Friday, May 27, 2022

नौकरी शोधनारे नव्‍हे तर नौकरी देणारे कृषी पदवीधर घडावीत..... प्राचार्य डॉ सय्यद ईस्‍माईल

कृषि महाविदयालय परभणी जिल्हयातील पंधरा गावात राबविणार ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम

ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमात कृषिच्‍या विद्यार्थ्‍यांना पदवीच्‍या पहिल्‍या तीन वर्षात प्राप्‍त केलेल्‍या ज्ञानाचा आणि कृषि तंत्रज्ञानाचा शेतकरी बांधवाच्‍या शेतात प्रत्‍यक्ष वापर करण्‍याच्‍या दृष्‍टीने प्रसार करावा. कृषी पदवी अभ्‍यासक्रमाच्‍या सातव्या सत्रात कृषि संलग्‍न व्‍यवसाय आणि कृषि निगडित कंपन्‍याचा अभ्‍यास करण्‍याची विद्यार्थ्‍यांना संधी आहे, यामुळे विद्यार्थ्‍यांमध्‍ये कृषी उद्योजकतेची बीजे रोवली जातील. भविष्‍यात केवळ नौकरी शोधनारे नव्‍हे तर नौकरी देणारे कृषी पदवीधर घडले पाहिजेत, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ सय्यद ईस्‍माईल यांनी केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील परभणी कृषी महाविद्यालयाच्‍या कृषि पदवीच्‍या  सातव्‍या सत्रात ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम (रावे) आणि कृषी औद्यागिक संलग्‍नता उपक्रम रा‍बविण्‍यात येतो. या उपक्रमात कार्यरत विद्यार्थ्‍यांना कृषिदुत व कृषिकन्‍या असे संबोधले जाते. या कृषिदुत व कृषिकन्‍यांकरिता दिनांक २६ मे रोजी प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले होते, कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानावरून ते बोलत होते. व्‍यासपीठावर रावे समन्‍वयक विभाग प्रमुख डॉ राजेश कदम, विभाग प्रमुख डॉ आर जी भाग्‍यवंत, विभाग प्रमुख डॉ संजीव बटेवाड, विभाग प्रमुख डॉ डिगांबर पेरके, सोयाबीन पैदासकार डॉ शिवाजी मेहत्रे, ज्‍वार पैदासकार डॉ के आर कांबळे, मध्‍यवर्ती रोपवाटीका प्रभारी डॉ संतोष बरकुले, शिक्षण विभागाचे प्रभारी डॉ रणजित चव्‍हाण आदींची प्रमुख उपस्थिती होती.

प्राचार्य डॉ सय्यद ईस्‍माईल पुढे म्‍हणाले की, अनेक प्रगतशील शेतकरी नाविन्‍यपुर्ण शेती करतात, त्‍यांच्‍या कडुन अनेक बाबी शिकण्‍याची संधी कृषिच्‍या विद्यार्थ्‍यांना आहे. शेतीतील शेतकरी बांधवाच्‍या समस्‍या जवळुन अनुभवयास मिळणार असल्‍याचे ते म्‍हणाले.

प्रास्‍ताविकात डॉ राजेश कदम म्‍हणाले की, पुढील चार महिने महाविद्यालयातील २३० विद्यार्थी पंधरा गावात ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कृषि तंत्रज्ञानावर आधारित विविध प्रात्‍यक्षिके दत्तक गावात घेणार असुन एक महिना विविध कृषि निगडित कंपन्‍यामध्‍ये काम करण्‍याची संधी मिळणार असल्‍याचे सांगुन रावे कार्यक्रमाबाबत सविस्‍तर माहिती देऊन मार्गदर्शन केले.

कार्यक्रमात डॉ आर जी भाग्‍यवंत, डॉ दिगांबर पेरके, डॉ संजीव बटेवाड, डॉ के आर कांबळे, डॉ शिवाजी मेहत्रे, डॉ संतोष बरकुले, डॉ रणजित चव्‍हाण आदींनी मार्गदर्शन केले. तांत्रिक सत्रात विविध विषयावर डॉ पी आर नेहरकर, इंजि. बी पी सावंत, ्‍ही बी न  डज्ञॅ जी भांग्‍यवंत डॉ विशाल अवसरमल, डॉ डि व्‍ही बैनवाड, डॉ महेश दडके, डॉ आर व्‍ही भालेराव, डॉ एस एल वाईकर, डॉ वानखेडे आदींनी मार्गदर्शन केले.  

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ प्रविण कापसे यांनी केले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी कार्यक्रम अधिकारी डॉ एस आर जक्‍कावाड, डॉ विक्रम घोळवे, डॉ अंबिका मोरे, डॉ स‍ुनिता पवार, डॉ अनंत लाड, डॉ आयएबी मिर्चा, डॉ एम एम सोनकांबळे, डॉ एस व्‍ही चिक्षे, डॉ जी एन गोठे, डॉ गोदावरी पवार, प्रा आर सी सावंत आदींनी कार्य केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील सातव्‍या सत्राचे विद्यार्थी कृषिदुत व कृषिकन्‍या मोठया संख्‍येने उपस्थित होते.