. Expressing gratitude for this remarkable achievement, the Chief Scientist and In-charge Officer of the project, Dr. Anand Gore, acknowledged the continuous motivation, guidance, and encouragement provided by the Hon’ble Vice-Chancellor Prof. (Dr.) Indra Mani and Director of Research Dr. Khizar Baig. The award was formally received on behalf of the research centre by Dr. Madan Pendke, Dr. Ganesh Gaikwad, and Dr. Papita Gaurkhede, who were present at the workshop.

This national recognition has provided renewed strength to the dryland agriculture research initiatives of Vasantrao Naik Marathwada Agricultural University, being carried out with the spirit of “Shetkari Devo Bhavah.” It is expected to further accelerate the development of farmer-friendly dryland technologies for the benefit of farmers in the Marathwada region.

Sunday, January 18, 2026

नार्म (NAARM) हैदराबाद येथे वनामकृविच्या चाकूर येथील पदव्युत्तर कृषि व्यवसाय व्यवस्थापन संस्थेच्या २८ विद्यार्थ्यांचा व्यवस्थापन विकास प्रशिक्षणात सहभाग

 भविष्यातील कृषि उद्योजक घडविण्यासाठी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांची प्रेरणा

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या चाकूर येथील पदव्युत्तर कृषि व्यवसाय व्यवस्थापन संस्था (PGIABM) मधील द्वितीय वर्षातील एकूण २८ विद्यार्थी आज दिनांक १८ जानेवारी २०२६ रोजी हैदराबाद येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या (ICAR) राष्ट्रीय कृषि विस्तार व्यवस्थापन संस्था (NAARM) येथे आयोजित पाच दिवसीय व्यवस्थापन विकास प्रशिक्षण कार्यक्रमात (Management Development Programme – MDP) सहभागी होण्यासाठी रवाना झाले आहेत.

हा प्रशिक्षण कार्यक्रम डिझाईन थिंकिंग फॉर अ‍ॅग्री-एंटरप्रेन्युअरशिप डेव्हलपमेंट” या विषयावर १९ ते २३ जानेवारी २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे.

सदर प्रशिक्षण कार्यक्रम माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या प्रेरणेने, शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सहयोगी अधिष्ठाता डॉ. संतोष कांबळे यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येत आहे.

यानिमित्त माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी सांगितले की, या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये व्यवस्थापन कौशल्य, नवोन्मेषी विचारसरणी तसेच उद्योजकतेची क्षमता विकसित करण्यावर विशेष भर देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी या प्रशिक्षणाचा पुरेपूर लाभ घ्यावा व विशेष प्राविण्य प्राप्त करावे, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.

शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनीही विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी सहयोगी अधिष्ठाता डॉ. संतोष कांबळे यांनी सांगितले की, या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना कृषि क्षेत्रातील नाविन्यपूर्ण व्यवसाय संधी ओळखण्यास मदत होणार असून नोकरी शोधणारे नव्हे तर नोकरी निर्माण करणारे उद्योजक बनण्याची प्रेरणा मिळणार आहे. भविष्यात सक्षम कृषि उद्योजक घडविण्याच्या दृष्टीने हा प्रशिक्षण कार्यक्रम अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.



Saturday, January 17, 2026

वनामकृविच्या ‘शेतकरी–शास्त्रज्ञ कृषी संवाद’ कार्यक्रमात एफपीओद्वारे शेतकरी समृद्धीवर मार्गदर्शन

 शेतकऱ्यांच्या आर्थिक समृद्धीसाठी एफपीओ प्रभावी माध्यम – विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या प्रेरणेतून तसेच विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती संभाजीनगर येथील कृषि विज्ञान केंद्र–१ यांच्या वतीने आयोजित ‘शेतकरी–शास्त्रज्ञ कृषि संवाद’ या ऑनलाईन कार्यक्रमाचा ८१ वा भाग दिनांक १६ जानेवारी २०२६ रोजी यशस्वीपणे संपन्न झाला.

या भागामध्ये शेतकरी उत्पादक कंपनीद्वारे समृद्ध शेतकरी (एफपीओ – स्थापना, महत्त्व, योजना व विविध व्यवसाय संधी)’ हा विषय घेण्यात आला.

