वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी यांच्या वतीने विद्यापीठाचे
माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या संकल्पनेतून आणि विस्तार शिक्षण
संचालक डॉ. राकेश अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली "माझा एक दिवस माझ्या
बळीराजा सोबत" हा अभिनव उपक्रम आणि विकसित कृषी संकल्प अभियानांतर्गत विविध विस्तार
कार्ये मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमध्ये दिनांक ११ जून रोजी यशस्वीरित्या
राबविण्यात आला.
या उपक्रमांतर्गत विद्यापीठातील १६ शास्त्रज्ञांच्या चमूमधील ४८ शास्त्रज्ञांनी
१९ गावांमध्ये ९७२ हून अधिक शेतकऱ्यांशी थेट संवाद साधत प्रक्षेत्र भेटी, चर्चासत्रे,
कृती प्रात्यक्षिके, आणि शेतकरी मेळावे घेतले.
शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करत त्यांना विविध पिकांच्या तंत्रज्ञानासह
हवामान बदलाच्या अनुषंगाने मार्गदर्शन करण्यात आले.
परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्याच्या मौजे आव्हाई येथे आयोजित मुख्य कार्यक्रमाच्या
अध्यक्षस्थानी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.)
इन्द्र मणि हे ऑनलाईन उपस्थित होते. यावेळी गावचे उपसरपंच श्री.गिरी, विद्यापीठाचे
विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ.
प्रशांत देशमुख, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. प्रशांत
भोसले तसेच कृषी शास्त्रज्ञ डॉ. दिगंबर पटाईत, डॉ. गजानन
गडदे, डॉ. चंद्रशेखर आंबडकर आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
मार्गदर्शनात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी विद्यापीठास भारतीय
कृषि अनुसंधान परिषदेच्या (आयसीएआर) राष्ट्रीय कृषि शिक्षण
अधिस्वीकृती समितीद्वारा प्रतिष्ठेचे ‘ए ग्रेड’ मानांकनासह अधिस्वीकृती प्रदान करण्यात आली असून, या मूल्यांकनात विद्यापीठास उच्चांकी
‘३.२१’ गुण प्राप्त झाले आहे असे सांगून हा सन्मान
शेतकरी आणि विद्यार्थ्यांना समर्पित केला. याबरोबरच शेतकऱ्यांशी संवाद साधत
त्यांना शाश्वत शेतीचे उपाय सांगत प्रेरणा दिली आणि विद्यापीठ सदैव त्यांच्या
सेवेत तत्पर असल्याचे आश्वासन दिले. यावेळी उपस्थित सर्व शेतकऱ्यांनी मा. कुलगुरू यांचे
याबद्दल अभिनंदन व्यक्त केले.
विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांनी सांगितले की, विकसित कृषी
संकल्प अभियानाच्या माध्यमातून दररोज ६ गावांमध्ये शास्त्रज्ञांची टीम जाऊन
शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मार्गदर्शन करत आहे. हे अभियान केवळ नव्या तंत्रज्ञानाचा
प्रचार न करता, शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी
झपाट्याने कार्यरत आहे. शेतकऱ्यांना शेतीचा उत्पादन वाढविण्यासोबत उत्पादन खर्च
कमी करण्यावरही भर द्यावा असे आवर्जून सांगितले त्यांनी विद्यापीठात उपलब्ध
असलेल्या विविध निविष्ठांचा आपल्या शेतीमध्ये वापर करण्याचे आवाहन केले.
यावेळी मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख यांनी विद्यापीठा
तर्फे शेतकऱ्यांसाठी दर मंगळवार व दर शुक्रवारी घेण्यात येणाऱ्या शेतकरी शास्त्रज्ञ
सुसंवाद कार्यक्रमाची माहिती देऊन शेतकऱ्यांना या कार्यक्रमात सहभागी होऊन आपल्या
अडचणी सोडविण्याचे आवाहन केले.
दरम्यान कार्यक्रमात शेतकऱ्यांनी आव्हाई गावात हळद, सोयाबीन आणि कापूस
ही प्रमुख नगदी पिके घेतली जातात. परंतु विशेषतः हळद पिकात बुरशीजन्य रोग, कंदकुज व करपा यांसारख्या समस्यांमुळे उत्पादनात घट जाणवत असल्याचे नमूद
केले. या पार्श्वभूमीवर डॉ. गजानन गडदे आणि डॉ. आंबडकर यांनी बियाणे प्रक्रिया,
माती परीक्षण आणि जैविक उपाययोजनांवर सखोल मार्गदर्शन केले.
विद्यापीठाने विकसित केलेले बायोमिक्स व ट्रायकोडर्मा यांसारख्या जैविक घटकांचा
वापर रासायनिक खतांच्या तुलनेत अधिक फायदेशीर ठरेल, असेही
त्यांनी सांगितले.
डॉ. प्रशांत भोसले यांनी केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती
देत त्याचा लाभ कसा घ्यावा यावर भर दिला. शेतकरी श्री जळबाजी बुचाले यांनी अनुभव
सांगताना नमूद केले की, पिके घेण्याआधी माती तपासणी व शिफारसीनुसारच खते वापरणे फायदेशीर ठरत आहे.
महा विस्तार AI अॅपच्या वापरामुळे शेतातच अचूक सल्ला मिळत
आहे, त्यामुळे खर्चही कमी होतो. या चर्चासत्रात शेतकऱ्यांनी
उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन आपल्या शेतीविषयक समस्या मांडल्या.
या उपक्रमांतर्गत दुसऱ्या कार्यक्रमात मौजे. नांदगाव (ता. जि. परभणी) येथे संशोधन
संचालक डॉ. खिजर बेग, सेंद्रीय शेती संशोधन केंद्र येथील शास्त्रज्ञ डॉ. आनंद गोरे, डॉ. बी. एस. कलालबंडी, डॉ. पपीता गौरखेडे, डॉ. आनंद दौंडे यांनी शेतकऱ्यांना
मार्गदर्शन केले तसेच प्रगतशील शेतकरी श्री. अच्युतराव जवंजाळ यांच्या शेतावर भेट
देऊन, केळी, ऊस, खजूर
पिकांची पाहणी केली. यामध्ये केळी पिकात अती वाऱ्यामुळे झालेले नुकसान कमी
करण्याचे उपाय, केळीची अतिरिक्त वाढणारी पील काढण्याचे अवजार,
खरीप पिकांचे नियोजन, विविध वाण, खरीप पिकासाठी बीज प्रक्रिया, ऊस पिकात पाचट कुजवणे,
खोडवा पिकासाठी आधुनिक यंत्र
इत्यादी विषयावर चर्चा संपन्न झाली.
याबरोबरच विद्यापीठाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ बाबासाहेब
ठोंबरे, डॉ वासुदेव नारखडे, शास्त्रज्ञ
डॉ सूर्यकांत
पवार, डॉ संजय पाटील, डॉ. मोहन धुप्पे, डॉ शिवाजी शिंदे, डॉ. वसंत प्र. सूर्यवंशी, प्रा अरुण गुट्टे, डॉ.
गणेश गायकवाड डॉ.
बसवराज भेदे डॉ. पवन ढोके, , डॉ व्यकट जगताप व डॉ
अनिलकुमार कांबळे, डॉ हनुमान गरुड प्रा किशोर जगताप डॉ डी एम फिरके डॉ तारकनाथ, डॉ. पी एस देशमुख, डॉ. सोमवंशी डॉ. गीते, डॉ. तडावी, डॉ. आर. एस. राऊत यांनी विविध ठिकाणी
शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून प्रक्षेत्रास भेटी दिल्या.