Friday, July 10, 2020

कृषि यांत्रीकीकरणाचे तंत्र या विषयावर एक दिवसीय ऑनलाईन कार्यशाळा संपन्न

महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा हरित क्रांतीचे प्रणेते स्व. वसंतराव नाईक यांच्या जन्मदिनाचे औचीत्य म्हणुन दि. 01 जुलै हा राज्यात कृषि दिन म्हणुन साजरा केला जातो. महाराष्ट्र राज्याचे महामहीम राज्यपाल मा. श्री भगत सिंह कोश्‍यारी व मा. कृषिमंत्री मा ना श्री दादाजी भुसे यांच्या संकल्पनेतुन यावर्षी दि. 1 जुलै ते 7 जुलै दरम्यान कृषि संजीवनी सप्ताहकुलगुरु मा डॉ अशोक ढवण यांच्या मार्गदर्शनाखाली वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ व कृषि विभाग यांच्या संयुक्त वतीने मराठवाडयातील आठही जिल्‍हयात शेतक-यांच्या शेतावर भेट देवून मार्गदर्शन तथा ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजीत करण्यात आले. विद्यापीठातील कृषि अभियांत्रीकी व तंत्रज्ञान महाविद्यालयातील कृषि यंत्र व क्ती विभाग आणि अपारंपारिक उर्जा यांच्या वतीने कृषि यांत्रीकीकरणाचे तंत्र, सुधारीत शेतीचे मंत्रया विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन दि. 7 जुलै रोजी करण्यात आले. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी प्राचार्य डॉ उदय खोडके हे होते.

मार्गदर्शनात प्राचार्य डॉ उदय खोडके म्‍हणाले की, शेतकरी बंधुनी उत्‍पन्‍न वाढीकरिता आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करावा. वाढती मजुरी व योग्‍य वेळी मजुरांची अनुपलब्‍धता यामुळे कृषि यांत्रिकीकरणाचा कास धरावी लागेल. जमीन धारणेनुसार कृषि विभागाच्या विविध योजनेतुन यांत्रिकीकरणाकरित उपलब्ध अनुदानावर असलेली शेती अवचारे व यंत्रे घ्‍यावीत व जास्‍तीत जास्‍त वापर करावा, असा सल्‍ला त्‍यांनी दिला.

कार्यशाळे प्रमुख वक्ते डॉ. स्मिता सोलंकी यांनी कृषि यांत्रीकीकरण विषयावर मार्गदर्शन केले तर डॉ. आर.टी. रामटेके यांनी सौर उर्जा चलीत विविध कृषि अवजारे या विषयावर मार्गदर्शन केले. डॉ. पंडीत मुंडे यांनी ग्रामीण युवकासाठी कृषि यांत्रीकीकरणातील संधी, डॉ. गोपाळ शिंदे यांनी डिजीटल तंत्रज्ञानाद्वारे स्मार्ट शेती आणि डॉ. डि. डी. टेकाळे यांनी ट्रॅक्टरची निवड व देखभाल या विषयावर मार्गदर्शन व ऑनलाईन सादरीकरण केले. सहभागी प्रशिक्षणार्थ्‍यींनी विचारलेले कृषि यांत्रीकीकरणावर कृषि अभियंतानी उत्‍तरे दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आयोज प्रा. दत्तात्रय पाटील यांनी केले तर आभार प्रा. दयानंद टेकाळे यांनी मानले. कार्यक्रम यस्वीतेसाठी नाहेप प्रकल्पातील वरिष्ठ व कनिष्ठ संशोधन सहाय्यक अभियंत्या यांनी परिश्रम घेतले. कार्यशाळेत राज्‍यातील शेतकरी, कृषि उद्योजक, कृषि अभियंते, व विद्यार्थ्‍यी सहभागी झाले होते.