Wednesday, September 25, 2024

शेतकऱ्यांना हवामान बदलानुरूप तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्याची गरज... कुलगुरु मा डॉ. इन्द्र मणि

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सेंद्रीय शेती प्रशिक्षण व संवाद मालिकेचा १३ वा भाग हवामान बदल आणि शेती व्यवस्थापन या विषयावर दिनांक २४ सप्टेंबर रोजी कुलगुरु मा. (प्रा.) डॉ. इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन संपन्न झाला. प्रमुख वक्ते जेष्ठ हवामान शास्त्रज्ञ डॉ. रामचंद्र साबळे हे होते. यावेळी संशोधन संचालक डॉ. खिजर बेग यांची उपस्थिती होती.  

अध्यक्षीय भाषणात कुलगुरु मा. (प्रा.) डॉ. इन्द्र मणि म्हणाले कीहवामान बदलामुळे सर्वच क्षेत्रात कमालीची अनिश्चितता जाणवत आहे. याचा कृषि क्षेत्रावर दूरगामी आणि विपरीत परिणाम दिसून येत आहेत. हवामान बदलानुसार तंत्रज्ञान विकासासाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध व्यासपीठांवर विचार मंथन होत आहे. विद्यापीठानेही हवामान बदलानुरूप तंत्रज्ञान विकसित करून नीक्रा प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहचविले आहे. यामध्ये असलेले कोरडवाहू शेती तंत्रज्ञान जसे की, बीबीएफ़ लागवड पद्धत, आंतरपीक पद्धत, एकात्मिक शेती पद्धती, शेततळे तंत्रज्ञान, पोटाशियम नायट्रेटची फवारणी, विहीर पुनर्भरण, कुपनलिका पुनर्भरण, कमीत कमी संरक्षित सिंचन, सिंचनाच्या आधुनिक पद्धती, अधिक पावसात निचरा चर, बीबीएफ़ लागवड पद्धत, योग्य वाणांचा वापर, पिक संरक्षण याचा अवलंब करावा. युवकांनी शेती उद्योगात पुढाकार घेवून या तंत्रज्ञानाचा अवलंब करावा. त्यांना प्रेरणा, पाठबळ आणि हवामान बदलानुरूप तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्याची गरज आहे असे प्रतिपादन केले .

प्रमुख वक्ते जेष्ठ हवामान शास्त्रज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी मार्गदर्शन करतांना मान्सूनचे नैरुत्य आणि ईशान्य असे दोन मुख्य प्रकार सांगून तापमान वाढ आणि त्याअनुषंगाने हवामान बदल ही संकल्पना पुढे आली असे सांगितले. हवामान बदलामुळे होणारे परिणामास सामोरे जावे लागत आहे. कृषि क्षेत्र आणि कृषि उत्पादनावर मोठा विपरीत परिणाम होत आहे. यासोबतच सुपीक मातीचा थर वाहून जाणे, अन्नद्रव्यांचा ऱ्हास, उत्पादनातील घट, मानवी व पशुधनाचे आरोग्य यावर विपरीत परिणाम होत आहे. त्यांनी  हवामानाचा अंदाज व सद्यस्थितीपाऊसमानवाऱ्याचा वेग व यांचा पिकांवर होणारा परिणाम सांगून या अंदाजानुसार  सद्य‌स्थितीत पीक व्यवस्थापनासाठी मार्गदर्शन केले. यासाठी मागील ५ ते १० वर्षाच्या अभ्यासावरून पीक नियोजनात व पीक पद्धतीत बदल करणे आवश्यक आहे. हलक्या आणि कोरडवाहू जमिनीवर कपाशी ऐवजी इतर पीक, कडधान्य पिकांचा पीक पद्धतीत समावेश, ज्वारी, मका, बाजरी, यावर भर देणे आवश्यक आहे असे सांगितले. संरक्षित शेतीवर यापुढील कालावधीमध्ये भर द्यावा लागेल ५ ते १० किंवा २० गुंठे पासून सुरुवात करून भाजीपाला, फुलशेती यावर भर देणे ही काळाची गरज आहे. शेतीला पूरक जोडधंद्याची जोड देवून एकात्मिक शेती पद्धतीच्या माध्यमातून हवामान बदलामुळे वाढलेली जोखीम कमी करता येईल. सेंद्रीय शेतीच्या माध्यमातून लागवडीवरील खर्च कमी करणे, जमिनीचे आरोग्य सुधारणे, सकस उत्पादन घेणे या बाबी साध्य करता येतील व त्याद्वारेही हवामान बदलाचे परिणाम कमी करता येतील.  फळपिक लागवड आणि एकूणच पीक विविधीकरणाकडे वळणे क्रमप्राप्त आहे असे त्यांनी असे प्रतिपादन केले.

या कार्यक्रमात मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांसह अकोला, सातारासांगली, कोल्हापूर, नंदुरबार, अहमदनगरनागपूरयेथून ऑनलाईन सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे शेतीविषयक समस्या विचारल्या, त्यास डॉ. रामचंद्र साबळे यांच्यासह विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ. आनंद गोरेडॉ. पुरुषोत्तम नेहरकर, डॉ. अरुण गुट्टे,  डॉ. वसंत सूर्यवंशीडॉ. सूर्यकांत पवारडॉ. अनंत लाड, डॉ. किशोर झाडे, डॉ. कैलास डाखोरे, डॉ. पपीता गौरखेडे यांनी उत्तरे देऊन समाधान केले.    

कार्यक्रमाचे आयोजन संशोधन संचालक डॉ. खिजर बेग यांच्या मार्गदर्शनाखाली सेंद्रीय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख अन्वेषक डॉ. आनंद गोरे आणि  मृदा शास्त्रज्ञ डॉ. पपिता गौरखेडे यांनी केले. याकार्यक्रमाचे प्रक्षेपण झूम मिटिंगयु टूबफेसबुक या सामाजिक माध्यमाद्वारे करण्यात आले.