Monday, July 27, 2020

शेतकरी व शेतीच्या विकासाकरिता शेतमाल प्रक्रिया आवश्यक ...... उद्योगमंत्री मा ना श्री सुभाष देसाई

वनामकृवित आयोजित डिजीटल तंत्रज्ञानाद्वारे कृषि प्रक्रिया उद्योग : उद्योजकांच्या यशोगाथा” यावरील ऑनलाईन वेबिनारचे उदघाटन 

भारत हा कृषि प्रधान देश असला तरी देशाच्या सकल राष्‍ट्रीय उत्‍पन्‍नात शेतीचा केवळ १७ टक्के वाटा आहे, आज मोठया प्रमाणात शेतमाल उत्‍पादन होते, परंतु साधारणत: ३० ते ४० टक्के नासाडी होऊन वाया जातो. याकरिता शेतमालावर प्रक्रिया व मुल्‍यवर्धन करणे गरजेचे आहे. त्‍यामुळे शेतमालाची नासाडी न होता, शेतक-यांनाही आर्थिक लाभ होईल. शेतमाल प्रक्रिया केल्‍यासच शेतीला भविष्‍य आहे, असे प्रतिपादन राज्‍याचे उद्योगमंत्री मा ना श्री सुभाष देसाई यांनी केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील भारतीय अनुसंधान परिषद नवी दिल्ली आणि जागतिक बँक पुरस्‍कृत राष्ट्रीय कृषि उच्च शिक्षण प्रकल्प (नाहेप)नवी दिल्ली येथील अखिल भारतीय अन्नप्रक्रिया उद्योजक संघटना आणि मुंबई येथील फार्म टु फोर्क सोल्युशन यांच्या संयुक्त विद्यमाने डिजीटल तंत्रज्ञानाद्वारे कृषि प्रक्रिया उद्योग : उद्योजकांच्या यशोगाथा” या विषयावर एक आठवड्याचे ऑनलाईन वेबिनारचे आयोजन दिनांक २७ जुलै ते ३१ जुलै दरम्यान करण्यात आले असुन या वेबिनाराच्‍या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण होते, विशेष अतिथी म्‍हणुन पुणे येथील कृषि विपणन (महाराष्‍ट्र राज्‍यचे संचालक मा श्री सतीश सोनी व नाशिक येथील सह्याद्री फार्मचे संचालक मा श्री विलास शिंदे उपस्थित होते तर नाहेप प्रकल्‍पाचे राष्‍ट्रीय संचालक डॉ आर सी अग्रवालशिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखलेनाहेप प्रकल्‍पाचे राष्‍ट्रीय समन्‍वयक डॉ प्रभात कुमारप्राचार्य डॉ अरविंद सावते आदींची उपस्थिती होती.

उद्योगमंत्री मा. ना. श्री सुभाषजी देसाई पुढे म्‍हणाले की, कृषि प्रक्रिया उद्योगाच्‍या विकासासाठी शासनाने अनेक धोरणात्‍मक निर्णय घेतलेले असुन शासकीय योजनाचा कृषिच्‍या विद्यार्थ्‍यींनी कृषि प्रक्रिया उद्योग उभारून लाभ घ्‍यावा. यात कृषि विद्यापीठांची महत्वाची भुमिका राहणार असून विद्यापीठातून शिक्षण घेऊन बाहेर पडणारे स्नातक विद्यार्थी यांना शेतमाल प्रक्रिया उद्योजक होण्‍यासाठी प्रेरित करावे. देशात होणारा शेतीमालाची नासाडी कमी करण्‍यासाठी अद्यावत पुरवठा साखळी तथा मुल्यवर्धनासाठी संशोधन करावे. जिल्हातंर्गत असलेल्‍या औद्योगिक वसाहातीत शेतमाल प्रक्रिया व मुल्यवर्धन उद्योगासाठी भुखंड राखीव ठेऊन सदरील उद्योगांना प्राधान्य देण्यात येत असुन उद्योग विकासाकरिता उद्योगमित्र पुरविण्याचे आश्वासनही त्‍यांनी दिले.

अध्‍यक्षीस भाषणात कुलगुरु मा. डॉ. अशोक ढवण म्‍हणाले की, शेतमाल प्रक्रिया उद्योगात अनेक कृषिचे विद्यार्थ्‍यी कार्यरत असुन ते ग्रामीण युवकांसाठी दिपस्‍तंभाचे कार्य करित आहेत. कृषि प्रक्रिया उद्योगात येणा-या समस्‍या व त्‍यावर उपाय यावर या यशस्‍वी उद्योजकांचे मार्गदर्शन नवउद्योजकांना मोलाचे असुन या वेबिनारच्‍या माध्‍यमातुन निश्चितच फायदा होईल, अशी अपेक्षा व्‍यक्‍त केली.  