कार्यक्रमास विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, मुख्य विस्तार अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख,  कृषिभूषण महाराष्ट्र एफपीओ फेडरेशनचे (महाराष्ट्र राज्य) चेअरमन श्री. भूषण निकम, कार्यक्रम समन्वयक डॉ. दिप्ती पाटगावकर, विषयतज्ज्ञ डॉ. बसवराज पिसुरे, डॉ. संजूला भावर, डॉ. अनिता जिंतूरकर तसेच श्री. अशोक निर्वळ यांची प्रमुख उपस्थिती होती.

मार्गदर्शन करताना डॉ. राकेश अहिरे म्हणाले की, शेतकऱ्यांना सक्षम व समृद्ध बनविण्यासाठी एकत्र येऊन संघटितपणे काम करणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी शेतकरी उत्पादक कंपनी (एफपीओ) हे सर्वात प्रभावी माध्यम आहे. विविध कृषि व्यवसाय सुरू करून अधिक आर्थिक लाभ व सर्वांगीण विकास साधायचा असल्यास शेतकऱ्यांनी एफपीओ स्थापन करून एकजुटीने कार्य करावे.

प्रमुख विषयावर मार्गदर्शन करताना श्री. भूषण निकम यांनी सांगितले की, कृषि उद्योग उभारणीसाठी शेतकऱ्यांनी उद्योगशील दृष्टिकोन व योग्य ज्ञान अंगीकारणे गरजेचे आहे. जोपर्यंत उद्योग करण्याची मानसिकता विकसित होत नाही आणि नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचा प्रयत्न केला जात नाही, तोपर्यंत यशस्वी उद्योग उभारणी शक्य होत नाही. यासाठी शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविणे आवश्यक आहे.

ते पुढे म्हणाले की, गावपातळीवरील किमान १० शेतकरी किंवा शेतकरी गट एकत्र येऊन शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करू शकतात. यासाठी ५ संचालक व ५ सदस्य असणे आवश्यक आहे. किमान एक महिला संचालक असल्यास अतिरिक्त लाभ मिळतो. एकापेक्षा अधिक गावे मिळूनही एफपीओ स्थापन करता येते.

एफपीओ स्थापनेसाठी संचालक व सदस्यांचे जन्म प्रमाणपत्र, पॅन कार्ड (मूळ/स्कॅन), आधार कार्ड (मूळ/स्कॅन), लाईट बिल किंवा मागील दोन महिन्यांचे बँक स्टेटमेंट, चार छायाचित्रे (मूळ किंवा JPEG स्वरूपात), ७/१२ उतारा (झेरॉक्स/PDF), शेतकरी असल्याचा दाखला, कार्यालयीन पत्त्यासाठी लाईट बिल, आवश्यक अर्ज व कंपनीचे नाव, संचालकांची नावे, मोबाईल क्रमांक व कार्यालयाचा पत्ता आदी कागदपत्रांची आवश्यकता असते. यातील बहुतांश प्रक्रिया सीए व सीएस यांच्या माध्यमातून पूर्ण करावी लागते.

केवळ कंपनी स्थापन करणे हा उद्देश नसावा, तर कंपनी स्थापन झाल्यानंतर परिसरातील बाजारपेठेचा सखोल अभ्यास करून त्यानुसार उद्योग उभारणी करावी. तसेच कृषिमालाला परदेशी बाजारपेठेत मोठ्या संधी असून योग्य मार्गदर्शनाच्या आधारे निर्यातीवरही लक्ष देणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

या ऑनलाईन कार्यक्रमास महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सहभागी शेतकऱ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांचे निरसन तज्ज्ञांमार्फत करण्यात आले.

कार्यक्रमाच्या नियोजनात मुख्य विस्तार अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख यांचे विशेष सहकार्य लाभले. प्रास्ताविक डॉ. दिप्ती पाटगावकर यांनी केले, सूत्रसंचालन डॉ. बसवराज पिसुरे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. संजूला भावर यांनी केले.








