Thursday, August 29, 2024

एक पेड मॉ के नाम अभियानात वनामकृविद्वारा २८१० वृक्षांची लागवड

 कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि यांच्या मार्गदर्शनात अभियानामध्ये अधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

भारताचे माननीय पंतप्रधानांनी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून आईच्या नावाने एक झाड –एक पेड मॉ के नाम – Plant4Mother हे अभियान सुरू केले. या अभियानांतर्गत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि यांच्या मार्गदर्शनाखाली वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या परभणी येथील परिसरात तसेच विद्यापीठाच्या संपूर्ण मराठवाड्याच्या कार्यक्षेत्रातील सर्व कार्यालयांनी दिनांक २९ ऑगस्ट रोजी वृक्षारोपण केले. या जागतिक अभियानात विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. उदय खोडके, विद्यापीठ अभियंता डॉ. दीपक कशाळकर, नियंत्रक श्री. प्रवीण निर्मळ, सहयोगी अधिष्ठाता डॉ. सय्यद इस्माईल, सहयोगी अधिष्ठाता डॉ. जया बंगाळे,  सहयोगी अधिष्ठाता डॉ. विश्वनाथ खंदारे, विभाग प्रमुख डॉ. राजेश कदम, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. पुरुषोत्तम झंवर, उप-विद्यापीठ अभियंता डॉ. दयानंद टेकाळे यांच्या शुभहस्ते वैद्यनाथ वसतीगृहाच्या मैदान परिसरात त्यांनी त्यांच्या आईसाठी वृक्षारोपण केले तर विस्तार शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या बीड जिल्ह्यातील खामगाव येथील कृषी विज्ञान केंद्रात त्यांच्या आईच्या नावाने एक झाड लावले आणि संशोधन संचालक डॉ. खिजर बेग,  कुलसचिव डॉ संतोष वेणीकर यांनी नांदेड येथील कापूस संशोधन केंद्रात व कृषीतंत्र विद्यालयात आणि सहयोगी अधिष्ठाता (शिक्षण) डॉ गजेंद्र लोंढे यांनी पशुसंवर्धन व दुग्ध शास्त्र विभागात वृक्षारोपण केले. तसेच सामुदायिक विज्ञान महाविद्यालयात देखील सहयोगी अधिष्ठाता डॉ. जया बंगाळे यांच्यासह सर्व अधिकाऱ्यांनी आणि विद्यार्थ्यांनी आपल्या आईच्या नावाने एक-एक झाड लावले. याबरोबरच विद्यापीठाच्या सर्व महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता, विभाग प्रमुख, कार्यालय प्रमुख, कृषि विज्ञान केंद्राचे मुख्य शास्त्रज्ञ, कृषि तंत्र विद्यालयाचे प्राचार्य, तसेच इतर कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी त्यांच्या कार्यालयाच्या परिसरात तसेच प्रक्षेत्रावर त्यांच्या आईच्या नावाने वृक्षारोपण केले. या जागतिक मोहिमे अंतर्गत विद्यापीठातील एकूण ३५०  अधिकारी तसेच कर्मचारी यांनी सहभाग घेतला व त्यांनी एकूण २८१० वृक्षांची लागवड केली. या अभियानातून विद्यापीठामध्ये वृक्षरोपणाची एक चळवळ सुरू झाली असून विद्यापीठातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होत वृक्षारोपण करून आपल्या मातेला तसेच पृथ्वीमातेला मानवंदना दिली.

या अभियानांतर्गत सप्टेंबर २०२४ पर्यंत देशभरात ८० कोटी रोपे आणि मार्च २०२५ पर्यंत १४० कोटी रोपे लावण्याचा प्रयत्न केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाद्वारे केला जात असून याद्वारे हे उद्दिष्ट देखील पूर्ण होत आहे तसेच वृक्ष लागवडीतून माती, पाण्याची गुणवत्ता सुधारून आणि जैवविविधता वाढवून शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी मदत होत आहे.