Thursday, September 17, 2020

विकेल ते पिकेल ही योजना शेतीला उद्योजकतेकडे नेणारी ठरेल ....... कुलगुरू मा डॉ अशोक ढवण

वनामकृविच्या वतीने आयोजित ऑनलाईन रबी शेतकरी मेळाव्यात प्रतिपादन

कोरोनाकाळात संपुर्ण जनजीवन विस्‍कळीत झाले असतांनासर्व आर्थिक व्‍यवहार ठप्‍प झालेले असतांनाना शेती थांबली ना शेतकरी थांबलाअर्थ व्‍यवस्‍थेवर गंभीर स्‍वरूपाचे परिणाम जाणवत आहेतपरंतु कृषिक्षेत्राची कामगिरी चमकदार झाल्‍याचे दिसुन येते आहेटाळेबंदीत शेतमालभाजीपालफळे आदी कोठेही कमी पडले नाही याचे श्रेय शेतकरी बांधवाना जातेटाळेबंदीमुळे शेतमाल विक्रीतील मध्‍यस्थ व दलाल आपोआपच हटले आहेतशेतकरी व थेट ग्राहक यांच्‍या मध्‍ये नवे बंध निर्माण झाले आहेतनुकतेच संवाद कार्यक्रमात राज्‍याचे माननीय मुख्‍यमंत्री ना श्री उध्‍दवजी ठाकरे यांनी विकेल ते पिकेल या योजनेच्‍या माध्‍यमातुन कृषि उत्‍पादन व विक्री व्‍यवस्‍था निर्माण करण्‍याचं सुतोवाच केले आहेयावेळी राज्‍याचे कृषिमंत्री मा ना श्री दादाजी भुसे उपस्थित होते. तसेच मागील महिन्‍यात विद्यापीठ आयोजित शेतमाल प्रक्रिया उद्योजकांचा ऑनलाईन मेळाव्‍यात राज्‍याचे उद्योगमंत्री मा ना श्री सुभाषजी देसाई यांनी शेतमाल प्रक्रिया उद्योगांना चालना देण्‍याच्‍या दृष्‍टीकोनातुन शासनस्‍तरावरून आवश्‍यक ती पाऊले उचलेले जातीलअसे सांगितलेयामुळे भविष्‍यात कृषि औद्योगिकीकरणाच्‍या माध्‍यमातुन शेतमाल मुल्‍यवर्धन व प्रक्रियाबाजारपेठेतील त्‍याचं सादरीकरणत्‍यातुन साध्‍य  होणारी ग्रामीण कृषी रोजगार योजना नीटपणे पुढे गेली तर निश्चितच नवी रचना उभी राहीलयातुनच विकेल ते पिकेल ही योजना शेतीला उद्योजकतेकडे नेणारी ठरेलअसे प्रतिपादन कुलगरू  मा डॉ अशोक ढवण यांनी केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील विस्तार शिक्षण संचालनालय व कृषि विभाग (महाराष्ट्र शासनपरभणी यांचे संयुक्त विद्यमाने मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त दिनांक १७ सष्टेबर रोजी आयोजित ऑनलाईन रबी शेतकरी मेळाव्याच्या अध्‍यक्षस्‍थानावरून ते बोलत होतेमेळाव्‍याचे उदघाटक भारत सरकारच्या कृषि नियोजन आयोगाचे माजी सल्लागार तथा कृषि विस्तार विशेषज्ञ मा डॉ व्ही व्ही सदामते हे होते तर कार्यक्रमास विस्तार शिक्षण संचालक डॉ डि बी देवसरकरसंशोधन संचालक डॉ दत्तप्रसाद वासकरशिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले आदींची प्रमुख उपस्थिती होती.

