Sunday, August 21, 2022

कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात सद्भावना दिन साजरा

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात दिनांक २० ऑगस्‍ट रोजी माजी पंतप्रधान स्‍व. राजीव गांधी यांची जयंतीदिनी सद्भावना दिन साजरा करण्‍यात आला. प्राचार्य डॉ उदय खोडके यांनी स्‍व. राजीव गांधी यांच्‍या प्रतिमेस अभिवादन करून सामुदा‍यिक सदभावना प्रतिज्ञेचे वाचन करण्‍यात आले. सरकारच्या निर्देशानुसार २० ऑगस्ट ते पाच सप्टेंबर या कालावधीच ‘सामाजिक ऐक्य पंधरवडा’ साजरा केला जाणार आहे.

जात, वंश, धर्म, प्रदेश किंवा भाषा विषयक भेद न करता सर्व भारतीय जनतेचे भावनिक ऐक्य आणि सामंजस्यासाठी काम करावे अशी प्राचार्य डॉ उदय खोडके यांनी सर्वांना प्रतिज्ञा दिली. तसेच कोणत्याही प्रकारच्या हिंसाचाराचा अवलंब न करता वैयक्तिक किंवा सामूहिक स्वरुपाचे सर्व मतभेद विचार विनिमय करून संविधानिक मार्गाचा अवलंब करून विविध प्रश्न सोडवू असेही प्रतिपादन त्‍यांनी केले.

कार्यक्रम यशस्‍वीतेकरिता कार्यक्रमाधिकारी डॉ. रवींद्र शिंदे, प्रा. दत्तात्रय पाटील, मंचक डोंबे, सुनिता तळेकर, नारायण राऊत, शुभांगी महाजन, अरुण ताटे, स्वयंसेविका गायत्री वाणी, जानवी  चव्हाण, मयूर राऊत, अक्षय कोटरंगे, प्रतीक्षा जोंधळे, श्रेयस वाजे, साक्षी दवणे आदींनी परिश्रम घेतले.