वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या लिहाखेडी (जिल्हा छत्रपती संभाजीनगर) येथील कृषी महाविद्यालयास आणि राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पास माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि आणि पुणे येथील महाराष्ट्र कृषि
शिक्षण व संशोधन परिषदेच्या माननीय महासंचालिका श्रीमती वर्षा लड्डा–उंटवाल
(भाप्रसे) यांनी दिनांक २ डिसेंबर २०२६ रोजी भेट दिली. भेटीदरम्यान माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि
यांच्या अध्यक्षतेखाली महाविद्यालयातील अधिकारी आणि विद्यार्थ्यासोबत संवाद
बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी विस्तार
शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, कृषि परिषदेचे संशोधन संचालक डॉ. किशोर शिंदे, सहयोगी
संचालक (संशोधन) डॉ. एस. बी. पवार, केव्हीके प्रमुख डॉ.
दीप्ती पाटगावकर आदी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी
विद्यार्थ्यांना शैक्षणिक व भौतिक सर्व सोयी-सुविधा मिळाव्यात, या
दृष्टीने या महाविद्यालयाच्या प्रगतीसाठी सादर करण्यात आलेल्या प्रस्तावांतील
त्रुटींची पूर्तता करून त्यांना लवकरात लवकर मंजुरी मिळावी, असे
नमूद केले. पुढे बोलताना माननीय कुलगुरूंनी विद्यार्थ्यांना समस्या सकारात्मक
दृष्टीने स्वीकारून त्यावर मात करण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांच्या अडचणी
सोडवण्यासाठी विद्यापीठातर्फे सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी शिक्षकांना
संबोधित करताना त्यांनी सांगितले की, गुरु होण्याची संधी
प्रत्येकाला मिळत नाही; त्यामुळे या संधीचे संधीत रूपांतर करावे. विद्यार्थ्यांना
सर्वांगीण शिक्षण देणे आवश्यक असून काम करताना सर्व विभागांमध्ये समन्वय राखण्याचे
महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. तसेच विद्यापीठाने राबवलेल्या विविध उपक्रमांची
माहितीही त्यांनी दिली. या ठिकाणी कार्यरत असलेल्या शास्त्रज्ञ, कर्मचारी व मजूर यांच्या कार्याची त्यांनी प्रशंसा केली आणि त्यांच्या
पुढील कार्यासाठी त्यांना प्रोत्साहन दिले.
माननीय महासंचालिका
श्रीमती वर्षा लड्डा–उंटवाल (भा.प्र.से.) यांनी या महाविद्यालयाचे कृषि परिषदेकडे
प्रलंबित असलेले सर्व प्रस्ताव शासनाच्या निदर्शनास आणून ते मार्गी लावण्यासाठी
निश्चित प्रयत्न केले जातील, असे आश्वासन दिले. त्या पुढे म्हणाल्या
की, केवळ कार्यालयात बसून बाहेरील समस्या समजत नाहीत;
प्रत्यक्ष भेटी व पाहणीमुळे अनेक अडचणी लक्षात येतात आणि त्या त्या
ठिकाणी सोडविण्याचा प्रयत्न केला जातो. कृषी महाविद्यालय लिहाखेडीच्या
प्रस्तावांसाठीही शासन स्तरावर प्रभावी पाठपुरावा केला जाईल, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
प्रारंभी
सहयोगी संचालक (संशोधन) डॉ. सुर्यकांत पवार यांनी कार्यालयाचा लेखाजोखा सादर करत
कृषी महाविद्यालय लिहाखेडीच्या विविध समस्यांकडे लक्ष वेधले.
या बैठकीस
कृषी महाविद्यालयातील विद्यार्थीही उपस्थित होते. त्यांच्याशीही मान्यवरांनी संवाद
साधला आणि विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
दरम्यान मान्यवरांच्या हस्ते वृक्षलागवड करण्यात आली,
त्यानंतर प्रक्षेत्रावरील गहू
‘फुले समाधान’ पैदासकार पिकाची पाहणी करण्यात आली. तसेच जैविक औषधी व
जैविक खते संशोधन व उत्पादन प्रयोगशाळेस भेट देऊन विविध जैविक उत्पादनांची माहिती
घेण्यात आली. ट्रायकोकार्ड निर्मिती प्रक्रियेचीही माहिती घेण्यात आली. यावेळी
महासंचालकांनी या कार्याचे कौतुक केले व यासाठी लागणाऱ्या स्वतंत्र इमारतीसाठी
आवश्यक पाठपुरावा करू,
असे आश्वासन दिले.
याप्रसंगी
राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाचे डॉ. दिलीप हिंगोले, डॉ. सी. बी. पाटील, डॉ.
आशिष बागडे, डॉ. ज्ञानदेव मुटकुळे, कृषी
तंत्र विद्यालयाचे प्राचार्य दत्ता मुळे, श्री. संतोष ढगे,
श्री रामेश्वर ठोंबरे यांच्यासह सर्व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे
सूत्रसंचलन आणि आभार डॉ. सुरेखा कदम यांनी केले.
.jpeg)



.jpeg)
.jpeg)










.jpeg)
.jpeg)







.jpeg)







.jpeg)



.jpeg)
.jpeg)



.jpeg)

.jpeg)







