Friday, March 22, 2013

गृहविज्ञान महाविद्यालयातील एल एल पी स्‍कुल मध्‍ये जा‍गतिक जल दिन साजरा




दिवसेंदिवस तीव्र होत असलेल्‍या दुष्‍काळाचा सामाना करण्‍यासाठी उपलब्‍ध पाणीचा काटकसरीने वापर करणे हि आज काळाजी गरज आहे असे प्रतिपादन मा कुलगूरू डॉ किशनरावजी गोरे यांनी गृहविज्ञान महाविद्यालयातील एल एल पी स्‍कुल मध्‍ये जा‍गतिक जल दिना निमित्‍त आयोजीत कार्यशाळेत केले. ते पुढे म्‍हणाले की, पृथ्‍वीचा 70 टक्‍के भाग जलमय आहे, यापैकी केवळ 2 टक्‍के पाणी मानवास वापरण्‍या योग्‍य आहे तसेच प्रत्‍येक व्‍यक्‍तीला दररोज 35-40 लिटर पाणी आवश्‍यक असल्‍याने या अमुल्‍य संसाधनाचा अतिशय कादकसरीने वापर करणे प्रत्‍येक नागरीकाचे आद्य कर्तृव्‍य आहे. प्रत्‍येकाने दैनदिन जीवनात पाण्‍याची योग्‍य वापर करणे, पावसाच्‍या पाण्‍याचे पुर्नभरण करून ते पाणी पुनश्‍च वापरात आणणे व आवश्‍यक तेवढेच पाणी घेउन त्‍याचा अपव्‍यय टाळणे आवश्‍यक आहे असे त्‍यांनी विशेष केले. याप्रसंगी मा कुलगूरू डॉ किशनरावजी गोरे यांचा जल संवर्धन व व्‍यवस्‍थापन विषयक प्रसंशनीय संशोधन व विस्‍तार कार्यबाबत 'उत्‍कृष्‍ट जल संवर्धक' या पुरस्‍काराने गृहविज्ञान महाविद्यालयाच्‍या सहयोगी अधिष्‍ठाता व प्राचार्या प्रा विशाला पटणम यांनी गौरव केला.
     याप्रसंगी एल एल पी स्‍कुल मधील विद्यार्थ्‍यीनी त्‍यांच्‍या वकृत्‍व कलेतुन उपस्थितांची मने जिंकली. यावेळी रूद्राक्ष, शताक्षी, सिध्‍दी, कुणाल, विष्‍णू, जान्‍ही, हार्दिक, तन्‍वी या विद्यार्थ्‍यीना मा कुलगूरू यांनी प्रशस्‍तीपत्र देउन गौरविण्‍यात आले. 
     कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ जया बंगाळे यांनी तर डॉ विणा भालेराव यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाचे आयोजन प्रा रम्‍मण्‍णा देसेटी, प्रा निता गायकवाड, पार्वती शिंदे यांनी केले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी सर्व शिक्षिका व कर्मचा-यानी परिश्रम केले.