Thursday, April 11, 2024

ग्रामीण युवकांना कौशल्य आधारित कृषि शिक्षण ही काळाची गरज.....मा. कुलगुरू डॉ. इन्द्र मणि


 वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ अंतर्गत कृषि तंत्र विद्यालय नांदेड व सिजेंटा फाउंडेशन इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक एप्रिल  रोजी आयोजित आयराइज प्रकल्पाच्या सांगता समारंभ संपन्न झाला. अध्यक्षस्थानी माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र णि हे होते. तर व्यासपीठावर संचालक संशोधन डॉ.खिजर बेग. सहयोगी अधिष्ठाता (शिक्षण) डॉ. गजेंद्र लोंढे, प्राचार्य डॉ. नरेशकुमार जायेवार, सिंजेंटा फाउंडेशन इंडियाचे क्रिएटिव्ह हेड श्री विक्रम बोराडे आदींची प्रमुख उपस्थिती होती,

अध्यक्षीय भाषणात माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र णि यांनी ग्रामीण युवकांना शेती शिक्षणाचे आधुनिक धडे देणे आवश्यक असून पुढील काळ हा कौशल्य आधारित शिक्षणाबरोबरच युवकांमध्ये तंत्रज्ञानाविषयी जागृती निर्माण करणे आवश्यक असल्याचे असे नमूद करून त्या दृष्टीने आयराइज प्रकल्पाची उपयुक्तता स्पष्ट केली.

यावेळी बोलताना सहयोगी अधिष्ठाता (शिक्षण) कृषि तंत्र अभ्यास डॉ. गजेंद्र लोंढे यांनी सर्व कृषी तंत्र विद्यालयांमध्ये नांदेडच्या धरतीवर आयराइज प्रकल्प राबवला जाणार असून लवकरच या संबंधीचा सामंजस्य करार हा सिजेंटा फाउंडेशन इंडिया सोबत करणार असल्याचे स्पष्ट केले. तद्नंतर सिंजेंटा फाउंडेशन इंडियाचे श्री विक्रम बोराडे यांनी सिंजेंटा फाउंडेशन हे भारतात सर्वप्रथम वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणीच्या कृषी तंत्र शिक्षण शाखा सोबत आयराइज प्रकल्प राबवत असल्याचे सांगून या अंतर्गत २०२३ -२४ वर्षामध्ये नांदेड कृषि तंत्र विद्यालयात झालेल्या ३१ दिवसीय प्रशिक्षणामध्ये विद्यार्थ्यांना कृषि क्षेत्रातील उद्योजकांसाठी आवश्यक असणाऱ्या अभ्यासक्रमाचे धडे देवून त्याची परीक्षा देखील घेण्यात आली. २५ विद्यार्थ्यांनी यामध्ये यश मिळवले असून लवकरच दुसरा भाग म्हणजे विद्यार्थ्यांना त्यांच्या निवासस्थानापासून १५ किलोमीटरच्या आत व्यावसायिक शिक्षणासाठी आवश्यक कार्यानुभव घेण्यात येणार असल्याचे नमूद केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. नरेशकुमार जायेवार यांनी करून शेवटी आभार मानले तर सूत्रसंचालन श्री विजेश जाधव यांनी केले. कार्यक्रमादरम्यान उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल कनिष्ठ संशोधन सहाय्यक श्री प्रकाश सिंगरवाड व श्रीमती वर्षा ताटेकुंडलवार यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच सिजेंटा फाउंडेशन इंडियामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना व या प्रशिक्षणात भाग घेतलेल्या सर्वच विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री भगवान कांबळे, श्री श्रीकृष्ण वारकड, श्रीमती स्वाती ताटपल्लेवार व श्रीमती महानंदा उत्तरवाड यांनी विशेष प्रयत्न केले.