सशक्त राष्ट्र निर्मितीत युवकांची मध्यवर्ती भूमिका - माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रम "आव्हान - चान्सलर्स ब्रिगेड 2025-26" चे डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठात शानदार उदघाटन संपन्न

 राज्यातील महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनी गिरविणार आपत्कालीन व्यवस्थापनाचे धडे

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि
माननीय कुलगुरू डॉ. शरद गडाख 

महाराष्ट्र व गुजरात राज्यांचे माननीय राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती श्री. आचार्य देवव्रत यांच्या निर्देशानुसार डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला येथे आयोजित महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ आपत्तीपूर्व तयारी प्रशिक्षण शिबिर” उद्घाटनप्रसंगी विशेष अतिथी म्हणून मनोगत व्यक्त करताना वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी सांगितले की, सशक्त राष्ट्रनिर्मितीत युवकांची मध्यवर्ती भूमिका असून भारत हा युवकांचा देश आहे. स्वयंपूर्ण व सक्षम राष्ट्रनिर्मितीत युवकांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. आपत्ती व्यवस्थापनाचे मूलभूत धडे शाळा व महाविद्यालयीन स्तरावरच मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. त्याचबरोबर युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी मैदानी खेळांचे महत्त्वही त्यांनी अधोरेखित केले. हे प्रशिक्षण शिबिर दिनांक १७ ते २४ जानेवारी २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोलाचे माननीय कुलगुरू डॉ. शरद गडाख म्हणाले की, कृत्रिम बुद्धिमत्तेसह इंटरनेट आणि इतर समाज माध्यमाच्या आत्याधिक भडीमारामुळे अलीकडील काळातील युवा पिढी काहीशी अलिप्ततेकडे झुकत असून आत्मनिर्भर राष्ट्राच्या निर्मितीसाठी आता एकात्मिक प्रयत्नांची गरज आधोरेखित झाली आहे. युवकांच्या देशातील युवा पिढीने आता अधिक समाजाभीमुख होणे गरजेचे असल्याचे सांगताना ह्या करिता शाळा, महाविद्यालयानी सामाजिक उपक्रमात अधिकाधिक विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्याची गरज प्रतिपादित केली. ते पुढे म्हणाले की, महामहीम राज्यपाल महोदयांच्या कल्पकतेतून आव्हान सारख्या काळसुसंगत उपक्रमांची मालिका महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना राष्ट्रप्रेम, स्वतःची जबाबदारी, कर्तव्य आदींची जाण अधिक भक्कम करणारी असल्याचे गौरवोदगार काढले व डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाला राज्यस्तरीय आव्हान- चान्सलर्स ब्रिगेड राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन शिबिराचे आयोजनाचा बहुमान प्राप्त करून दिल्याबद्दल माननीय राज्यपालांप्रति कृतज्ञता देखिल व्यक्त केली. 

कार्यक्रमात महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूरचे माननीय कुलगुरू डॉ. नितीन पाटील यांनी युवा पिढीला सामाजिक जबाबदारीची अधिक जाण देत समाजाप्रती आपण देणे लागतो ही भावना वृद्धिंगत करण्याचे आवाहन केले. याप्रसंगी एनडीआरएफ अकॅडमी नागपूरचे संचालक ब्रिगेडियर आर सत्यनारायण तथा एनडीआरएफ पुण्याची कमांडंट संतोष बहादुर सिंह यांनी समावेशित विचार व्यक्त करताना राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनावर अधिक प्रकाश टाकत राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांकडून या राष्ट्रीय कार्यात जोमाने सहभागी होण्याच्या अपेक्षा व्यक्त केल्या.

आठ दिवस चालणाऱ्या या प्रशिक्षणात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि आणि शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांच्या प्रेरणेतून तसेच विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ राजेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेतील आठ विद्यार्थ्यांच्या चमूने कार्यक्रम अधिकारी डॉ. सुभाष विखे यांच्यासह सहभाग नोदाविला आहे.

उद्घाटन सत्राचे प्रसंगी विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सन्मानीय सदस्य, सर्व संचालक, प्रशासकीय अधिकारी, सहयोगी अधिष्ठाता, विभाग प्रमुख, विद्यार्थी कल्याण अधिकारी तसेच वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणीचे विद्यापीठ समन्वयक डॉ. राजेश कदम,  यांच्यासह महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांचे समन्वयक त्यांच्या विद्यार्थी चमूसह सहभागी झाले.


