Sunday, February 20, 2022

शिवरायांच्या युद्धनितीतील गनिमी काव्याचे महत्व अनन्यसाधारण…….कुलगुरु डॉ.अशोक ढवण

कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात आयोजित शिवजयंती कार्यक्रमात प्रतिपादन

छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत गनिमी कावा या युद्धनीतीचा अत्यंत प्रभावीपणे वापर केला. यालाच ईंग्रजीत गोरिला वार असे म्हणतात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा या युध्दनीतीचा अभ्यास करण्यात येतो. यात सैनिकांचे कमी संख्याबळ असले तरी बलाढ्य शत्रूला जेरीस आणता येते. शिवरायांनी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात या युद्धतंत्राचा वापर करून शत्रूंचे मनसुबे उधळून लावले. स्वराज्य स्थापनेसाठी त्यांनी अवलंबिलेले तंत्र तसेच त्यांनी कुशल राज्यकर्ता म्हणून राबविलेली अनेक धोरणे यांचे खूप महत्व आहे. विद्यार्थांनी शिवचरित्राचे वाचन करून त्यांचे गुणांचा अवलंब करावा, असे प्रतिपादन कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात दिनांक १९  फेब्रुवारी रोजी आयोजित शिवजयंती कार्यक्रमात अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते.  व्यासपीठावर शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उदय खोडके, जिमखाना उपाध्यक्ष डॉ. राहुल रामटेके आदि मान्यवर उपस्थित होते.

मार्गदर्शनात शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले यांनी शिवरायांच्या शेती विषयक धोरणावर प्रकाश टाकला. ते पुढे म्हणाले कि रयत हाच खरा शिवकालीन शेतीचा आधार होता आणि त्यांचे उत्पन्न हेच राज्याचे उत्पन्न होते. छत्रपती शिवरायांनी शेतकऱ्यांच्या संदर्भात आखलेल्या अनेक प्रकारच्या योजना व त्यांना दिलेल्या सवलती यांचाही उल्लेख त्यांनी केला. प्राचार्य डॉ. उदय खोडके यांनी छत्रपती शिवराय हे नीतिमंत व लोक कल्याणकारी राजे होते. स्वराज्य स्थापनेच्या कार्यात त्यांचेवर खूप मोठी संकटे आली परंतु त्त्यांनी सर्व संकटे मोठ्या चातुर्याने व शौर्याने सामना केला असे प्रतिपादन केले.

मान्यवरांचे हस्ते शिवप्रतिमेचे पूजन आणि द्वीप प्रज्वलन करण्यात आले. रणजीत पाटील या विद्यार्थ्याने शिवगर्जना सादर केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. राहुल रामटेके यांनी केले. सूत्रसंचालन कु. राजश्री पाटील व श्री साबळे या विद्यार्थांनी केले तर प्रा. मधुकर मोरे यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. श्याम गरुड आणि सहाव्या सत्राचे सर्व विद्यार्थी यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील विभाग प्रमुख डॉ. स्मिता खोडके, डॉ. स्मिता सोलंकी, डॉ. हरीश आवारी, प्रा. विवेकानंद भोसले, सर्व प्राध्यापक,  कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.