अध्यक्षीय भाषणात कुलगुरू मा डॉ अशोक ढवण म्हणाले कीकरोना रोगाच्‍या प्रादुर्भावात परभणी कृषि विद्यापीठाने अनेक ऑनलाईन प्रशिक्षणवर्ग व व्‍याख्‍यानमालेचे आयोजन करून विद्यापीठ शास्‍त्रज्ञ व शेतकरी यांच्‍या सातत्‍याने संवाद साधलापुढील हंगामात विद्यापीठ विकसित दर्जेदार बियाणे शेतकरी बांधवाना पुरविण्‍याचा मानस असल्‍याचे मत त्‍यांनी सांगितले.

मेळाव्‍याचे उदघाटक मा डॉ व्ही व्ही सदामते मार्गदर्शनात म्‍हणाले कीशेती क्षेत्र हे विस्‍तृत असे क्षेत्र असुन या क्षेत्रात मोठया प्रमाणात रोजगार उपलब्‍ध केला जाऊ शकतोआज शेतकरी बांधवांनी एकत्रित येऊन शेती करणे गरजेचे असुन ­केंद्र व राज्‍य शासनाने गट शेती व शेतकरी उत्‍पादक कंपन्‍यांना प्रोत्‍साहन देणा-या अनेक योजना सुरू केल्‍या आहेतया योजना गाव पातळीपर्यंत पोहचल्‍या पाहिजेतशेतकरीकृषि शास्‍त्रज्ञकृषि अधिकारी यांच्‍यात विविध माध्‍यमातुन सातत्‍यांने संवाद होणे गरजेचे आहेकृषि तंत्रज्ञानाच्‍या माध्‍यमातुन आज कृषि उत्‍पादनात आपण भरीव अशी कामगिरी केलीपरंतु उत्‍पादीत शेतमालाची प्रक्रिया व विपणन यावर देण्‍याची गरज आहे. कोरडवाहु शेती विकासासाठी कृषि विस्‍तार कार्यात सार्वजनिक - खासगी भागीदारी तत्‍वाचा वापर करावा लागेलअसे प्रतिपादन त्‍यांनी केले.

प्रास्ताविकात विस्तार शिक्षण संचालक डॉ डी बी देवसरकर यांनी विद्यापीठ विकसित रबी पिकांच्‍या मुख्य वाणाबाबत मार्गदर्शन करून विद्यापीठ विकसित कमी खर्चिक कृषि तंत्रज्ञानाचा शेतकरी बांधवानी अवलंब करावा असे आवाहन केले. सुत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी डॉ प्रविण कापसे यांनी केले तर आभार मुख्य विस्तार शिक्षणाधिकारी डॉ व्ही बी कांबळे यांनी मानले.

ऑनलाईन तांत्रिक सत्रात रबी हंमागातील विविध पिक लागवड तंत्राज्ञानावर विद्यापीठ शास्त्रज्ञांनी  मार्गदर्शन केलेयात ज्वार लागवडीवर डॉ एल एन जावळेहरभरा लागवडीवर डॉ सी बी पाटीलकरडई लागवडीवर डॉ एस पी म्हेत्रेगहु लागवडीवर डॉ एस एम उमाटे आदींनी मार्गदर्शन केले तसेच शेतकरी बांधवाच्या रबी पिक लागवडी संबंधीत शंकांचे समाधान डॉ यु एन आळसेडॉ ए व्ही गुटटेडॉ व्ही पी सुर्यवंशीडॉ एस पी पवारडॉ शिवाजी शिंदे, डाॅ डी डी पटाईत आदींनी केलेऑनलाईन कार्यक्रमाकरिता नाहेप प्रकल्‍प अन्‍वेषक डॉ गोपाल शिंदे यांच्‍या मार्गदर्शनाखाली डॉ अविनाश काकडेडॉ रश्‍मी बंगाळेइंजि रविकुमार कल्‍लुजीइंजि खेमचंद कापगाते, डॉ हेमंत रोकडे आदींनी सहकार्य केले. ऑनलाईन कार्यक्रमात झुम अॅप मिटिंग व विद्यापीठ युटयुब चॅनेलाच्या माध्यमातुन कृषि व शेतकरी बांधवानी मोठया संख्येने सहभागी झाले होते.