माननीय कुलगुरू डॉ. नितीन पाटील


 



Youth Play a Central Role in Building a Strong Nation – Hon’ble Vice-Chancellor Prof. (Dr.) Indra Mani

 

Grand Inauguration of the State-Level Disaster Management Programme
“AVHAAN – Chancellor’s Brigade 2025–26” Held at Dr. Panjabrao Deshmukh Agricultural University

 

College Students Across the State to Learn Essential Lessons in Emergency and Disaster Management

 

As per the directives of the Hon’ble Governor of Maharashtra and Gujarat and Chancellor of the University, Shri Acharya Devvratji, the “Maharashtra State Inter-University Pre-Disaster Preparedness Training Camp” was organized at Dr. Panjabrao Deshmukh Agricultural University, Akola.

While expressing his views as the Chief Guest at the inaugural function, the Hon’ble Vice-Chancellor of Vasantrao Naik Marathwada Agricultural University, Parbhani, Prof. (Dr.) Indra Mani, stated that youth play a central role in building a strong nation, and India is a country of youth. He emphasized that the contribution of youth is extremely valuable in building a self-reliant and capable nation. He further mentioned that basic lessons of disaster management should be imparted at the school and college level itself. Along with this, he also highlighted the importance of outdoor sports for the overall development of youth.

This training camp has been organized during the period from 17th to 24th January 2026.

In his presidential address, the Hon’ble Vice-Chancellor of Dr. Panjabrao Deshmukh Agricultural University, Akola, Dr. Sharad Gadakh, stated that due to the excessive influence of artificial intelligence, the internet, and various social media platforms, the younger generation in recent times is gradually moving towards social detachment. He emphasized that for building a self-reliant nation, there is now a strong need for collective and integrated efforts.

While stressing that the youth of the country must become more socially responsible and community-oriented, he underlined the necessity for schools and colleges to involve a larger number of students in social initiatives and outreach activities.

He further remarked that the series of timely and innovative initiatives such as Aavhan, conceptualized under the visionary guidance of the Hon’ble Governor, play a significant role in strengthening values like patriotism, personal responsibility, and sense of duty among college students. He also expressed words of appreciation and gratitude to the Hon’ble Governor for bestowing upon Dr. Panjabrao Deshmukh Agricultural University the honor of organizing the state-level Aavhan – Chancellor’s Brigade Disaster Management Training Camp.

During the programme, the Hon’ble Vice-Chancellor of Maharashtra Animal and Fishery Sciences University, Nagpur, Dr. Nitin Patil, appealed to the youth to develop a stronger sense of social responsibility and to nurture the feeling of giving back to society.

On this occasion, Brigadier R. Satyanarayan, Director of NDRF Academy, Nagpur, and Commandant Santosh Bahadur Singh of NDRF Pune, shared their insightful thoughts. They elaborated on national disaster management and expressed their expectations that National Service Scheme (NSS) volunteers should actively and enthusiastically participate in this important national service.

In the eight-day training programme, under the inspiration of Hon’ble Vice-Chancellor Prof. (Dr.) Indra Mani and Director of Instruction Dr. Bhagwan Asewar, and under the guidance of Student Welfare Officer Dr. Rajesh Kadam, a team of eight NSS student volunteers from Vasantrao Naik Marathwada Agricultural University participated along with Programme Officer Dr. Subhash Vikhe.

During the inaugural session, respected members of the University Executive Council, all Directors, administrative officers, Associate Deans, Heads of Departments, Student Welfare Officers, and University Coordinator Dr. Rajesh Kadam of Vasantrao Naik Marathwada Agricultural University, Parbhani, along with coordinators from all universities across Maharashtra and their respective student teams, were present.

वनामकृविच्या गोळेगाव कृषि महाविद्यालयात राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त जनजागृती कार्यक्रम

 आरोग्य विभागाच्या आपत्कालीन पथकाकडून विद्यार्थ्यांना प्रथमोपचाराचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण


वाढत्या रस्ते अपघातांमुळे होणारी जीवितहानी रोखण्यासाठी ‘राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताहा’निमित्त वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या गोळेगाव येथील कृषि महाविद्यालयात जनजागृती कार्यक्रमाचे दिनांक १७ जानेवारी २०२६ रोजी योजन करण्यात आले. महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. शिवाजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागामार्फत राबविण्यात आला.