नाशिक येथील सह्याद्री फार्मसचे व्‍यवस्थापकीय संचालक मा. श्री विलास शिंदे यांनी शेतक-यांना स्‍वत:चा उत्पादीत शेत मालाची विक्री मुल्‍यवर्धन करून तथा ब्रँडींग करण्यासाठी स्वत:पासूनच प्रयत्न करण्‍याचा सल्‍ला ‍दिला तसेच कृषि विक्री व्यवस्थापन (महाराष्ट्र राज्य, पुणे) व्यवस्थापकीय संचालक मा. श्री सतिश सोनी यांनी महाराष्ट्र पणन महामंडळात असणा-या विविध शासकीय धोरण तथा योजना याबद्दल मार्गदर्शन केले. शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले यांनीही मार्गदर्शन केले.

प्रास्‍ताविकात आयोजन सचिव प्रा. डॉ. राजेश क्षीरसागर यांनी ऑनलाईन वेबीनार आयोजित करण्यामागची भुमिका याबद्दल माहिती दिली तर नाहेप प्रकल्प प्रमुख अन्वेषक प्रा. गोपाळ शिंदे  यांनी नाहेप प्रकल्‍पाबाबत माहिती दिली. सुत्रसंचालन प्रा. डॉ अनुप्रिता जोशी यांनी केले तर आभार प्रा. डॉ शाम गरुड यांनी मानले. सदरील वेबीनारसाठी सुमारे दोन हजारपेक्षा जास्‍त  व्‍यक्‍तींनी ऑनलाईन नोंदणी केली असून त्यामध्ये ५०  टक्के कृषिचे विद्यार्थी,  ३० टक्के शेतकरी बांधव, २० टक्के महिला बचत गट सदस्य, १५ टक्के उद्योजकांचा सहभाग आहे. वेबिणारचे मुख्‍य आयोजक अखिल भारतीय अन्‍न प्रक्रिया उद्योजक संघटनाच्‍या पश्चिम विभागाचे अध्‍यक्ष डॉ प्रबोध हळदेमुंबई येथील फार्म टु फोर्क सोल्‍युशन चे संचालक श्री उमेश कांबळेनाहेप प्रकल्‍पाचे मुख्‍य अन्‍वषेक डॉ गोपाल शिंदे आहेत. सदरिल वेबिणारचे थेट प्रक्षेपण विद्यापीठाचे युटयुब चॅनेल www.youtube.com/user/vnmkv यावर होणार आहे.

वेबीनार च्‍या समारोपीय समारंभ अन्‍न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्‍त मा डॉ अरूण उन्‍हाळे यांच्‍या प्रमुख उपस्थिती पार पडणार असुन  विशेष अतिथी म्‍हणुन नवी दिल्‍ली येथील अखिल भारतीय अन्‍न प्रक्रिया उद्योजक संघटनाचे अध्‍यक्ष मा डॉ सुबोध जिंदाल व भारत सरकारच्‍या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयातील जैव तंत्रज्ञान विभागाच्‍या संचालिका डॉ संगिता कस्‍तुरे उपस्थित राहणार आहेत.

पाच दिवस चालणा-या वेबीनर मध्‍ये देशातील कृषि प्रक्रिया क्षेत्रातील अग्रगण्‍य अशा उद्योगांचे प्रमुख तथा संचालक मार्गदर्शन करणार आहेतया उद्योजकांच्या यशोगाथा प्रत्यक्षपणे त्यांच्या तोंडुन ऐकता येणार असुन त्यात विविध कृषि प्रक्रिया उद्योगांबाबत सखोल चर्चा करणार आहेत. उद्योग उभारतांना उद्योजकांना येणा-­या अडचणीत्यावरील उपायशेतमाल ऑनलाईन पध्दतीने विविध कंपन्यांमार्फत ग्राहकांना विकणेनिर्यात करणेकेंद्र व राज्य शासनाच्या कृषि प्रक्रिया उद्योगाकरीता असणा­-या विविध योजना तसेच गटशेती  व कृषि उद्योग या बाबत माहिती मिळणार आहे. तसेच या उद्योगपतीशी प्रत्यक्ष चर्चाही करता येणार आहे. या ऑनलाईन वेबिनारचा मुख्‍य उद्देश प्रगतशील शेतकरीबचतगटाचे सदस्यशेतकरी गटनवउद्योजकलघुउद्योजक व गृह उद्योजकविद्यार्थी यांना अन्न प्रक्रिया व शेतीपुरक उद्योग सुरू करण्‍यास प्रोत्साहन देणेउद्योग संधीच्या दिशा दाखविणेमनातील उद्यमशीलतेस जागृत करणे हा आहे. कोरोना रोगाच्‍या पार्श्‍वभुमीवर अशा प्रकारचे राज्‍यात ऑनलाईन वेबिनार प्रथमच होत असुन कृषि प्रक्रिया उद्योगातील नविन संधीचा शोध नवउद्योजकांना घेता येईल.