सहयोगी
अधिष्ठाता डॉ. राहुल रामटेके यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, विद्यार्थी
जेव्हा वर्गाबाहेर जाऊन खऱ्या परिस्थितीत काम करतात, तेव्हा त्यांना
प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याची संधी मिळते. हे शिक्षण केवळ सैद्धांतिक मर्यादेत न राहता,
त्यातून वास्तवातील ज्ञान आत्मसात करता येते. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये
आत्मविश्वास, तांत्रिक कौशल्ये व व्यावसायिक समज वाढीस लागते.
या
उपक्रमाचे समन्वयक डॉ. मधुकर मोरे यांनी सांगितले की, अनुभवात्मक
शिक्षण ही एक अशी प्रक्रिया आहे ज्यामध्ये विद्यार्थी कृतीतून शिकतात. या उपक्रमात
२०२५-२६ शैक्षणिक वर्षातील एकूण ३५ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली असून त्यांना
एन. बी. एस. एस. अँड एल. यु. पी., नागपूर; सी. एफ. टी. आर. आय., म्हैसूर; जीओटेक अँड जीआयएस ट्रेनिंग इन्स्टिटयूट, छत्रपती संभाजीनगर;
जे. फार्म अँड मेकानायझेशन सेंटर, चेन्नई (परभणी
कृषि विद्यापीठ परिसर); ऍग्रीनेक्स्ट कन्सल्टन्सी; सनब्लिस सोलर पी. व्ही. ट्रेनिंग इन्स्टिटयूट, पुणे;
आणि हरित गृह कंपनी, सांगली या संस्थांमध्ये पाठविण्यात
आले आहे.
या
कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणी महाविद्यालयाचे शिक्षण विभाग प्रभारी प्रा. विवेकानंद
भोसले तसेच विभागप्रमुख डॉ. मदन पेंडके, डॉ. हरीश आवारी, डॉ. रघुनाथ जायभाये, डॉ. सुभाष विखे, डॉ. गोपाळ शिंदे, प्रा. दत्तात्रय पाटील, डॉ. अनिकेत वाईकर, डॉ. शैलजा देशवेंना, डॉ. गजानन वसू, डॉ. अश्विनी गावंडे, डॉ. ओंकार गुप्ता आणि इतर शिक्षक-प्राध्यापकांचे मार्गदर्शनात होणार आहे.
विद्यार्थ्यांना
प्रत्यक्ष औद्योगिक परिस्थितीत कार्य करण्याची संधी देणारा हा उपक्रम भविष्यातील सक्षम
कृषि अभियंत्यांचे घडवण्यासाठी निश्चितच उपयुक्त ठरेल, असा विश्वास
महाविद्यालय प्रशासनाने यानिमित्ताने व्यक्त केला आहे.