यावेळी आरोग्य विभागाच्या आपत्कालीन पथकाने विद्यार्थ्यांना रस्ते सुरक्षेबाबत तसेच अपघातप्रसंगी घ्यावयाच्या तातडीच्या उपाययोजनांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमात श्री. गणेश बाहेती, सहायक व्यवस्थापक डॉ. कपिल पुड, डॉ. सचिन भोसले, श्री. केशव वाट, श्री. गजानन गायकवाड आदी आरोग्य विभागाचे सदस्य उपस्थित होते.

मार्गदर्शन करताना डॉ. कपिल पुड यांनी अपघातानंतरच्या पहिल्या एका तासाला ‘गोल्डन अवर’ असे संबोधले जाते, याचे महत्त्व स्पष्ट केले. या कालावधीत जखमी व्यक्तीस योग्य वैद्यकीय मदत मिळाल्यास त्याचे प्राण वाचण्याची शक्यता लक्षणीयरीत्या वाढते, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमात केवळ व्याख्यान न देता प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांद्वारे विद्यार्थ्यांना सी.पी.आर. (CPR), प्रथमोपचार पद्धती, सुरक्षा साधनांचा योग्य वापर तसेच आपत्कालीन परिस्थितीत कसे वागावे याचे प्रशिक्षण देण्यात आले.

या कार्यक्रमास महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ राहुल भालेराव, डॉ दशरथ सारंग डॉ. प्रवीण राठोड,  शिक्षकेतर कर्मचारी, अधिकारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांनी वाहतुकीचे नियम पाळण्याची व रस्ते सुरक्षिततेबाबत जागरूक राहण्याची शपथ घेतली.







Friday, January 16, 2026

‘हिंद की चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी शताब्दी वर्षानिमित्त वनामकृविच्या समुदायिक विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या समुदायिक विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे ‘हिंद की चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन दिनांक १६ जानेवारी २०२६ रोजी करण्यात आले. हा कार्यक्रम विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या प्रेरणेने, शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच कुलसचिव श्री संतोष वेणीकर यांच्या निर्देशानुसार सहयोगी अधिष्ठाता डॉ. राहुल रामटेके यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला.

या कार्यक्रमात शीख धर्माचे नववे गुरु, ‘हिंद की चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या जीवनकार्यावर, धर्मरक्षणासाठी केलेल्या अतुलनीय बलिदानावर तसेच मानवतेच्या रक्षणासाठी दिलेल्या सर्वोच्च त्यागावर आधारित माहितीपूर्ण व्हिडिओ प्रदर्शित करण्यात आले. या व्हिडिओंच्या माध्यमातून त्यांच्या संघर्षमय जीवनप्रवासाची, धार्मिक स्वातंत्र्यासाठी दिलेल्या बलिदानाची आणि समाजासाठी दिलेल्या प्रेरणादायी संदेशाची प्रभावी मांडणी करण्यात आली.

कार्यक्रमाचा मुख्य उद्देश युवकांमध्ये व विद्यार्थ्यांमध्ये धार्मिक सहिष्णुता, मानवता, सत्य आणि त्याग यांसारखी मूल्ये रुजविणे हा होता. यावेळी उपस्थित विभाग प्रमुख डॉ. नीता गायकवाड, डॉ. वीणा भालेराव, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी तथा विभाग प्रमुख डॉ. शंकर पुरी, प्राध्यापक, कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांनी या व्हिडिओ सादरीकरणातून श्री गुरु तेग बहादुर साहेबजी यांच्या महान कार्याची सखोल माहिती घेतली व त्यांच्या विचारांपासून प्रेरणा घेतली.

हा कार्यक्रम अत्यंत श्रद्धा, आदर व प्रेरणादायी वातावरणात पार पडला. समाजात धार्मिक स्वातंत्र्य व मानवतेच्या संरक्षणाचे महत्त्व अधोरेखित करण्यास हा कार्यक्रम उपयुक्त ठरल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

शेवटी, कार्यक्रम अधिकारी तथा विभाग प्रमुख डॉ. शंकर पुरी यांनी विद्यापीठ प्रशासनाच्या निर्देशानुसार महाविद्यालयाच्या वतीने पुढील आठवडाभर विविध स्पर्धा व कार्यक्रमांचे आयोजन करून ‘हिंद की चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या कार्याचा गौरव करण्यात येत असल्याची माहिती दिली.