Wednesday, September 16, 2020

सोयाबीनच्‍या उभ्‍यापिकातील शेंगामधील बियाण्‍याची उगवण समस्‍या व उपाय

मराठवाडा विभागात सोयाबीनची पेरणी खरिप हंगामात साधारणत:१५ जुन ते ३० जुन दरम्‍यान झालेली आहे. हे पिक सध्‍या शारीरिक पक्‍वतेच्‍या / शेंगा भरलेल्‍या अवस्‍थेत आहे. मागील  ८ ते १० दिवसांतुन सतत ढगाळ वातावरण, कमी सुर्यप्रकाश व  पाऊस सुरू असल्‍यामुळे दिवसाचे तापमान २० ते २५ डिग्री से. असुन आर्द्रता ९० टक्‍क्यापेक्षा जास्‍त आहे. शारिरीक पक्वतेनंतर शेंगा वाळण्‍यासाठी व बियामधील ओलावा कमी होण्‍यासाठी तापमान ३० ते ३५ डिग्री से. असावे लागते, या काळात आर्द्रता ५० टक्कयापेक्षा कमी असावी लागते. तसेच प्रखर सुर्यप्रकाश आणि निरभ्र आकाश असावे लागते. परंतु सद्य‍ परिस्थितीत ही साखळी विस्‍कळीत झालेली असल्‍यामुळे काही ठिकाणी सोयाबीनच्‍या उभ्‍यापिकातील शेंगामधील बियाण्‍याची उगवण झालेली आहे, हे शारिरीक व्‍यंग / विकृती असुन सतत पडणा-या पावसामुळे निर्माण झाले आहे.

उपाय – शेतात चर काढुन पाण्‍याचा निचरा करावा व शेतामध्‍ये हवा खेळती ठेवावी. पाऊस थांबताच सोयाबीन पिकाची काढणी करून काडाचे छोटे - छोटे ढिग करून प्रखर सुर्यप्रकाशामध्‍ये शेतातच वाळवावे. त्‍यानंतर प्रादुर्भाव किंवा उगवण झालेल्‍या शेंगा बाजुला काढुन मळणी करावी, अशी माहिती वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे सोयाबीन पैदासकर डॉ एस पी म्‍हेत्रे यांनी दिली आहे.